(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

अर्नाळरांच्या (कथितहत्येचं वृत्त

अर्नाळकरांच्या हत्येचे वृत्त आले नि खळबळ माजली. पण हे कसं शक्य आहे?  कारण अर्नाळकरांचा नैसर्गिकरीत्यामृत्यू झाला होता. मृत्यू पावलेल्याची हत्या करण्याची अद्भूत क्षमता कुणामध्ये असावी? या सवालाने समस्त मराठी सारस्वतमंडळ बैचन झालं.

घटनाच तशी होती. हत्येची सुई फडक्यांच्या दिशेनं सरकवण्याचा प्रयत्न झाला. पण फडके कुठे नि अर्नाळकर कुठे, असा एक आंबट-चिंबट तर्क समोर आला. फडक्यांचं एक युग वगैरं होतं. ते वगैरं असल्यानं पुढे विस्मृतीत गेलं, असं एक ज्येष्ठसाहित्यरत्न म्हणून गेला. आता या जेष्ठास सिगारेटचं चटकेबिटके फडके देतात की काय, असं वाटून दुसऱ्या ज्येष्ठास दरदरूनघाम सुटला. एवढेच नव्हे तर त्यांनी मोठ्या कष्टाने लघुशंका थांबवली.

मुद्दा युगाचा होता. कारण फडक्यांच्या भाळी एक युग, हे कुंकू नाही म्हंटले तरी आहेच ना. पण अर्नाळकराचं तसं नाही. ते कोणीच नव्हते. असंख्य कांदबऱ्या लिहणं म्हणंजे युगनिर्मिती नव्हे. मग असं असताना त्यांचीच हत्या कां व्हावी? हा सवालफडक्यांनी खांडेकरांच्या समोर टाकला.

हा सवाल म्हणजे, माझी हत्या कां झाली नाही, असं तर तुम्हास म्हणावयाचे नाही ना, असं खांडेकर काहीसं पुटपुटले.

तेंडुलकर म्हणाले, मी जिवंत असतानाच अनेकदा माझी हत्या करण्याचा प्रयत्न झाला. पण अर्नाळकराची मृत्यूनंतरचीहत्या म्हणजे घाशीरामाचे नवे षडयंत्र तर नसेल ना ?

यावर हसावं का रडावं की मख्ख बसावं, हे न कळून काळे वदले, तेंडुलकरांचं असंच तिसऱ्या कोनातलं वागणं बोलणंअसतं नि वर पुन्हा हे सर्व कोठून येतं असा सवालही करण्यात तेच असतात आघाडीवर.

आघाडी जेव्हा जेव्हा होते, तेव्हा तेव्हा त्याक्षणी बिघाडीची बीजे रोवली जातात. असं फिस्सकन हसत देशपांडे उद्गारले.

कोट्या केल्याशिवाय देशपांडेना भूकच लागत नाही. देसाई गरजले.

ही गैरफिजुली चर्चा म्हत्वाची नसून अर्नाळकरांच्या हत्येच्या घटनेचं गांभीर्य ओळखा जरा, माडगुळकर ओरडले.

त्यांच्या हत्येची सुपारी आपण दिल्याचं कुणी म्हणालं वा असा संशय जरी घेतला तरी ते आपणास नाही कामानहानीकारक होणार ? गाडगीळ बोलून गेलं.

पण असं कसं घडू शकतं ? कुणाची हत्या करण्याची आपली क्षमता आणि हिम्मत तरी आहे का ? इनामदारांनी थेटसवालच केला.

अर्नाळकरांची हत्या एवढी मोठी घटना असावी की, जेष्ट सारस्वतांनी त्यावर इतकं मंथन करावं, आपलं काही तरीचुकत तर नाहीय ना  ? भागवत बोलून गेले.

अर्नाळकरांच्या हत्येची सुई गरगरा फिरत ती जर एखाद्याकडे दिशादिग्दर्शित करती झाली तर समस्त साहित्य प्रभुंसाठीतो कलंकच ठरायचा. सावंतांनी मुद्दा मांडला.

आपल्या अंगतीपंगतीत सामील होण्याची श्रेणी संपादन करण्याची क्षमता ज्यांना जिवंतपणी प्राप्त होऊ शकली नाहीत्या अर्नाळकरांच्या हत्येला आपण कसे काय जबाबदार? यादव खंतावले.

ही खरोखरच हत्या आहे की अफवाच, याचा सर्वप्रथम शोध घेतला पाहिजे. कानेकटकारांनी सूचना केली.

या सूचनेनुसार मग एक शोध समिती स्थापन्यात आली. दळवींना त्याचे अध्यक्षपद देण्यात आले. समितीने शोधाशोधसुरु केली. या शोधामोहिमेत एके दिवशी समितीला अर्नाळकरच रस्त्यात भेटले. त्यांना बघून दळवी समिती चपापलीच. घाबरली सुध्दा. एकदा मृत्यू  आणि दुसऱ्यांदा हत्या होऊनही अर्नाळकर जिवंत कसे ?  हा सवाल दळवींचा मनी आला. त्यांनाघाम फुटून ते बेशुध्द पडले. शिरवाडकरांना शब्द फुटेनासे झाले. चोरघडे कसे बसे अर्नाळकरांशी संवाद साधते झाले,

र्ना , तुम्ही कसे बरे  इथे?

म्हणजे.. अर्नाळकरांनी आश्चर्यानं विचारलं.

तेव्हा चोरघड्यांनी एक विधान अर्नाळकरांच्या हाती डकवलं, ते विधान असं होतं की….मुले मराठी वाचत नसतील, त्यांना वाचनाची गोडी नसेल, तर सर्व आईबापांनी त्यांना अर्नाळकरांच्या पुस्तकांची चटक अवश्य लावावी. पहा कितीचांगला परिमाण होतो ते. –इती एलकुंचवार.

हे विधान कर्नपटलावर पडताच अर्नाळकरांनी डोळे विस्फारले. आँ वासला.

हे असं डोळं विस्फारणं आणि आँ वासनं अर्नाळकरांना तिसऱ्यांदा मृत्यूच्या दाढेत ढकलेल की काय  ? अशी भीतीवाटून समितीने अर्नाळकरांना तिथेच ठेऊन पळ काढला….