(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

किचनमधील न्यूज

इद्रंपुरीचे प्रिंसिपल करस्पांडन्ट नारदमुनीं यांनी वृत्तसंकलनात अजोड  आणि अमूल्य कामगिरी बजावल्याचंआपण सारेच जाणतो. त्यांच्यासारखं बातमीसाठी नाक खुपसणं अद्याप कुणालाही जमलेलं नाही.असं असूनहीत्यांच्या मनी एक खंत राहूनच गेली.ती म्हणजे त्यांना एखाद्या अमृतभांडार भोजनालयाच्या किचनमध्ये नाकखुपसावेसं वाटलं नाही.स्वंयपाकघरातील वास सुध्दा बातमीचा विषय होऊ शकतो हे काही त्यांच्या लक्षातआलं नाही.ही ती खंत.

   स्वयंपाकघरातही बातमी असू शकते,हे जर त्यांना कळले असते तर,त्यांनी  प्रभू रामचंद्रांच्या अयोध्यानगरीआणि पुढे वननगरीतील त्यांच्या किचनमध्ये होणाऱ्या विविध डिशेश,द्वारका नगरीत श्रीकृष्णांच्या आठसौभाग्यवती करीत असलेले पक्वांनं,हिमालयनिवासी श्री महादेव यांच्या अन्नप्रयोगाच्या विविध रेसिपी,श्रीयुतलंकाधीपती रावण महोदयांना आवडणाऱ्या भाज्यांच्या रेसिपी,श्रीयुत कुंभकर्ण यांना आवडणाऱ्या नॉनव्हेजच्याडिशेश,चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्य पहिले ते विक्रमादित्य तेरावे यांच्या पिढीपर्यंत खानपानात झालेलेबदल,सम्राज्ञी क्लिओपात्रा यांच्या सौंदर्याला चार चांद आणि आठ सूरज लावणाऱ्या त्यांच्या खानपानाचे रहस्यआदी बाबींची नोंद करता आली असती.या विविध रेसिंपीवर आधारित असंख्य पुस्तके लिहिता आलीअसती.या पुस्तकांनी त्यांना प्रचंड रॉयल्टी मिळवून दिली असती.कदाचित इंद्रपुरीचे प्रिसिंपल करस्पांडंन्टपदसोडून त्यांना स्वत:चे वृत्तपत्राचे संपादक संपादक होता आले असते.कदाचित या रेसिपजवर आधारित फूडचैन रेस्टॉरेंटस उघडता आली असती.कदाचित,त्यामुळे कुबेराच्या बँक बॅलेन्सला लाजवेल एवढा धनसंचयहीकरता आला असता..पण ते होणे नव्हते.किचनमध्येही बातमी असते हे नारदांना कळलं नाही..

   पण त्यांचा वारसा चालवणाऱ्या पृथ्वीतलावरील अनेकांना सांप्रतकाळी हे मात्र बरोबर कळले.आधीनाकाला बातमी कळली पाहिजे या व्याख्येनुसार अनेकांनी आपले नाक किचनकडे वळवले नि या मंडळींनीकिचनमधले बातमीमूल्यावर मोहर उमटवली.

00000

2

   फूड जर्न्यालिझम उदयास येऊन तसा बराच कालावधी उलटलाय.मानवाचा जन्म झाला कदाचित त्याचदिवसापासून त्याला चवीचं खाणं आणि सोबत पिणही हवं असलच पाहिजे.मानवानं खानपानावर अत्यंतआवडीने प्रयोग आणि प्रेम केले.तो आपल्या प्रेयसीवर,पत्नीवर प्रेम करायला उन्नीस ठरला असेल पणखानपानाच्या प्रयोगाबाबत त्याने प्रेयसीला मागे टाकले.उलट उत्कटप्रेमाचा मार्ग खानपानातूनच जातो,हे सत्यत्यानेच शोधून काढलं.

   मानवाने खानपानाचे ज्ञात-अज्ञात लाखो प्रयोग केले.ते अजूनही सुरुच आहेत.याचा पुरावा कोणत्याहीबऱ्यापैकी रेस्टॉरेंट किंवा उपहारगृहात गेल्यावर,चार ते आठपानांचं पदार्थांचं कॅटलॉग आपल्यासमोर ठेवलंजातं,त्यावरुन मिळतो.

   खानपानाच्या या प्रयोगांमध्ये बातमीचा विषय असल्याचं लक्षात आल्यावर हुषार आणि चवीच्या खान्यावरप्रेम करणाऱ्या पत्रकारांनी लिहायला सुरुवात केली.इंग्रजी पत्रकारांनी याचं वेगळं मूल्यही लगेचच जाणलं.तेम्हणजे विविधांगी पदार्थांची चव ही सौजन्याने घेता येते नि त्यासाठी एक रुपयाही खर्च करावा लागतनाही.ज्या रेस्टॉरेंट वा हॉटेलमधील पदार्थांवर लिहितो तिथे,पुन्हा पुन्हा सन्मानपूर्वक बोलावलं जातं नि पुढीलखेपेला व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट मिळते.पुन्हा डिसकाऊंटही मिळतं.वगैरे..काही अपवाद वगळले तर हा आनंदतसा कुणी अव्हेरला नाही.तसे करण्याचे काही कारणही नाही.

