(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

घरची भजी आणि हॉटेलची भजी-एक शोध-एक अन्वयार्थ

दुपारी मस्त रिमझीम पाऊस पडत होता. भाऊसाहेबांच्या आयुष्यात पावसाचं नातं हे गरमागरम भज्यांसोबत कायमचं जोडलंगेलय. विशेषत: सरकारी नोकरित स्थिरस्थावर झाल्यावर हे नातं सुदृढ झालं. पावसात भिजण्याच्या आनंदापेक्षा पावसालान्याहळत भजी खाण्यात जी मजा येते, ती सुश्री सनी लेऑन पुढ्यात फ्री म्हणून उभी राहिली तरी येणार नाही. असा त्यांच्याया वर्षिचा सिध्दांत आहे. काही वर्षांपूर्वी त्यामध्ये माधुरी दीक्षितांचे नाव त्यांनी ओवले होते. मर्लिन मेन्रो, जेनिफर लोपेजआणि शकिरा वगैरेच्या श्रेणित ते अद्याप गेलेले नाहीत.

     असो,

     आज ऑफिसमध्ये आसनस्थ

झाल्यापासूनच त्यांना भजी आनंदाचे डोहाळे लागले होते. त्यामुळे आसनस्थ होत असतानाच त्यांनी टेबलावरील काचेच्याखाली असलेल्या सद्गुरु महाराजांच्या तसबिरीला, आज काम जोरात होऊ द्या महाराज या ऐवजी, आज बरसू दे रे जोरातअशी प्रार्थना केली. भाऊसाहेबांनी केलेली ही मनोभावे प्रार्थना सदगुरु महाराजांनीही मनोभावे ऐकली. लंच टाइम होता होतापाऊस बरसू लागला. भाऊसाहेबांनी बसल्याबसल्या सदगुरु महाराजांना दंडवत घातला आणि रावसाहेबांना हाक मारली.

    

000

     रावसाहेबांशिवाय भाऊसाहेबांना भजी आस्वादाचा आनंदच घेता येत नसे. पाऊस आला आणि रावसाहेब आलेलेनसतील तर भाऊसाहेब कधीच भजी आस्वाद घ्यायला ऑफिसची पायरी ओलांडत नसत. रावसाहेबांशिवाय भजी आस्वादम्हणजे भिवापुरी मिरचीच्या तिखटाशिवाय सावजीचं मटन, अशी त्यांची शासकीय धारणा होती. या धारणेला तडे जाऊ नदेण्याची खबरदारी ते कायमच घेत आले. त्यामुळे आजही पाऊस सुरु होताच त्यांनी रावसाहेबांना हाक मारली. चलारामभरोसेत. झक्कास कुरकुरित भजी मिळतात तिथे.

     भाऊसाहेबांच्या हाकेच्या अंतरावर बसणाऱ्या रावसाहेबांनाही एव्हाना भाऊसाहेबांचं त्यांच्यावरचं प्रेम व्यवस्थितआकलन झालं होतं.

000

     भाऊसाहेबांच्या ऑफरला रावसाहेबांनी नाकारणं शक्यच नव्हतं. कारण भाऊसाहेबांच्या ऑफरी बिग बाझारीस्टायलिच्या असत. म्हणजेच एकावर पाच फुकट-बिकट. रावसाहेब नोकरित आल्यावर याच भाऊसाहेबांनी त्यांना ही बिकटवाट सोपी करुन दाखवली होती. त्यामुळे भाऊसाहेब बोले नि रावसाहेब हाले. तिकडे नो आरग्युमेन्ट.

     भाऊसाहेबांचं बोलावणं हे भजी आस्वाद करण्यासाठीचं अशासकीय, अनधिकृत आणि प्रेमाचं निमंत्रण असलं तरीते कंपल्सरी होतं. स्पष्टच सांगायचं तर तो रावसाहेबांच्या पूर्वजांनी भविष्यातील सर्व भाऊसाहेबांसाठी तसा गोळीबंद आदेशचकाढून ठेवलेला होता. कोणतही कनफ्युजन नसलेला. हे आता रावसाहेबांना इतक्या वर्षांच्या सेवेनंतर चांगलचं परिचयाचंझालं होतं.त्यामुळे त्यांना भाऊसाहेबांच्या प्रेमाच्या हाकेला ओ देणे आलेच..

