(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

उच्चशिक्षणाचे “प्रवेशव्दार”

अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, विज्ञान, मानव्यशास्त्र यामध्ये अधिकाधिक प्रज्ञावंत विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षण घ्यावे, संशोधनकार्यास वाहून घ्यावे, यासाठी भारत सरकारच्या वतिने सातत्याने प्रयत्न केले जातात. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात, जगात भारत अग्रेसर राहावा, तसेच आत्मनिर्भरही व्हावा, अशी धोरणकर्त्यांची अपेक्षा आहे. अंतराळविज्ञान आणि सागरीविज्ञान क्षेत्रात, भारताने केलेली प्रगती, विकसित राष्ट्रांच्या तोडीस तोड अशी आहे. “ऑपरेशन सिंदूर”मध्ये भारतीय लष्कराने, प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, अत्यंत काटेकोरपणे साध्य केलेल्या, निर्धारित उद्दिष्टामुळे, बऱ्याच राष्ट्रांना आश्चर्यचकित केले. चंद्रयान तीनच्या यशस्वी कामगिरीनंतर, भारतीय तरुणांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञानशाखेतील उच्चशिक्षण आणि संशोधनामध्ये अधिक रस निर्माण झाल्याचे निरीक्षण, खुद्द पंतप्रधानांनी संसदेत नोंदवले.

विज्ञान, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान शाखेतील दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण उच्चशिक्षण हे,  इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयआयआयटी), नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी), इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायंस एज्युकेशन ॲण्ड रिसर्च (आयसर), इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायंस- बेंगळुरु, कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग- पुणे, सारख्या काही महत्वाच्या शासकीय संस्थांमध्ये दिले जाते. या संस्थांमधील प्रवेशासाठी हुषार आणि प्रज्ञावंत विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायला हवेत. यातील काही संस्थांनी, मानव्यशास्त्राशी निगडित वैशिष्ट्यूपर्ण अभ्यासक्रमही सुरु केले आहेत. (उदा- आयआयटी मद्रास – एमए इन डेव्हलपमेंट स्टडी, आयआयटी दिल्ली- एमए इन कल्चर, सोसायटी ॲण्ड थॉट, इत्यादी)

उच्चशिक्षणाचे “प्रवेशव्दार”

ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग- गेट (अभियांत्रिकी स्नातक अभिक्षमता), या परीक्षेव्दारे देशातील उपरोक्त नमूद महत्वाच्या संस्थांमधील, अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान/ वास्तुकला या विषयातील पदव्युत्तर पदवी आणि डॉक्टोरल अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकतो. या अर्थाने, या संस्थांमधील प्रवेशासाठी ही परीक्षा, प्रवेशव्दार असल्याचे म्हंटल्यास वावगे ठरु नये. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील डॉक्टोरल अभ्यासक्रमांसाठी गेटचे गुण ग्राह्य धरले जातात.

मिळणारी संधी

(अ) पुढील सार्वजनिक क्षेत्रातील मोठ्या कंपन्या नियुक्ती प्रकियेत या परीक्षेतील गुणांचा आधार प्राधान्याने घेऊ शकतात –

(१) भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड- भेल, (२) भारत संचार निगम लिमिटेड – बीएसनल, (३) कोल इंडिया लिमिटेड- सीआयएल, (४) सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम्स, (५) चेनाब व्हॅली पॉवर लिमिटेड, (६) दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन, (७) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, (८) इंजिनीअर्स इंडिया लिमिटेड, (९) गॅस ॲथॉरिटी ऑफ इंडिया- गेल, (१०) इंडियन ऑईल कॉर्पोरशन लिमिटेड-आयओसीएल, (११) माझगाव डॉक शिपबिल्‍डर्स लिमिटेड, (१२) नॅशनल हायवेज ॲथॉरिटी ऑफ इंडिया, (१३) एनएलसी-इंडिया लिमिटेड, (१४) नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (१५) न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, (१६) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन- एनटीपीसी, (१७) आईल ॲण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन- ओएनजीसी, (१८) पॉवर ‍ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया- पीजीसीएल, (१९) ग्रिड कंट्रोलर ऑफ इंडिया लिमिटेड, (२१) राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड, (२२) हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड – हाल, (२३) स्टिल ॲथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, इत्यादी

