
कृषी स्टार्टअप्सना संधी
“पुसाकृषी” हे कृषीक्षेत्रासाठीचं “नवपक्रोम हब” किंवा केंद्र म्हणून विकसित करण्यात आलं आहे. या केंद्रात जागतिक दर्जाच्या सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रत्येक क्षेत्राचं सखोल ज्ञान उपलब्ध करुन देण्यात येतं. संपूर्ण परिवर्तानाचा मुख्य उद्देश साध्य करण्यासाठी सर्व प्रकारचं साहाय्य केलं जातं.
भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालायानं या संस्थेची उभारणी केली आहे. कृषी आधारित स्टार्टअप्ससाठी सर्वात मोठी “इनक्युबेशन संधी” उपलब्ध करुन देणारी ही संस्था ठरली आहे. ही संस्था कोणत्याही क्षणी शेतकऱ्यांच्या साहाय्यासाठी उपलब्ध असते. कृषी क्षेत्राचा सर्वसमावेशक, फायदेशीर आणि अधिक गतिनं विकास करण्याचं लक्ष्य या संस्थेपुढे ठेवण्यात आलं आहे.
या संस्थेने संकल्पना निर्मिती, नवोप्रकमांना उत्तेजन, उद्योजकांचं तांत्रिक क्षमतावर्धन आणि कौशल्यवृध्दीस प्राधान्य दिलं आहे. या संस्थेच्या परिघात ३ लाखाहून अधिक शेतकरी, ५०० हून अधिक शास्त्रज्ञ, २०० हून अधिक स्टार्टअप आणि बऱ्याच सर्वोच्च श्रेणीच्या उद्योजकांचा समावेश झाला आहे. इंडियन काउंसिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च आणि इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इंस्टिट्यूटच्या, विशेष प्रकल्पासाठी कार्यरत असणारी ही संस्था आहे.
स्टार्टअप्सना प्रोत्साहन
या संस्थेने कृषी क्षेत्रातील स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी एक विशेष योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत कृषी क्षेत्रातील नवपक्रोमांना आर्थिक साहाय्य दिलं जाईल.
या योजनेमध्ये निवड झालेल्या स्टार्टअप्सना पुढील फायदे दिले जातील-
(१) ४५ दिवसांसाठी तांत्रिक आणि व्यावसायिक मार्गदर्शन/ सल्ला पुरवला जाईल.
(२) नवपक्रोमासाठी चार लाख रुपयांचे अनुदान दिलं जाईल.
(३) बियाणे पूर्व स्टार्टअपसाठी ५ लाख रुपयांचं अर्थसाहाय्य, दिलं जाईल. ही योजना, “अराइज” यानावाने ओळखली जाते. यामध्ये एखाद्या नावीण्यपूर्ण संकल्पनेचे उद्गाते आणि ही संकल्पना प्रत्यक्ष कार्यान्वित होण्यापूर्वीच्या पातळीपर्यंत असलेल्या स्टार्टअप्स या योजनेत सहभागी होऊ शकतात. नवपक्रोम संकल्पना असणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्याच्या स्टार्टअपची नोंदणी झाली नसली तरी तोसुध्दा या योजनेसाठी अर्ज करु शकतो.
(४) बियाणे स्टार्टअपसाठी २५ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य दिलं जाईल. या योजनेला “उपजा” असं नाव देण्यात आलं आहे. व्यापारासाठी तयार असणा-या नावीण्यपूर्ण उत्पादनांसाठी हे साहाय्य दिलं जाईल. मार्केटमध्ये पूर्वीपासूनच असलेल्या नावीण्यपूर्ण स्टार्टअप्सचे उद्योजक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. निवड झालेल्या स्टार्टअप्सना तांत्रिक साहाय्यही उपलब्ध करुन दिलं जातं. या क्षेत्रात पूर्वीपासून असणाऱ्या उद्योजकांकडून व्यवसायसंधी संदर्भात मार्गदर्शन आणि सल्ला सुविधा पुरवली जाते. अत्याधुनिक पायाभूत सुविधांचा लाभ मिळवून दिला जातो. मार्केटमधील विविध संधी आणि गुंतवणुकदारांसोबत संपर्क साखळी निर्मितीसाठी साहाय्य केलं जातं.
काही क्षेत्रे
(१) कृषी फिनटेक, (२) कृषीविस्तार आणि शिक्षण, (३) नैसर्गिक संसाधने व्यवस्थापन, (४) कृषी जवैतंत्रज्ञान, (५) कच-यातून संपत्ती आणि हरीत उर्जा, (६) पुरवठा साखळी आणि कृषी संसाधनं, (७) कृषी यांत्रिकीकरण, (८) अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान अशा काही क्षेत्राच्या स्टार्टअप्सवर लक्ष केंद्रित केलं जातं.
या दोन्ही योजनेत, आपल्या नावीन्यपूर्ण संकल्पना, उत्पादन किंवा एखाद्या कृषी विषयक समस्येच्या निराकरणाचं तंत्र यामुळे कृषीक्षेत्रासाठी योगदान देऊ शकणारा कोणताही भारतीय नागरिक सहभाग घेऊ शकतो.
अर्ज प्रकिया
योजनेसाठी अर्ज ऑनलाइनच करावा लागतो. त्यासाठी संस्थेच्या संकतेस्थळावर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या अर्जासोबत सादरीकरण (प्रेझेंटेशन) ही जोडावं लागेल. त्यासाठीचे टेम्प्लेट्स सुध्दा संकेतस्थळावर आहेत. त्याचा उपयोग करण्याची सूचना संस्थेने केली आहे. ज्या योजनेसाठी अर्ज करावयाचा असेल त्यानुसार सादरीकरणाचं शीर्षक बदलावं लागेल. (उदा- उपजा किंवा अराइज)
(ही नियमित स्वरुपाची योजना असून, विशिष्ट कालाधिने त्याची घोषणा केली जाते.)
पर्क- संकेतस्थळ-www.pusakrishi.in, भ्रमणध्वनी- ८७००१८३७०९
पुढील व्हॉटसॲप चॅनेलवरही या योजनेसंदर्भात माहिती मिळू शकेल.
https://whatsapp.com/channel/0029VaTBvBo2ZjCmY32h931p
: