आनंदाचं झाड
आपलं आयुष्य आनंदी ठेवायचं असेल तर आपल्या अंर्तमनात दडलेलं मूल आपण कायमच जागृत ठेवायला हवं. मुलांना फुलांची उपमा दिली जाते. कोणत्याही रंगांचं, गंधाचं फूल आपण जेव्हा आपल्या पुढ्यात येतं,तेव्हाआपलं मन आनंदून जातं. प्रसन्न होतच. तसच मुलांचही आहे. बागडणाऱ्या छोट्या मुलांकडे कोणत्याही क्षणीबघा, आपणास चार क्षण सुखावून जातात.
आपण जेव्हा बालपणाच्या पर्वात असतो तेव्हा इतरांना आणि आपल्या कुटुंबियांसाठी आनंदाचं झाडचअसतो की. वय वाढतं नि बालपणाच्या पर्वावर आपणच पडदा टाकतो. बालपण सरतं मात्र मनाच्या एककोपऱ्यात आपल्यातलच छोटं मूल तसच असतं. त्याला तसच बागडावं , उंडारावं, खेळावं ,गावं आणि जेकाही बालपणी केलेलं असतं ते सारं काही करावं वाटतच असतं. पण आपल्यापैकी कितीजण मनातल्या याछोट्यामुलास ही संधी देतात?
वयपरत्वे बदलणं स्वाभाविक
वयपरत्वे सारं काही बदलणं स्वाभाविक असलं तरी मनातल्या त्या खेळकर छोट्या मुलास नंतर नंतरत्याच्या मनासारखं करायचं संधीच देत नाही. आपला मुलगा/मुलगी कार्टून नेटवर्क मजेत बघत असतील तेव्हातुमच्या मनातील छोट्या मुलालाही त्याचा आनंद घ्यावा वाटू शकतो, बरेचदा. पण आपण ती संधी त्याला देतनाही. उलट मुलांनाच किती बसता कार्टूनला चिटकून असं बोलून त्यांच्या आनंदावर विरजणही घालण्याचाप्रयत्नच करतोच. छोट्या मुलांची मासिकं बालपणाच्या पर्वात आपण वाचलेली असतात. दिवाळसणात तरहमखासच. पण आता मात्र आपला सहभाग आपल्या मुलांना ही मासिकं आणून देण्यापुरताच मर्यादित असतो. हॅरी पॉटरची पुस्तकं त्यांना वाचायची होती म्हणून आपण दुकानातून आणली. पण आपल्या मनातील छोट्यामुलाचीसुध्दा ओढ हॅरीचे प्रताप आणि पराक्रम जाणून घेण्याकडे होतीच की? पण ही ओढ आपण कृत्रिमरीत्याथांबवली.
मोठं होतो तेव्हा आपण छोट्या मुलांच्या अशा कितीतरी निर्वाज्य गोष्टी विसरुन जातो. किंवा त्याकडेदुर्लक्ष करतो आणि कित्येक आनंदाच्या क्षणांना मुकतो.
भीतीच्या पलिकडे
साधारणत: छोट्या मुलांना कशाचीच भीती वाटत नाही. त्यांच्यापुढे मुंगी, पाल, कोणतेही कीटक, एखादा भयावह प्राणी येऊ द्या. ते पटदिशी त्याला पकडायलाच बघतात. श्रीहनुमान बालपणी सूर्यालाचपकडायला निघाल्याची कथा सर्वश्रूतच आहे. यातला प्रतिकात्मक आशय हा न भिण्याचा आहे. आपणहीलहानपणी कोणतीही अशक्यप्राय गोष्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. मोठे होताच मात्र लहान मुलाचं हे सर्वातमोठं वैशिष्ट आपण हरवून बसतो. कितीतरी गोष्टींची आपणास सतत भीती वाटत असते. अपयशाची भीती तरकायमच मनात घर करुन असते. त्यामुळे आपण पहिलं पाऊलच उचलत नाही. समोर संधी दिसत असूनही आपणती स्वीकारत नाही. त्यातून पुढे आपलच जे काही व्हायचं नुकसान घडून जातच. लहान मुलं कोणताही मागचापुढचा विचार न करता कृती करतात ,त्यातून त्यांची काही वेळा फटफजती होते. पण त्यांच्यातील उत्सुकता मात्रशमली जात नाही. ते तसेच वागतात. आपल्या कृतीचा मनोसक्त आनंद घेतात.
कायम वर्तमानातच
लहान मुलांचं आणखी वैशिष्ट्य म्हणजे ते कायम वर्तमानातच असतात. खेळताना, बागडताना मुलं तेक्षण पुरेपुर उपभोगतात. काल काय घडलं होतं किंवा उद्या काय घडेल याची ते काळजी करत नाही. आपण मात्रआजच्या क्षणांऐवजी काल आणि उद्याची चिंताच अधिक करत बसतो. वर्तमानाचा आनंद पाहिजे तसा घेत नाही. वर्तमानातील कृती ही यशासाठी किंवा एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी हितावह असते याची कल्पना असूनहीबरेचदा आपण पूर्ण क्षमतेने कार्यप्रवण होत नाही. आजचं काम उद्यावर ,उद्याचं काम परवावर टाकतो.
