(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

ओळख स्वत:ची

शासकीय वा खाजगी नोकरी किंवा व्यक्तिगत वा सामाजिक जीवनात काही व्यक्ती खूप यशस्वी होतात. तर काहींना यश मिळवण्यासाठी बराच संघर्ष करावालागतो. काहींच्या आसपास यश फिरकत नाही. अशावेळी त्या व्यक्ती बाह्य गोष्टींना स्वत:च्या अपयशासी जोडत असतात. तो मानवी स्वभाव आहे. तथापीप्रत्येकानं स्वत:चं आत्मपरीक्षण केलं तर काही बाबींची सुधारणा करता येऊन आपणही यशाच्या मार्गावर प्रस्थान करु शकतो आणि इच्छित उद्दिष्टाप्रती पोहचूसुध्दा शकतो.

(1) उत्तर शोधण्याची भूमिकाआपण अनेकदा प्रश्नार्थक म्हणजेच नकारात्मक भूमिकेला अधिक जवळ करतो. कोणतीही छोटी मोठी समस्या उभी राहते तेव्हात्याला भिडण्याऐवजी ती समस्या सुटू शकतच नाही अशी स्वत:ची धारणा पक्की करतो. त्यामुळे ती समस्या प्रलंबित राहते. या भिजत धोंगड्यामुळे नव्यासमस्या उत्पन्न होतात वा जुनी समस्या अधिक किचकट होते. त्यामुळे जेव्हा कधी समस्या निर्माण होते, तेव्हा त्याचं उत्तर शोधण्याची इच्छा ठेवली तरप्रत्येकाची बुध्दिमत्ता, आकलन यानुसार अशी समस्या सुटण्याचे मार्ग दिसू लागतात. समस्येची उत्तरं शोधणाऱ्या व्यक्ती या शासकीय वा खाजगी ठिकाणीइतरांपेक्षा दोन पावलं समोर असतात.

(2) नवं तंत्रज्ञान, नवं कौशल्य याचा अग्रक्रमाने अंगिकारखाजगी असो की शासकीय नोकरी वा खाजगी आस्थापनांमध्ये तुम्हास स्वत:ला नवं तंत्रज्ञान, नवंकौशल्य याचा अग्रक्रमाने अंगिकार करता आला पाहिजे. काही तंत्रकौशल्यात सर्वोच्च पातळीची पारंगतता मिळवली तर तुमच्याशिवाय वरिष्ठांचं पान हलणारनाही, ही बाब लक्षात घ्या. शासकीय नोकरीमध्ये अशा व्यक्ती कायम वरिष्ठांच्या जवळ असतात. त्यामुळे अशा व्यक्तिंवर नव्या जबाबदाऱ्याही विश्वासानंटाकल्या जातात. नवी जबाबदारी याचा अर्थ अतिरिक्त काम नव्हे. तर तुमच्या क्षमतेवर दाखवला जाणारा विश्वास होय. हा विश्वास तुम्हास कोणत्याही टप्प्यावरअनेकवीध लाभ मिळवून देणारा ठरु शकतो.

(3) उद्दिष्टांचा आराखडातुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा, तुम्हास नेमकं काय व्हायचं किंवा काय करायचं आहे याचा स्वयंस्पष्ट आराखडा तयार करणं आवश्यकठरतं. असा आराखडा सतत कार्यप्रवण राहण्यासाठी प्रेरणा, उत्साह आणि उर्जा देत असतो. हा आराखडा क्लिष्ट, अशक्यप्राय नसावा. स्वत:च्या शारीरिक, बौध्दीक आणि मानसिक क्षमतांचे पुरेपूर भान ठेऊन तयार केलेला असावा. यामध्ये प्रामाणिकतेचं तत्व महत्वाचं ठरतं, ही बाब लक्षात ठेवावी. यामुळे स्वत:च्याप्रबळ आणि दुर्बळ बाजू तुमच्या लक्षात येतील. प्रबळ बाजू अधिक सक्षम करुन दुर्बळ बाजूवर मात करण्याचे उपायही अवलंबता येतील.

