कोण कोणाच्या घरात?
यंदाचा पावसाळा अनेक कारणांनी लक्षात राहील.त्यातलं एक महत्वाचं कारणम्हणजे यंदाच्या पावसाळयात मच्छरांनी मुंबई आणि महाराष्ट्रात घातलेला ऐतिहासिकहैदोस.हा हैदोस मोगलांनी 500 वर्षापूर्वी महाराष्ट्रात घातलेल्या गोंधळाला लाजवेलअसा होता.
याकाळात मच्छर बंधू आणि भगिनिंनी मीडियाच्या टीआरपीत टॉप स्थानपटकावून,शाहररुख खान, अमिताभ बच्चन,सलमान खान,कट्रीना कैफ,सचीनतेंडूलकर,आसाराम बापू , बाबा रामदेव यांना खूप मागे फेकून दिलं होतं.मीडियातीलमच्छरांच्या सुपर-ड्युपर चर्चेला फक्त महागाईची चर्चाच तोडीस तोड उत्तर देऊशकली.(महागाई आणि मच्छर हे दोघेही माणसाला मारु शकतात,म्हणूनही कदाचितअसं असेल..)
साला ,एक मच्छर अमूक करु शकतो.ढमूक करु शकतो,हा एका सुप्रसिध्दनटवर्याचा सुप्रसिध्द डॉयलाग या निमित्त वारंवार चर्चेत आला.कदाचित हा डॉयलागमच्छरांच्या कानावर गेला असला पाहिजे.त्यामुळेच तुम्ही असं म्हणता होय, मग बघाएक मच्छर क्या नही कर सकता है..हे दाखवूनच देतो..अशी प्रतिज्ञा घेऊन मच्छरमैदानात उतरल्याचं स्पष्टपणं दिसलं.समजा हेजर सत्य असेल तर मच्छर हेसुपर(बग)इंटेलिजेंट आहेत आणि सातत्यानं माणसांसोबत राहून त्यांना माणसाची भाषाकळायला लागलीय हे आपोआप सिध्द होतं.
माणसांची भाषा कळण्याइतपत मच्छरं इंटेलिजेंट झालेत किंवा नाही हेशोधण्याचा प्रयत्न जीवजंतू शास्त्रज्ञांनी करायलाच हवा.कारण त्यामुळे मग मच्छर हटावमोहीम सुध्दा मानवाला इंटेलिजेंटली राबवता येईल.कासव छाप पध्दती सोडून ससाछाप पध्दती राबवायची काय यावरही विचारमंथन करता येईल..
तर अशा या मच्छरांभोवती संपूर्ण पावसाळाभर आपलं जग फिरत होतं.
मच्छरांनी राजकारण्यांना एकमेकांवर चिखलफेक करण्याची संधी दिली.पालिकेच्याअधिकाऱ्यांवर टीका करण्याची संधी दिली.बिल्डरांवर,परप्रांतियांवर तोंडसुख घेण्याचीसंधी दिली.याकाळात मच्छरांच्या बातमीशिवाय वृत्तपत्रांच्या पानाला शोभा आली नाही. टीआरपीच्या भाषेत मच्छर हे क्रमांक एकवर होते.या काळात मच्छरांवर कार्यक्रम असतातर त्याला सर्वाधिक जाहिराती त्या कार्यक्रमाला मिळाल्या असत्या.पण या काळातीलवेगवेगळया कार्यक्रमांमध्ये मात्र मच्छर हटाव अगरबत्त्या,मच्छर हटाव लोशन, मच्छरहटाव लोशन क्रीमच्या जाहिरातींची संख्या वाढलीच.अशा एका जाहिरातीत विद्याबालन असल्यानं मच्छर हटाव मोहिमेला ग्लॅमर प्राप्त झाले.मच्छरांशी शत्रुत्व घेण्यासाठीअनेकजण विद्या बालनच्या प्रेमात पडले.त्यामुळे त्यांनी मच्छर भगाव रिपेलंट विकतघेण्याचा सपाटा लावला.कंपनीचा खप वाढला.मच्छर भगाव अगरबत्ती लाखोंनीविकल्या गेल्या.मच्छरभगाव रिपेलंटमुळे काही कोटी मच्छर धाराशायी पडलेअसावेत.त्यामुळेही कदाचित मच्छरांनी आपला डाव अचूक साधला असला पाहिजे.हेजर सत्य असेल तर मच्छर हे इंटिलेजंट आहेत आणि ते टीव्हीवरील जाहिराती सुध्दाबारकाईनं बघतात ,हे सुध्दा आपोआप सिध्द होतं.ते जेव्हा टीव्ही स्क्रीनजवळगुणगुणत असतात तेव्हा त्यांचं सुक्ष्म निरीक्षण चाललं असतं असं आपण आता म्हणूशकतो.हे म्हणनं सुध्दा सत्य आहे की नाही याचाही शोध जीवजंतू शास्त्रज्ञांनी घ्यायलाहवा.
