खाशा निमंत्रणास मर्लिनची किनार
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त आपल्या देशात प्रमुख अतिथी म्हणून आलेल्या कोणत्यातरी देशाच्याराष्ट्राध्यक्षसाहेबांनी मायदेशी परतण्यापूर्वी जाताजाता मुंबईतील मोह प्लस मायानगरीच्या खाशा मंडळीअसलेल्या बॉलिवूडकरांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यात काही नवल नाही. असं बरेच राष्ट्राध्यक्ष करत असतात. कारण या बॉलिवूड कर प्लस करिनचं आकर्षण जसं आपणास असतं, तसच त्यांनाही असतच. अशा भेटीठरवल्या जातात तेव्हा बॉलिवूडच्या सौंदर्यवतींना आवर्जून बोलावलं जातं. परदेशी मान्यवरांचा दिल-दर्या यामुळेप्रशांत प्रशांत होऊन, क्या चिज है भारतभूमी वगैरे असं त्यांचं मन गाऊ लागतं. हा दौरा सफल-सुफळ होतो..
कोणत्यातरी देशाच्या राष्ट्रपती साहेबांनी ज्यांना ज्यांना भेटण्याची इच्छा व्यक्ती केली त्या काहीजणांमध्येसौभाग्यवती ऐश्वर्या रॉय बच्चन या होत्या. यात नवल ते काय, असा प्रश्न बांद्रा पूर्वतील आदिनाथ ठाकरे तेएटापल्ली दक्षिणमध्ये वास्तव्यास असणारा मुकरु एडका कोवा विचारु शकतात. त्यांचा प्रश्न शंभर टक्के बरोबरआहे. कारण अशा व्हेरी व्हेरी व्हेरी इर्म्पाटन्ट भेटीगाठीसाठी निमंत्रण मिळणाऱ्यांमध्ये मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स, मिस अमूक, मिस ढमूक वगैरेंचा अग्रकम लागतो. कारण या मिस व, मिस यू, मिस अ, मिस ढ, म्हणे भारतीयसंस्कृतीच्या जागतिक ॲम्बेसेडर वगैरे असतात.
असो, तर अशा या जागतिक ॲम्बेसेडर वर्गवारीत सौ. ऐश्वर्या वहिनी एकदम फिट्ट बसतात. शिवाय त्या अभिनेत्रीआहेतच. बच्चन सरांच्या बहू आणि खासदार बच्चन आजींच्या सूनबाई आहेत. इतके सारे गुणवैशिष्ट असल्यावरत्यांची व्हीव्हीव्ही आयपी भेटीगाठीच्यावेळी वर्णी लागणार नाही तर काय आमच्या मिसेसची वर्णी लागणार ?
सांगायचा मुद्दा हाच की सौ. ऐश्वर्या वहिनींना राष्ट्रपतीसाहेबांचे निमंत्रण मिळालं हे नवल नसून त्यांच्या यानिमंत्रणाचं वृत्त वाचून आमच्या मिसेसला जो हर्षवायू झाला ते मोठे नवल ठरत होते. अशी नवलाई आम्हासपुत्ररत्नं झालं तेव्हासुध्दा आम्ही बघितली नव्हती.
आपल्याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जोरात, जोशात आणि सदैव जोमात असल्यानं कुणास कशाचा हर्षवायू व्हावाहे काही आपण ठरवू शकत नाही. जो तो अपने मर्जिका मालिक. (जरी साईबाबांनी, सब का मालिक एकच असंसांगून ठेवलं असलं तरी.) त्यामुळे आम्ही मिसेसच्या हर्षवायुकडे जरासं दुर्लक्षच केलं. त्यामुळे त्यांच्या गालावरमिरे आणि होठांवर मिरच्या उमटल्या. ते लक्षात येताच आम्ही सावध होऊन त्यांच्याकडे सूक्ष्मरीत्या बघितलं. तेव्हा त्यांच्या मुखातली हिरो होंडा कोणत्याही क्षणी त्या आमच्यावर आदळवतील हे आमच्या लक्षात येताचआम्ही सावध झालो. शाहरुखखान भाऊ जसं काजोल ताईकडं अतिव प्रेमानं बघतात तसं आम्ही आमच्यामिसेसकडे बघण्याची कोशीस करु लागलो असतानाच हिरो होंडा त्यांच्या मुखातून बाहेर पडलीच. तिला अंगावरघेण्यावाचून आम्हास काही पर्यायच उरला नाही.
