(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 सर्वांचा सन्मान करा(भाग दोन) 

लहान मोठ्या प्राण्यांचा सिंह महाराज समान सन्मान करायचे.मात्र कोल्होबा,वाघोबा,लांडगोबा अशा सारख्या दरबाऱ्यांना ते मान्य नव्हते. आपला महाराज मूर्ख असल्याची त्यांची समजूत झाली होती.त्यामुळे ते सर्व महाराजांच्या विरुध्द कटकारस्थाने करत असत. पुढे…

०००

वाघोबा, कोल्होबा, लांडगोबा, अस्वलराव यांना आश्चर्य वाटलं. वाघोबा हे आश्चर्य व्यक्त करत म्हणाले,

महाराज आपण काहीच कसं बोलला नाहीत. संकट दारात येऊन ठेपलं असताना असं शांत राहणं बरोबर नाही. कोल्होबा, लांडगोबा, अस्वलराव याचं आशयाचं बोलून गेले. त्यांनी वाघोबांची री ओढली.

महाराज आपला राग दाबून शांतपणे म्हणाले,

वाघोबा, कोल्होबा, लांडगोबा, अस्वलराव तुम्हा सर्वांचं म्हणणे मी ऐकलं आहे.त्यावर मला विचार करायला थोडा वेळ द्या. आज यावर मी विचार करतो नि उद्या सारं काही स्पष्ट करतो. चालेल ना.

वाघोबा, कोल्होबा,लांडगोबा, अस्वलराव आणि इतर दरबाऱ्यांनी होकार दर्शवला. त्यांच्या चेहऱ्यावर कुत्सित हसू पसरले.

०००

महाराजांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा दरबार भरवला. त्यांनी एका लखोट्यातून कागद बाहेर काढला. तो एक आदेश होता. सर्व दरबाऱ्यांसमोर त्यांनी एक आदेश वाचून दाखवला. या आदेशात असं नमूद होतं की, वाघोबा, कोल्होबा, लांडगोबा, अस्वलराव,रानडुकरे यांच्यासारख्या सर्व मोठ्या प्राण्यांनी उंदिर,मुंगी,माकोडे अशा सारख्या सर्वछोट्या प्राण्यांना प्रेमाणे वागणूक सर्वांनी दिली पाहिजे. त्यांचा आदर केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. त्यांचा इवलासा आकार, छोटीशी असलेली किंवा नसलेली शक्ती यांचा कधीही अपमान होणार नाही असं वागलं बोललं पाहिजे. असं जे कोणी वागणार नाहीत, मग ते कोणत्याही पदावर असतो वा शक्तीशाली असतो त्यांना राज्यातून हाकलूनदिलं जाईल.

हा आदेश वाचून दाखवल्याबरोबरच महाराजांनी दरबार बरखास्त केला नि ते अंत:पुरात निघून गेले.

०००

याआदेशाचा वाघोबांना प्रचंडराग आला. आपल्या सारख्या शक्तीशाली प्राण्यांपेक्षा आणि वननगरीच्या इतर महत्वाच्या प्राण्यांपेक्षा उंदिर, मुंग्या महाराजांना अधिकप्रिय वाटतात हे त्यांनासमजून चुकले. अशापुळचट महाराजांना वननगरीतून हाकलून लावायला हवं, असंवाघोबांना वाटू लागलं.

कोल्हा, अस्वल, लांडगा, रानडुक्करयांना विश्वासात घेऊनसिंह महाराजांना पदच्युतकरुन दूर हाकलून लावण्याची आपली इच्छाअसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यासाठी त्यांनी कोल्होबा, लांडगोबा अस्वलराव यांची मदत अपेक्षित असल्याचं सांगितलं.

कोल्होबा, लांडगोबा, अस्वलराव, रानडुक्कर यानांही महाराजांचा राग आला असला तरी त्यांनी हाकलून दिलं तर आपली स्थिती ना घरका ना घाटका अशी होईल, अशी या सर्वांना मनोमन भीती वाटत होती. ही भीती त्यांनी एकमेकांना बोलून दाखवली. त्यामुळे त्यांनी वाघोबांना सरसकट पाठिंबा काही दिला नाही.

इच्छाउत्तमच असल्याचं कोल्हा, अस्वल, लांडगा, रानडुक्करम्हणाले.

पण वाघोबा, माझी एक अट आहे, लांडोगाबा म्हणाले.

कोणती अट लांडगोबा..

वाघोबा, आधी तुम्हीसिंह महाराजांची गादीहिसकवा,आम्हा सर्वांना मोठी पदे द्या मग तुम्हाला समस्त लांडगे समुहाचा पाठिंबा राहील.

अस्वल, कोल्हा, रानडुक्करही असंच म्हणाले. वाघोबांना  भयंकरराग आला. आपलेराज्य आले की सर्वप्रथम अशा कुटील प्राण्यांचा खातमा करु असंमनात ठरवून वाघोबांनी त्यांचीबोळवण केली. आता शेजारीलगेंडाश्री महाराजांची मदतघेतली पाहिजे असं वाघोबांनावाटू लागलं.