   फूड जर्न्यालिझमने उपहारगृहाच्या चार भिंतीतच फिरणारे पदार्थ चांगल्या अर्थाने चव्हाट्यावर आणले. भक्तांची पावलं जशी मंगळवारी सिध्दी विनायकाकडे किंवा गुरुवारी साईबाबांच्या मंदिराकडे वळतात तशीवेगळ्या चवींसाठी सदैव आसुलेल्या खवैयांची पावलं या उपहारगृहे किंवा हॉटेल्सकडे वळू लागली.

   अमूक रेस्टॉरेंटध्ये तमूक पदार्थ टेस्टी मिळतो हे वृत्तपत्रे किंवा मासिकातून कळल्यावर नि खवैय्यांनी त्याचीचव घेतल्यावर माऊथ पब्लिसिटीने उपहारगृहे फूल्ल होऊ लागली.एखाद्या पदार्थाचे कोडकौतुक करणारे दोनशेशब्द अर्थप्राप्तीचे साध्य आणि साधन ठरु शकते हे दिसून आलं.

   000

   3

   स्व.बेहराम काँट्रक्टर म्हणजेच बिझी बी यांनी तर मुंबईतील लहान-मोठया पंचतारांकित, गेट वे ऑफइंडियाच्या पाठीमागे असलेल्या गल्लितल्या

टपरीवरच्या ,लालबागेतील खाऊगल्लीतल्या अनंत पदार्थांचा आस्वाद घेत त्या आस्वादाची मौजमजावाचकांपर्यंत पोहचवली.

   90 च्या दशकात इंग्रजी वृत्तपत्र आणि सण्डे सप्लिमेंटमध्ये चित्रपट समीक्षापेक्षाही उच्च दर्जाचे स्थान फूडक्रिटिकला मिळाले.अनिल धारकर (टाईम्स ऑफ इंडिया,इलुस्ट्रेटेड वीकली,डेबोनेर इत्यादी),विनोद मेहता(आऊल लूक,डेबोनेर,इंडियन पोस्ट,सण्डे ऑब्झर्व्हर इत्यादी),प्रीतीश नंदी,कधीकधी खुषवंत सिंग,शोभाडे,वीर संघवी आणि दुसऱ्या फळीतीलही अनेक पत्रकार यांनीही हा राजमार्ग चोखाळला आणिचाखला.हेलनच्या कॅबेरे नृत्याशिवाय हिंदीचित्रपट जसा सुफळ संपूर्ण होत नसे तसच फूड कॉलम शिवायसाप्ताहिक पुरवण्यांचं कुंकू ठसठशितच होत नसे.

   पुढे,केवळ अमूक पदार्थ तमूक ठिकाणी अत्युत्तम मिळतो एव्हढ्यापुरतं हे चवदार लिखाण फूलस्टॉप घेतझालं नाही तर अमूक तमूक ठिकाणी मिळणाऱ्या अत्युकृष्ठ एक वा दोन पदार्थाची रेसिपीही देणं सुरु झालं.हेव्हॅल्यू ऍ़डेड लिखान संबंधित रेस्टॉरेंट आणि संबधित पत्रकार/लेखक यांची लोकप्रियता वाढवते झाले.यारेसिपीजींची पुस्तके निघालित.त्यांच्या आवृत्यावर आवृत्याही निघाल्या.टाईम्स सारख्या प्रथितयश मीडिआहाऊलसाही दरवर्षी फूड गाईड काढावेसे वाटले.

   000

   4

   सांप्रतकाली वीर संघवी हे फूड जर्न्यालिझमधले.सूपर-ड्यूपर स्टार आहेत.वीर संघवी हे इंग्रजीपत्रकारितेतील मोठ्‌ठं नाव.टॉप टेनमध्ये त्यांचा समावेश होतो.हिंदुस्थान टाईम्स सारख्या राष्ट्रीय वृत्तपत्राचे त्यांनीसंपादकपद भुषवले.राजकीय विश्लेषक म्हणूनही त्यांची ख्याती आहेच.पण त्यांनी आपला खानपानाचा शौकलिखानात परावर्तीत केला.नि त्यावर ते सातत्याने लिहितच राहिले.