000

     भजी आस्वादासाठी भाऊसाहेबांची विनंती कम निमंत्रण येताच रावसाहेबांना जागेवरुन हलणे मस्टच होते. भज्यांचंनाव कर्णपटलावर पडताच रावसाहेबांचीही नसलेली भूक प्रज्वलित

झाली. फुकटात-बिकटात हे सारच चालतं. यात पोट-बिट बिघडलं तरी पुन्हा भाऊसाहेबच डॉक्टरकडे नेण्यास कार्यतप्तर. औषधही तेच घेणार नि बिलही तेच देणार. म्हणजे इथेही फुकटात-बिकटातच. तेव्हा रावसाहेबांना तशी काही चिंता नव्हतीच.

     भाऊसाहेब सोबत असताना सर्व चिंता अमेरिकेतल्या व्हाइट हाऊसमध्ये किंवा दिल्लीतल्या राष्ट्रपती भवनातीलविश्रामगृहात  नेऊन ठेवायच्या असतात याचं ज्ञान रावसाहेबांना नोकरीच्या तिसऱ्याच महिन्यात उत्तमरीत्या आलं होतं.

     इथे एक प्रश्न निर्माण केला तर किंवा मेंदूला सुचला तर उपस्थित होऊ शकतो. की हे भाऊसाहेब कोणत्याअंबाणीचे जावई आहेत बाँ,किंवा त्यानांच केवळ महाराष्ट्र राज्य लॉटरी भव्य सोडत कशी सुटते बाँ, किंवा त्यांनाच कशीदाऊद साहेबांकडून खंडणीबिंडणी सहर्ष येते बाँ. किंवा त्यांनाच कसं अरब देशातील खनिज तेल किरकोळ विक्रिचा परवानामिळाला बाँ. तर असे बाँ वाले असंख्य सवाल पडले तर पडू द्यायचे असतात. पण त्याच्या खोलात जायचं म्हणजे नदीच्यातळाचा आणि नटीच्या पावित्र्याचा शोध घेण्यासारखं.

000

     त्यामुळेच भाऊसाहेबांना हे असं कसं जमून जातं हे विचारायचं नाही. हे असं विचारणं म्हणजे माइक समोर येताचराजकीय नेते कसे फिलॉसॉफी ते फार्मकॉलॉजी या सारख्या यच्चयावत विषयावर भडाभडा बोलू शकतात हे विचारण्यासारखंझालं. तर मुद्दा असा की  भाऊसाहेबांना (रावसाहेबांना कायम खुष ठेवण्याचं जुगाड) जमत कसं हे विचारायचंच नाही. तसाअलिखत नियम सम्राट अकबरानेच केला होता म्हणे . तो नियम कोणत्याही बादशाही – पादशाही – राजेशाही – निजामशाही – इमादशाही- पेशवेशाही – इंग्रजशाही आणि नंतर लोकशाहीने बदवलला नाही. उलट प्रत्येक शाहीच्या टप्प्यात हा नियमअधिकच घट्ट घट्ट होत गेला.

000

     भाऊसाहेब – रावसाहेबांच्या जोडीचं नातं हे गंधर्व आणि अप्सरेच्या नात्यासारखं. एकाशिवाय दुसऱ्याला अर्थ नव्हता. ज्या ठिकाणी गंधर्व तिथे अप्सरेचे नृत्य. आणि ज्या ठिकाणी भाऊसाहेब त्याठिकाणी रावसाहेबांचा पदस्पर्श, हे समिकरणठरलेलचं.(याचा अर्थ रावसाहेब भाऊसाहेबांसाठी मदारीवाला बंदर नव्हते हे सुध्दा तितकेच खरे.)