माझ्या असं लक्षात आलय की मच्छरांचा आणि मानवाचा संबंध अनादी अनंतकाळापासूनच आहे.माणूस आणि मच्छर कदाचित एकाचवेळी ब्रम्हदेवाने जन्मास घातलेअसावेत.त्या पहिल्या दिवसापासून मच्छर हे मानवाच्या सानिध्यात आले असावेत.हेसानिध्य युगानेयुगे टिकवून ठेवण्यात कुणी किती भूमिका बजावली ,याचा शोधघेण्याची वेळ आता नक्किच आली आहे.सर्व काळ मच्छरं माणसाच्या अवती भवतीअसतातच पण पावसाळयात मात्र त्यांचा उत्साह हा द्वीगुणित होतो.त्यामुळे यंदाच्यापावसाळ्यातलं त्यांचं उत्साहानं फदफदणं नवं नसलं तरी मानवाला मच्छरांवर चर्चादरवर्षी करावशी वाटते.आयटेम साँगशिवाय हिंदी चित्रपट आणि मच्छरांशिवायपावसाळयाला पूर्णत्व येत नाही,हे सत्य स्वीकारणं आपल्याला भाग आहे.
पावसाळ्यातलं मच्छर प्रकरण सुरु असतानाच आमच्याही घरी मच्छरांनी मी आणिमाझ्या कुटुंबियांना चावास्त्रांनी त्रस्त करुन सोडलं होतं.
या चाव्यामुळेच माझ्या विचारचक्राला गती मिळून मी याप्रश्नाच्या मुळाशीजाण्याचा निश्चय करु लागला.त्यासाठी मच्छरांचा आपल्या घरी आगमन कधी झालंअसेल ,हा प्रश्न मला पडला.
ते कधी आले हे जसं महत्वाचं तसं ते कसे आले हे ही महत्वाचं. प्रत्येकालापडणारा हा सवाल मलाही पुन्हा एकदा पडला. या सवालाच्या पाठिमागे धावत असताना माझ्या लक्षात आलं की, माझा जन्म झाला त्या दिवशी माझ्या घरी श्री.व सौ.मच्छर,श्री मच्छरांचे वृध्द आई-वडील आणि (अद्याप कुटुंबनियोजनाचा कायदा त्यांच्या सम्राटांनी न केल्याने) शेकडयानं मुलं मुली व पाहुणपणाला (नॉन व्हेज.म्हणजे मी माझ्या कुटुंबियांचंरक्त. आयजीच्या जीवावर बायजी,म्हणतात ते असं.)आलेले हजारेक नातेवाईकवास्तव्याला होते.(मच्छरांनी केवळ माझ्याच घरी आपला मुक्काम ठोकला असं मलाम्हणायच नाहीय.कारण त्यांनी इंग्लंडमध्ये राणी एलिजाबेथचा महाल,अनिल आणिमुकेश अंबांणीचा बंगल्यावजा महाल आणि शाहरुख खानचा महालवजा बंगला आणिअमेरिकेच्या राष्ट्रपतींच्या व्हाईट हाऊस या राजवाडा-कम-बंगल्यातसुध्दा त्यांचा,हेविश्वची माझे घर या न्यायाने मुक्काम ठोकला असलाच पाहिजे.
