आपलं लखलखित वैभव
दिवाळीचा प्रारंभ आजपासून होत आहे.आपल्यासाठी बहुतेक सर्वच सण महत्वाचे असले तरी दिवाळीचा सणहा विशेषच महत्वाचा. सणांचा राजा म्हंटलं तरी वावगं ठरु नये. दिवाळीची वाट बालपणापासूनच अतिशयआतुरतेनं बघतो. काळ बदलला. वेगवान झाला. नाती बदलली. समाजजीवनात बरीच पडझड झाली. अत्याधुनिकता आली. अनेक दृष्य बदल झाले. पण दिवाळीची वाट बघण्याची हुरहुरता मात्र बहुतेक तशीचराहिली. याचं कारण काय असावं बरं?
दिवाळीस अनेकजण जीवनाचा उत्सव संबोधतात. तो प्रकाशाचा उत्सव आहेच. या काळात लहान-थोरांची घरं प्रकाशानं उजळून जातात. वातावरण आनंददायी होऊन जातं. सर्वांची मनं प्रसन्न असतात. घरंउत्साहानं भारुन गेलेली असतात. प्रत्येकाच्या वाटेला आलेलं छोटं-मोठं दु:ख, वेदना, व्यथा यावर फुंकरमारण्याची किमया दिवाळीचे हे दिवस करतात.
दिवाळीत क्वचितच कालची आठवण काढली जाते. काढली तरी ती कढ काढणारी वा नैराश्यआणणारी नसते. प्रत्येकच व्यक्ती आत्ताच्या क्षणात रमलेला असतो. हाच क्षण आपला ही जाणीव पक्कीकरणारे दिवाळीचे दिवस असतात. चला दुपारी अभ्यंगस्नान करु या, असं कुणाला वाटत नाही. अभ्यंगस्नानाचा क्षण जो असेल तोच उपभोगायचा असतो. कारण त्याचं महत्व हे त्याच क्षणाला असतं. तोक्षण गेल्यावर कितीही भारीची सुंगधी उटणे, अत्तर यांनी स्नान करा त्याचं महत्व शून्यच ठरतं. दिवाळीचा हापहिला धडा किती महत्वाचा नाही का? जेव्हाची कामं तेव्हाच कराल तरच त्याची फळं मिळतील.आनंदमिळेल. समाधान मिळेल. कर्तव्यपूर्ती होईल. प्रगती आणि सौख्याची पुढची पायरी गाठण्यासाठीचा उत्साहदुप्पट होईल. थोडक्यात काय तर आळस झटकून टाकाच. कल करेसे जो आज कर, आज करे सो अभी, असं जे म्हटंल जातं त्याचं महत्व शिकवणारा हा धडा आहे.
आजची गोष्ट उदयावर ढकलली की त्याचा तणाव येतोच. आणखी दुसऱ्या गोष्टी तोपर्यंत अंगावर येऊनपडतात. मग या आणि त्या गोष्टीची पूर्तता करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. ही कसरत जमूनगेली तर बरेच बरे. पण नाही जमली तर मात्र शारीरिक,मानसिक,आर्थिक आणि कौटुंबिक बाबीचं कितपतनुकसान होईल, हे सांगता यायचं नाही. याचा अनुभव कित्येकांनी घेतला असू शकतो.
