
१२ वीनंतर आयआएमचा राजमार्ग (उत्तरार्ध)
(१) आयआयएम अमृतसर
या संस्थेने पाच वर्षे कालावधीचा, इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट, नव्याने सुरु केला आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर, एमबीए पदवी प्रदान केली जाते. या अभ्यासक्रमातून तिसऱ्या वर्षी बाहेर पडण्याचा पर्याय देण्यात येतो. या पर्यायाचा स्वीकार करणाऱ्या विद्यार्थ्यांना, बॅचलर ऑफ सायंस इन क्वांटिटेटिव्ह फायनांस ॲण्ड इकॉनॉमिक्स (बीएसक्यूएफइ) ही पदवी दिली जाते.
अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये- (१) वित्त आणि अर्थशास्त्रात परिणामात्मक/संख्यात्मक तंत्राच्या वापरावर, प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले जाते, (२) व्यवसाय व्यवस्थापनाच्या सर्व पैलूंचा सर्वसमावेशक परिचय करुन दिला जातो, (३) देशातील सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन गुरुंकडून विषयघटक शिकवले जातात, (४) तिसऱ्या वर्षानंतर इंटर्नशीपच्या माध्यमातून उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव मिळवून दिला जातो, (५) चौथ्या आणि पाचव्या वर्षी ड्युएल डिग्री, एमबीएचा अभ्यास करता येतो, (६) वित्त, अर्थशास्त्र आणि व्यवस्थापन या क्षेत्रांसाठी, भविष्यातील सक्षम नेतृत्व निर्मिती व्हावी, यासाठी विद्यार्थ्यांची सर्वांगीण तयारी केली जाते.
संवादकौशल्य, गणित, सांख्यिकी, संगणकीय प्रोग्रॅमिंग, विपणन, मनुष्यबळ व्यवस्थापन, कार्यान्वयन (ऑपरेशन) व्यवस्थापन या विषयांवर लक्ष केंद्रित केले जाते. सामाजिक प्रकल्प, इंटर्नशीप, संशोधन प्रकल्प यांची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते.
या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या प्रारंभिक चाळणीसाठी, आयआयएम इंदौर मार्फत घेतली जाणारी, इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट- ॲप्टिट्यूड टेस्ट (आयपीमॅट)चे गुण ग्राह्य धरले जातात. ही परीक्षा दिलेले, जे विद्यार्थी, आयआयएम अमृतसरच्या, आयपीएम अभ्यासक्रमाला अर्ज करतील, त्यांची गुणवत्ता यादी तयार करुन, निवडक विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. अंतिम गुणवत्ता यादी तयार करताना महिला उमेदवारांना ५ टक्के वेटेज दिले जाते.
अर्हता- १२ वी मध्ये गणित किंवा ॲल्पाइड मॅथेमॅटिक्स (उपयोजित गणित) या विषयांसह सरासरीने ६० टक्के गुण मिळणे आवश्यक. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारांना ५५ टक्के गुण मिळायला हवेत.
संपर्क- आयआयएम अमृतसर, मन्नावाला रोड, मन्नावाला, राख जिठा पंजाब- १४३११५, भ्रमणध्वनी- ७८१४३००५६३, ईमेल-ipmoffice@ iimamritsar.ac.in ,संकेतस्थळ-https://iimamritsar.ac.in
(२) आयआयएम सिरमौर- या संस्थेने- बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस) हा चार वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम, नव्याने सुरु केला आहे. कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी, या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र ठरतात.
या अभ्यासक्रमात, व्यवस्थापकीय शिक्षणातील मुलभूत बाबी, शिकवल्या जातात. व्यवस्थापकीय जबाबदारी सांभाळण्यासाठी आवश्यक कौशल्यनिर्मिती केली जाते. याशिवाय, उच्चशिक्षणासाठी हे विद्यार्थी सक्षम होतात. २०४७ साली विकसित भारताचे स्वप्न, साकारण्याच्या अनुषंगाने, हा अभ्यासक्रम केलेले विद्यार्थी, आपले योगदान देऊ शकतात.
