आपली नैतिकता
दररोज सकाळी वर्तमानपत्र, वा इतर माध्यमांद्वारे आपल्यापुढे अधिकाधिक नकारात्मक स्वरुपाचे वृत्त वा माहिती येत असते. यामध्ये वेगवेगळे अपघात, कुपोषणामुळे झालेले मृत्यू, लोकांवर होणारे अन्याय अशांचा समावेश होतो. अशा घटनांमध्येकाही काळ गुंततो आणि नंतर या घटनांना विस्मृतित अलगद ढकलून आपल्या दैनंदिन कार्यास लागतो.
या अशा वृत्तांमुळे आपल्या मनावर नैराश्याचे ओरखडे पडतात. आपण काहीही करु शकत नाही. आपण असहाय्यआहोत असं वाटू लागतं. आपल्या डोळ्यासमोरही अनेक अन्यायपूर्ण घटना घडत असताना आपण काहीही करु शकत नाही हीअसाहय्यता आपणास आणखी निराश करत असते. आपल्या अवतीभवतीची व्यवस्था आणि परिस्थिती अशी निष्क्रियकरणारी असल्यानं एखादी व्यक्ती काय करणार अशी समजूत स्वत:ची घालून स्वस्थ बसतो. मात्र जेव्हा एखाद्या घटनेचासामूहिक आक्रोश मोठ्या प्रमाणावर होतो, तेव्हा मात्र आपणास त्यात सामील व्हावेसं वाटतं. अशा निषेध मोर्चा वाआंदोलने वा कँडल मार्चमध्ये सहभागी होऊन अन्यायकारी व्यवस्थेविरुध्द आवाज उठवण्यासाठी सक्रिय असल्याचं सिध्दकरण्याचा प्रयत्न करतो. हे वागणं प्रामाणिक आणि पारदर्शकसुध्दा राहू शकतं.
कधीकधी वाईटाच्या विरोधात एकट्यानं आवाज उठवण्याचा प्रयत्न आपण कां करु नये? कदाचित संबंधितयंत्रणा आणि आजूबाजूच्या नागरिकांची साथ त्या क्षणाला न मिळून असं साहस आपल्या अंगावर सुध्दा उलटू शकतं. योग्यमार्गावर जात असूनही रस्ता चुकिचा असल्याचं आपल्याला वाटू शकतं. त्यामुळे काळाच्या ओघात समाजात अवती
भवती घडणाऱ्या वाईट/अन्यायकारी घटनांबद्दल विशेष काहीच वाटण्याची शक्यता निश्चितपणे वाढू शकते. अशा घटनांकडेबघण्याची आपली भूमिका तटस्थेचीच राहू शकते. किंबहुना आपण त्या घटनांकडे दुर्लक्ष करणेच श्रेयस्कर समजू लागतो. व्यवस्था अशीच असते अशी आपल्या मनाची समजूत घालू लागतो. ही समजूत आपण योग्य वाटते. त्यामुळे मग सामूहिक वाव्यक्तिगत कोणत्याही लहान-मोठ्या अन्यायाकडे दुर्लक्ष करु लागतो.
नैतिक मूल्यांची शिकवण
हे असं कां होतं? आपल्याला ज्या नैतिक मूल्यांची शिकवण घरी वा इतरत्र दिली जाते, त्याचा काहीच परिणामआपल्या व्यक्तिमत्व आणि कृतींवर होत नाही का? असा परिणाम नक्किच होत असावा. आपल्या समोर येणाऱ्या विविधप्रसंगांना, घटनांना आपण कसं सामोरे जातो, येणाऱ्या समस्या वा प्रश्न आपण कसे सोडवतो यावर आपल्या आयुष्याचादृष्टिकोन स्पष्ट होतो. यामध्ये साध्यासाध्या बाबींचा समावेश होतो. उदा-आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता, सहकाऱ्यांसोबतचा प्रामाणिक व्यवहार, सार्वजनिक व्यवस्थेची काळजी,पाण्याचा गैरवापर टाळणं, कोणत्याही कार्यात वनातेसंबंधात पारदर्शकता ठेवणं
वेळ पाळणं, यांचा वानगीदाखल समावेश करता येइल.
सत्याचा आग्रह
महात्मा गांधी सत्य बोलणं, सत्य वर्तणूक करणे याबद्दल आग्रही होते. दैनंदिन जीवनात हा आग्रह पाळण्याचाप्रयत्न करणं हे सुध्दा आपण आयुष्याकडे कसं बघतो याचं निदर्शक ठरु शकतं. यामुळे काहीवेळा त्रास होऊ शकतं हे वास्तवअसलं तरी त्यामुळे आपलं व्यक्तिमत्व कणखर बणून इतरांसाठी प्रेरेणेचं स्त्रोत ठरु शकतं. ही प्रेरणा आपल्या एखाद्यासहकाऱ्याला, नातेवाईकला ,शेजाऱ्याला किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तिलाही मिळू शकते.
आपलं सकारात्मक वागणं ही एक साहसी कृती असते. आपली नैतिक मूल्ये जर भक्कम पायांवर आधारित असतीलतर अशी कृती लहानप्रमाणात कां होईना उपयुक्तच ठरत असते. त्यामुळे आपल्या नैतिक जाणिवा या सतत तेवत ठेवायलाहव्यात. फक्त स्वत:च्या आयुष्याचीच घेणं देणं आहे, इतरत्र काय घडतय त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही,अशीमनोवृत्ती सोडणं गरजेचं आहे. अन्यथा व्यवस्था बदलण्याची केवळ चर्चाच होत राहील. त्यात फारसा परिणामकारक बदलहोणार नाही. त्याचे परिणाम हे सगळ्यांनाच भोगावे लागतात. आपण कर चुकवतो तेव्हा तेव्हढीच रक्कम विकासप्रक्रियेसाठीकमी होते, हे लक्षात घेतलं पाहिजे. सार्वजिनक वाहतूक व्यवस्था ही उत्तम ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक व्यक्तिची असतेपण आपणास तसे वाटत नाही. त्याचा परिणाम आपली रेल्वे वा बसस्थानके अस्वच्छ झाली आहेत. रेल्वे डब्यांची दुरावस्थाआपल्या डोळ्यासमोर आहे. विविध शासकीय कार्यालयांच्या भिंती आणि शौचालये हे पान/तंबाखू थुंकून घाणकरण्यासाठीच असल्याचं आजचं दृष्य आहे. रस्त्यावरुन रहदारीचे नियम मोडत वाहनं चालवणं हे सुध्दा नित्याचेच झाले आहे. संबंधित व्यक्तिला त्याक्षणाला असं वागणं पराक्रम वाटत असला तरी कधी ना कधी त्यासही या अशा वागण्याचा फटकाकोणत्या ना कोणत्या रुपात बसतो. तेव्हा आपण व्यवस्थेला आणि इतरांना दोष देतो. चरफडतो. पण हे असं वागणं नपूंसकचसमजायला हवं.
आपली वर्तणूक नैतिकतेच्या विविध सिध्दांताशी प्रामाणिक राहून होत राहिली तर परिस्थिती बदलण्याची शक्यतानिश्चितपणे हळूहळू कां होईना राहीलच. जीवनाची सकारात्मकता यातच दडलेली आहे.