(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

पुरुष मित्रांनोसावध व्हा..!

पुरुष मित्रांनो, सावध व्हा. सावध व्हा..सावध व्हा. तुम्ही अक्षयराव असा, शारुखराव असा, रणबीरराव असा, सलमान राव असा की श्रीरामराव असा, तुम्ही सावधच व्हा.

    तुम्ही स्वत:ला इंटेलिजंट, स्मार्ट, सूपर उबर कूलबिल समजत असाल तरीही सावध व्हाच.

    विशेषत: लफडा-सदनात प्रवेश करण्यापूर्वी पन्नास वेळा विचार करा आणि मगच त्यात पहिलपाऊलटाका.

    लफडा-सदनातला प्रवेश कुण्णालाही कळू शकणार, इतका स्मार्टनेस किंवा हुषारी आपल्यात असल्याचाअभिमान तुम्हाला असेल तरी सुध्दा सावध व्हाच. कारण एक (दुष्ट) संशोधन नुकतच बाहेर पडलय हो.

    हे  संशोधन  करण्याची दुर्बुध्दी आपल्यापैकी एका पुरुष मित्राला झालीय.  हे संशोधक आहेतलफडा सदनात मोठ्या डौलात आणि थाटात सदैव प्रवेश करणाऱ्या शेन वार्न-भाऊ  याच्या मातृभूमितील-ऑस्ट्रेलियातील. लैग सॉयमन्स हे ते थोर संशोधक . त्यांचं संशोधन रॉयल सोसायटी जर्नल बायलॉजीलेटर्स, या नियतकालिकात नुकतच प्रकाशित झालय.

    सायमन्स रावांचं संशोधन असं सांगतं की, पुरुषराव आपली प्रेमप्रकरण आणि प्रेमपात्र लपविण्यातस्वत:ला स्मार्ट समजत असेल आणि आपल्या अशा प्रकरणांचा गंध वा सुगंध कुण्णालाच अगदी स्वत:च्यासौभग्यवतीलाही  येणार  नाही असंही समजत असेल तर ते मुर्खाच्या नंदनवनातले रहिवाशी समजायला हवेत. कारण प्रत्येक महिला ही किमान असल्या गंध  वा सुगंधाला ओळखण्याचं स्मार्टनेस घेऊनच जन्माला आलेलीअसते. त्यामुळे पुरुष मित्रांनो सावध व्हाच.सूपरकूलबिल असाल तरी सावध व्हाच.

    पुरुष मित्रांनो,तुम्हाला जरी वाटत असेल ,की तुम्ही शंभर टक्के सुरक्षिततेचं कवच बांधलय, प्रेमप्रकरण लपवायला. तरी तुमच्या चेहऱ्यावर म्हणे ते दिसूनच येतं. मचा चेहरा सपाट असला, भकास असलाकिंवा डोळयात कोणतेच भाव नसल्याचा आव असला तरी, स्मार्ट महिलांना मात्र तुम्ही लफडा-सदनाचं दारठोठवल्याचं बरोबर समजतं. कळतं. समजा तुमची सौभाग्यवती कधीच या बाबतीत बोलली नसेल, तिनेकिंचितही शंका उपस्थित केली नसेल, याचा  अर्थ तिला काहीच समजलेलं नाही असं नसून या आनंदातप्रेम प्रकरणातील पुढची प्रकरणं लिहायला मोकळं असं तुम्ही समजू नका. तसं समजून अशी प्रकरणं लिहूशकायला तुम्हाला कुणी अडवणार नाही म्हणाच. पण पुरुष मित्रांनो, तुमच्या  सौभाग्यवतींना, तुमचंप्रेमकथा लेखन हे केवळ चारोळीपुरतं मर्यादित राहिलं नसून ते कथा-दीर्घ कथेचा टप्पा ओलांडून कादंबरीलेखनाच्या दिशेने चाललय हे कळलय हे लक्षात असू द्या, म्हणून तुम्ही सावध व्हाच.