सांख्यिकी, गणित, व्यवस्थापनाची तत्वे, व्यवस्थापनातील विविध कार्यकारी शाखा, अर्थशास्त्र, संवादसंप्रेषण, मानसशास्त्र, मानव्यशास्त्र, सामाजिक शास्त्रे, शास्वतता, सार्वजनिक धोरण, आदी विषयांचे सखोल ज्ञान विद्यार्थ्यांना प्रदान केले जाते. संपूर्ण सहाव्या सत्राचा कालावधी, हा आंतरराष्ट्रीय किंवा औद्योगिक इंटर्नशीपसाठी राखून ठेवला जातो. विद्यार्थ्यांना अधिकाधिक प्रात्यक्षिकांचा अनुभव मिळावा म्हणून प्रयत्न केला जातो. या अभ्यासक्रमात किमान ८ सीजीपीए मिळवलेल्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या, एमबीए अभ्यासक्रमाला थेट प्रवेशाची संधी मिळू शकते.
हा अभ्यासक्रम, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील तत्वांवर आधारित आहे. वेगवेगळ्या टप्प्यांवर या अभ्यासक्रमातून बाहेर पडण्याची सुविधा आहे. हा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी, या क्षेत्रातील उत्कृष्ट अध्यापक आणि तज्ज्ञांना बोलावले जाते. अभ्यासक्रमाच्या कालावधित, विद्यार्थ्यांना अनेक प्रकल्पांवर काम करण्याची संधी दिली जाते. वेगवेगळया सॉफ्टवेअर प्रोग्रॅमचे प्रशिक्षण दिले जाते. प्रत्यक्ष उद्योग किंवा कॉर्पोरेटमध्ये काम करण्याचा अनुभव मिळवून दिला जातो.
या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे तीन टप्पे आहेत- (१) प्रारंभिक चाळणीसाटी, आयपीमॅट (इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्ट) यापरीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात (ही परीक्षा इंदौर आयआयएम मार्फत घेतली जाते.) या परीक्षेतील गुणांना ५५ वेटेज दिले जाते, (२) आयपीमॅट गुणांवर आधारित, निवडक उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. याला २० टक्के वेटेज दिले जाते, (३) दहावी आणि बारावीतील गुणांना वेटेज (दोन्हींसाठी प्रत्येकी) – ८५ ते ९० टक्क्क्यांपेक्षा अधिक- ३ वेटेज, ८५ ते ९० टक्क्क्यांपेक्षा अधिक- ४ वेटेज, ९५ टक्के टक्क्क्यांपेक्षा अधिक- ५ वेटेज, (५) लिंग वैविध्यता (महिला आणि तृतीयलिंगी)- ५ वेटेज.
संपर्क- आयआयएम सिरमौर, धौला कौन, सिरमौर- १७३०३०, ईमेल- admission@iimsirmaur.ac.in, संकेतस्थळ-https://www.iimsirmaur.ac.in
(३) आयआयएम बोधगया –
या संस्थेने २०२१ सालापासून इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट (बीबीए+ एमबीए) अभ्यासक्रम सुरु केला. विद्यार्थ्यांना तीन वर्षानंतर अभ्यासक्रमातून बाहेर पडता येते. अशा विद्यार्थ्यांना बीबीए (बॅचलर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन) ही पदवी प्रदान केली जाते.
अर्हता – १० वी आणि १२ वीमध्ये किमान ६० टक्के गुण आवश्यक. राखीव संवर्गासाठी ५५ टक्के गुण.
या अभ्यासक्रमाचा मुख्य उद्देश, विद्यार्थ्यांना प्रारंभापासूनच उद्योजकीय नेतृत्व स्वीकारण्यासाठी सर्वांगीणदृष्ट्या तयार करणे, हा आहे. जागतिक पातळीवरील आधुनिक व्यवस्थापकीय संकल्पना, पध्दती आणि प्रकियेचे सखोल ज्ञान प्रदान केले जाते. वैशिष्ट्यपूर्ण विषयघटकांमुळे, हा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये, विश्लेषणात्मक तंत्राचा वापर करुन, कोणत्याही समस्या निर्धारणाचे, कौशल्य निमाण होणे अपेक्षित आहे.