गेलेला क्षण हा काही परत मिळणारा नसतो. भविष्याची पायाभरणी वर्तमानात झोकून देण्याच्या आपल्यावृत्तीवर शक्य असते. पण इथेच आपण मागे राहतो. मुलांचं वर्तमानातलं समरसून जगणं आपणही कायमस्वीकारायला काय हरकत आहे.
अफलातून कल्पनाशक्ती
छोट्या मुलांची कल्पना शक्ती अफलातून असते. त्यांना सतत नव्यानव्या कल्पना सुचत असतात. त्याकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ते प्रयत्नही करतात. त्याचा आनंद घेतात. या कल्पना प्रत्यक्षात उतरवणं कठिणजात असेल तर ते निराश होत नाहीत. छोट्या मुलांच्या गप्पा, बागडणं, दंगामस्ती, रडणं, चिडणं यासाऱ्याकृतीकडे आपण आता काळजीपूर्वक बघितलं तर आपल्या लक्षात ही बाब येईल. आपणास मुलांची हीबदमाशगिरी वाटतं. तसं आपण कौतुकांनं इतरांना सांगतोही. लहान मुलांचं असं सर्जनशील असणं आपणास नंतरकां जमू नये? आपण रुळलेल्या मळलेल्या वाटेनेच जाण्याचा प्रयत्न करतो. आपल्या मनात नव्या कल्पना येतनाही. शिवाय नव्या गोष्टींना सहजासहजी स्वीकारायला आपलं मन तयार होत नाही. नेहमीचा रस्ता बदलायचाम्हंटला तरी आपण सैरभर होतो. नव्याचा स्वीकार न करण्याकडे आपला सतत कल जात राहिल्याने प्रगतीच्याविविध वाटा हळूहळू दूर जाऊ लागतात. आपण स्थितीशील होतो आणि आहे त्याच ठिकाणी सुख आणिसमाधान वाटू लागतं. पण ते फसवं असतं हे लक्षात घेत नाही. लक्षात येतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते.
अद्भूत उत्साह
लहान मुलांच्या उत्साह आणि सक्रियतेची पातळी अद्भूत असते. कौतुकानं आपण त्यांना राक्षसबिक्षसअशी उपमा देतो. त्यांना थकवा येत नाही. कंटाळा येत नाही. पूर्णपणे झोकून देऊन त्यांचं बागडणं,खेळणं किंवादंगामस्ती करणं चाललेलं असतं. पण आपण मात्र आपल्या उत्साह आणि सक्रियतेच्या पातळीस मर्यादा घालतो. असं घडण्याची व्यक्तिपरत्वे वेगवेगळी कारणं राहू शकतात. पण हळूहळू आपणास त्याची सवय लागते. आपलाउत्साह आणि आपली सक्रियता आपल्या अंगावर तर येणार नाही ना, आपल्यालाच सर्व भार तर उचलावालागणार नाही ना, या विचाराचं ओझं आपण व्यावसायिक आणि कार्यालयीन जीवनात बाळगू लागतो. हाआपणास व्यावहारिक शहाणपणा वा सुज्ञपणा वाटतो. पण वस्तुत: तसं नसतं. त्यामुळे आपल्या यशाला आणित्यातून मिळणाऱ्या आनंदाला मर्यादाच पडतात.
लहान मुलं कायम आनंदी असतात. त्यांचं आनंदी असणं हे मनातूनच असतं. हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर, नजरेतून उमटलेला दिसतो.आपण मोठे झालो की असा निर्भेळ आनंद घालवून बसतो. अगदी छोट्या छोट्यागोष्टिंमधूनही मनस्वी आनंद मिळू शकतो. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. या दुर्लक्षामुळे आपण कार्यालयीन/व्यावसायिक/कौटुंबिक सहभाग अर्धवट देतो. त्यामुळे समाधानाचे, कार्यपूर्तीचे क्षण मनस्वी उपभोगताच येतनाही.
आग्रही आणि स्पष्टता
छोट्या मुलांना जे हवं असतं ते त्याविषयी ते आग्रही असतात. स्पष्टपणे ते आपल्या मागण्या मांडतअसतात. आपण त्या पूर्ण केल्या नाहीत त्याविषयी विचारणाही करतात. मात्र आपण मोठे झालो की अनेकदाप्रत्येक टप्प्यावर गप्प राहण्याची भूमिका स्वीकारतो. हे असं गप्प बसणं आपणास सुज्ञपणा वाटतो. या गप्पबसण्यामुळे आपल्या मनातलं बाहेर येत नाही. संवाद घडत नाही. त्यामुळे प्रत्येक नात्यामध्ये किंवा सहकाऱ्यांमध्येअदृष्य दरी निर्माण होते. नात्यांमधला स्पष्टपणा वा स्वच्छपणा गढूळ होतो. त्यात कृत्रिमता येते. अवघडलेपणयेतं. त्यामुळेच लहानमुलांसारखच आपणही आपल्या मनातल्या गोष्टी बोलायला हवं. त्यामुळे एकमेकांचं मनकळू शकतं. शक्याशक्यतेच्या बाबी आकलन होऊ शकतात. एकमेकांच्या मर्यादाही स्पष्ट होऊ शकतात. हेएकमेकांना कळल्यावर संदिग्धता उरत नाही. संदिग्धता नसणं म्हणजे सहजता असणं. असं असणं हेच लहानमुलांचं वैशिष्ट्य असतं. त्यापासून आपल्या मनातल्या लहान मुलास कां बरं वंचित करत असतो.