(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

एक पाऊल आणि दोन्ही हात स्वच्छतेकडे

करण जोहर किंवा स्व.यश चोप्रा यांचे चित्रपट भारतीय प्रेक्षकांनासर्वाधिक आवडतात. याचं महत्वाचं कारण म्हणजे त्यातीलचकचकितपणा, सुबकपणा आणि सुंदरता. या तिन्ही बाबीस्वच्छतेशी निगडित आहेत. जिथे स्वच्छता तिथे सौंदर्य हे साधंतत्व. आपण सौंदर्याच्या प्रेमात पडतो पण स्वच्छतेबाबतआपणास फार कष्ट पडतात. काही वर्षांपूर्वी पंतप्रधानांनी 2 ऑक्टोबरला स्वच्छ भारत मिशनची घोषणा केली. त्याला गतीमिळावी म्हणून त्यांच्या पध्दतीनं प्रचाराचं रान उठवलं. यंदाच्यादोन ऑक्टोबरला विविध माध्यमांनी स्वच्छता अभियानाचा आढावाघेतला. कचऱ्याच्या ढिगांची छायाचित्रं छापली ,दाखवली. काहींना याचा आनंदही झाला असावा. म्हणजे स्वच्छता-बिच्छतासब झुठ है, असं वाटणाऱ्या या मनोवृत्ती.

   सेलेब्रिटी स्वच्छतादूत यांनी प्रारंभी स्वच्छतेचं काम केलं, तेकेवळ दाखवण्यासाठी होतं, प्रसिध्दीसाठी होतं.अशा शेलक्याप्रतिक्रिया काहींनी दिल्या. सचिन तेंडूलकर यांनी दररोज झाडूघेऊन रस्ता स्वच्छ करणं अपेक्षित आहे की काय,किंवा प्रियंकाचोप्रा यांनी मुंबईतील गटारे दररोज स्वच्छ करणं म्हणजेच त्यांचीस्वच्छतादूत म्हणून निवड सार्थ ठरणं असं समिकरण आहे कीकाय ? सचिन तेंडुलकर, प्रियंका चोप्रा ,अमिताभ बच्चन यांनाआता प्रसिध्दीची गरज आहे,असं समजणं म्हणजे आपल्यानाकर्तेपणावर पाघंरुण घालणं झालं. या सर्वांनी किमान एकदातरी प्रतिकात्मकरीत्या कां होईना उत्तमरीत्या स्वच्छता केली. सचिन तेंडुलकर आणि त्यांचे पथक दोनेक तास त्यांचा परिसरस्वच्छ करत होते. काही सेलिब्रिटिजनी जे.जे.रुग्णालयात जाऊनप्रतिकात्मक स्वच्छता केली. त्यानंतरची जबाबदारी आपली होती. सर्वप्रकारच्या सार्वजनिक ठिकाणच्या अस्वच्छतेला आपणचजबाबदार नाही का? दोन ऑक्टोबर 2014 रोजी सर्व लोकलस्टेशनची स्थिती आणि दोन ऑक्टोबर 2015 रोजीची याचस्टेशनवरची स्थिती अपवाद वगळता जैसेथेच राहिली. स्वच्छताहा काही,चला हवा येऊ द्या यामालिकेतील मधील विनोदवाटतो की काय आपणास.

   अस्वच्छता आणि अनारोग्य

   अस्वच्छता आणि अनारोग्य हे दोन्ही सख्खे आणि एकमेकांवरजीवापाड करणारे भावंड असल्याचं आपणास ठाऊक आहे. हीभावंड आपल्या जीवावर उठली आहेत. असे असुनही त्यांच्याप्रेमात आपण आकंठ बुडालेलो असतो. त्यातून बाहेर पडण्याचीकिंचितही इच्छा आपणास दिसत नसल्याचं या वर्षभरात दिसूनआलं. जीवही प्यारा आणि अस्वच्छता प्यारी अशा दोन ध्रुवांवरराहण्याचा आपला आनंद अतर्क्यच.

