(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

अतूल्य आणि अमूल्य

  सिंह महाराजांना एकेदिवशी वाटले की, श्रीयूत अमिताभ बच्चन जे कोणी आहेत ते एवढे, कधी असे तरकधी तसे, कधी गाऊन तर कधी कविता वाचून, कधी भारताच्या ड्रेसमध्ये तर कधी इंडियाच्या पोषाखातसांगतात की, पर्यटनाला चला, पर्यटनाला चला. तेव्हा आपण सुध्दा त्याचं म्हणणं ऐकलं पाहिजे. 

  त्यांनी याबाबत महाराणिंशी चर्चा केली. त्यांना ही कल्पना उत्तम वाटली.

  कित्ती वर्षे झाली होती. ते दोघेही त्यांच्या जंगलाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या तलावाकडे सुध्दाफिरकले नव्हते. सिंह महाराजांचं काय, ते तर महाराजच! खा,प्या,आराम करा. वाटलं तर मान वाकडीकरु डरकाळी फोडा. दोन तीन किलोमीटर फेफटका मारा. संपलं त्यांचं आयुष्य. आपण खरोखरच राजेआहोत का? असलो तर आपले राज्य किती चौरस फुटाचे आहे ? याची माहिती नको का यांना. पण काहीनाही. ठेविले अनंत तैसेची राहावे. असे हे महाराज. यांना यांच्या लहान मुलाचं नाव सोम्या की मोठ्यामुलाचं नाव गोम्या हे सुध्दा सांगता यायचं नाही. कसा काय यांना जंगलाचा सम्राट म्हणतात, उपरवलाचजाणे.

  असे, काहीबाही विचार महाराणींना अधूनमधून येत राहत. त्यामुळे दस्तुरखुद्द महाराजच जेव्हा पर्यटनासजाऊ या का, असे म्हणाले तेव्हा त्यांचा आधी स्वत:वरच विश्वास बसला नाही. त्यांनी महाराजांना त्यांच्यानाजूक गालास पंजाची नखे लावण्याची विनंती केली.

  मिसेस मंडळींचं आपलं नेहमीच असं काहीतरी ढिमकं असतं, असं गालातल्या गालात संवाद करीतमहाराजांनी महाराणींच्या गालाला पंजा लावला. त्यांची तीक्ष्ण नखं महाराणींच्या गालास रुतली. महाराजझोपेत नाहीत याची खात्री महाराणींना झाली. ज्या कुणी अमिताभ बच्चन नामक सद्गृहस्थाने ही सद्बुध्दीमहाराजास दिली त्यांची पंचाआरती ओवाळण्याचा मनोमन प्रण त्यांनी केला. त्याचवेळी महाराजांना मिठीमारण्याचा मोहही त्यांना झाला. पण तो त्यांनी लगेच बाजूला सारला. कारण त्यामुळे पर्यटन बाजूलाच राहूनमहाराजांना इश्काच्या गजला आणि प्रेमाचे सुनित सुचतील, अशी रास्त शंका येऊन त्यांनी महाराजांकडे प्रेमानंपाहिलं आणि चला निघू या की, असं त्या लाडिकपणे महाराजांना म्हणाल्या.

  पर्यटनाच्या नुसत्या विचारात इतका लाडिकपणा दडलेला असतो, असं महाराज पहिल्यांदाच बघत होते. त्या कुणा अमिताभ बच्चन यांसी आपण निशाने -ई- गिर अशी सर्वोच्च पदवी देऊन सन्मान करु असामनोमन निश्चय करुन त्यांनी महाराणींसोबत पर्यटनासाठी प्रस्थान केले.

  रमतगमत दोघांची छान भ्रमंती सुरु झाली. आपल्या जगाच्या बाहेर इतकं सारं असतं हे बघून दोघांचेहीडोळे विस्फारले. आपणास जंगलाचे राजे बनवण्याचा कट कुणीतरी केला असावा अन्यथा आपणच जंगलाच्याबाहेरच्या या राज्याचे महाराज झालो असतो. त्यामुळे आपणास पर्यटनाची मजा मजा करता आली असती, असे विचार महाराजांच्या मनी आले.