     हे विस्तृत विश्लेषण याचसाठी की रावसाहेबांच्या कर्णपटलावर भजी शब्द पडला की की त्यांचे रुपांतर, अ मंकीहू लव्हड गरमागरम भजी असं होऊ लागायचं.(अर्थातच हे सारं केवळ त्यांच्या मनीच बर कां..) पुढे त्यांनीच यात दुरुस्ती केली. अ माँक हू लव्हड हॉट भज्जी, अशी मंकी ते माँक सुधारणा करण्याचा बिलंदरपणा केला. यावर त्यांचं असं स्पष्टीकरण होतंकी माँकला जर फेरारी आवडू शकते तर भज्जी कां नाही.(पुन्हा सारं काही मनातच बरं का..) मुद्दा शंभर नंबरी सत्य होता. पणयात एकमेकांचा काहीही बादरायण संबंध नाही हे त्यांना कोण कसे सांगणार? शेवटी मंकी काय किंवा माँक काय, महत्वाचा ठरतो ते भजी आस्वादच. बाकी चर्चा निष्फळ आणि शुष्क. तत्वज्ञानातल्या पुस्तकातील संदर्भाच्या तळटीपांसारखी. हे सुध्दा ज्ञान रावसाहेबांना उत्तमच होते त्यामुळे ते भाऊसाहेबांसोबत रामभरोसेत अतिव आनंदानेच प्रस्थान करत झाले.

000

     भाऊसाहेबांनी दोन प्लेट कांद्याभज्यांची आणि दोनप्लेट मिरची भज्यांची ऑर्डर दिली. पाच मिनिटात छोटूने दोन प्लेटगरमागरम कांदीभजी दोघ्यांच्या पुढ्यात ठेवली. पुढच्या दोन मिनिटात मिरची भजीही पुढ्यात आली.

     अशी कुरकुरित आणि फुरफुरित भजी आपल्या बायकांना कां करता येत नसावे हो, रावसाहेबांनी भाऊसाहेबांनाविचारलं.

     कुरकुरित समजलं पण भजी फुरफुरित कधी पासून व्हायला लागली. भाऊसाहेबांना प्रश्न पडला.

     फुरफुरित म्हणजे फुस्सकन गळ्याखाली सरकणारी पण जिभेला चटका लावून फ फ फ करायला लावणारी, अशीफुरफुरित शब्दाची अमूल्य व्युत्पत्ती रावसाहेबांनी भाऊसाहेबांसमोर ठेवली. इतिहासपूर्व काळात सन 320 बीसीच्या एकासुलभ पाकशास्त्रीय चोपडित अशी नोंद असल्याचे ते सांगायला चुकले नाहीत.

     पण रावसाहेब, कुरकुरित म्हणा किंवा फुरफुरफुरित म्हणा अशी भजी फक्त रामभरोसे हॉटेलातच कां मिळतात ? शामभरोसे सुध्दा नाही हे लक्षात ठेवा. ओन्ली विमल सारख ओन्ली रामभरोसेच.

     खरच की भाऊसाहेब. याचा साला आपण कधी विचारही केला नव्हता. रामभरोसेचा आणि कुरकुरित भज्यांचा संबंधरामायण काळापासूनच घट्ट झाला असला पाहिजे. एवढ्या मोठ्या सैन्याला सदैव ताजेतवाणे ठेवण्यासाठी कुरकुरितभज्यांशिवाय दुसरं कोणतंच साधन असू शकतं नाही. श्री जांबुवंतांना ही बाब चांगलीच लक्षात आली. त्यातूनच त्यांना पहिलेचालतेफिरते रामभरोसे उपाहरगृह सुरु करण्याची प्रेरणा मिळाली. कुरकुरित भज्यांचे उपहारगृह. भज्यांवर ते रामभरोसेलिहायचे. रामाचे नाव लिहिलं की विटाही तरंगतात. हे त्यांना ठाऊक होतच. त्यामुळे रामाचं नाव लिहिलेली भजी गिळली कीमिळाली एनर्जी, नव्या दम्याने पुढे जाण्याची. नव्या दम्याने लढण्याची. असा हा रामभरोसेचा रम्य इतिहास. रावसाहेबांनीपुन्हा एकदा अमूल्य माहिती भाऊसाहेबांना पुरवली. पण भाऊसाहेबांना यात जरा सुध्दा रस नव्हता.त्यांनी आपली चिंताविनोदी अंगाने बोलून दाखवली..