   आपल्यासारख्या प्रगत समाजास स्वच्छतेसाठी सांगावंलागावं, उत्कृष्ट स्वच्छता करणाऱ्यास पारितोषिक द्यावं लागावं यागोष्टी आपल्या प्रगतिशिलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्याआहेत. गणेशोत्सवाच्या आधी गोविंदाउत्सव पार पडला. त्याउत्सवात सहभागी झालेल्या तरुणाईला खाण्यापिण्याचे पॅकेट्सदेण्यात आले. ते पॅकेट्स आणि प्लेट्स अनेक ठिकाणी यातरुणाईनं तसेच रस्त्यांमध्ये टाकून दिल्याचं दुसऱ्या दिवशी दिसूनआलं.बऱ्याच प्लेटमध्ये अन्नपदार्थ तसेच होते. रात्रभरात ते सडूनत्याची दुर्गंधी परिसरात पसरली. स्त्यावरुन जाणाऱ्या येणाऱ्यासया दुर्गंधीचा सामना करावा लागला. असा कचराकरणं,अन्नपदार्थ फेकून देणं यात कसला आला पराक्रम? एकाहीतरुणाला स्वच्छ भारत मोहिमेचा स्वच्छतादूत असलेल्या सचीनतेंडुलकरची तेव्हा आठवण येऊ नये? प्रियंका चोप्राची आठवणयेऊ नये? दोषारोपण करणं, दोष दाखवणं सोपं असतं. आपली वागणूक मात्र कधीही सुसंगत नसते. गोंविदाने आनंदमिळत असेल तर कचरा केल्यानं महाआनंद मिळतो की काय?

   खरे वास्तव

   स्वच्छता आपल्या जीवनाचा अद्यापही अविभाज्य भागबनलेला नाही, हे वास्तव आपण स्वीकारलं पाहिजे. हे वास्तवमात्र आपल्या व्यक्तिगत जीवनासाठी आणि राष्ट्र म्हणूनसमूहासाठी घातक ठरणारं आहे. देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीयस्तरावर अस्वच्छ देश अशीच असण्याची शक्यता अधिक वाटते. याचा परिणाम गुंतवणूक येण्यावर,पर्यटक येण्यावर होतो. यामुळेअंतिमत: नुकसान सर्वांचं होतं.एका अंदाजानुसार महाराष्ट्रातदररोज 35 शे टन कचरा आपण निर्माण करतो. आपल्याविविध शहरांची ओळख वेशिबाहेरच्या दुर्गंधीनं वा कचऱ्याच्याढिगानं होते. ही ओळख दिवसेंदिवेस अधिकच दृढ होत चाललीआहे.

   गांधीजी म्हणत की स्वच्छता ही देवपूजेसारखी आहे. देवपूजा भक्तिभावानं करतो ना आपण. मग स्वच्छतासुध्दा त्याचभक्तिभावाने कां करु नये? दुर्गंधी करण्यात वा कचरा फेकण्यात, कुठेही पचापचा थुंकण्यात, गटारे तुंबवण्यात कोणता पराक्रमवाटतो,हा संशोधनाचाच विषय ठरतो.

   स्वच्छतेचा धडा

   स्वच्छतेचा धडा आपणास शाळेत दिला जातो. पण तो नदेताही त्याचं महत्व पटलं पाहिजे. स्वच्छता करणं ही काहीमंगळावर यान पाठविण्याच्या तंत्रज्ञानाइतका कठिण आणिसर्वसामान्यांच्या आकलनापलिकडचा विषय नाही.तरीही आपण  त्याबाबत उदासीन  आणि बेफिकीरही असतो. व्यक्तिगत आनंदआणि समाधानावर विरजण घालणाऱ्या या बाबी आहेत. आपलंघर,आपला परिसर आणि त्यानंतर सामुदायिक ठिकाणं स्वच्छराहिली तर आपली विचारसरणीही स्वच्छ, संतुलित आणिआरस्पानी राहू शकते.आपल्या अवतीभवतीच्या अस्वच्छतेचापरिणाम आपल्या विचार व मनावर होतो. अनंत प्रकारचे सुष्ट-दुष्ट विचार, मानपानाच्या भावना, द्वेष, अहंकार, दुष्टावा, वैमनस्य, श्रेष्ठत्व आदी बाबींनी आपला मेंदू डम्पिंग ग्राऊंड झालाआहे. या विकाररुपी कचऱ्याचे थरच्या थर त्यात साचताहेत. अशा मानसिक अस्वच्छतेला बळी पडून स्वत:चे दैनंदिन जीवनकष्टप्रद आणि बरेचसं असह्य केलं आहे.

