आनंदाचे तरंग
प्रसन्नेतेचा शिडकावा करणाऱ्या व्यक्ती सर्वांनाच हव्याहव्याशा वाटतात. त्यांचा सहवास हवाहवासा वाटतो. त्यांच्या वागण्याबोलण्यातून सकारात्मकतेची उर्जा जाणवते. या व्यक्ती प्रामाणिक असतात. बोलताना किंवाकोणत्याही प्रसंगात वावरताना आत्मविश्वाने भारलेल्या असतात. या व्यक्ती विनाकारण कुणाबद्दल मतेमतांतरेदेण्यात रस दाखवत नाहीत. या व्यक्ती खुल्या मनाच्या आणि दिल्याच्या असतात.आयुष्य आनंदानंजगण्यासाठीच असल्यानं त्या सगळीकडे सहजरीत्या कार्यरत असतात. अशा व्यक्ती नेहमी पहिल्या भेटितआपला ठसा उमटवतात.
या व्यक्तींचा महत्वाचा गुण म्हणजे त्या इतरांच्या सहाय्याला कोणतीही अपेक्षा न ठेवता धावूनजातात. कोणत्याही कठिण आणिभीषण प्रसंगात शांत आणि संयत राहू शकतात. अपयशानं खचून जातनाहीत. यशाचा आनंद साजरा करताना वाहून जात नाहीत. इतरांच्या भाव-भावनांचा सन्मान करतात. इतरांपेक्षा आपण शहाणे असल्याची भावना त्यांच्या मनात येत नाही. कुणाच्याही व्यक्तीगत आयुष्यात तेढवळाढवळ करत नाहीत. इतरांनी सल्ले वा मार्गदशन मागितल्याशिवाय ते देत नाहीत.ते उत्तम श्रोतेअसतात. आपलं कौतुक स्वत:च करण्याचं ते कायम टाळत असतात. आपण सद्गुणांचे पुतळे आहोत याचात्यांना अजिबात अहं नसतो. त्यामुळे आपल्या हातूनही चुका घडू शकतात, याची त्यांना जाणीव असते. याचुका कबूल करण्यात त्यांना कमीपणा वाटत नाही. अशा चुका पुन्हा होणार नाहीत याची प्रामाणिकखबरदारी त्या घेतात.
स्वत:चं हसू होऊ नये याची खबरदारी या व्यक्ती घेतात. पण त्यांच्यावर केलेले विनोद ,हास्य तेखेळाडूपणे स्वीकारतात. त्याअनुषंगाने मनमुराद हसतात. कायम गंभिर चेहऱ्यानाच राहिलं पाहिजे असं याव्यक्तिंना वाटत नाही. प्रत्येक वेळी सर्वोत्कृष्ट राहायला हवं याबाबत अशा व्यक्ती आग्रही नसतात. निकोपस्पर्धेत त्यांचा विश्वास असतो. इतरांच्या यशाचा हेवा वाटून घेत नाहीत. इतरांच्या अपयशाचा आनंद मनवतनाहीत. इतरांच्या अपयश किंवा संकटाच्या प्रसंगी त्या व्यक्तीला धिर देण्यासाठी या व्यक्ती पुढाकार घेतात.
अशा व्यक्ती लहान-थोरांशी समान आदराने वागतात. भेदभाव करत नाहीत. कुणालाही कमी लेखतनाहीत. इतरांच्या छोट्या-छोट्या गोष्ट स्मरणात ठेवतात. त्यांची नावं लक्षात ठेवतात. जन्मतारखा लक्षातठेऊन त्या त्या वेळी शुभेच्छा देतात.
समन्वय आणि सहकार्यामध्ये अधिक विश्वास ठेवतात. त्यामुळे शक्यतो वादविवाद टाळतात. विसंवादहोऊ नये याची काळजी घेतात. इतरांच्या मताचा संपूर्ण आदर ठेवत आपली भूमिका प्रभावीरीत्या मांडण्याचीखबरदारी घेतात. आपलीच बाजू योग्य असल्याचा हेका ठेवत नाहीत. इतरांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकूणघेण्याची त्यांनी स्वत:ला सवय लावलेली असते.
त्यांना आपल्या अवतीभवतीचा परिसर, व्यक्ती, ठिकाणे अशा नव्या गोष्टी जाणून घेण्याची इच्छाअसते. त्यासाठी बरोबर वेळ काढतात. स्वत:ला आनंद देणारे छंद जोपासतात. इतरांना भेटण्यात त्यांनामनापासून आनंद आणि समाधान वाटतं. स्वत:च्या अशा कृतीतून इतरांना त्यांचं महत्व जाणवून देतात. अशाव्यक्ती इतरांशी संवाद साधताना समोरच्या व्यक्तीशी थेट नजर भिडवतात. इतरांचं स्वागत सुहास्य वदनानेकरतात. इतरांच्या बोलण्याला प्रामाणिकपणे प्रतिसाद देतात.
आपणास कां जमू नये?
हे असं असणं आपल्यापैकी प्रत्येकाला कां जमू नय? हा अगदी साधा प्रश्न आहे. उत्तरही साधंचआहे. कारण प्रसन्न राहण्यासाठी ज्या गोष्टी करायला हव्यात त्या अजिबात कठिण वा आवाक्याबाहेरच्यानाहीत.अगदी सहज अंगी बाणवू शकणाऱ्या आणि जीवनशैलीचा भाग बनवू शकणाऱ्या आहे. असंअसताना आपण सदैव संकटग्रस्तच कां वावरतो? हेच तर कारण नसेल ना, की जगात आनंदी व्यक्तींच्यासर्वेक्षणात आपल्या देशाचा 117 क्रमांक लागावा. हे सर्वेक्षण 158 देशात संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंतर्गतकार्यरत असणाऱ्या सस्टनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स या संस्थेनं केलय. ही अधिकृत अशी संस्था. शास्त्रीयपध्दतीने आकडेवारीचं विश्लेषण करुन हा निष्कर्ष या संस्थेनं काढलाय. आपल्या देशापुढे आपणास काहीज्ञात नसलेले आणि काही न आवडणारे देशही आहेत.