      ते म्हणाले, रावसाहेब, आपल्या बायकांचं बोलणं कुरकुरित असतं, मॉलमध्ये कुरकुरे चिप्स मिळतात. पणघरी मात्र कुरकुरित भजी मिळत नाही ती नाहीच. हा हा हा भाऊसाहेबांनी त्यानांच समजेल असा (पांचट) (रावसाहेबांच्या मतेपोचट) विनोद केला . फुकट-बिकट कुरकरित भज्याला जागण्यासाठी या विनोदाला कपिल शर्माच्या आणि तारक मेहताच्याविनोदापेक्षा हजार पट श्रेष्ठ आहे असे सांगून रावसाहेबांना ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ह्यॅ करावे लागले.

000

     रामभरोसे हॉटेलमधीलच भजी कुरकुरे कां होतात? याचा शोध घ्यायलाच हवा गडे. दोन प्लेट पोटात भजी पोटातगेल्यावर रावसाहेब पुन्हा मूळ मुद्यावर आले.  चीन एखादे वेळेस अरुणाचल प्रदेशाबाबत आपल्या मुद्दा पातळ करु शकेलकिंवा सोडूनही देऊ शकेल पण रावसाहेब मात्र कुरकुरित भजे, रामभरोसे हॉटेल आणि घरची भजी या मुद्यालाफेविकॉलसारखे चिटकून बसले होते.

000

     त्यामुळे इच्छा नसतानाही भाऊसाहेबांनाही त्यांच्या मुद्याला पकडून ठेवणं भागचं पडलं.

     रावसाहेब म्हणतात याचा अर्थ त्यात काही तथ्य असणारच. त्यामुळे कुरकरित भजी केवळ रामभरोसे हॉटेलातच कांहोतात? याचा शोध घेणं अत्यावश्यक असल्याच भाऊसाहेबांनाही वाटू लागलं. या वाटण्याला आणखी एक दु:खद किनारहोती. लग्नाची 23 वर्षे कुरकुरण्यात फुर्रदिशी उडून जाऊनही त्यांच्या बायकोला तर भजेच बनवता येत नव्हते.  कुरकुरे भजे  तर तिकडे अफगानिस्तान आणि सोमालियातच राहिले. त्यामुळे रावसाहेबांच्या प्रपोजलला भाऊसाहेबांनी एकमुखी पाठिंबादिला.

     घरची (नॉट-सो कुरकुरित) भजी आणि हॉटेलची (हॉट-सो-कुरकुरित) भजी- एक शोध-एक अन्वयार्थ , समकालीनवास्तवाचे सत्यशोधन.. हा संशोधनाचा विषय रावसाहेबांना रामभरोसेतील त्या विशिष्ट सुगंध असलेल्या वातावरणात सुचलासुध्दा.

     पीएचडी करण्याचे रावसाहेबांचे स्वप्न बालपणापासूनच होते. (असं त्यांच्या स्वर्गस्थ पिताश्रींनी त्यांच्या मृत्यूपत्रातलिहून ठेवलं होतं. मात्र स्वप्न पिताश्रींचं होतं की पुत्रासाठी होतं ही संदिग्धता कायम ठेऊनच पिताश्री स्वर्गस्थ झाले होते. पिएचडी केल्यावरच शांती मिळेल आणि धनाची पेटीही मिळेल असं मृत्यपत्राच्या ताजा कलममध्ये नमूद होतं. पिताश्रींनास्वर्गस्थ झाल्याने शांती मिळाली होती. आता राहिली ती धनाची पेटी. ती मिळवण्याची जबाबदारी रावसाहेबांची. त्यासाठीपिएचडी मिळवणं गरजेचं. असा एक सोईचा संबंध रावसाहेबांनी जोडून घेतला होता.) हे स्वप्न मरण्यापूर्वी पूर्ण करणार(च) किंवा करुन दाखवणारच असा त्यांचा पण होता. मात्रा आतापर्यंत त्यांना विषय सूचत नव्हता.