आमच्या मिसेस आमच्या डोळ्यात डोळा टाकून गरजल्या,
तुम्हाला काहीच कशाच कवतिक वाटत नाही हो.
या वाक्याचा रोख आम्हाला कळला नाही. आम्हास पुस्तकातली कविता कधी कळली नाही म्हणून तिच्यावाटेला गेलो नाही. वर्गातली कविता कावळे हिला आम्ही आवड नसल्यानं तिच्याकडे वाट वाकडी करण्याचाप्रश्न नव्हता. कॉलनितल्या कविता बोंबिलमारे, ही चला हवा येऊ द्या असं डंके की चोट पे म्हणायची तीशेजारच्या पोरांसाठी. त्यामुळे ही कविताही बाद झाली. तेव्हा कुणाचं कवतिक आम्हास वाटणार ते कसं ? पण हेसांगायचं तरी कसं? या प्रश्नाचं उत्तर देऊन अडकित्त्यात जाण्यासाठी स्वत:ची सुपारी करुन घेण्याचा वेडेपणा नकरण्याची बुध्दी आणि शहाणपण देवानं चुकून दिल्यानं कवतिक प्रकरण आम्ही चार हात दूरच ठेवलं होतं. त्यामुळे आमच्या मिसेसच्या मुखी कवतिकाचे बोल उमटले तेव्हा आमचे डोळे शून्य झाले. चेहरा सपाट झाला. मिसेच्या मुखातली हिरोहोंडा दुसऱ्या गिअरमध्ये गेली. आणखी गतीनं आमच्यावर आदळली.
तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. तुम्ही कोणत्या मातीचे बनले आहात हो. मिसेस गरजल्या.
त्यांच्या या गरजण्यानं कानाचा हिरोशिमा होण्याआधी आता काही तरी केलं पाहिजं असं वाटून आम्ही नम्रपणंत्यांना विचारलं..
आम्ही चिकनी माती, लात माती, काळी माती की कोणत्या तरी मातीचे बनले आहोत हे ठरवण्याआधी नेमकंझालं काय, घडलं काय, बिघडलं काय, उघडलं काय, डुबलं काय हे तर कळू द्या आम्हास.. कॉलनीतली काळीमांजर पुन्हा व्याली नि तिला पाच बच्चे कंपनी झाली की देशपांडेच्या कुत्र्याला नवी सखी भेटल्यानं त्याचं भुकणंआता कॉलनीवाल्यांना, तेरे मस्त मस्त दो नैन, या गाण्यासारखं वाटू लागलंय…मी निरलसपणे बोलून गेलो.त्यामुळे मिसेसचा फनकारा पुन्हा वाढला.
तुम्ही राहा चोवीस त्या कुत्र्याच्या आणि मांजरीच्या मांडीवर. मागच्या जन्मात तुम्ही त्यांच्या कुळातले होतात कीकाय ?
मिसेसच्या मुखातल्या हिरो होंडाने आमच्या कुळावर थेट धडक दिल्यावर आमच्या इज्जतीच्या बटाटावड्यातीलबटाटा इकडे आणि वडा तिकडे फेकला गेला. पण परिस्थितीनं असं वळण घेतलं होतं की आम्हास ना बटाटाउचलता आला नि वड्याचा सन्मान ठेवता आला. अडला गधा तो काय करेल धोबी, असं काहीसं आमचं झालं. अशावेळी मौनशक्तीच कामी पडते हे गांधीबाबांचं वचन आम्हास आठवलं. सोईसोईच्यावेळीस त्यांचा आदर्शआम्ही ठेवत असल्यानं आम्ही त्यांना दंडवत घालून गप्प बसणं श्रेयस्कर मानलं. गांधीबाबा प्रमाणित आमच्यामौनानं आगीत तेल ओतल्यासारखं झालं.
तुम्ही असं कसे हो. काय करावं बाई या ढिमड्याचं. असं त्यांच्या मुखातली हिरो होंडा आमच्या बघत तिखटनजरेनं फटफटली.