वेळेशी प्रतारणा टाळा
वेळ साधा. शक्यतो वेळेशी तडजोड करु नका हा या धडयात दडलेला आणखी एक अर्थ.अनेकांचीव्यस्तता आणि त्यातून निर्माण होणारे ताणतणाव याबाबी वेळेशी प्रतारणा करण्यातून वा वेळेशी खेळून वावेळेला टाळण्यातून निर्माण होतात. टाइमपास वा वेळकाढूपणा हे दोन घातक शब्द आपल्या अतिपरिचयाचेआणि तसे आवडीचेही. छान टाइमपास झाला, असं बरेचदा उच्चारलं जातं. वेळकाढूपणा कसा काय छानराहू शकतो, याचा मानसशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञांनी शोध घ्यायला हवा. आपला सामूहिक टाइमपास हाप्रचंडच मोठा असल्यानं सामुदायिकरीत्या भरीव काही घडतय असं काही जाणवत नाही वा दिसत नाही. जपान वा इस्त्रायल वा सिंगापूर या छोटया देशांनी अमुक-तमुक क्षेत्रात केलेल्या प्रगतीचं तीच ती उदाहरणंवर्षानुवर्षे सादर केली जातात. पण या छोटया देशांना जे जमतं ते आपल्याला का जमत नाही, यावर मात्रमनापासून मंथन होत नाही. या देशातील मान्स आणि आपण यात काय फरक आहे? सर्वकाही समानआहे.ते सुध्दा आपल्यासारखीच आधुनिक गॅजेटस लिलया वापरतात. महत्वाचा फरक असा की या छोटयादेशातील नागरिक सामूहिकरीत्या टाइमपासला महत्व देत नाहीत. निरर्थक गोष्टीत तर अजिबातच वेळ दवडतनाहीत. महाराष्ट्रापेक्षा अर्धाही नसलेला जपान देश तर आपल्यापेक्षा जवळपास प्रत्येकच क्षेत्रात कितीतरी पटसमोर आहे. या देशावर काही प्रभुपरमेश्वराची खूप कृपा आहे,असही नाही. भूकंप,युध्दापासून तरअणुबॉब्मपर्यंत सारी संकटं या देशावर येऊन गेली आहेत. पण तरीही या उगवत्या सूर्याच्या या देशावरीलसूर्य जराही काळवंडला नाही. तो काल जसा प्रकाशमान होता तो तसाच आजही प्रकाशमान राहील याचीकाळजी आणि प्रयत्न जपानी मानसाने घेतली. खरं हा सूर्य त्यांच्या अंर्तमनातच दडलेला आहे. त्यांनाअंधकार दिसतच नसावा. सूर्य कधी मावळत नसतो. अंधार येतो तो प्रकाशाची पेरणी करण्यासाठीच हे तत्वत्यांना किती छान कळलेलं आहे.
कालचा प्रकाश आज अधिक तेजोमय
आपली दिवाळी सुध्दा तेच सांगतेय ना. काल अंधार जरी असला तर आज प्रकाशानं सारा आसमंतउजळून गेलेला आहे. कालचा प्रकाश आज अधिक तेजोमय झाला आहे. हा प्रकाश तुम्ही तुमच्या अंतरंगातबघा. अंतरंगात काळोख दाटला असेल तर तो कृत्रिम असल्याची जाणीव ठेवा. कारण काळोख नसतोचमुळी. ती एक मानसिक अवस्था असते. प्रकाश हेच वास्तव. जीवन आनंददायी आणि यशस्वी करण्यासाठीगरज असते ती प्रकाशाची. तो कायम सोबत असतो.