     श्रीयुत व्यासमुनिंनी काहीही गरज आणि आवशक्यता नसता  जगताल्या साऱ्या विषयांवर आपला हात आणिलेखनी चालवली होती. त्यामुळे इतरेजणांसाठी विषयांचा ठणठणपाळ आणि मोठ्ठाच महादुष्काळ निर्माण झाला होता. कोणताही विषय घेतला की तो व्यासमुनीश्रेष्ठांनी आधीच स्पर्शिलेला. विषयाचे नावीन्य ते असे काही नाही. सारे काही उष्टेच.

     कोणताही नवा विषयच नसल्याने संशोधन कसलं डोंबल्याचं करणार ? विषयाच्या शोधात रावसाहेबांची उमेदीचीवर्षे गेली. पण त्यांनी हार माणली नाही. कारण त्यांना माहीत होतं की ही काही पानिपतची लढाई नव्हे. बचेंगे तो और भीलढेंगे असा उसना आवसुध्दा आणायची गरज तेव्हा तर नव्हतीच नव्हती, आतातर तसा सवालच उठत नाही. बचेंगे तो औरभी लढेंगे, हे बोल जेव्हा अहमदशहा अब्दालीच्या कानावर गेले. तेव्हा तो फिदी फिदी हसला म्हणे. लढण्यापेक्षा हे हसणंत्या (वेड्या) विरांच्या जास्त जिव्हारी लागलं होतं. असं काही रावसाहेबांना होऊ द्यायचं नव्हतं. विषय नाही मिळाला तरीचालेल पण वासना म्हणजे इच्छेला मरु नाही द्यायच, हा त्यांचा ठाम निर्धार होता. तो त्यांनी असा निष्ठने पाळला आणित्याची सुंदर कुरकुरित फळं आता त्यांना मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. 

     विषयाच्या शोधात अडकलेला रावसाहेबांच्या गळ्यातल्या माशाचा काटा असा अवचित विरघळून त्यांच्या प्लेटमेटमध्येच त्यांना संशोधनासाठी विषय गवसला.