आम्हास मिसेसनी ढिमडा म्हंटल्यानं आमचं मौन पातळ झालं. त्या पातळ अवस्थेतही आम्ही त्यांना विचारण्याचीहिम्मत केली, की तुम्ही असं आडवळणानं जाण्याऐवजी थेटच कां सांगत नाही, झालं तरी काय नेमकं.
आजचा पेपर नाही वाचला का तुम्ही…
वाचला ना..
खरोखरच काही वाचलं की फक्त सनी लिओनीच बघित्तली. मिसेसच्या मुखातली हिरो होंडा किंचित स्लो होऊनफटफटली. मिसेसच्या म्हणण्यात अर्धसत्यता होती. आता सत्य हे अर्धवट असलं काय नि अर्धवटरावांचे असलंकाय, त्याच्या गुणवत्तेला चार चाँदच्या ऐवजी आठ तारे काही लागत नाहीत. या अर्धवट सत्याचा अपलाप होऊनये हा उदात्त हेतू ठेऊन आम्ही नाही म्हणण्याच्या औपचारिकतेच्या भानगडित पडलो नाही.
तरीच म्हणत होते की तुम्हास तिकडची सन्नी दिसते पण इकडची ऐश्वर्या दिसत नाही. फटफटणारी हिरो होंडाफटकारे लगावत म्हणाली.
ऐश्वर्याचं नावं कानी पडताच आम्ही दचकलो. छातीवर दगड ठेऊन आम्ही डोळ्यात प्राण आणून विचारलं, कायझालं ऐश्वर्यास? या स्वरात ऐश्वर्याचं काही बरंवाईट तर झालं नाही ना, आयसीसच्या दहशवाद्याने तर तिलापळवलं नाही ना, ती प्रवास करत असलेल्या एअर सिंगापूरचे विमान तर हायजॅक झालं नाही ना, अमेरिकेच्याविमानतळावर तिला अडकवून ठेवलं नाही ना, अशा अनेक शंका-कुशंका मनी रुंजी घालू लागल्या. आमचा चेहरापडला. डोळे भिरभिरु लागले. ऐश्वर्याच्या काळजीमुळे झालेली आमची तोळामाशाची अवस्था अयप्पाच्या कृपेनंमिसेसच्या लक्षात आली नाही. आमचा काळजीचा सूर हा नेहमी सारखा नार्मल असल्याचं समजून त्या सांगत्याझाल्या..
काय झालं काय विचारता मिस्टर. अहो तिला राष्ट्रपती साहेबांनी खास भेटायला बोलावलं होतं. बघा कशीगुलाबी साडी घालून ती सजूनधजून गेली होती, त्यांना भेटायला.
असं होय, हे कारण आहे तुला हर्षवायू होण्यासाठी आणि एवढं आनंदून जाण्यासाठी. ऐश्वर्यासाठीचं हे कारणकानी पडताच आमच्या छातीवरच्या दगडाचं रुपांतर गुलाबाच्या फुलात झालं. भिरभिरणाऱ्या पाखराचा जीवताळ्यावर आला. मनात आम्ही अयप्पाचे आभार माणले.
आनंदून जाण्याची ही गोष्ट वाटत नाही का तुम्हास.. मिसेस म्हणाली.
यात कसला आलाय डोंबल्याचा आनंद. ऐश्वर्या तुझी चुलत बहीण नाही की माझी मावस बहीण नाही. आम्हीउत्तरलो.
कुणाची तरी बहीणच कशाला पाहिजे, आनंद होण्यासाठी.
