इंद्रसेनांचा दरबार आणि चीअर गर्ल्सचा जन्म
खास आणि आम दरबार भरवण्याचा प्रयत्न इंद्रसेन महाराजांनी केला नाही, असे म्हणण्यास काही अजिबातप्रत्यवाय नाही. याबाबतीत इंद्रसेन महाराजांना 100 पैकी 100 गुण द्यावेच लागतील. वेळोवेळी काही गंभिरआणि काही टाइमपासप्रसंगी इंद्रसेन महाराजांनी विशेष दरबाराचे निमंत्रण अ श्रेणीच्या सर्व देवता आणि देवींनापाठवले होते. शिवाय काही अ प्लस श्रेणितील देवतांशीही स्वत: संपर्क साधलाही होता. पण यादेवतांकडून नो प्रतिसाद.
प्रत्येक ज्येष्ठ देव एकदम व्यस्त.
कुणी हिमालयात नृत्यगायनागत.
तर कुणी सागरतळी जलक्रीडा करण्यात.
तर कुणी नव्या चविच्या मदिरापानाचा आनंद घेण्यात.
तर कुणी पृथ्वीतलावरुन आलेल्या मदनिकेच्या मोहक हास्यात भारावून जाण्यात.
तर कुणी उगाचच चक्कलस करण्यात.
कनिष्ठ श्रेणीतील देव सुध्दा त्यांच्या त्यांच्या पध्दतीने फुल- टू -बिझी.
या अतिमहत्वाच्या कामांपुढे इंद्रसेन महाराजांनी बोलावलेला विशेष दरबार एकालाही महत्वाचा वाटतनसे. त्यामुळे दरबार बोलावला असलेल्या त्या दिवशी इंद्रसेन महाराज एकटेच सिंहासनावर बसून पॉझिटिव्हमनाने दरबारात हे देव येतील,ते देव येतील अशी वाट बघत बसत. पण एकाही देवाचे आगमन होत नाहीहे बघून मग माशा मोजायला सुरुवात करत. पुढे पुढे माशा मोजण्याचा त्यांना कंटाळा येऊ लागला. यावरतोडगा म्हणून त्यांनी सुश्री मेनका, रंभा, उर्वशी, सोनालिका, मंदाकिनी व्दीतीय चित्रांगदा आदी सुश्री अप्सरायांना दरबारात निमंत्रित करायला सुरुवात केली.
प्रारंभी या सुश्री अप्सरा व इंद्रेसन महाराज यांच्यात वेगवेगळ्या दैवी आणि अधिभौतिक विषयांवर गप्पाहोत. पण गप्पा करुन करुन काय आणि किती करणार ? शिवाय तेव्हा आताच्यासारखे गॉसिपिंगचे फॅडनव्हते. म्हणजे जे काही करायचे ते उघड उघडच. त्यामुळे सगळ्यांना सगळे काही ठाऊक असल्याने त्याचेचरवंथ करण्यात कुणालाही रस नसे. शिवाय अशा घटनांमध्ये तिखट-मीठ-मसाला टाकून टाकून तरी कितीटाकणार? तो मर्यादित असलेला बरा. अन्यथा ठसका लागलाच म्हणून समजा. ठसका म्हणजे सगळीकिरकिरी. त्यामुळे इंद्रसेन महाराजांनी मग मधला मार्ग काढला. त्यांनी या सर्व सुश्री अप्सरांना नृत्याचे धडेगिरवायला सांगितले.
सुदैवाने तेव्हाच श्रीलंकेहून राजाधीराज श्री श्री रावण लंकावर्धने यांनी इंद्रसेन महाराजांच्यावाढदिवसानिमित्ते त्यांना सप्रेम भेट म्हणून त्यांच्या दरबारातील ज्येष्ठतम नृत्यबिजली श्रीकिरणमौली पाठवलीहोती. नृत्यकुशल अशा श्रीकिरणमौली यांनी रंभा, मेनका, उर्वशी व इतर अप्सरांना नृत्यनिपूण करावे अशीविनंती इंद्रसेन महाराजांनी केली. अर्थातच श्रीकिरणमौली यांना ही विनंती अमान्य करता येणे शक्य नव्हतेच. त्यांनी सहर्ष आपला नृत्य शिकवणी क्लास इंद्रसेन महाराजांच्या दरबारी सुरु केला.