संपर्क – आयआयएम बोधगया, उरुवेला प्रबंधविहार, गया- ८२४२३४, संकेतस्थळ- https://iimbg.ac.in/programs/ipm/, ईमेल -director_office@iimbg.ac.in
(४) आयआयएम जम्मू
या संस्थेने, इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट (बीबीए+ एमबीए) हा अभ्यासक्रम दोन वर्षांपूर्वी सुरु केला. अर्हता – १० वी आणि १२ वीमध्ये किमान ६० टक्के गुण आवश्यक. राखीव संवर्गासाठी ५५ टक्के गुण. या अभ्यासक्रमात विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित यांच्यासोबत व्यवस्थापन शाखेचे एकत्रिकरण केले जाते. कोणत्याही टप्प्यावर हा अभ्यासक्रम सोडणाऱ्या विद्यार्थ्यांना करिअर करता येणे शक्य व्हावे, यासाठी, अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे. या अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांचे, मौखिक आणि लेखी संवाद कौशल्य क्षमता वाढते, त्यांना जागतिक दृष्टिकोनाचे भान येते, वेगळया पध्दतीची विचारशैली आणि समस्या निर्धारणाचे कौशल्य प्राप्त होते. नैतिक आणि सामाजिक भान असणाऱ्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. तीन वर्षानंतर हा अभ्यासक्रम सोडणाऱ्या विद्यार्थ्यांना बीबीए पदवी प्रदान केली जाते.
संपर्क- आयआयएम जम्मू, जागती, जम्मू १८१२२१, संकेतस्थळ- https://www.iimj.ac.in, ईमेल- : info@iimj.ac.in
निवड प्रकिया
बोधगया आाणि जम्मू येथील, आयआयएम, मधील पाच वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी, “जिपमॅट- जॉईंट इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट ॲडमिशन टेस्ट”, परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा, नॅशनल टेस्टिंग एजंसीव्दारे घेतली जाते. परीक्षेचा कालावधी अडीच तास. ही संगणकाधारित (कॉम्पुटर बेस्ड) परीक्षा आहे. या परीक्षेमध्ये, क्वाँटिटेव्ह ॲप्टिट्यूड (संख्यात्मक कल), डाटा इंटरप्रिटेशन (माहिती विश्लेषण), व्हर्बल ॲबिलिटी (भाषा क्षमता) हे तीन भाग असतात. बहुपर्यायी वस्तुनिष्ट पध्दतीचे, १०० प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाच्या अचुक उत्तराला, चार गुण दिले जातात. उत्तर चुकल्यास एक गुण कपात केला जातो. पेपरचा कालावधी अडीचा तास.
चाळणी परीक्षेतील गुण, उमेदवारांच्या प्रारंभिक निवडीसाठी (शॉर्टलिस्टिंग) उपयोग आणले जातात. त्यानंतर प्रत्येक आयआयएम, अंतिम निवडीसाठी वेगवेगळया बाबींचा अंगिकार करतात. यामध्ये मुलाखत, व्यक्तीमत्व चाचणी, लेखनकौशल्य क्षमता, यांचा समावेश असतो. १० वी १२ वीमधील शैक्षणिक कामगिरीसाठी काही वेटेज ठेवले जाते.
०००
आयआयएम रोहतक
या आयआयएम मधील, प्रवेशाची अंतिम निवड यादी, आयपीमॅटमधील गुण, शैक्षणिक कामगिरी आणि मुलाखतीचे गुण यावर केली जाते. आयपीमॅट गुणांना ५५ टक्के वेटेज, मुलाखतीला १५ टक्के वेटेज, दहावितील गुणांना १० टक्के वेटेज, बारावितील गुणांना २० टक्के वेटेज दिले जाते. अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याला १० वी आणि १२ वीमध्ये किमान ६० टक्के गुण मिळणे आवश्यक. राखीव संवर्गासाठी ५५ टक्के गुण. तीन वर्षानंतर, अभ्यासक्रम सोडणाऱ्या विद्यार्थ्यांना, बीबीए पदवी प्रदान केली जाते.
संपर्क- मॅनेजमेंट सिटी, एनएच- १०, सदर्न बायबास, सुनारिआ, रोहतक- १२४०१०, संकेतस्थळ- https://www.iimrohtak.ac.in/ipm-admission.php, ईमेल-admin@ www.iimrohtak.ac.in
सुरेश वांदले