मग तुमच्या आनंदाचं कारण तरी काय गडे, असं आम्ही जरासं लाडिकपणे म्हणालो. कारण हिरो होंडाचंफटकारणं कमी होऊन ऐश्वर्याच्या गुणगाणतेत मिसेस रमू लागली होती. तेव्हा आम्हीही गडेची खडीसाखर टाकूनबघितली. खडीसाखरेचा प्रसाद फळाला आला. त्याने आतापर्यंत फुरंगटून गेलेली मिसेसची कळी खुलली. गालावरच्या मिरच्यांच्या जागी झेंडुची फुले उगवली. होंठावरच्या मिरचीचे रुपांतर मोगऱ्यात झाले. मुखातल्याहिरो होंडाला त्यांनी स्वत:च पंक्चर केले. मर्लिन मन्रो जशा एकेकाळी हडसन नदीच्या किनाऱ्यावर आपल्याप्रियकर क्रमांक 14ला खेटून बसायच्या अगदी तसच आमच्या मिसेसही आम्हाला खेटून बसल्या नि लाडे लाडेम्हणाल्या. (लक्षात घ्या, धिस इज पॉवर ऑफ ऐश्वर्या. केवळ पेपरमध्ये ऐश्वर्याचं नाव वाचताच आमच्या मिसेसचंरुपांतर असं मर्लिन मन्रो मध्ये झालं होतं. ओन्ली फार खेटून बसणं नि लाडं लाडं बोलणं, यासाठीच बर कां. मर्लिन सारखं 14 व्या प्रेमप्रकरणाचं चॅप्टर लिहिण्याची गम्मतजम्मत तीस मानवारी नाही. कृपया समस्तजणांनीयाची गंभीररीत्या नोंद घ्यावी.)
अहो, तुमच्या लक्षात कसं येत नाही. आमचा गालगुच्चा घेत मिसेस म्हणाली.
मर्लिन सुध्दा तिच्या प्रियकराचा असाच गालगुच्चा घेत असावी. अशी कल्पना करत आम्ही सुखावलो. त्याच नादात आम्ही लाडावत मिसेसला विचारलं..
आमच्या काय लक्षात येत नाही सखे.. खडीसाखर जरा जास्तच झाली होती. पण त्याचा परिणामही आणखीगोड झाला. मिसेसने दिवस्याढवळया आमच्या गळ्यात हात टाकला. नि डोळ्यात निदा फाजलीच्या नाजूकगजलांचे शेर उमटवत त्या म्हणाल्या,
अहो, आज ऐश्वर्यास राष्ट्रपती साहेबांना भेटण्याची अशी संधी मिळाली. उद्या मला सुध्दा मिळू शकेल.
क क काय म्हणता तुम्ही. आम्ही कसंबसं म्हणू शकलो. अंगावर चढलेला झुरळ झटकावा तसा आमच्यागळ्याभोवतीचा असलेला त्यांचा हस्तहार झटकला नि कडक उभाच राहिलो. बंगल्याचं वर्णन लिहा, अशाकल्पनाविस्तारातल्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना बंगल्याच्या ऐवजी म्हैसूरच्या ओडियार महाराजांच्या आलिशानमहालाचे वर्णन पेपर तपासणाऱ्याच्यासमोर आल्यावर त्याचं जसं व्हायचं तसं आमचं झालं. एखाद्याच्यास्वत:बद्यलच्या गैरसमजुतीचा आनंद हा पॅसिफिक सागरात असणाऱ्या पर्वतासारखा उंच उंच असू शकतो किंवाचंद्रावर असणाऱ्या अटलांटिक महासागरापेक्षाही खोल असू शकतो. आपण अभियानात अमिताभ बच्चनला यूंवगचांडी देऊ शकतो, संधी मिळाली असती तर सचिन तेंडुलकरपेक्षा 25 पट अधिक धावा आपण काढू शकलोअसतो असे गैरसमज राखून आनंदाच्या डोही तरंगत राहण्यास भारतीय न्यायलायांनी आणि जागतिकन्यायालयांनी बंदी आणली नसल्यानं कुणालाही कोणताही गैरसमज जोपासण्यास काहीच हरकत नाही. असंअसलं तरी मंथरेलाच जर आपण मेनकेच्या दहापट सुंदर आणि मादक आहोत असं वाटू लागलं तर कसं व्हायचंतिकडे अयोध्येत कैकेयी महाराणी साहेबांचं आणि इकडे इंद्रपुरीत इंद्रसेन महाराजांचं. कैकेयी महाराणी साहेबआरशात बघणं सोडतील. शिवाय आरसा नावाच्या प्रकारास अयोध्येतून कायमस्वरुपी हद्दपार करण्याचा हट्टमहाराज दशरथ महोदयांकडे करतील. तिकडे इंद्रपुरीत इंद्रसेन महाराज अप्सरांची नवी व्याख्या शोधण्याचं फर्माननारदेश्वरांना सोडतील. आमची स्थिती अशीच काहीबाही झाली. आम्ही कावरेबावरेही झालो.