तो दिवस होता गुरुवार, वेळ होती पहाटे 4 वाजून 46 मिनिटे. कारण तोच शुभमुहूर्त होता. यामुहुर्तावर पहिल्यांदा इंद्रसेन महाराजांच्या दरबारी घुंगरुचा आवाज निनादला. पुढचा इतिहास सर्वांना ज्ञातआहेच.
मेनका, रंभा,उर्वशी, चित्रंगदा, मंदाकिनी द्वितीय या साऱ्या सुश्रर अप्सरा एकाहून एक नृत्य तरबेजझाल्या. त्या समस्त विश्वातल्या पहिल्या चीअर गर्ल्स अशाप्रकारे ठरल्या. (ललित मोदीसाहेबांना चीअरगर्ल्स संकल्पेनचा उद्गाता वगैरै ठरवले जाते, म्हणून ही विशेष नोंद.)
या चीअरगर्ल्सच्या नृत्यकौशल्याला गंज लागू नये म्हणून त्यांनी सतत नाचत राहिले पाहिजे, असेश्रीकिरणमौली यांनी इंद्रसेन महाराजांना सांगितले. महाराजांना याची उत्तम जाण होतीच. रथ कायम दौडवतठेवला नाही तर त्याची चाकं गंजतात, तलवार चालवली नाही तर त्याची धार कमी होते, डोके चालवलेनाही तर बुध्दीला वाळवी लागते याचे सामान्य ज्ञान त्यांना त्यांच्या पिताश्रींनी दिले होते. त्यामुळे त्यांनाश्रीकिरणमौलिंचे म्हणणे तत्काळ पटले. त्यांनी मेनका,रंभा,उर्वशी, मंदाकिनी द्वितीय चित्रांगदा व इतरनृत्यबिजलींना कायमस्वरुपी दरबारातच नृत्य करण्याची सोय-सुविधा उपलब्ध करुन दिली. अधूनमधून ते सुध्दाहे नृत्य बघण्यासाठी दरबारात येऊ लागले.
या ओरिजिनल चीअरगर्ल्सच्या नृत्यनिपुणतेने महाराज पुढे पुढे इतके मोहून गेले की त्यांनी एकशासकीय फर्मानच काढले. या फर्मानाचा आशय असा होता की यापुढे दरबारात दररोजच नृत्याचे विविध रंगदर्शविणाऱ्या कलाकृती मेनका, रंभा, उर्वशी, मंदाकिनी द्वितीय, चित्रांगदा व इतर नृत्यबिजलींनी सादर केल्यापाहिजेत. हा अध्यादेश त्यांनी सर्व अ आणि अ प्लस श्रेणीच्या देवतांकडे मान्यतेसाठी पाठवला. नेहमीप्रमाणेच ही देवतामंडळी त्यांच्या त्यांच्या अनुक्रमे खेळात-क्रीडेत आनंद उपभोगत असल्याने त्यांना याखलित्यात काय लिहिले आहे,अशा फालतु गोष्टिकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही. त्यामुळे या सर्वंदेवांनी तो खलिता वाचलाच नाही. बिनकामाच्या इंद्रसेनाच्या आणखी एका बकवास दरबाराचे निमंत्रण समजूनत्यावर स्वाक्षरी ठोकून दिल्या. तुम्हास इंद्रपुरीतून तहहायात निष्काषित करण्यात येत आहे, असे जरी त्याखलित्यात नमूद करुन पाठवले असते तरी त्यावरही या देवतांनी स्वाक्षऱ्या ठोकल्याच असत्या. पण इंद्रसेनमहाराजांना हे असे काही सुचले नाही. असे काही सुचवणारा एखादा चाणक्य तेव्हा त्यांच्या आसपासनव्हता. त्यामुळे देवतांवर काही अरिष्ठ आणि अनिष्ठ ओढवले नाही.
हे थोडे विषयांतर झाले. मुद्दा होता, मेनका,रंभा,उर्वशी मंदाकिनी द्वितीय आणि इतर चीअरगर्ल्सदरबारात कायमस्वरुपी नाचू लागण्याचा. त्यांना तसा शासकीय आदेश मिळाल्याने नाचत राहणे हे त्यांचेपहिले कर्तव्य होते. त्यात त्यांनी कोणतीही कसूर ठेवली नाही. मेनका, रंभा , उर्वशी या चीअर गर्ल्सयांच्यात इंद्रसेन महाराज जास्त कां रममाण झाले असतात, त्याच्यापाठीमागे ही पार्श्वभूमी आहे.