माझ्या आयुष्याची वर्ष एक एक करीत कालौघात निघून गेली. त्याचासुवर्णमहोत्सव मी यंदा साजरा करणार..या सुवर्णमहोत्सवी वर्षात सुध्दा, ज्या माझ्याघरात मी जन्मलो त्यादिवशी असणाऱ्या मच्छरांच्या कुटुबांची पुढची पिढी संख्येत अमापवाढ करुन गुण्यागोविंदानं नांदत आहे.त्यांचे आप्तस्वकीय माझ्या घरी ठाण मांडूनभूणभूणत आहेत.
गेल्या पन्नास वर्षापासून माझ्या सोबतीला असलेले हे मच्छर माझे कोण? हाप्रश्न मला भूतकाळात वारंवार पडला आहे.वर्तमानकाळात सदैव पडत आहे.दरपावसाळयात तर दर तासाला आणि मच्छर मारण्यासाठी उपाययोजना करण्यासाठीकराव्या लागणाऱ्या खर्चाच्या समयी मला पडत असतो.मच्छरांनी माझ्या आर्थिकविकास आणि समृध्दीला मर्यादित केले आहे.माझा खिसा लोकलमध्ये कमी कापलागेलाय पण मच्छरांच्यामुळे मात्र दर आठवडयाला कापला जात आहे ,अशाप्रकारे..
भविष्यकाळात यामध्ये काही फरक पडेल असं सध्या तरी कोणेतेही चिन्हनाहीत.उलट हायराईज इमारतींमुळे मच्छरांची हाय-राईज होण्याची दाट शक्यता इकडूनतिकडून हाय-पिच मध्ये यंदा वर्तवली वर्तवली जातेय.
सातत्याने इतकी वर्ष एकाच घरी राहणाऱ्यांचे एकमेकांशी काही तरी नातेबंधनिर्माण होऊ शकतात,असं सर्व तत्वचिंतक,कवी,श्री. श्री. रवीशंकर आणि माझेसदगुरु
योगवशिष्ठ हरेराम बाबा म्हणतात.त्यामुळे मी गेल्या काही दिवसांपासून विचारकरतोय की माझ्या घरात पन्नास वर्षापासून संगतसोबत करणारे हे मच्छर माझे कोणबरे आहेत?
त्यांच्याशी इतकी वर्षे शत्रुवत वागल्याने ते माझे मित्र होऊ शकतनाहीत.बाजूच्या फ्लॅटमधील देशपांडे हे माझे शत्रू आहेत.त्यांच्या घरीही हे मच्छरआहेत.आजच्या काळात शत्रुचा शत्रू, -(एकमेकांना सोईचे असल्यास)- मित्रहोण्याची दाट शक्यता असते.पण इथे तिही शक्यता दिसत नाही.देशपांडे सुध्दामच्छरांशी शत्रूत्व करण्यात माझ्यापेक्षा वरचा क्रमांक देतात हे मला ठाऊक आहे.
मच्छरांना मी नातेवाईकांचा दर्जा देऊ शकत नाही.कारण तसा मी दिला तरमाझी बायको व मुले आणि बायकोचे व माझे नातेवाईक मला निश्चितपणेमानसोपचारतज्ज्ञांकडे नेतील.कदाचित तो तज्ज्ञ मला मेंटल हॉस्पिटल मध्ये ऍ़डमिट कराअसाही सल्ला देऊ शकेल ,किंवा मी गेलेली केस आहे,सांभाळून रहा असही तो सांगूशकेल.यातील कोणतीही शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे माझ्या बायकोला तिचेसासू-सासरे हे अजिबात आवडत नसताना ती त्यांना बेदखल करुन ज्याप्रमाणे संसारकरते आहे,त्याच भावनेने मला मच्छरांच्या नातेवाईकपणाच्या संकल्पनेकडे बघावे लागेलअसं वाटतं.
मच्छर माझा शत्रू आहे, असं म्हंटलं तर तेही हास्यास्पद होईल.इतकी वर्षशत्रुसोबत एकाच घरी आयुष्य घालवणारा एक तर महामुर्ख असेल नाही तर गाढवअसेल असाच निष्कर्ष कुणिही काढेल.