    पुरुष मित्रांनो, तुम्हाला गुपचूप-चूपचूप प्रेम काव्याचा आस्वाद घेता येऊ नये याची खबरदारी देवानेचघेतलीय.त्यामुळे पुरुष मित्रांनो तुमचा स्मार्टनेस कुचकामाचा ठरलाय.या बाबत देवाने आपल्यापेक्षा महिलांनाअधिक स्मार्ट, इंटेलिजंट बनवलेय हो.या जखमेवर सायमन्सरावांच्या संशोधनातील मीठ चोळल्या गेल्याचंदु:ख तुम्ही सहनही केलं असतं,पुरुष मित्रांनो.पण प्रत्येक नाटकात जसे व्टीस्ट आणि टर्न्स असतात तसच यासंशोधनात जे व्टीस्ट आणि टर्न्स आढळून आलेत,ते तर पुरुषी अहंकाराला झोपवणारेच निघालेय.

    पुरुष मित्रांनो, तुमच्या चेहऱ्यावरुन, तुमच्या डोळयातील भावातून, रुंद खांद्यातून तुम्ही प्रेम प्रवासाचीतिकिट कापल्याचे ओळखू शकणारी तुमची सौभाग्यवती,ही जर तुमच्या सारखाच  गंध आणि सुगंधचाआस्वाद घेत असेल ,ते तुम्हाला कळणं कठिण.कारण पुरुष मित्रांनो तुम्ही या बाबतीत स्मार्ट,हुषार आणिबुध्दीमान नाहीत.असं सायमान्सरावांचं संशोधन सांगतं. याचा अर्थ असाच की तुम्ही तसेही स्मार्ट नाहीत निअसेही स्मार्ट नाहीत . कदाचित यालाच इकडे आड तिकडे विहीर म्हणत असावे.

    तेव्हा पुरुष मित्रांनो, तुम्ही सावधच व्हा. कारण सायमन्सरावांच्या संशोधनानं एक  अग्निबाणहीउडवलाय. सायमन्सरावांची सूचना अशी आहे की,लग्नापूर्वी पुरुष मित्रांनी लफडा सदनात प्रवेश केला किंवाकसे हे लग्नइच्छूक महिलांनी आधीच समजून घ्यावे. त्यासाठी  काही महिलांना समजून देण्याचे असेस्पेशलाईज्ड प्रशिक्षण द्यावे. म्हणजे अशा प्रशिक्षित महिला ठिकठिकाणी सर्विस सेंटर उघडतील. अशासेंटर्समध्ये लग्नाची गाठ फायनल करण्यापूर्वी  होणाऱ्या बायकोस घेऊन जायचं. या सेंटरची प्रशिक्षितसंचालिका मग तुमच्याकडे टक लावून बघेल .रुद खांद्याकडे बघेल, चेहऱ्याकडे बघेल, डोळयात बघेलआणि आपला रिपोर्ट देईल. संभाव्य बायको समोरच,ती प्रशिक्षित संचालिका,तुमचं त्या क्षणी सुरु असलेलीकिंवा त्या क्षणाआधी संपून गेलली प्रेमकथा किंवा कविता होऊ घातलेल्या बायोकडे उघडं करेल.अशाअनफेथफूल माणसाशी लग्न करायचं की नाही तुझ तूच ठरव किंवा मग फाट्यावरच मार त्यास असंही तीप्रशिक्षित संचालिका सांगू शकेल.

पुरुष मित्रांनो, हे असेच घडेल असं नाही, पण सायमन्सरावांच्या संशोधनातून बाहेर पडलेला हा गांडूळ हळूहळू सरपटत भारतदेशी किंवा इतर देशी कधीतरी जाण्याचा धोका आहेच.

    पुरुष मित्रांनो, ते जेव्हा केव्हा घडेल तेव्हा घडेल. पण सध्या तरी तुम्ही सावध व्हाच. तुम्ही  स्वत:ला धर्मेन्द्रराव,देवानंदराव,अक्षयराव,जॉनराव,अमिरराव किंवा जेम्स बाँड (राव) समजत असलास तरीलफडा-सदनातील प्रवेशाचं सिक्रेट तसच राहू देण्याची क्षमता आणि बुध्दी तुमच्यात नाही रे भाऊ….त्यामुळेसावध व्हाच.