मूर्ख ससा
सशाच्या कोणत्यातरीपूर्वजाने म्हणे सिंह महाराजांनायुक्तिने चित केलं होतं. ही कथा या पिढीपासूनपुढच्या पिढीपर्यंत सशाच्याकुटुंबात सांगितली जायची.
खूप खूपवर्षापूर्वी, सध्याच्या सिंहमहारांजाच्या पणजोबांचे पंजोबाखूप दुष्ट होते. वननगरीतत्यांची फार दहशत होती. त्यांच्या मनात आले की, ते कुणालाही महालीबोलवत नि त्याचा फडशापाडत. त्यामुळे सगळेनागरिक त्रस्त झाले होते. या दुष्ट महाराजांना कसेवठणीवर आणायचं नि त्यांचाकसा बंदोबस्त करायचाहे कुणालाच कळेना.
अशा दहशतीखालीवननगरीचं जीवन किती दिवसचालायचं, असा प्रत्येकाला प्रश्नपडायचा. पण कुणीही काहीचकरु शकत नव्हतं. आलादिवस कसा तरी पुढंढकलणं हेच प्रत्येकजण करुलागला.
मात्र एकेदिवशी सध्याच्या ससोबाच्यापणजोबाच्या पणजोबास वाटलं कीआपण काही तरी केलंपाहिजे. सिंह महाराजांना धडाशिकवला पाहिजे. तसंत्याने आपल्या बाबांना सांगितलं. मित्रांना सांगितलं. हत्तीरावांनाही सांगितलं. बाबा घाबरले. मित्र हसले.
हत्तीराव म्हणाले, ससोबा कशाला जीव धोक्यात घालता स्वत:चा. आगीची परीक्षा घेऊ नये म्हणतात.
पण ससोबानंकुणाचं ऐकलं नाही. तोहिम्मत करुन महाराजांच्या समोरउभा ठाकला. महाराजांना म्हणाला तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आणि शक्तिमान प्राणी आपल्या वननगरीत आल्याचं मी बघितलंय महाराज. त्याला आपण हाकलून दिलं नाही तर तो एके दिवशी आपलं राज्यच हिसकावून बसेल.
ससोबाचं बोलणंऐकताच सिंह महाराजांनी मोठीगर्जना केली. या गर्जनेनंजंगल घाबरलं. तेससोबास म्हणाले,
सशा, कुठे आहे तो माझ्यापेक्षा मोठा श्रेष्ठ प्राणी. तू जर तो प्राणी दाखवू शकला नाहीस, तर मात्र आज तूच माझी मेजवाणी.
महाराज, हे मला ठाऊक नाही का? तुमच्याशी मी कसा असत्य बोलेन. तुम्ही चला माझ्यासोबत मी दाखवतो तुम्हाला तो प्राणी.
पुढची गोष्टसाऱ्यानांच ठाऊक आहे. ससोबानेसिंह महाराजांना एकामोठया विहिरीजवळ नेलं. त्यात त्यांना बघायला लावलं. सिह महाराजांना त्यांचंप्रतिबिंब दिसलं. महाराजांनीगर्जना केली. त्या प्रतिबिंबानेही गर्जना केल्याचं दिसताचमहाराजांना आला प्रचंड राग. त्यांनी मारली उडी विहिरीत. त्यात त्यांचा झाला अंत.
दुष्ट सिंहमहाराजांच्या तावडीतून वननगरीलामुक्त केल्याबद्दल मगससोबांचं खूप कौतुक वगैरेझालं..
तर सध्याच्याससोबाच्या पणजोबांच्या पणजोबांचीही खरी असलेली किंवानसलेली पराक्रमाची गाथाएका पिढीकडून दुसऱ्यापिढीकडे येत राहिली. सध्याच्याससोबांनाही वाटलं की आपलेपूर्वज जर एवढे पराक्रमीहोते तर आपणही तेवढेचपराक्रमी असलो पाहिजे. त्यांचंचरक्त ना आपल्या अंगी. मग आपण सुध्दासध्याच्या सिंह महाराजांना असाचधडा शिकवला पाहिजे. आपल्यामनीची ही इच्छा ससोबानंत्याच्या बाबांना सांगितली. बाबांनीत्याच्या कानशिलात ठेऊनदिली. याचं कारण काहीत्याला कळेना.
मुर्खा, तुझ्या पणजोबाच्या पणजोबांनी खरोखरच तेव्हाच्या सिंह महाराजांना अद्दल घडवली की नाही हे सांगायला काय त्यांचं भूत आलं होतं तुला सांगायला? असल्या गावगप्पांवर फार विश्वास ठेवायचा नसतो. सिंह महाराज कुठे नि आपण कुठे. त्यांची आपली बरोबरी तरी होऊ शकते का.
पण बाबा, तुमचं असं सांगणं आपल्या पणजोबाच्या पणजोबाच्या कीर्तीला कलंक लागू शकतो ना. ससोबाहुंदका देत म्हणाला.