(ब) केंद्र सरकारातील, सिनिअर फिल्ड ऑफिसर (टेलिकम्युनिकेशन), सिनिअर रिसर्च ऑफिसर (क्रिप्टो), कॅबिनेट सचिवालयात- सिनिअर रिसर्च ऑफिसर (सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी), अशी गट अ श्रेणितील पदे, थेट ‘गेट’ परीक्षेच्या गुणांवर भरली जातात. भारत सरकारच्या इतर विभागासुध्दा, ‘गेट’ गुणांचा विचार नियुक्तीसाठी करु शकतात.

    गेट अर्हता-

ज्या विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान/ वास्तुकला/ विज्ञान/ वाणिज्य/ कला याशाखेतील पदवी प्राप्त केली असेल, ते  किंवा अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षाला असलेले विद्यार्थी, ही परीक्षा देऊ शकतात. या परीक्षेसाठी कोणतीही वयोमर्यादा नाही. कला/ वाणिज्य/ विज्ञान शाखा- पदव्युत्तर पदवी किंवा या पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणारे विदयार्थी.

गेट मधील पेपर्स-

ही परीक्षा संगणकाधारित म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड असते. पुढील विषयांमध्ये ही परीक्षा देता येते.

(१) एरोस्पेस इंजिनीअरिंग, (२) ॲग्रिकल्चरल इंजिनीअरिंग, (३) आर्किटेक्चर ॲण्ड प्लॅनिंग,  (४) डाटा सायंस ॲण्ड आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (५) बायोमेडिकल इंजिनीअरिंग, (६) सिव्हिल इंजिनीअरिंग, (७) केमिकल इंजिनीअरिंग, (८) कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी, (९) केमिस्ट्री, (१०) इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग, (११) इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, (१२) एनव्हिरॉन्मेंटल सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग, (१३) इकॉलॉजी ॲण्ड इव्होल्युशन, (१४) जिओमॅटिक्स इंजिनीअरिंग, (१५) जिऑलॉजी ॲण्ड जिओफिजिक्स, (१७) इंस्ट्रुमेंटेशन इंजिनीअरिंग, (१८) मॅथेमॅटिकस, (१९) मेकॅनिकल इंजिनीअरिंग, (२०) मायनिंग इंजिनीअरिंग, (२१) मेटॅलर्जिकल इंजिनीअरिंग, (२२) नॅव्हल आर्किटेक्चर ॲण्ड मरिन इंजिनीअरिंग, (२३) पेट्रोलियम इंजिनीअरिंग, (२४) फिजिक्स, (२५) प्रॉडक्शन ॲण्ड इंडस्ट्रिअल इंजिनीअरिंग, (२६) स्टॅटिस्टिक्स, (२७) टेक्सटाइल इंजिनीअरिंग ॲण्ड फायबर सायंस, (२८) इंजिनीअरिंग सायन्स, (२९) ह्युमॅनीटिज ॲण्ड सोशल सायन्स, (३०) लाइफ सायंस

परीक्षा पध्दती

प्रत्येक पेपरचे गुण १००. निगेटिव्ह मार्किंग आहे. या पेपरमध्ये तीन प्रकारचे प्रश्न विचारले जातात() मल्टीपल चॉइस -बहुपर्यायी. (एमसीक्यू) – १ किंवा २ गुण. हे प्रश्न वस्तुनिष्ठ पध्दतीचे असतात. दिलेल्या चार पर्यांमधून एक पर्याय अचुक उत्तराचा असतो. १ गुण असलेल्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे लिहिल्यास एक तृतियांश गुण कपात केले जातात. २ गुण असलेल्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे लिहिल्यास २ तृतियांश गुण कपात केले जातात.