(4) गुरु, मार्गदर्शक, प्रेरणादायी स्त्रोत असावाकुणीही सर्वज्ञ असत नाही. ही बाब कायम लक्षात ठेवावी. शिवाजी महाराज ते सचीन तेंडुलकर यांना सुध्दा गुरुलागतो. कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ती उत्तुंग यश प्राप्त करतात तेव्हा त्यांच्या आयुष्यात एखादा मार्गदर्शक, प्रेरणादायी स्त्रोत असतो. कारण अशा व्यक्तीअडचणीच्या वेळी त्यांच्या अनुभवाच्या जोरावर त्यांना मदत करतात. समस्या सोडण्याचे मार्ग दाखवतात. चुका दुरुस्त करतात. संबंधिताचे प्रयत्न आधिकप्रभावशाली कसे होतील, यासाठी मार्गदर्शन करतात. त्यामुळे तुम्ही असा एखादा गुरु अथवा मार्गदर्शक नक्कीच शोधला पाहिजे. त्याची मदत घेण्याविषयीआपणास कोणताही कमीपणा वाटायला नको.

(5) सह्रदयांशी नातेबंधसह्रदयांची साखळी म्हणजेच ज्यास आजच्या काळात नेटवर्किंग म्हणतात ती अधिकाधिक कशी सक्षम आणि समर्थ करता येईलयाकडे लक्ष पुरवणं गरजेचं आहे. या साखळीत जोडल्या गेलेले सह्रदय हे आपणास कोणत्याही टप्प्यांवर मदतीस येऊ शकतात, याची आपणास खात्री वाटलीपाहिजे. त्यासाठी अशा सह्रदयांशी नातेबंध सुदृढ करण्यासाठी वेळेची गुंतवणूक करायला हवी. सध्या विविध समाजमाध्यमांमुळे तर ही सोय अधिकच उपलब्धझाली आहे.

(6) असत्य टाळा–  असत्य बोलण्यानं किंवा वागण्यानं आपली प्रतिष्ठा कोणत्याही क्षणी ढासळू शकते ही बाब लक्षात ठेवावी. महाभारत युध्दातील एकअर्धसत्य धर्मराज युधीष्ठराची सत्यवचनी व्यक्तिची प्रतिष्ठा कायमची धुळीस मिळवून गेली. महाभारतकारांनी सकलजणांना शहाणे करण्यासाठी ही कथागुंफली असण्याची शक्यता वाटते. वागण्याबोलण्यातला असत्यपणा आपणास अल्पवेळेसच यश देतो किंवा समस्येच्या सोडवणुकीसाठी सहाय्य करतो. मात्रदीर्घकालासाठी असं वागणं घातक ठरु शकतं.

(7) तुलना टाळादूरदर्शन वाहिन्यांवरील रिॲलिटी शोच्या सादरीकरणात अतिशय लोकप्रियता मिळवलेल्या भारती या गलेलठ्ठ अभिनेत्रीची एक जाहिरातसध्याआकर्षित करुन घेत आहे. या जाहिरातीत भारतीजी म्हणतात की, मला लहानपणापासूनच ठाऊक होतं की मी सुंदर आहेहा अतिशय सकारात्मक संदेशप्रत्येकानं लक्षात ठेवायला हवा. आपण स्वत:ला इतरांशी तुलना करत सुटतो. हे टाळणं कसं गरजेचं आहे, ही बाब हा संदेश देणाऱ्या भारती मनावर ठसवतात. प्रत्येकाची स्वत:ची वैशिष्ट्ये असतात, क्षमता असते आणि कोणतातरी अनोखा गुणही असतो. त्याची ओळख अचुकपणे व्हायला हवी. त्यामुळे इतरांशी तुलनाकरण्याचा मोह होणार नाही. इतरांशी तुलना कधीही कुणालाही प्रेरणा देत नाही. तुलना म्हणजे नकारात्मकता. ती टाळायला पाहिजे. तुलना करुन स्वत:कडेनसणाऱ्या गोष्टींबाबत दु:खीकष्टी होण्यात हशील नाही.