अरे, जी गोष्ट आपणास ठाउुक नाही. त्याचा काही पुरावा नाही. सांगोवांगी पराक्रम अर्थहीन असतो. सिंह महाराजांनी डरकाळी फोडली तर आपण उडून जावू, इतका आपला जीव पिटुकला. त्यांच्या पंजांचं नख जरी लागलं तरी आपल्या शरीरातून रक्ताची धार वाहू लागेल. त्यांच्या समोर जाऊन आपण कोणता पराक्रम गाजवू शकतो. की पुन्हा तीच थाप नव्याने सांगणार. सिंह महाराजांना विहिरीवर नेणार. त्यांना त्यांचं प्रतिबिंब दाखवणार. मूर्खा, तुला जर कळू शकते की पाण्यात दिसतं ते आपलं प्रतिबिंब असतं तर सिंह महाराजांना कां कळू शकत नाही. तुझ्या पणजोबाचा पणजोबा एवढाच हुश्शार असता तर तोच नाही का या जंगलाचा राजा झाला असता. आपल्या कुटुंबात या जंगलाचा राजाच सोड आतापर्यंत एकही जण साधा शिपाईसुध्दा होऊ शकला नाही. कुणी तरी थाप दिली ठोकून नि आपण बसलो त्यातच गुंतून. असे जे गुंतून बसतात ना ते प्रगती करत नाही. समजलं.
ससोबाने मानडोलावली. पण त्याला काहीआपल्या बाबांचं म्हणनं पटलंनाही.
००००
ससोबाने आपल्यामित्रांना सध्याच्या सिंहमहाराजांना नमवण्याचा पराक्रमकरु इच्छितो असं सांगितलं. त्यांनी ससोबाच्या डोक्यातहवाच भरली. तुझ्याशिवाय कुणीहीम्हणजे कुणीही सिंह महाराजांनानमवू शकत नाही असंचकाहीसं प्रत्येकजण म्हणाला. या सर्व मित्रांनी ससोबाचाजयजयकार केला नि तेत्यास म्हणाले. शुभस्यशीघ्रम. तू उशीर कशालाकरतोस. आजच आपण जाऊया महाली. झालं. सगळेजण निघाले. वाटेतत्यांना एक गाढव भेटले. तो ससोबास म्हणाला,
ससोबा, असा कसा तू असा चालत जाणार. माझ्या पाठीवर बस नि चल एखाद्या वीराच्या थाटात. ससोबाखुष झाले. ते गाढवोबाच्यापाठीवर बसले नि निघालेसिंह महाराजांच्या महालाकडे.
महाल आल्यावरससोबा गाढवाच्या पाठीवरुनउतरले. नि सर्व मंडळीमग दरबारात पोहचली.
महाराजांनी येण्याचंकारण विचारलं
ससोबा छाती समोर करुन म्हणाला, महाराज, या वननगरीत तुमच्यापेक्षा शक्तीमान प्राणी आलाय. तो आम्ही बघितलाय. त्याला तुम्ही हाकलून लावलं पाहिजे. अन्यथा तो एके दिवशी आपणास वननगरीतून हद्दपार करेल.
ससोबा आम्हास तो प्राणी ठाऊक आहे की..महाराज म्हणाले.
काय सांगता महाराज, महाराजांचं उत्तरऐकून ससोबा चपापलाच.
होय ससोबा, तो प्राणी वननगरीतल्या त्या मोठ्या विहिरीत राहतो. रोज आम्ही भेटतो त्यास.
पण महाराज, तो तुमच्यापेक्षा शक्तिमान आहे. तो एखाद्या दिवशी आपणास हद्दपार करेल वननरीतून..असंकाहीसं त त पप करत ससोबा बोलूनगेला. आपलं काही खरंनाही. हे त्याच्या लक्षातआलं. त्याचं उसनं अवसानहीगळालं. त्याने धावत जाऊनमहाराजांचे पाय पकडले आणिक्षमा मागितली. आपलाअंतस्थ हेतू सांगितला. आपल्याबाबांचं न ऐकता फुकाचंशौर्य गाजवायला निघाल्याचंत्यानं महाराजांना सांगितलं. तो भीतीनं थरथर कापूलागला. त्याची ती अवस्थाबघून महाराज हसू लागले. ससोबाला धिर देत तेम्हणाले..
अहो ससोबा, पूर्वजांच्या अशा सर्वच कथाखऱ्या नसतात. त्यातभाकडकथा अधिक असतात. तुमचेबाबा खरं तेच म्हणाले. समजा अशा कथा खऱ्याहीअसतील तरी त्या त्याकाळात खऱ्या होत्या. काळबदलतो. परिस्थिती बदलते. आपले पूर्वज पराक्रमी होतेम्हणजे आपणही तसेच असूअसं नाही. ते जसेवागले तसेच आपणही वागायलाहवं असंही नाही ना. काळाप्रमाणे आपण बदललं पाहिजे. स्वत:च्या अंगी असलेलीशक्ती आणि बुध्दी जोखलीपाहिजे. पूर्वजांच्या कर्तृत्वावरपराक्रम गाजवता येत नाहीससोबा..सिंह महाराजांनी ससोबालासमाजावलं..
यापुढे असं मुर्खासारखं वागणार नाही अशी कबुली देऊन ससोबानं महाराजांचा निरोप घेतला.
सुरेशवांदिले