आमच्या सुदैवानं आणि त्यांच्या दुर्देव्यानं मिसेसच्या लक्षात आमच्या मनातली चलबिचल लक्षात आली नाही. त्यामुळे लाडेलाडेचं बेअरिंग सांभाळत त्यांनी आम्हास प्रेमानं खाली बसवलं. त्या पुन्हा आम्हास खेटल्या निमर्लिनच्या ट्रान्स मध्ये जाऊन अतिव प्रेमानं बोलत्या झाल्या,
अहो, आज किंवा उद्या किंवा फार तर परवा मलासुध्दा असं एखाद्या राष्ट्रपतींच्या भेटीचं निमंत्रण येईल बघा..
अरे वा कित्ती छान, कित्ती छान, ग्रेट, फंटास्टिक, वंडरफूल अशी प्रतिक्रिया आमच्या मुखातून बाहेर पडली. याप्रतिक्रियेवर थांबण्याची आमची इच्छा असली तरी आमच्या मुखातली माशी अनिच्छेनं शिंकली आणि म्हणाली,
डार्लिंग, तुम्हास कोणत्यातरी देशाचे राष्ट्रपती भेटण्यासाठी कसं काय बोलावतील बुवा.
अहो, जर ते ऐश्वर्यास बोलावू शकतात तर आम्ही कां नाही. लाडेलाडे मिसेस आमच्या गालाला गाल घासतम्हणाल्या. त्यांच्यातली मर्लिन ठार रोमँटिक झाल्याचं हे लक्षण होतं. ते आमच्यासाठी सुखावणारं होतं, पणत्यांचं बोलणं आम्हास वेड लावणार होतं. आम्हास बेशुध्द पाडण्याची शक्ती ठेवणारं होतं. त्याचं हे बोलूनं ऐकूनआम्ही बेशुध्द कां पडलो नाही. बेशुध्द पडून आम्हास कुणीतरी हिरानंदानी हॉस्पिटलच्या आयसीयू मध्ये कां नेलेनाही. आयसीयूमधून थेट मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी कां नेल नाही. अशी फालतू कम वस्तुनिष्ठ विचारप्रकियागतिमान झाली. आता आणखी काय काय बघावं लागेल, ऐकावं लागेल अशी जी अवस्था महाभारत युध्दातभीष्माचार्यांची झाली होती. तशीच आता काय काय ऐकावं लागेल, बघावं लागेल अशी आमची झाली. आम्हीमुख बंद आणि कर्णपटल खुले आणि हत्तीच्या कर्णपटलाऐवढे केले. आ वासून मिसेसकडे बघू लागलो.
त्यांचा उत्साह आता महापुराच्या वेळी बिहारराज्यातील कोसी नदीस येतो ना तसा झाला होता. या उत्साहातत्या आणखी खेटून आमचा गालगुच्चा घेत म्हणाल्या..
अहो, सगळ्या ऐश्वर्यांना कधी ना कधी अशी संधी मिळतेच,मिळते.
अहो पण तुम्ही सौ. मालिनी आहात. ऐश्वर्या कधीपासून तुमचं नाव झालं.
बालपणी माझ्या आईने नव्हतं का ठेवलं माझं नाव ऐश्वर्या. पाळण्यातलं. माझ्या आजीला फार आवडायचं नावहे. केजीच्या दोन्ही वर्गात हेच नाव होतं. तशी सर्टिफिकेट नाही का आहेत, आपल्याकडे.
मग ..
अहो मी मुळची ऐश्वर्याचं..
अहो पण मिसेस केवळ ऐश्वर्या राहून चालत नाही.
मग..
मग काय मग, अहो मिस वर्ल्ड व्हावं लागतं. ज्या ज्या ऐश्वर्या मिस वर्ल्ड होतात ,त्यानांच एखाद्या देशाच्याराष्ट्रपतींच्या भेटीचं निमंत्रण दिलं जाते.
तीच तर गंमत आहे. मिसेस म्हणाल्या. त्यांच्यातला लव्हबर्ड आता कोणत्याही क्षणी प्रेमाच्या पाच पंचेवीसकविता कधीही गाऊ लागेल असं आम्हास वाटू लागलं..
