कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
निर्माण होते तेव्हा…
बरेचदा स्वत:च्या क्षमतेबद्दल आपल्यापैकी अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण होतात. त्यामुळे आपल्या कार्यक्षमतेवरहीत्याचा परिणाम होऊ शकतो. असे प्रश्नचिन्ह नैराश्याचे मळभ निर्माण करु शकतात. मात्र बऱ्याच मानसशास्त्रज्ञांच्या मते यापरिस्थीतवर फार चिंता करण्याची गरज नाही. प्रत्येकाच्याच आयुष्यात कोणत्या ना कोणत्या टप्प्यांवर असे प्रश्नचिन्हस्वत:कडून वा इतरांकडूनही निर्माण होत असतात. अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा हतबल न होता वा संपलच सारं असं नसमजता शांतपणे बसून हे असं कां बरं घडतय यावर चिंतन करणं श्रेयस्कर ठरतं. या चिंतनमननातून बरेचदा असं दिसून येतं कीआपल्या कार्यक्षमतेवरचा प्रश्न अवास्तव स्वरुपाचा आणि केवळ भीतीपोटी निर्माण झाला आहे. ही परिस्थिती कृत्रिमअसल्यानं या परिस्थितीवर मात करता येतं. त्यासाठी पुढील काही बाबी ध्यानात ठेवायला हव्यात.
वस्तुनिष्ठ आणि कठोर आत्मपरिक्षण
आपण स्वत:चं अतिशय वस्तुनिष्ठ आणि कठोर आत्मपरिक्षण करायला हवं. यामुळे आपणास आपल्याव्यक्तिमत्वातील उत्तम गुण आणि वाईट गुण यांची जाणीव होईल. प्रत्येक व्यक्तिकडे असलेले चांगले गुण हे त्याचंबलस्थान असतं. या बलस्थानामध्ये आपणाकडे असलेलं एखादं कौशल्य, एखादी कला, आपला प्रामाकिणपणा, पादर्शकपणा अशासारख्या बाबींचा समावेश करता येईल. या अशा बाबी आपल्या व्यक्तिमत्वाचे सकारात्मक पैलूदर्शवतात. यासर्व पैलूंची आपण एक स्वंयस्पष्ट यादी तयार करावी. या गुंणामुळे आणि कौशल्यामुळे आतापावेतो ज्या गोष्टीसाध्य केल्या त्यांचीही यादी करावी. या यादीवरुन आपल्या लक्षात येईल की तुमच्या अंगभूत क्षमतेमुळे तुम्ही अनेकलहानमोठ्या गोष्टी साध्य करु शकला आहात. ही अशी यादी तुमच्या क्षमतेवरील प्रश्नचिन्ह दूर सारण्यास सहाय्यभूत ठरुशकते. त्यामुळे आत्मविश्वासही नव्याने जागृत होऊ शकतो. हा आत्मविश्वास स्वत:च्या कृतिशील क्षमतेवर निर्माण झालेल्याप्रश्नचिन्हाला चोख उत्तरही देऊ शकतो. मनातील अपयशाची भीती दूर करु शकतो. ही भीती दूर झाल्याने आणखी नवीआव्हानं स्वीकारण्यासाठी आपण सक्षम आहोत असं वाटू लागतं. त्यासाठी आपण मग स्वत:ला स्वयंप्रोत्साहनही देऊ लागतो.
उद्दिष्टांची स्वयंस्पष्टता
आपल्याला आयुष्यात नेमकं काय साध्य करायचय हे स्पष्ट झालं की मग त्यादिशेनं सातत्यानं प्रयत्नशील राहिल्यासयेणाऱ्या विविध स्वरुपाच्या अडचणीवर मात करण्याची उर्जा आपल्याला स्वयंप्रेरणेतून मिळू लागते. त्यामुळे ठरविलेल्याउद्दिष्ट्यपूर्तिच्या दिशेनं आपण अधिकाधिक आत्मविश्वासानं पावलं टाकत राहतो.
आपलं उद्ष्टि किंवा एखादं हाती घेतलेलं काम जर अशक्यप्राय वाटत असलं तरी ते कोणत्याही टप्प्यावर सोडून देऊनये. प्रयत्नांमधील सातत्यामुळे यशाचा मार्ग आणि दिशा आपल्या नजरेसमोरुन दूर जात नाही. येणाऱ्या अडचणींमुळेकदाचित आपलं मन त्या कामापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत राहील. पण त्यावर मात करता आली पाहिजे. अशास्थितीत आपलं स्वप्न किंवा आपलं उद्दिष्ट यावरच पूर्णपणे लक्ष केंद्रित करणं अत्यंत महत्वाचं असतं. त्यासाठी स्वत:वरीलविश्वास महत्वाचा ठरतो. आपल्या कार्यावरील प्रेम महत्वाचं ठरतं. त्यामुळे येणाऱ्या अडचणींवर मात करण्याची किंवा याअडचणींशी सामना करण्याची शक्ती प्राप्त होते.