असे अनेक प्रश्न मला पडत होते नि माझ्या डोक्याचा खिमा करत होते.विचारकरता करता एके दिवशी मला वाटले माझ्या घरी मच्छर राहतात ते कसे?गुण्यागोविंदाने की कुरकुरत की समाधानाने?हा वादग्रस्त प्रश्न असल्याचं माझ्या लक्षातआलं.त्यावर मी बरच चिंतन केलं.त्यातून माझ्या असं ध्यानात आलं की मच्छरकुरकुरत नक्किच राहत नसतील.त्यांच्या राहण्यात समाधानाच्या छटा दिसतात.याचंकारण ते सदैव गुणगुणत असतात.चित्ती समाधान असल्याशिवाय असं गुणगुणणं शक्यनाही हे आपल्या संतांनी सांगूनच ठेवलय.गुणगुणत आपले गुण म्हणा किंवा अवगूणम्हणा दाखवत राहतात हे मात्र खरं आहे.
मच्छरांना सोबत घेऊनच माझी आतापर्यंतची म्हणजे सुवर्ण महोत्सवी जमेल तशीभौतिक,आर्थिक,शारीरिक,सामाजिक,शैक्षणिक आणि लैंगिकसुध्दा वाटचाल झालीआहे.माझ्या शेवटच्या दिवसापर्यंत ती तशीच सुरु राहील,असे स्पष्टपणे दिसते आहे.
मच्छरांनी मला कधीच लळा लावला नाही.खरं तर दोघांकडूनही तसा प्रयत्नआजतागायत झाला नाही.बरीच वर्षे प्रकाश आमटे यांचे नाव आमच्या कानावरनव्हते.प्रकाश आमटे हे वाघाला लळा लावू शकतात,अस्वलीला लळा लावू शकतातकिंवा व्हायपर नामे जगातील सर्वात डेंजर सापाला लळा लावू शकतात असे आम्हालाफार उशिरा कळले.त्यामुळे सुध्दा मच्छराला लळा लावण्याचा प्रयत्न माझ्याकडून झालानाही. मच्छर म्हणजे डेंजरसच असल्याचे कळत्या वयापासून कानावर पडल्याने वत्यानंतर आईबाबांनी मच्छरांना घालविण्यासाठी हजाराने उपाय केल्याचे मी बघतआलोय.त्यामुळे मच्छरांकडे दयाबुध्दिने बघण्याचा प्रश्नच नव्हता.(मच्छर नाहीसेकरण्यासाठी आईने देवाला नवस कां बोलला नाही,हा एक अनुत्तरीत प्रश्न आहे.असानवस बोलला होता का? हे मी विचारु शकलेलो नाही.
असा काही नवस मी बोलावा असं मला वाटतं.पण त्यातून आपला दुबळेपणादिसेल. एक शुल्लक मच्छराला तू घाबरतोस बुळ्या,असं म्हणून देव हसेल अशीमाझी धारणा आहे.त्यामुळे मी नवस बोलण्याचं टाळतोय.बायकोला ही कल्पना अद्यापमी सांगितलेली नाहीय.
मच्छर भगाव किंवा हटाव किंवा मराव मोहिमेत आई-बाबांना माझ्या रुपानेतिसरा सैनिक मिळाल्यावर सुध्दा मच्छरांना आमच्या घरातून जावं वाटलेलंनाही.मच्छरांसोबत आमच्या घरात गेल्या पन्नास वर्षात पानिपताचे अनेक प्रसंग आलेआणि त्यात आमचेच पानिपत झालं.नेपोलीयन ज्या लढाईत हरला त्या वार्टलूचेहीप्रसंग आले.पण यातही आमचीच जास्त वाट लागली. त्यांच्या सोबतच्या सातत्यपूर्णसंघर्षात असंख्य मच्छरांना वेळोवेळी प्राणांची आहुती द्यावी लागली.हे वास्तव असलंतरी मच्छरांनी अहमदशहा अब्दाली,चंगेज खान,महमद गझनी यांच्याकडून अत्युकृष्टदर्जाचे लष्करी प्रशिक्षण घेतल्याचं माझ्या लक्षात आलं आहे.त्यामुळेच त्यांच्या करोडोसैन्याच्या निपा:त होऊनही ते लगेच हिवताप किंवा डेंग्यू यासारखे ब्रम्हास्त्र सातत्यानेसोडतच राहतात.इतक्या हजारो वर्षात या ब्रम्हास्त्रांचं तेज कमी झालेलं नाही.त्यांचीधार कमी झालेली नाही.आमच्या घरी सुध्दा मच्छरांनी हे अस्त्र आमच्यावर चालवून,चांगलाच वचपा काढलेला आहे.त्यामुळे आमच्या आयुष्यातील काहीशे तासरुग्णालयात,मेडिकलच्या दुकानात गेले आहेत.शिवाय वेळोवेळी अर्थसंकल्पाला भगदाडहीपडले आहे. मी आणि माझे कुटुंबीय हे मच्छरांच्या टोकाच्या विरोधात असल्याचंत्यांच्या एव्हाना लक्षात आलं असेलच.विरोध इतका की जणू काही ओसामा बीनलादेनच्या विरोधात अमेरिका असल्यासारखं
.लादेनच्या सर्वनाशासाठी जसे अमेरिका हरप्रकारे प्रयत्नांची पराकाष्ठा करीतहोती,तसचं माझं आणि माझ्या कुटुंबियांचं चाललय. अमेरिकेला लादेन सापडलाआणि त्यांनी त्याला यमसदनीही पाठवला.पण आमच्या जाळयात शेवटचा मच्छर काहीयेत नाही.यावरुन आमच्या घरातील मच्छर हे लादेनपेक्षा खतरनाक असल्याचं आपोआपसिध्द होतं.
