आपणच आपली प्रेरणा
जीवनात कोणतीही सुविधा नसलेल्या आणि सतत विविध संकटे आणि कष्टच उपसाव्या लागणाऱ्या वप्रयत्नांची पराकाष्टा करणा-या व्यक्ती त्यांच्या जीवनात भव्यदिव्य यश प्राप्त करताना दिसतात. सर्वसाधारणपणेहेच दृष्य जगभरात दिसतं. याचा अर्थ आपण असा घ्यायचा की अडचणी आणि संकटं असतील तरच यश मिळूशकतं, अन्यथा यशाला मर्यादा पडतात?
तत्ववेत्ते आणि मानसशास्त्रज्ञ याचा धांडोळा गेली अनेक दशके घेत आहेत. त्यातून एक बाब स्पष्ट होतानादिसते की संकटं आणि यशाचा निश्चित असा सकारात्मक संबंध असू शकतो. हा संबंध आपल्या मनातील प्रचंडउर्जेशी संबंधित आहे.
आपली छोटी-मोठी कृती आपल्या मनाशी निगडित असते. आपल्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणितमनाचा मोठा हातभार लागतो. विश्वातील सर्वाधिक शक्तीशाली गोष्ट आपलं मन असल्याचं आता सर्वमान्यझालेलं तथ्य आहे. त्यामुळे आपल्या सर्व बौध्दीक, मानसिक क्रिया या मनावरच अवलंबून असतात. आपणएखादी क्रिया करण्याचं ठरवतो तेव्हा आपलं मन ती क्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक उर्जेची आणि उत्साहाचीनिर्मिती करते. ही उर्जा आपणास सतत कार्यरत ठेवते. आपल्या हातून विविध प्रकारची कार्यं घडवून आणते.
आपलं कार्य सोपं, साधं असेल तर मनाकडून तेवढीच उर्जा पुरवली जाते. मात्र आपण अतिशय कठिणकार्य हाती घेतो तेव्हा हेच मन आवश्यक असणारी उर्जा आणि उत्साह त्याच तीव्रतेनं प्रदान करतं.
एव्हरेष्ट सर करणारे बहुतेक सर्व गिर्यारोहक त्यांच्या यशाचं श्रेय त्यांच्या मानसिक शक्तीला देतात, हीबाब आपण लक्षात ठेवायला हवी. मोठे कार्य म्हणजेच मोठी मानसिक उर्जा हे समिकरण आता वैद्यकीय क्षेत्रातहीमान्य केलं जात आहे. अशा मानसिक उर्जेतूनच आपल्या सक्षम व्यक्तिमत्वाची जडणघडण होते.
प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या भाग्याचा निर्माता असतो. हे वास्तव आपणास ज्येष्ठ संशोधक स्टिफन हॉकिंग्जयांच्या उदाहरणावरुन दिसून येतं. अतिशय दुर्धर व्याधींनी ग्रस्त असूनही स्टिफन हॉकिंग्ज यांनी स्वत:चं भाग्यनिर्धारित केलं. आपल्या सर्व मानसिक उर्जेला त्यांनी सर्वोच्च पातळीवर नेलं. अशा दुर्धर अवस्थेततही विविधप्रकारचं संशोधन केलं. अजूनही करताहेत. जिंवतपणीच ते दंतकथा झाले आहेत. रेल्वेमध्ये तिकिट कलेक्टरअसलेल्या महेंद्रसिंग धोनी यांचं उदाहरणही या अनुषंगानं आदर्शवत ठरावं. कोणतीही पाश्वभूमी नाही. हलाखीचीपरिस्थिती. पण केवळ आपल्या अथक परिश्रम, गुणवत्ता आणि भव्य स्वप्न साकार करण्यासाठी आवश्यकअसणाऱ्या मानसिक उर्जेचा वापर करुन महेंद्रसिंग धोनी हे, जीवनात सर्वोच्च यश प्राप्त करु इच्छिणाऱ्यातरुणांसाठी आज रोलमॉडेल झाले आहेत. चित्रपट क्षेत्रातील शाहरुख खान यांचंही उदाहरण आपल्या समोरआहे. मध्यमवर्गीय शाहरुख खान मुंबईसाठी नवखे होते. पण त्यांनी मानसिक उर्जेचा उच्च पातळीवर जाऊनउपयोग केला आणि स्वत:चे भाग्य स्वत: घडवलं. बॉक्सर मेरी कोम यांचंही उदाहरण असच आहे. प्रत्येक यशस्वीव्यक्तींची जडणजघड स्वप्रयत्नानेच होत असते. अशा व्यक्ती आपल्या या प्रयत्नांना सुयोग्य नियोजन आणिपरिश्रमाची जोड सातत्याने देतात.
मात्र ज्या व्यक्तींना नियोजनाचं महत्व कळत नाही. प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवता येत नाही. त्याचं यशमर्यादित राहतं. काही तत्ववेत्यांच्या कथनानुसार आपलं मन हे एखाद्या धरणासारखं आहे. या धरणातून आपणासजेव्हा मर्यादित स्वरुपात पाणी सोडावयाचं असतं तेव्हा त्यास अल्पउर्जा लागते. मात्र मोठ्या प्रमाणावर पाणीसोडायचं असेल तर मोठीच उर्जा लागतं. आपल्या मनाचंही तसंच आहे. आपलं यश अल्प मर्यादेतलं हवं की मोठंहवं, हे आपण स्वत: ठरवू शकतो. त्यानुसार कार्यप्रवण झालो तर आपणास उर्जाही तशीच मिळू लागते.
आपल्या उदिष्ट्य वा स्वप्नपूर्तीसाठी कार्यरत असताना कुणाशीही तुलना करु नये. ती निरर्थक असते. त्यातून काहीच साध्य होत नाही. आपली प्रेरणा आपणच व्हायला हवी.आपल्या मानसिक क्षमता आणिबळावरच मोठी कामगिरी आपण बजावू शकतो.