000

     अनंत काळ असाच कोणत्यातरी विषयाच्या संशोधनात अडकून पडलेल्या ऑर्किमेडिज नामे संशोधकाला तोस्नानगृहात स्नानंदाच्या समाधीचा अनुभव घेत असताना हवा असलेल्या शोधाचा मार्ग गवसला. तेव्हा तो युरेका युरेकाओरडतच भोंगळाच बाहेर धावत सुटला. अशी ऐतिहासिक नोंद असल्याचे बरेच दाखले दिले जातात. हा आर्किमेडिज आणित्याचा युरेका मंत्र वारंवार ऐकवला जातो. पण त्याच्या सत्यासत्येत कुणीही अद्याप गेलेलं नाही. स्नानगृहात भोंगळं असणं हाकाही पराक्रम नाही. कारण हमाम मे सारेच नंगे होते है, हा हिंदी सिनेमातला सुप्रसिध्द डॉयलॉग खोटा वा असत्य ठरु शकतनाही. आर्किमेडिज भोंगळे धावत सुटले. यात त्यांचा पराक्रम नसून अशुध्द – अस्वच्छ भोंगळेपणाच दिसतो. शास्त्रज्ञ झालेम्हणून त्यांना कसेही धावण्याची मुभा कशी काय राहू शकते. पण त्यांनी ती मुभा घेतली. वरुन युरेका युरेका असं त्याचंसमर्थनही केलं. युरेका म्हणजे सापडलं सापडलं हा नवा अर्थ सुधारित आवृत्तीतला प्रक्षिप्त असा असला पाहिजे. पणआर्किमेडिज मोठी तालेवार हस्ती. त्यामुळे त्यांच्या नावावर काहीही खपून गेलं तेव्हा. आता तसे होणे नाही ना. कारणरावसाहेब जरी राव आणि साहेब असले तरी ते मोठे साहेब नव्हते. त्यांच्या साहेबांच्या साहेबांच्या साहेबांच्याही वर आणखीसाहेब होतेच. त्यामुळे रावसाहेब एका टप्प्यावरच मोठे होते. याचे त्यांना चांगले भान होते. ही बाब त्यांनी कधी विस्मरणातनेली नाही. त्यामुळे रावसाहेबांना हॉटेलमध्ये भज्यावर ताव मारताना संशोधनाचा विषय सापडला असतानाही ते शांत – प्रशांतच राहिले. त्यांनाही कुरेका कुरेका असं ओरडत बाहेर जाऊन नाचायची – बागडायची तीव्र इच्छा होत होती पण तेआर्किमेडिजच्या ऐवजी रावसाहेब होते. याचे भान त्यांनी राखले होते.ते राखूनही त्यांनी एक तोडगाही तत्काळ काढला. कारणत्यांना इच्छा मरु द्यायची नव्हती. त्यांनी मनातल्या मनात युरेका युरेका, अरे कुरेका, असे म्हणून आपला आनंद व्यक्तकेला. हा अव्यक्त आंनद खुलेपणाने व्यक्त करण्यासाठी छोटूला थाटात हाक मारली तो येताच पुन्हा दोन प्लेट कुरकुरितभज्याची ऑर्डरही दिली. याचे बिल आपणच देणार हे त्यांनी जाहीर करुन टाकले.

0000

     भाऊसाहेब ताडकन उडालेच. गेल्या पाच हजार वर्षात असं कधी झालं नव्हतं. रावसाहेब सांगे आणि भाऊसाहेबडोले. हीच प्रथा होती. हीच परंपरा होती. या परंपरेचं पालन करनं एवढचं अधिकृत कार्य भाऊसाहेबांचं होतं. त्यात त्यांनी कधीअनमान केला नव्हता. त्यांनी शेकडो वेळा मनातल्या मनात रावसाहेबांना शिव्यांची लाखोली वाहिली असेल पण कर्तव्यातमात्र अनमान केला नव्हता. आज काहीतरी अघटितच घडले होते. भाऊसाहेबांना हा धक्का न मानवणारा होता..

000

     पण हॉटेलातील कुरकुऱ्या भज्यांचे रहस्य शोधण्यासाठी त्यांनी हा धक्का मोठ्या धिराने आणि साहसाने सहन केला. असे धक्के सहन करुनच संशोधनाला गती देता येते. हे त्यांनाही ठाऊक होतं. 

000

     पिएचडीच्या संशोधनासाठी आतापर्यंत हाती न गवसलेला विषय सापडल्याने रावसाहेबांनी पहिली फेरी तर जिंकलीहोती. रामभरोसे हॉटेल मधला शेफ आणि घरी (शेफरालेली) बायको यांच्या समवेत विचारविनिमयाचा बॅलन्स साधला कीत्यांना हॉटेलमधील कुरकुरित भज्याचं रहस्य गवसणारच होतं..

  000

  अहो हे रहस्य समजा गवसलंच तर त्यातून साध्य काय होणार? काय साध्य होणार सांगा बरं. बायकोपुढे जेव्हा कुरकुरितभज्यांच्या संशोधनाचा विषय रावसाहेबांनी छेडला तेव्हा त्यांच्या बायकोने मुद्यालाच हात घातला. ते खरही होतं.

  समजा हे रहस्य गवसलं तर रावसाहेब काही बायकोला घटस्फोट देणार नव्हते. त्यांचं कलेक्टर म्हणून प्रमोशन होणार नव्हतं. ते दररोज काही रामभरोसे हॉटेलमधील कुरकुरित भजेही खाणार नव्हते.