०००

गेंडा-श्री महाराजांसोबत संधान बांधण्याचा दुष्ट हेतू घेऊन पंतप्रधान वाघोबांनी शेजारी राज्यात एकेदिवशी गुपचूपभेट दिली. आपले सिंहमहाराजकसे गुळाचा गणपती आणि साखरेचा महादेव झाले असून त्यांनामुंग्या उंदिर आवडायलालागल्याचं गेंडाश्रींनासांगितलं. गेंडाश्रींनीजर सिंहमहाराजांना हटवण्यासमदत केली तर वननगरीच्यागादीवर बसल्यावर अर्धेराज्य देऊ साप्रस्तावच त्यांनी गेंडा-श्री महाराजांपुढे ठेवला.

गेंडाश्रीयांच्यासाठी ही सुवर्णसंधी होती. एकदा का सिंहमहाराजाला हटवलेकी मग सगळेच राज्यताब्यात घेऊन या वाघोबासहाकलून लावू असा विचारकरुन गेंडाश्रींनीवाघोंबाकडे मैत्रीचा हातपुढे केला.

ठरल्याप्रमाणेएके दिवशी वाघोबा आणिगेंडाश्री यांनी वननगरीवरआक्रमण केले. वाघोबांना सर्वखाचाखोचा माहीत असल्याने तेथेट सिंह महाराजाच्या दरबारातपोहचले. महाराज त्यावेळी न्यायनिवाडादेत होते. दरबारात इतरप्राण्यांसमवेत उंदिर आणि मुंग्याहीहोत्या.

वाघोबाआणि गेंडाश्रीनेसैन्यासह दरबारात प्रवेश केला. गेंडाश्रीच्या सैन्याने सिंह महाराजांना वेढाटाकला. लांडगा, कोल्हा, अस्वल, रानडुक्कर आंनदले. या सर्व घडामोडींकडे हुषार उंदराचे बारिक लक्ष होते. प्रसंगाचं गांभीर्यत्याला चटकन कळलं. त्यानेझटदिशी गेंडाश्रीच्याडोक्यावर उडी घेतली. झटपटकचदिशी चावा घेतला. गेंडा-श्री यांना काही कळण्याचा आत टुणकनउडी मारुन तो आपल्या सहकाऱ्यांना बोलावायला बाहेर पडला. त्याचे सहकारी दरबाराच्या आसपास वेगवेगळ्या बिळात होतेच. ते पटापट बाहेर पडले. आणि काही कळण्याचा आत उंदिर टोळी गेंडाश्रीच्या सैन्याला चावू लागली. त्यांच्या चपळाईपुढे गेंडा-श्री आणि त्याचे सैन्य हैरान झाले . याचाव्याच्या वेदेनेने गेंडाश्रीआरडाओरड करु लागला.

वाघोबाचीदुष्टबुध्दी एव्हाना पिटुकल्या मुंगीच्याही लक्षात आलीचहोती. अवतीभोवती शांतपणे काम करत असणाऱ्या आपल्या टोळीला तिने इशारा केला. मुंगीटोळी वाघोबांच्या चटकन त्यांच्या शरीराव पोहचून वाघोबास इकडे तिकडे चावू लागल्या. एकाच वेळी खूप साऱ्या मुंग्या चावू लागल्याने वाघोबांना काय करावे हेच कळेनासे झाले. त्यातच  उंदराने आताआपला मोर्चा वाघोबाकडे वळवला. त्याने वाघाच्या नाकपुडीलाकरकचून चावा घेतला निमिशीचे केस ओढले. वाघवेदेनेन तळमळू लागला. उंदिरझरदिशी वाघावरुन उडीमारुन पुन्हा गेंडाश्रीवरचढून त्याला चावा घेऊलागला. उंदराच्या तीक्ष्णदातांनी गेंडाश्रीघायाळ होऊ लागला. मुंग्याआणि उंदिर आलटून पालटूनवाघोबा, गेंडाश्री त्याच्या सैनिकांवर चालूनजात राहिले.

त्यामुळेते हैरान झाले. यादोघा लहानग्या प्राण्यांनाकसं पकडायचं हे कुणालाचकळेना. पुन्हा एकदा उंदिरआणि मुंगी आपल्या मदतीलाधावून आल्याचं सिंह महाराजांच्यालक्षात आलं.

काहीक्षणगडबडून गेलेले महाराज आतासावध झाले. त्यांनी मोठीडरकाळी दिली. आपला पंजाउगारुन त्यांना वाघोबालाउचलले नि त्याला खालीआपटले. हा गोंधळ आणिउंदिर मुंग्यांच्या चाव्यानेगोंधळून गेलेल्या गेंडाश्रीलासिंहमहाराजांच्या सैन्याने पकडले.

फंदीफितुरीनेसिंह महाराजांवरील झालेलाहा हल्ला उंदिर आणिमुंग्यामुळे अयशस्वी ठरला.

यापुढेतरी कुणीही कुणाला लहानसमजू नका. प्रत्येकाचा सन्मानकरायला शिका. अशी तंबीदेऊन महाराज कोल्हेरावांकडे बघतम्हणाले बरोबर ना कोल्होबा

कोल्होबाततपप करु लागले. लांडगा,अस्वल आणि रानडुकराने महाराजांच्यापायी लोटांगण घालून त्यांचीक्षमा मागितली.

सुरेश वांदिले