प्रकाश म्हणजे सकारात्मकता. दिवाळीचा तिसरा धडा हा अशा सकारात्मकतेचा आहे.अवतीभवती इतक्यानकारात्मक गोष्टी/घटना/घडामोडी घडत असतात की त्यामुळे आपणही त्याचाच एक भाग बणून जातो. हीनकारात्मकता काळया ढगांसारखी मन व्यापून टाकते.सगळीकडे तसचं नैराश्य असलेलं जाणवायला लागतं. दैनंदिन आयुष्यही तसचं वाटू लागतं. दिवाळीचा प्रकाश सांगतो की त्यापासून तुम्ही तुम्हाला दूरच ठेवा. तुमचं साधं आणि सरळ रेषतेलं आयुष्य कठिण करण्यासाठी कोणतीही कसूर ही नकारात्मकता ठेवणार नाही. दिवाळीच्या दिवसात मन कसं प्रकाशमान झालेलं असतं. अभ्यंगस्नानाला पहाटे आवर्जून उठणं, उटणं लावूनघेणं, ओवाळून घेणं, सुंगंधी साबण आणि तीळ घातलेल्या उन पाण्यानं आंघोळ करणं, नवे कपडेघालणं, रामप्रहारीच फराळ करणं, फटाके फोडणं, नातेवाईक-मित्रमंडळींना शुभेच्छा देणं, दिवाळी पहाटेलाजाऊन सांगितिक मेजवाणीचा स्वाद चाखणं या छोटया-छोटया गोष्टी आपण उत्साहानं करतो. त्याचा आनंदघेतो. यातील प्रत्येक गोष्ट आनंद व्दिगुणित करत जाते. हा आनंदाचा ठेवा घेऊन दिवाळीच्या दुसऱ्यादिवसाचं स्वागत करतो. तोच आनंद अनुभवतो. तीनचार दिवस हे चक्र छान सुरु राहतं. नकारात्मकतेचाकोणताही घटक या आनंदात विरजण घालत नाही. त्याने घालायचा प्रयत्न केला तरी या काळातीलउत्साहाची उर्जा या घटकास लगेचच बाजूला सारते.
दिवाळी सांगते की या छोटया-छोटया गोष्टिंचा मनापासून तुम्ही आनंद उपभोगा. त्यात किंतु-परंतु शोधूनका. कारण या छोटया छोटया आनंदाच्याच्या पायावर सुखाची, समाधानाची मोठी इमारत उभी राहते. कुढत बसू नका. तसे बसलात तर ही इमारत उभी राहिली तरी तिचा पाया भुसभूशितच राहील हे लक्षातठेवा.
तुमचा आनंद तुमच्यातच शोधा
दिवाळीचा पाचवा धडा म्हणजे तुमचा आनंद तुमच्यातच शोधा. इतरांकडे बघू नका. इतरांकडे महागडेफटाके फोडले जातात म्हणून आपल्याकडेही फुटायला हवेतच असं नाही. तो त्यांच्या क्षमतेचा आणिआनंदाचा भाग झाला. त्याबददलही आनंद माना. पण आपल्याकडे ते नाही म्हणून दु:ख करण्यात हशीलनाही. कारण सुखाची अचुक व्याख्या अदयाप कुणालाही करता आलेली नाही. प्रत्येकाची जीवन जगण्याचीशैली आणि प्रकृतीही वेगळी. त्यामुळे स्वत:च्या क्षमतेला आणि सामर्थ्याला जे जमतं, जे झेपतं ते वास्तवस्वीकारलं की मग पुढचे प्रश्नही निर्माण होत नाही. हे प्रश्न आपल्या कर्तृत्वावर अविश्वास दाखवणारेअसतात. ते कां म्हणून उपस्थित करायचे आणि स्वत:ला दु:खाच्या खाईत लोटायचं. हे टाळलं पाहिजे. तेटाळण्याचा संदेश घेऊन दिवाळी दरवर्षी येते. त्याच उत्साहानं येते. आपल्यावरचं नैराश्यचं मळभ जावं म्हणूनयेते. दिवाळसण हा ज्यांनी कोणी, जेव्हा केव्हा सुरु केला असेल त्यांचे अनंत उपकारच मानायला हवेतसर्वांनी. दरवर्षी मनस्वी आनंद देणारा, उत्साह आणि उर्जेने भारुन टाकणारा हा दुर्मिळ आणि सांस्कृतिकठेवा हेच आपलं खरखुरं वैभव आहे. शेकडो हजारो वर्षानंतरही हे वैभव तसचं लखलखित राहिलं आहे. हेलखितपण तसचं तेजस्वी ठवलंय ते प्रकाशानं. हा प्रकाश म्हणजे तुम्ही आपण सारेच जणना.
तेव्हा हॅप्पी दिवाळी.आनंदी राहा आणि यशस्वी व्हा..