मच्छरांनी माझ्या सोबतच्या संघर्षाला डू ऑर डायचे रुप दिलं असल्याचं एव्हानासिध्द झालच आहे. ते डू करतात नि डायही होवून आम्ही कधी डाय होतो याची वाटबघण्यात त्यांना पन्नास वर्षात कंटाळा आलेला नाही.ही चिकाटी कौतुकास्पदसमजायची की घृणास्पद समजायची हा मोठाच प्रश्न माझ्यापुढे आहे.नकोसा पाहुणासुध्दा एक दिवस घरुन जातोच.पण मच्छरांना ते सुध्दा मान्य दिसत नाही.ते गमिनीकावाही करत नाही.त्यांचं जे काही चाललय ते थेट चाललय.त्यांना माझी वा माझ्याकुटुंबियांची भीती वाटतेय असं कधी जाणवलच नाहीत.ते चोरासारखे राहतनाहीत.याबाबतीत त्यांनी बांगला देशी नागरिकांचा आदर्श घेतलेला दिसतो आहे.
000
तीन
या अशा विचारमंथनात मग्न असताना मला असं एके दिवशी वाटलं की मच्छरमाझ्या घरी राहतात असं मी म्हणतो याचा अर्थ आपण कसा घ्यायचा?कारण ज्यादिवशी मी जन्मलो त्या दिवशी मी जन्म घेतलेल्या घरी , मच्छर होतेच की.कदाचितत्याच दिवशी काही मच्छरांचा जन्म सुध्दा झाला असू शकतो,की नाही.म्हणजेच जेघर मी माझे माझे म्हणतोय ते घर मच्छरांचे सुध्दा नाही होत का?माझ्या वैचारिकमंथनातील या नव्या पैलूने माझ्या अंगावर शहारेच आणले.
मच्छरांना ,मी त्यांच्या घरी राहतोय ,आता पन्नास वर्षानंतर त्यांना मी नकोसाझालोय.आता मी त्यांच्या घरातून बाहेर जावं असं तर वाटत नसेल ना.मीत्यांच्यासाठी भैय्या तर नाहीना..मला वाटलेलं मी बोलू शकतो.सांगू शकतो.त्यांनावाटणारं ते गुणगुणत असतात.पण त्या गुणगुणण्यातून हाच अर्थ तर ध्वनित होतनसावा ना..
00000
माझी मुलगी आता 11 वीत जाणार आहे.तिला प्राणीशास्त्रात अजिबात रसनाही.तिला गणित विषय घ्यायचाय.मी तिला प्राणीशास्त्र विषय घेऊन मच्छरांवरसंशोधन करण्यासाठी मन वळवतोय.मच्छरांच्या गुणगुणण्याचा ध्वन्यार्थ जोपर्यंत मलाकळणार नाही तोपर्यंत सध्या अस्तित्वात असलेल्या माझ्या मनाला आणि नंतर अदृष्यआत्म्याला शांती लाभणार नाही,हे मी तिला समजवून सांगितलंय.
000
सुरेश वांदिले