 () मल्टीपल सिलेक्ट प्रश्न (एमएसक्यू) – सर्व पेपरमध्ये १ किंवा २ गुणांचे प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न वस्तुनिष्ठ पध्दतीचे असतात. उत्तरांमध्ये चार पर्याय असतात. यापैकी एक किंवा त्यापेक्षा अधिक उत्तर बरोबर राहू शकतात. या विभागातील (सेक्शन), प्रश्नांसाठी निगेटिव्ह गुण नाहीत. मात्र, एकापेक्षा अधिक अचूक उत्तरे असताना, एकच उत्तर नमूद केल्यास गुण दिले जात नाही. एक चूक आणि एक अचूक उत्तर नमूद केल्यासही गुण दिले जात नाही, आणि किंवा () संख्यात्मक उत्तर पध्दत- म्हणजे (न्युमरिकल ॲन्सर्स टाईपनॅट) प्रश्नया सेक्शनमधील प्रश्नांना १ किंवा २ गुण असतात. हे उत्तर संख्यात्मक असतात. यामध्ये कोणतेही पर्याय दिले जात नाहीत. उत्तर अपूर्णांकात सुध्दा राहू शकतात.

विद्यार्थ्यांना एक किंवा दोन विषयांच्या पेपरला बसण्याची संधी दिली जाते. दोन पेपरचा पर्याय दिलेल्या यादीनुसार स्वीकारावा लागतो. मात्र परीक्षा केंद्रांशी निगडित पायाभूत सुविधा आणि उपलब्ध तारखा लक्षात घेऊनच, दोन पेपर्सना बसण्याची संधी दिली जाऊ शकते.

प्रत्येक पेपरमध्ये १०० गुणांचे ६५ प्रश्न विचारले जातात. यापैकी १० प्रश्न हे सामान्य कलचालणी (जनरल ॲप्टिट्यूड) पध्दतीचे असतात. विद्यार्थ्यांची भाषा आणि विश्लेषण कौशल्याची चाचणी करण्यासाठी या प्रश्नांची रचना केली असते. ८५ टक्के गुण हे परीक्षेसाठी निवडलेल्या विषयावर आधारित असतात. गेट परीक्षा कितीही वेळ देता येते.

अर्ज, ऑनलान पध्दतीनेच स्वीकारला जातो. दोन पेपर्ससाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना एकच अर्ज करावा लागता. गेटचे गुण पुढील पुढील सलग तीन वर्षातील प्रवेशासाठी ग्राह्य धरले जातात. (२०२५ मधील गुण हे २०२६, २०२७ आणि २०२८ सालातील प्रवेशासाठी ग्राह्य धरले जातील.)

    परीक्षा केंद्रे

अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बारामती, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नासिक नवी मुंबई- ठाणे, पनवेलरायगड, पुणे, रत्नागिरी, संगमनेरलोणी-शिर्डी, सांगली, सातारा, सोलापूर, वसई-पालघर, वर्धा, यवतमाळ सांगली. यापैकी कोणत्याही तीन केंद्राचा पर्याय विद्यार्थी देऊ शकतात.

वित्तीय साहाय्य

गेट गुणांच्या आधारावर, शासकीय किंवा शासन अनुदानित संस्थेत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. एम. टेक अभ्यासक्रमाला प्रवेश‍ मिळालेल्या विद्यार्थ्यांना दरमहा १२,४०० रुपयांचे विद्यावेतन २२ महिन्यांसाठी दिले जाते. बीई/ बीटेक/ एमएस्सीनंतर थेट पीएचडीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या दोन वर्षासाठी दरमहा ३७ हजार रुपये आणि पुढील तीन वर्षासाठी दरमहा ४२ हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. (ऑगस्ट २०२५ मध्ये, गेट-२०२६ परीक्षेची, अर्ज भरण्याची प्रकिया सुरु होईल. याची सूचना, देशातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांमध्ये जाहिरातीच्या माध्यमातून दिली जाते.)

सुरेश वांदिले