आता मिस वर्ल्ड होण्यामध्ये काय गंमत आहे बुवा. तशी गंमतजंमत असती ऐश्वर्यानंतर केवळ एकच हिंदुस्थानीकन्या मिस वर्ल्ड झाली नसती ना? असं आम्ही वदलो असतो तर मिसेसच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं झालंअसतं. मिसेसच्या मनात जागृत झालेल्या लव्हबर्डची मान सुरी न चालवताच कापली गेली असती. मिसेसनेस्वत:च पंक्चर केलेली हिरो होंडा पुन्हा फटकारायला लागली असती. या बाबी ध्यानात येताच आम्ही मौनतोडायचं नाही हे स्वत:स बजावलं. कधी कधी आमचा हा अंगभूत शहाणपणा बराच कामी येतो. मिसेसच्याबोलण्यावर आम्ही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. हे उत्तमच झालं. कारण आतापर्यंत आमच्याशी खेटूनखेटूनलाडेलाडे प्रेमालाप करणाऱ्या मिसेस नाजुकपणे आमच्याजवळून उठल्या. आमच्या ह्रदयास कोणताही धक्काबसू नये असं कदाचित त्यांच्या मनातील लव्ह बर्डास वाटलं असावं. त्या उठल्या आणि आश्चर्य म्हणजे त्यांनीस्वत:भोवती छानसी गिरकी घेतली. जुुन्या सिनेमात हिंदुस्थानात गीताबाली, आशापारेख ,वैजंयती माला आणितिकडे मर्लिन, एलिजाबेथ टेलर वगैरे जशा गिरकी घेत होते तशी ही रोमांचित करणारी गिरकी होती. मिसेसचाआनंद आमच्या 450 चौरस फुटाच्या सदनिकेत मावेनासा झाल्यासारखा दिसत होता. माझे डोळे आपोआपविस्फारले गेले.
गिरकी गिरकी घेत घेतच त्या म्हणाल्या.
माझे आईबाबा राहत त्या सोसायटीचं नावच मुळी कूल वर्ल्ड होतं. त्या वर्ल्ड सोयासटीनं मी मॅट्रिक मध्ये असतानासोसायटी क्वीन स्पर्धा घेतली होती. त्यात मी विनर होते राव. आहात कुठे? मिसेस तालासुरात बोलून गेल्या.
सध्या वेड्याच्या इस्पितळात भरती केल्यासारखं वाटतं, असं बोलावसं वाटलं. पण मौन आमच्या मदतीस आले. आता गिरकी घेऊन त्या सोफ्यावर ऐटित बसल्या. बालपणीच्या ऐश्वर्या, मॅट्रिक मध्ये मिस (कूल) वर्ल्ड(सोसायटी) झाल्याच्या आठवणीच्या झोपाळयावर, उंच माझा झोकाच्या गच्च मूडमध्ये कधीच गेल्या होत्या.
शिवाय त्या ऐश्वर्यांच्या पतिदेवांचे नाव ए पासून सुरु होतं. त्यांचं आडनाव बी पासून सुरु होतं. त्यांच्या कन्येचंनाव ए पासूच सुरु होतं. तुमचं नाव अनिकेतराव म्हणजे ए पासून, आडनाव बुडकुले म्हणजे बी पासून., कन्येचे नावआशिका. नावाची सुरुवात ए पासूनच. म्हणजे कसे सेम टू सेम.
याचा स्वयंस्पष्ट आणि कोणत्याही जीआरपेक्षा स्वच्छ अर्थ असाच की आमच्या मिसेस कोणत्यातरी राष्ट्राध्यक्षसाहेबांच्या भेटीच्या निमंत्रणासाठी कोणताही वशिला किंवा कोणतीही राखीव जागा याशिवाय पात्र, लायकआणि फिट ठरत होत्या..
आता फक्त वाट आहे, ती तसे निमंत्रण पत्र येण्याची…
ते तसे यावे यासाठी आमच्या मिसेस,देव पाण्यात टाकून बसल्या आहेत. तर आम्ही त्यांच्यातली मर्लिनकायमस्वरुपी जागृत राहावी यासाठी देव पाण्यात टाकून बसलो आहोत..
सुरेश वांदिले