   खाद्य पदार्थावरील त्यांचं लिखान हे त्या पदार्थाइतक चवदार असतं.ते इंग्रजी पत्रकार असल्यानं त्यांचीडिमांड देशातील सर्व मोठया पंच-सप्त तारांकित हॉटेल्समधून असते.त्यांना या हॉटेल्समध्ये मोठा सन्मानमिळतो.तुम्हा आम्हा मीडलक्लास लोकांना माहीत नसलेल्या नि कल्पनाही करु न शकणाऱ्या विविधरेसिपीजवर ते रसभरीत लिहितात नि वाचकाला गुंगवून टाकतात.हॉटेल्स आणि रेस्टाँरेंटसना  त्यांच्या टार्गेटऑडियन्सवर म्हणजे ग्राहकांवर आकर्षित करणारा बाण लागावा अशी अपेक्षा असते तिथे हा बाण अचूकलागतो.

   वीर संघवी हे केवळ पदार्थांच्या महतीच्यया आशिकीत अडकलेले नाहीत.ते त्यापलिकडे जाऊनआता,संबधित रेस्टॉरेंट राहण्यासाठी-बसण्यासाठी कसे आहे,दिसायला कसे आहे,त्यात कोणकोणत्या सुख सोईआहेत,कोणत्या लक्झरियस बाबी आहेत,तेथील बार कसा आहे,शेफचे वैशिष्ट काय आहे,वाईन किती वर्षंजुनी आहे,वाईनची चव कशी आहे.असेही सांगू लागले आहेत.त्यांचं हे सांगणं आपल्या सारख्या मध्यमवर्गीयवाचनांना व्हर्च्युएल आनंद देणारं असलं तरी हाही बाण ज्यांना लागावयाला हवा त्यास तो बरोबर लागतआहे.

   वीर संघवी यांनी त्याही पुढेचं पाऊल टाकलं असून ते आंतरराष्ट्रीय हॉटेल्स आणि उपहारगृहांवरही लिहूलागले आहेत.टीव्हीवरही त्यांची आलीशान खानपानावरील मालिका खवैय्यांच्या गळ्यातील ताइत बनली आहे.

   000

   5

   मराठी पत्रकारितेत मात्र खाद्य पत्रकारिता तेव्हढीसी रुजली नाही.साप्ताहिके किंवा पुरवण्यांमध्ये वेगवेगळयारेसिपीजची माहिती येत राहिली.पण अमुक शहरातील किंवा तमूक गावातील एखाद्या हॉटेलातील पदार्थ आणित्यांच्या रेसिपी यावर जाणिवपूर्वक व सातत्याने फारसं लिहिल्या गेलं नाही.मात्र खाद्यपदार्थावरील पुस्तकांचंमार्केट हे 365 दिवस जोरात आणि जोशात असते. याच पुस्तकांच्या सर्वाधिक आवृत्ता मराठीत निघाल्याआहेत.

   असे म्हणतात की दर बारा कोसावर भाषा बदलते.तसेच दर बारा पावलांवर चहाची चवही बदलते,असंआपण म्हणू शकतो.नागपूरात बारा नंबरचा चहा हा स्पेशल चहा असतो तर औरंगाबादेत तो गोल्डन चहाहोतो.गूळ आणि चन्याच्या दाळीपासून बणनारी पुरणपोळी एकच,पण गडचिरोलीपासून गडहिंगल्ज पर्यंत तिच्यातऱ्हा किती निराळया नि अफलातून.चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरीसारख्या आडवळणाच्या गावातील रिमकेचीमिसळ भल्याभल्यांनाच्या तोंडाला पाणी आणते,तर नांदेडकडे जाणाऱ्या वारंगा फाट्यावरची खिचडीखाल्याशिवाय प्रवास अपूर्णच राहतो.अशी असंख उदाहरणं सांगता येतील .त्यावर पत्रकारांनी लिहायलाहव.त्यांची रेसिपी नोंदवून ठेवली पाहिजे.

   पु.लं.देशपांडे यांनी त्यांच्या प्रवासवर्णनांमध्ये जमेल तेव्हा विविध पदार्थांवर आणि ते मिळणाऱ्यास्थानांवर झक्कासपणे लिहून ठेवलय.ते वाचल्यावर आजच्या पिढीलाही ते खाण्याची इच्छा झाली नाही तरनवल.मुंबईतील आयडियल बूक डेपोजवळील श्रीकृष्ण वडा पाव त्यांच्या लिखानाने रसदार झाला नि तोअजूनही तितकाच खवैयांना आकर्षित करणारा ठरलाय.

   000

   6

   मराठी पत्रकारीतेला गौरवशाली परंपरा आहे.ही परंपरा खाद्य पत्रकारीतेशिवाय अपूर्णच राहील.नव्या पिढीनेचवीने खात पित इकडे लक्ष दिलं तर ही गौरवशाली परंपरा तृप्तिचा ढेकर देईल… अन्यथा इंद्रपुरीचेप्रिसिंपल करस्पाँडंट नारदमुनींसारखीच खंत मराठी पत्रकारांना भविष्यकाळात वाटत राहील.

   000