त्यांना यासाठी अशाप्रकारे वरिष्ठांकडूनच अप्रत्यक्षरीत्या बाध्य केले गेले. देवमंडळी वेळोवेळी दरबारातहजर झाली असती तर इंद्रसेन महाराजांवर ही वेळच आली नसती, ही बाब चाणाक्षांनी लक्षात घेतलेलीबरी.
मात्र चीअर्स गर्ल्सच्या नृत्याविष्काराला सतत प्रोत्साहन आणि उत्तेजन देत राहिल्याने इंद्रेसन महारांनाअनेक दिव्यातून जावे लागले. गाय गरीब असते म्हणून तिला सारखा मार मिळत राहतो ना, तसेच पुढेइंद्रसेन महाराजांचे झाले. त्यांना पुढे कोण कोणत्या दिव्यातून जावे लागले, त्याचा हा संक्षिप्त गोषवारा…
दिव्य क्रमांक एक
आपला राजा, सर्व कार्यालयीन कामकाज सोडून आणि जनतेकडे दुर्लक्ष करुन 24 तास नृत्यांगणांच्यागराड्यात असतो, ही बाब देवलोकांना शोभणारी नाही, अशी तक्रार एका ज्येष्ठतम अ प्लस श्रेणीच्या देवानेदुसऱ्या ज्येष्ठतम अ प्लस श्रेणीच्या देवांकडे केली. (दिलमे जलन या सर्वकालीक भावनेतूनच ही तक्रारकरण्याची प्रेरणा या अ श्रेणीच्या देवास मिळाली. आपण इतके पॉवरफूल असताना आपणापुढे कुणीहीनृत्य करत नाही, मात्र शुल्लक इंद्रास हे सौख्य कां? दात काढलेला सिंह आणि पॉवर नसलेला इंद्रयात फरक तो काय? असे काहीसे जलनशील विचार या देवांच्या मनी आल्यानंतर ही तक्रार घटनाघडली.)
या अ श्रेणीच्या देवाच्या देवाच्या तक्रारीत नमूद होते की, इंद्रसेन महाराज हा बालबुध्दीचा झालाआहे. किंबहुना त्याची बुध्दीच हरपली आहे. असाच व्यक्ती राज्यकारभार सोडून टीम-टीम नाच बघू शकतो. त्याला ताळ्यावर आणण्यासाठी टकमक टोकावरुन त्याचा कडेलोट करायला पाहिजे. किंवा मग हत्तीच्यापायाखाली त्यास द्यायला पाहिजे. नाचगाण्यापुढे कर्तव्याला दुय्यम स्थान देणे म्हणजे पत्नीला मोगऱ्याचा हारआणने सोडून दुसऱ्याच्या बायकोसाठी चाफेकळीचा हार आणण्यासारखे आहे. हा निंदनीय अपराध आहे. त्यास दंड व्हायलाच हवा. तुम्ही परवानगी दिली तर सुदर्शनच धाडतो. आणि मुंडकी छाटतो, इंद्रसेनाची.
या अ प्लस देवाने हा निरोप धाडल्यावर त्यांचे हात सुदर्शन चक्र चालवण्यासाठी शिवशिवायला सुध्दालागले. शिशुपाल एपिसोडनंतर ब्रम्हांडाच्या या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत सुदर्शन क्रिया अशी कुठेघडली नव्हती. ती संधी आता आयती चालून आली होती. ही संधी त्यांना सोडायची नव्हती. त्यामुळे तेसुदर्शन करंगळीतून भिरकवणार तोच दुसऱ्या अ प्लस श्रेणीच्या देवाने त्यांना थांबवले. सुदैवाने बरेच दिवसकरंगळीच्या बाहेरच न पडल्याने सुदर्शन तसे गंजलेले होते. त्यामुळे ते बाहेर निघाले नाही. अस्मादिकांमुळेसुदर्शन तुझ्यापर्यंत येण्याचे थांबले अन्यथा तू तेराच्या भावात जाऊन तुझे बारा वाजले असते,असं गुपित यादुसऱ्या अ प्लस श्रेणीच्या देवाने इंद्रसेन महारांजापुढे उघडे केले. त्यामुळे त्यांच्याबद्दलचा आदर इंद्रसेनमहाराजांच्या मनी द्विगुणित झाला. याचे भांडवल पुढे या देवाने अनंत शतके करुन इंद्रसेन महाराजांकडून बरेचकाही काही करुन घेतले. (हे तेव्हा घडून आलेलं आद्य ब्लॅकमेलिंग.)