या असल्या सर्वेक्षणावर आक्षेप घेण्यासाठी कारणांचा पाऊस पाडणं कधीच अशक्य नसतं. पणआपण प्रामाणिकपणे स्वत:ला विचारलं तर काय दिसतं. आनंद आणि समाधान हरवून बसल्याचच चित्रबहुतेकांच्या घरी दिसत नाही का ? सर्वेक्षणकर्ते जरी मोजक्याच लोकांना भेटले असतील,मोजक्याच लोकांशीत्यांनी संवाद साधला असेल तरी त्यांना या प्रातिनिधिक सर्वेक्षणातून जे दिसलं ते काही अपवाद वगळताआपल्याकडे सर्वव्यापीच आहे. परमेश्वराच्या नामसंर्कीर्तनात सदैव असणारे साधू संतही अस्वस्थ आणि अशांतदिसतात. कुंभमेळ्यासारख्या प्रसंगी अशा अशांततेचा विस्फोट होतो. आर्ट ऑफ लाइफचं प्रशिक्षण घेतानाहीबहुतेकांच्या मनातली अशांतता जाता जात नाही. देवदर्शनाला गेलेल्या व्यक्तींच्या मनात चुळबूळच सुरुअसते. मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यावरही अस्वस्थता कमी होत नाही. दिवसाचा प्रारंभही असाच होतो.
ताण-तणाव हे जीवनाचा अविभाज्य भागच आहेत. त्यापासून कुणालाही सुटका नाही. ज्यांची आपणपूजा करतो त्या परमेश्वरांच्या बऱ्याच अवतारांच्या ताण-तणावाच्या गोष्टी वाचलेल्या असतात किंवा आपल्याकानावरुन त्या गेलेल्या असतात. ज्या साधू संतांचे अभंग, आरत्या नित्य पठण करतो,तेही यातून गेलेलेअसतात. तरीही आपण आपल्या मनातील अस्वस्थता तशीच राहू देऊन त्यावर दिवसागणिक थर चढू देतो.
आपण प्रसन्न वा आनंदी न राहण्यासाठीचं हे महत्वाचं कारण आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेनं केलेल्यामर्यादित स्वरुपाच्या सर्वेक्षणात ही बाब आढळून येऊ शकते. आनंदी जगणं ,राहणं ही एक वृत्ती आहे. त्याचा आपल्याकडे अभाव दिसतो. भारताने पाकिस्तानविरुध्दचा क्रिकेटचा सामना जिंकल्यावर होणारा आपलासामूहिक आनंद हा नकारार्थी स्वरुपाचा आहे. हा असा आनंद सर्वव्यापी करता येत नाही.
व्यक्ती म्हणून आपण प्रसन्न राहणं,आनंदी असणं हे जराही अवघड नसताना आपण स्वत:ला परावृत्तकरत राहतो किंवा आपण त्या गावचे नसल्याने तिकडे जायचेच कशाला असा एक विचार करतो, तो खराआपला शत्रू.त्याच्याशी दोन हात करण्याची तयारी असावी.श्री.श्री.रवीशंकर म्हणतात की, तुम्ही आनंदीहोण्याची सवय विकसित करा. तुमच्या वतिने दुसरं कुणी हे करु शकत नाही. तुम्ही प्रसन्न वा आनंदीअसण्याची जबाबदारी इतरांनी कां घ्यावी.
तक्रारीचा सूर सोडा
आपलं व्यक्तिमत्व प्रसन्न न ठेवण्यामागे कायम असणारा आपला तक्रारीचा सूर महत्वाचा ठरतो. याजगात आपल्यापेक्षा दु:खी आणि संकटग्रस्त कुणीही नसल्याची मोठी तक्रार आपल्या चेहऱ्यावर लिहूनचआपण वावरतो. देवाच्या दारी बहुदा हीच तक्रार आधी नोंदवतो आणि मग त्याच्या दर्शनाने आनंदी होतोकिंवा होतही नाही. दु:खाची नेमकी व्याख्या करा म्हंटल तर तशी करणं आपणास जड जाईल. कारणआपण सुखाची व्याख्या करु शकत नाही. दोन बेडरुमच घर असण्यात सुख आहे की तीन बेडरुमचे घरअसण्यात आहे, यावर वाद होईल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणत की माझ्या झोपडीत स्वर्गाचे सुखआहे. मुलाला आयआयटीत प्रवेश मिळाला तर सुख आणि व्हीजेटीआय मध्ये मिळाला दु:ख. पॅनोसोनिकचाथ्रीडी टीव्ही घेण्याची क्षमता असणे म्हणजे सुख आणि व्हीडिओकानचा टीव्ही घेण्याची आर्थिक क्षमता असणेम्हणजे दु:ख. अशा व्याख्या तर करता येणार नाही ना. तेव्हा प्रसन्न असणं हा जीवनाचा अविभाज्य भागबनवला तरच जीवनातील आनंदाचा डोह दिसेल. त्यातील आनंदाच्या तरंगाची तरल अनुभूती सदैव घेतायेईल.
पर्याय आपल्याच हाती आणि मनी आहे.
0000