  भजे जिभेचे लाड करतात पण पोटाचे हाल करतात. हे तर वैश्विक सत्यच आहे. त्यामुळे इंग्लड – अमेरिकेत- फ्रांसमध्येकुरकुरिकत भजी नाहीत तिकडे फ्राईड चिकन ते फ्राईड वेफर्सच. बायको म्हणाली ते खरच होतं.

  मग हा खटाटोप कशासाठी. रावसाहेब विचार करु लागले. भाऊसाहेबांचा सल्ला त्यांनी घेतला. कुरकुरित भज्यांच्यासंशोधनाचा उपयोग काय? हा गहन प्रश्न त्यांनाही पडला.

  यावर विचार करता करता भाऊसाहेबांना असं सुचल की रावसाहेबांच्या संशोधनाच्या फलितातून सिध्द झाले की कुरकुरितभजी फक्त रामभरोसत तयार होऊ शकतात आणि कोणत्याही हाऊसवाइफला तशी भजीच तयार करता येत नाही. तर घरीभजी तयार करण्यावर बंदीच आणणं श्रेयस्कर ठरेल. याचा अर्थच असा की जर घरी भजी नाही म्हणजे भजी फक्तरामभरोसेशीच. मात्र रामभरोसेचा कारभार हा राम – रावणकालापासून अगदीच रामभरोसे चाललेला. तेव्हा सध्याच्या स्मार्टकाळात कुरकुरित भज्यांची गरज रामभरोसे कशी भागवणार ?

  याचा अर्थ रामभरोसेमध्ये मोठी बिझिनेस ऑप्यर्च्युनिटी दिसते. याचा दुसरा अर्थ असा की टाटा, बिर्ला किंवा अंबाणीचरामभरोसे स्ट्राँग आणि समर्थ करु शकतात. देशात साखळी आणि परेदशात महासाखळी निर्माण करु शकतात. केंच्युकीफ्राइड चिकनची साखळी न्यूर्याकपासून नवेगावबांधपर्यंत पसरली. तसच रामभरोसे कुरकुरित भज्यांची साखळी वरोडयापासूनवाशिंग्टनपर्यंत पोहचू शकेल. एका दणक्यात रामभरोसे इंटरनॅशनल कार्पोरेट कंपनी स्थापित होऊन अर्थव्यवस्थेला गती आणिचालनाही मिळू शकते. रामभरोसे नवा आर्थिक सिध्दांतही तयार होऊ शकतो. रामभरोसे कुरकुरित भज्यांची नवी अर्थव्यवस्थाआणि अर्थकारण जन्मास घातल्या बद्दल रावसाहेबांना अर्थविषय नोबल प्राइज मिळू शकते. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणूननियुक्ती मिळू शकते. गेला बाजार देशाचे अर्थमंत्रीपद मिळू शकते.

  वंडरफूल.. आपल्याच कल्पनाविस्तारावर भाऊसाहेब खुष झाले. त्यांना अधिकच गुदगुल्या होऊ लागल्या. कारण त्यांनाठाऊक होतं. रिझार्व बँकेचे गव्हर्नर आणि देशाच्या अर्थमंत्रीपदाचा कार्यभर सांभाळलेल्या महनीय व्यक्तिस पुढे पंतप्रधानांचामुकूट मिळतो.

  गुदगुल्या या कारणासाठी नव्हत्या.

  तर पंतप्रधान झालेले रावसाहेब हे आपणास म्हणजे भाऊसाहेबास खाजगी सचिव म्हणून नक्किच म्हणून नियुक्तीकरतील.आतापर्यंत रावसाहेबांवर जो काही दानधर्म केला,तो चक्रव्याढ व्याजासह वसुल होण्याची ही नामी संधी होती..

  कुरकरे भज्यातून मिळू शकणारी..

  आता सांगा, कुणाला बरं गुदगुल्या होणार नाही ते…