(8) चालढकलहा एक मोठाच दुर्गुण आपले पाय कायम मागे ओढत असतो. हा दुर्गुण कुणीही शिकवत नाही. तो आपल्या अंगी कसा आणि कोणत्या क्षणीघुसतो हे कळत नाही. मात्र चालढकल करतो आहोत हे आपणास पक्क कळत असत. हे कळूनही आपण सावध होत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर, तब्येतीच्या काही समस्या जाणवू लागतात तेव्हा प्रारंभी आपल्यापैकी अनेकजण त्याकडे दुर्लक्षच करतात. त्या जेव्हा मोठ्या होऊ लागतात तेव्हा अधिक क्लिष्टझालेल्या असतात. शरीरात शिरणारे उच्च वा कमी रक्तदाब हे आपल्या चालढकलीचे परिणात असतात. दुसरं उदाहरण म्हणजे बऱ्याच व्यक्ती फेब्रुवारीमार्चमहिन्यापर्यंत करनियोजनाकडे दुर्लक्ष करतात आणि शेवटच्या महिन्यात धावाधाव करुन आयकर वाचवण्यासाठी कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करुन बसतात.समजा, पब्लिक प्रॉव्हिंडट फंडात तुम्हास जानेवारीफेब्रुवारी महिन्यात जी रक्कम टाकायची आहे, तीच रक्कम संबंधित आर्थिकवर्षाच्या प्रारंभी म्हणजे एप्रिलमहिन्याच्या पाच तारखेपर्यंत टाकली तर, त्या संपूर्ण रक्कमेवर वर्षभराचं व्याज मिळतं. तीच रक्कम शेवटच्या दोन महिन्याआधी टाकली तर केवळ दोनचमहिन्याचं व्याज मिळत. चालढकलीमुळे असं आर्थिक नुकसान होऊन जातं.

(9) स्वत:विषयी नकारात्मक भावनाआपल्यापैकी काही जणांना स्वत:विषयी नकारात्मक भावना ठेवायला आवडतं. याचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्वावरहोतो. अशा व्यक्तींना अपयशाची भीती वाटत राहते. त्यामुळे त्या कोणतेही प्रयत्न करत नाहीत. किंवा असे प्रयत्न केले तर ते अर्धवट मनाने करतात. त्यातउत्साह आणि उर्जेची कमतरता असते. त्यामुळे अशा व्यक्तींना संधी मिळाली तरी ते घालवून बसतात. व्यक्तीगत आणि खाजगी आयुष्यातही ते दु:खीचराहतात. अशा व्यक्ती अनेकदा निष्कारणच स्वत:वर राग काढून नव्या समस्यांमध्ये गुंतून जातात.

(10) इतरांवर दोषारोपणहा दुर्गुण सुध्दा आपले पाय मागे ओढण्यासाठी कारणीभूत ठरतो. असं दोषारोपण करण्यात आपण आपला वेळ कां घालवायचा, हे स्वत:च्या मनास विचारलं पाहिजे. असा वेळ दडवणं हा वेळेचा अपव्यय नाही तर गुन्हाच ठरतो. इतरांचा दोष शोधण्यात, त्यावर चर्चा करण्यात काहीचहशील ठरु शकत नाही. त्यातून फक्त नकारात्मक आनंद आणि फसवं समाधान मिळतं. त्याचं मूल्य शून्य असतं. त्यातून तुमचा विकास घडत नाही. प्रगती साध्यहोत नाही. कोणत्याही गुणात वाढ होत नाही.

   उपरोक्त नमूद बाबी या सहज अंगिकारणाऱ्या आहेत. त्यासाठी विशेष कष्ट सुध्दा घेण्याची गरज नाही. फक्त आपण ठरवायचं आणि त्याप्रमाणे वागायचं. असं वागून बघा नि स्वत:मध्ये होणारे सकारात्मक बदल बघा