दिव्य क्रमांक दोन
नृत्यानंदात इंद्रेसन महाराज रममाण झाले खरे.पण काही काळाने त्यांना चीअरगर्ल्सचा नृत्याविष्कारकंटाळवाणा वाटू लागला. हा कंटाळा घालवण्यासाठी श्रीकिरणमौलीने एक जाम महाराजांना नजर केला. खास प्रसंगांमध्ये राजाधीराज श्री श्री रावण लंकावर्धने हे जाम प्राशन करायचे. श्रीलंकेतून इंद्रपुरित येताना श्रीश्री रावण यांनी हे जाम विशेषत्वाने श्रीकिरणमौलिंना दिले होते. अट एकच होती, योग्यवेळेची वाट बघणे.
एके दिवशी मेनकेचा नृत्याविष्कार सुरु असताना देहभान विसरुन जाण्याऐवजी इंद्रसेन महाराज शून्यातगेल्याचे श्रीकिरणमौलिने बघितले आणि हीच ती योग्य वेळ असल्याचे तिने अचुक ओळखले. तिनेमहाराजांपुढं जाम ठेवला. महाराजांनी तो जाम तोंडी लावला.
जामच ते. महाराजांना तुफान आवडले. राम गणेश गडकऱ्यांच्या आधी एकच प्याला इथे असाघडण्याचा हा प्रारंभ बिंदू ठरला. इंद्रसेन महाराज प्यालावर प्याले रिचवत राहिले. त्यांना देता देताश्रीकिरणमौली कंटाळली. तिला जामचा पुरवठा करता करता श्री श्री रावणही थकून गेले. तेव्हा काहीव्हिस्की, रम, बीअर, वाइन, व्होडका, नारंगी, मोसंबी अशा काही व्हेरायटी नव्हत्या. पक्का प्युअर जाम. कडक मोहाचीपासून तयार केलेला. पण तो केवळ राजाधीराजांपुरताच मर्यादित होता.
श्री श्री रावण लंकावर्धने सुध्दा मोजक्याच क्षणी हा जाम प्राशन करायचे. पण जेव्हा इंद्रसेनमहाराजांनी एकच प्याला एकापाठोपाठ रिचवायला सुरुवात केली, तेव्हा त्यांचे धाबे दणाणले. इकडेइंद्रप्रस्थालाही काळजी वाटू लागली. इंद्रसेन महाराज ओसाड गावचा जरी राजा असला तरी तो अधिकृतराजा होता. हे राजेपण एखाद्या साध्वी स्त्रीच्या मंगळसूत्र आणि कपाळावरच्या कुंकवासारखे होते. कुंकू भाळीन लावलेली स्त्री म्हणजे विधवा. इंद्रसेन महाराजाविना ओसाड कां होईन साम्राज्य विधवेसारखेच झालेअसते. राजाच नसेल तर प्रजेला विचारतो कोण? राज्याची जबाबदारी घ्यायची तयारी कोणाचीच नव्हती. त्यामुळे इंद्रसेन महाराजांचे काही वाईटसाईट या एकच प्याला प्रकरणी झालेच तर आपले काय होणार अशीचिंता कनिष्ठ, वरिष्ठ, अ, अ प्लस श्रेणीच्या देवाधिदेवांना लागली. त्यामुळे त्यांनी इंद्रसेन महाराजांनातत्कालीन अल्कोहल ऍ़निमस या, जामसे पिछा छुडाव संस्थेत जबरदस्तीने दाखल केले. इंद्रसेन महाराजांनीतमाशा वगैरे करण्याचा प्रयत्न केला. आपला अर्धासुध्दा प्याला झाला नसल्याचे ते ठासून सांगू लागले.पणकुणीच त्यांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. जामसे पिछा छुडाव या संस्थेत त्यांना काही काळ राहावेलागले. हा कालावधी त्यांच्या साठी मेनकाही गेली आणि मदिराही गेली, हाती काठी आली असा होता. काही काळाचा हा ड्राय स्पेल संपवून इंद्रसेन महाराज नव्या दम्याने घरी परतले. पण त्यांच्या छातीचा भुसाझाला तो झालाच. तो काही पुन्हा भरुन निघाला नाही.