उद्दिष्टपूर्तीचा रोडमॅप
जे कोणतं काम आपल्याला करायचं आहे, त्याची स्वयंस्पष्ट कल्पना किंवा आराखडा आपल्या मनात तयार हवा. त्यानंतर तो आराखडा कागदावर उतरवून घ्यावा. याला आपण आपल्या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने नेणारा रोडमॅप म्हणू शकतो. हारोडमॅप उत्तमरीत्या रेखाटायला हवा. ठरवलेलं उद्दिष्ट ही जीवनातील महत्वाची परीक्षा असून ती उत्कृष्टपणे उत्तीर्ण व्हायीचययाचा ध्यास हवा. रोडमॅपचं उत्तम सादरीकरण हे आत्मविश्वास वाढवणारं साधन ठरु शकतं. तुमच्या संपूर्ण व्यक्मित्वावरचत्याचा परिणाम होऊ शकतो. यश मिळविण्यासाठी नेमकं काय करावं लागेल याची स्पष्टता या रोडमॅपमुळे येते. प्रयत्नांच्यादिशेमध्ये स्पष्टता येते. कार्यप्रवणतेसाठी नवी उर्जा आणि मनाला उभारी देणारं हे साधन असतं. इतरांपेक्षा चार पावलं पुढंठेवण्यासाठी हा रोडमॅप उपयुक्त ठरतो. यश मिळवण्यासाठी काही प्रमाणात प्रतिभा असावी लागते. पण सातत्यपूर्ण प्रयत्नआणि आत्मविश्वास नसेल तर केवळ प्रतिभेच्या बळावर यश मिळेलच असं खात्रीनं सांगता येत नाही.
आपणास भविष्यात राज्याचं मुख्यमंत्रीपद मिळू शकतं हे जेव्हा स्व. यशवंतरावाजींच्या लक्षात आलं तेव्हासमकालीन नेत्यांपेक्षा स्वत:ला चार पावलं कसं समोर राहता येईल यादृष्टिने त्यांनी एक रोडमॅप करुन स्वत:ला अधिक सक्षमकरुन घेतलं. त्यामध्ये विविध विषयांचं चौफर वाचन, इंग्रजी भाषेवरचे प्रभुत्व, सांसदीय राजकारणाच्या बारकाव्यांचासखोल अभ्यास, राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय राजकारणाचा सखोल अभ्यास आदी बाबींचा समावेश आहे. समाजकारण आणिराजकारणात महात्मा गांधी आल्यानंतरचं त्यांचं संपूर्ण आयुष्य हे एका स्वयंस्पष्ट रोडमॅपचे आदर्श उदाहरण आहे. त्यांचाप्रत्येक दिवस या रोडमॅपनुसारच व्यतित होत असे. त्यामुळेच त्यांच्याद्वारे इतके प्रचंड कार्य होऊ शकले. प्रचंड व्यस्तअसतानाही गांधींजींनी त्यांच्या जीवनकाळात हजारो पत्र लिहिलीत. हे एकच उदाहरण त्यांच्या रोडमॅपच्या यशस्वतीचं पुरेसंउदाहरण ठरावं. सिव्हिल सर्व्हिस परीक्षेत गरिब परिस्थितील बरीच मुलं अनन्यसाधारण यश मिळवतात, ते सुध्दा त्यांनीठरवलेल्या व त्याबरहुकूम कृती केल्यामुळेच. आपल्या राज्यातील अनेक छोटे शेतकरी, निसर्गाच्या लहरीवर मात करीतशेतीसाठी त्यांच्या कल्पनेनुसार रोडमॅप तयार करतात. नि तसचं वागतात. कोणत्याही परिस्थितीत ही छोटीशी भूमी त्यांनासमाधानकारक उत्पन्न देत असतं. दरवर्षी महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांना कृषीभूषण म्हणून निवडून त्यांचा सत्कार राज्यसरकारच्या वतिने केला जातो. त्यांच्या यशकथा सुध्दा या रोडमॅपच्या कथाच असतात. स्वत:च्या कार्यक्षमतेबद्दल जेव्हा जेव्हाप्रश्नचिन्ह निर्माण होतात, तेव्हा हे असे रोडमॅप आपला आत्मविश्वास जागृत करण्यास सहाय्यभूत ठरु शकतात.