  भ्रमंती करता करता महाराज आणि महाराणी एका भव्यदिव्य मंदिराच्या समिप आले. नुकतीच पूजा झालीहोती. पुजारी आणि भक्तमंडळी घरी गेली होती. परिसर शांत होता. दोघांनी मंदिराकडे निरखून बघितले. मंदिराच्या प्रवेशद्वारावर त्यांच्या चेहऱ्यासारखे चेहरे असणारे दोन सिंह सुरक्षारक्षकासारखे स्थानापन्न झाले होते. आपण इथे कधी बाँ आलो,असा प्रश्न महाराजांना पडला. महाराजांचा तिबल रोल कसा काय शक्य आहे, असा प्रश्न महाराणींना पडला.  ही भानगड आहे तरी काय हे बघण्यासाठी महाराज जरा पुढे सरसावले. त्यांनी त्या स्थानापन्न सिंहांच्या चेहऱ्यास पंजा लावून बघितला, पण त्यांनी ना डरकाळी फोडली, ना चलोहटो मेरे नजरोसे असंही ते बडबडले. काय हा चमत्कार? महाराज आणि महाराणी या दोघांनीही एकमेकांकडेचमकून बघितलं.

  महाराणींनी भित भित त्या स्थानापन्न सिहांच्या तोंडात काहीतरी दिसते म्हणून पंजा घातला. त्यांना तिथेखोबऱ्याचे तुकडे दिसले.

  शी गड्या, महाराणी म्हणाल्या. हा कसला सिंह खोबरं खाणारा.

  महाराजांना आश्चर्याचा धक्काच बसला. सिंहाने कलेजी खायची असते. सिहांने खोबरे खायचे नसते असेत्यांना प्राथमिक शिक्षणाच्या पहिल्याच इयत्तेत सांगण्यात आले होते. तो अभ्यासक्रम आपण अद्यापबदललेला नसताना या दोघांना खोबरे खाऊ घालण्याची गुस्ताखी करणारा कोण, असा सवाल महाराजांच्यामनी येऊन ते लालबुंद झाले. संतापाने थरथरु लागले. त्या शिक्षणाचा हा अपमान असून तो करणाऱ्यासशिक्षा झालीच पाहिजे असे त्यांना वाटू लागले. महाराणींनी त्यांना कसेबसे शांत केले.

  हा आपल्यातल्या सिंह नाही महाराज, त्या म्हणाल्या. हा या पर्यटनाच्या जगातला सिंह आहे.तोव्हेजेटेरियन राहू शकतो ना. व्हेजेटेरियन राहिलं की हार्टचे प्रश्न निर्माण होत नाही असं नाही ते कुणी तरीअमिताभ बच्चनच सांगतात. ते स्वत: व्हेजेटेरिअनच आहेत.

  म्हणजे इकडच्या सिहांना हार्ट आहे नि तिकडचे सिंह काय हार्टलेस आहेत. महाराज गरजता गरजताराहिले.

  काय हा काळ आला, हेच बघणे नशिबी होते का. सिंह खोबरे खातो? किती ही अवनती. सिंहाने कसेसिहांसारखेच राहिले पाहिजे. खाल्ले पाहिजे. झोपले पाहिजे. खोबरे खाणारा सिंह राहूच शकत नाही. महाराणींकडे बघत महाराज म्हणाले.

  महाराज एवढे वाइट वाटून घेऊ नका, हे दोघे कदाचित सिंहांचे कातडे पांघरलेले बैल असतील. त्यांनाचालतं खोबरं. फार विचार करु नका अन्यथा तुमच्या डोक्याचं खोबरं व्हायचं. झाली इतकी भ्रमंती पुरेझाली. डोक्याला ताप देणारे असे दृष्य बघण्यापेक्षा आपले राज्यच बरे नाही का, चला जाऊ परत. लेकरंवाट बघत असतील.मिसेस महाराणी  म्हणाल्या. पर्यटन अर्धवट टाकून महाराज माघारी फिरले.

000