दिव्य क्रमांक तीन
इंद्रसेन महाराज केवळ महाराज म्हणून वावरत होते तोपर्यंत त्यांच्याकडे कुणी फारसे ढुंकूनही पाहतनव्हते. पण जेव्हापासून त्यांच्या दरबारात मेनका, उर्वशी,मंदाकिनी द्वितीय,चित्रांगदा या चीअर गर्ल्स नृत्यकरु लागल्या आणि जेव्हापासून महाराजांच्या हाती जाम आला तेव्हा पासून अनेक देवादीदेवांना त्यांचा हेवा, असूया, दिलमे जलन, जेलसी वाटू लागली. हे चार शब्द त्याचकाळात जन्मास आल्याची स्पष्ट नोंदऑक्सफर्ड शब्दकोशाच्या पहिल्या आवृत्तीत कुणासही सापडू शकते. पण काही काळानंतर असे वाटणे केवळवाटण्यापुरते मर्यादित राहिले नाही. कारण काही अ श्रेणीच्या शेवटच्या रांगेतील आणि ब प्लस श्रेणीच्यादेवांनी इंद्रसेन महाराजांना किडनॅप करण्याची योजना आखली. त्याला पळवायचे नि प्लुटोवर धाडून द्यायचेअशी ती योजना होती. ही योजना अतिशय गुप्तपणे आखली गेली. मात्र शेवटच्या टप्प्यावर म्हणजेमहत्प्रयासाने सुईच्या न दिसणाऱ्या छिद्रात दोरा जाण्यास प्रारंभ व्हावा नि हातातून सुईच निसटावी असे काहीसेझाले. जाम प्राशनानं झिंगथिंग झालेल्या महाराजांना सिहांसनावरुन उचलणार तोच निम्न श्रेणितीलदेवादेवकांनी प्रश्न उपस्थित केला की महाराज प्लुटोला गेल्यावर सिंहासनावर कोण बसणार? हा घात करणारासवाल उच्चारला गेला नि सारा नुरच पालटला. जो तो मी मी करु लागला. तेव्हापासून या निम्नश्रेणींच्यादेवादीदेवांमध्ये सुरु असलेले तू तू मै मै अद्याप सुरु आहे. तू तू मै मैचा प्रारंभसुध्दा असा अवचित होऊनगेला. त्याचे श्रेय इंद्रसेन महारांजाकडे जाते. ही तू तू मै मै, जी सुरु झाली ,त्यात इंद्रसेन महाराजांनाप्लुटोवर धाडण्याचे कारस्थान देव मंडळी विसरुन गेली. दोघांच्या भांडणात तिस-याचा फायदा,या म्हणीचाजन्म इथे असा घडला. इंद्रसेन महाराजांचा फायदा होऊन ते सिंहासनाधिष्ठितच राहिले. अद्यापही ते सिंहासनत्यांनी टिकवून ठेवले आहे.
दिव्य क्रमांक चार
आधी मेनका, रंभा आणि उर्वशीच्या नृत्यसाधनेत मग्न आणि नंतर जाम की रंगीन-संगीन रात्री यामध्येइंद्रसेनमहाराजांचा तिन्हीत्रिकाळ जाऊ लागल्याने इंद्राणी वहिनींच्या रात्री निरस आणि दिवस बेचव झाले. त्यामुळे नवा तिढा निर्माण झाला. महाराज महाली जाणेच विसरले. सारे काही दरबारातच. प्रत्येक क्षणांचात्यांना आनंद घ्यायचा होता. महाली जाणे म्हणजे हे क्षण स्वत: घालवून बसण्यासारखे होते. टाइम इजमनी ही म्हण तेव्हा प्रचलित नव्हती आली. पण कुबेर श्री अधून मधून असे काही तरी पुटपुटून जायचे. तेमहाराजांनी बारिक कानाने ऐकून बरिक लक्षात ठेवले होते. त्यामुळेच टाइममधील सेकंदासेंकदाचा सदुपयोगकरण्यासाठी त्यांनी महाली जाणे टाळले. याचा काय अनर्थ होईल हे त्यांनी लक्षात घेतले नाही.
इंद्राणी वहिनी पतिव्रता वगैरे होत्याच यात शंका नाही. पण पविव्रतेने दुर्गावतार धारण करु नये असेथोडेच आहे. त्यांनी एके दिवशी तसेच केले. म्हणजे त्या सिंहाबिंहावर बसून हाती मोठा त्रिशूळ वगैरे अस्त्रे-शस्त्रे घेऊन महाराजांवर चालून गेल्या नाहीत. एकदाचे ते परवडले असते. पण त्यांनी थेट काडीमोडचाखलिताच की हो धाडला. अशाप्रकारे जगातला पहिला तलाक ठरण्याची शक्यता निर्माण झाली. देवलोकांनाहे शोभणारे नाही. इज्जत का वगैरे भाजीपाला होईल म्हणून एक ज्येष्ठतम अ प्लस श्रेणीतील देव धावूनआले. आणखी असेच एक देवही इंद्रपुरीत प्रगटले. काही ज्येष्ठ देवांनी आपल्या भावना या दोन्ही अ प्लसश्रेणीच्या देवांसारख्याच असल्याचे नारदेश्वरांमार्फत कळवले.