   भौतिक स्वच्छता आणि अभौतिक अस्वच्छतेचा काहीचअर्थाअर्थी संबंध नाही,असं ठामपणे कुणी सांगू शकतनाही.परिसर स्वच्छ असेल तर आपलं मनही प्रसन्न आणि आनंदीराहतं. नसेल तर मनावर उदासिनतेचे ढग स्वार होतात. अशास्थितीत काम करण्याचा उत्साह कमी होऊ शकतो. उत्पादकता कमी होऊ शकते. सर्जनशीलतेला चाप बसू शकतो. स्वभाव चिडचिडा वा संकटाचं आवरण कायम घेऊन वावरणाराहोऊ शकतो.अशा व्यक्तिंना मग काही मंगलमय दिसत नाही. त्यामुळेच कचरा ही भुषणावह बाब होऊ शकत नाही. सुशिक्षितआणि उच्चभ्रू मंडळींनी ही बाब विशेषत्वानं ध्यानात घ्यायलाहवी.

   पर्यटनस्थळे, वने ,उद्याने यांना प्लॅस्टिक बॅगा, बॉटल्सयांची सप्रेमभेट देणं टाळलं पाहिजे. प्राण्यांनी प्लॅस्टिक खाल्यासत्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. पर्यटनस्थळपरिसरातील अस्वच्छतेत भर टाकलीच पाहिजे असा नियम नाही. त्यासाठी आपणास कुणी शिक्षा करणार नाही. कचरा करणारनाही, करु देणार नाही असं आपण मनात कां पक्कं ठसवूशकत नाही? कचऱ्याला कुणी मायबाप नसतो हे जरी खरंअसलं, तरी आपण सुरुवात केली तर त्याचे मायबाय होऊशकतो. पर्यटनस्थळांची स्वच्छता ही केवळ त्याठिकाणच्यानगरप्रशासनाची जबाबदारी ठरु शकत नाही. एकिकडे अतूल्यभारत म्हणत स्वत:ची पाठ थोपटून घ्यायची आणि दुसरीकडेमिळेल तो परिसर कचराकुंडी समजून अतूल्य भारताची महतीमातिमोल करायची असं सध्याचं दृष्य आहे. अशाच प्रकारेनद्या,नाले यांच्या पवित्रतेला आणि सुंदरतेला कचरा आणिघाणिमुळे आपण बाधा आणली आहे. एकिकडे नदीला आईआणि पाण्याला जीवन म्हणायचं आणि दुसरीकडे दोन्हीबाबींचीजितकी म्हणून वासलात लावता येईल तितकी लावयाची,असंआपलं सध्याचं वर्तन आहे.

   स्वच्छतासंस्कृतीची खरी ओळख

   स्वच्छता हीच संस्कृतीची खरी ओळख असते. स्वच्छपरिसरातून वैभवशाली साहित्य,पंरपरा,कला यांचा उदय झालाआहे.स्वच्छतेचा आनंद हा किती मोठा असतो हे आपण जेव्हाअजंठा-वेरुळची लेणी बघतो तेव्हा प्रत्ययास येतो. कल्पना कराकी या लेण्या अस्वच्छ असत्या तर असा निर्मळ आणि निरामयआनंद आपणास मिळाला असता का? आपले हे छोटेखानीआयुष्य अधिक समृध्द,समाधानी आणि सुंदर करण्यासाठीस्वच्छतेचा मोठा हातभार लागू शकतो. गेल्यावर्षी आपण एकपाऊल स्वच्छतेकडे टाकयाला सुरुवात केली होती. यंदा दोन्हीपावलं टाकूया..शक्य झालं तर त्यास गतिही देऊ या.