खरे तर, इंद्राणी वहिनींचा काडीमोड खलिता बघून इंद्रसेन महाराज बेशुध्दच पडायचे राहिले. घर कीमुर्गी दाल बराबर नही होती, हा धडा त्यांना तेव्हा मिळाला. ते धावतच महाली आले. तोपर्यंत दोन्हीज्येष्ठतम अ प्लस श्रेणितील देव महाली पोहचलेच होते. कसेबसे त्या दोघांनी इंद्रानी वहिनींना समजावले. इंद्रानी वहिनींनी महाराजांना दोघांपुढे नाक घासावयास सांगितले. महाराजांनी ही कृती प्रत्यक्ष केल्यावरचत्यांचा राग शांत झाला. त्यांनी खलिता फाडून टाकला. यानंतर असे झाले तर बघाच्च माझा दणका असेत्यांनी दोन्ही देवांसमोर इंद्रसेन महाराजांना सांगितले. यापुढे ताटाखालील मांजर होऊन राहा, असा पितृतूल्यसल्ला देऊन दोन्ही देव माघारी वळले. इंद्राणी वहिनींचं कुंकू टिकलं. तसच महाराजांचा संसार रथही चालतराहिला..
दिव्य क्रमांक पाच
इंद्रसेन महाराज इतके नृत्यांमध्ये रममाण झाले की, त्यांची समाधी लागू लागली. म्हणजे साधू महंतवगैरे ग्रेट अनुभव बिनुभव घेण्यासाठी घेण्यासाठी घेतात ती नव्हे. तर अभ्यासासाठी जी ध्यानधारणा केलीजाते ती समाधी. इंद्रसेन महाराजांना अशी समाधी लागू शकते, हा आश्चर्याचा धक्का अर्ध्याअधिक इंद्रपुरीलाबसला. हा जगातील पहिला आश्चर्याचा धक्का होता. तशी पक्की नोंद सापडली आहे. कच्च्या नोंदी तरमेनका,उर्वशी,चित्रांगदा वगैर चीअर गर्ल्सनी करुनच ठेवली होती. समाधी केवळ वसिष्ठांचीच, दुर्वासांचीलागावी असंही काही चित्रगुप्ताने लिहून ठेवलेले नाही. इंद्रसेन महाराज समाधीत जाऊन नृत्याविष्काराचा आनंदउपभोगण्याऐवजी रसास्वादाचे सिध्दांत लिहून काढू लागले. नृत्यबिजलींचा पाय थिरकला की यांची लेखणीसुरु. पृष्ठावर पृष्ठ त्यांनी रखडून काढले. नृत्यकलेवर पहिला ग्रंथ असा तयार झाला. हा ग्रंथ चोरीस जाईलअशी महाराजांना जराही आशंका नसल्याने तो ते उघड्यावरच ठेवत असत. पण त्यांची आशंका खोटीठरली. एके दिवशी हा ग्रंथराज चोरीला गेला. हा शर्विलक दागदागिने सोडून हे कागदाचे बाड कां बरे चोरीकरण्यास प्रवृत्त झाला असावा, हा संशोधनाचा विषय आहे. हा ग्रंथ चोरीस जाणे इंद्रसेन महाराजांनी फारचमनावर घेतले. त्यांनी कानाला खडा लावला. लेखणी मोडून टाकली. शपथ घेतली की यापुढे काहीहीलिहायचे नाही. ही शपथ त्यांनी तंतोतंत पाळली. एक होऊ घातलेला सर्वकालिक श्रेष्ठ लेखक असाअकालीच निजधामास गेला…
(इंद्रसेन महाराजांवर ओढवलेल्या अशा अनेक दिव्यांचा पाढा वाचायचा म्हंटला तर स्वतंत्र ग्रंथच तयारहोईल.पण सध्या ग्रंथांना डिमांड नसल्यानं हा विचार आम्ही स्थगीत केला आहे.)
सुरेश वांदिले,