25 तासाचे वरदान
नवं वर्षं आलं सुध्दा. नवं वर्षं प्रत्येकांसाठी एक नवी संधी घेऊन येते. मागील वर्षाचं आपण किंचितसं सिंहावलोकन केलं तरीआपल्या लक्षात ही बाब लक्षात येईल. ज्यांना संधी मिळाली आणि ज्यांनी या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन आपली गुणवत्ताआणि दर्जा वाढवला, त्यांनी स्वत:चं मन:पूर्वक अभिनंदन करायला हवं. स्वत:चं कौतुक करायला हवं. स्वत:ला एक छानशीपार्टीही द्यायला हरकत नाही. हे सारं स्वत:ला प्रोत्साहन देण्यासाठी व आपली उर्जापातळी कायम ठेऊन नव्या वर्षात पुढच्याटप्प्यावर नेण्यासाठी आवश्यक ठरतं.
मात्र,ज्यांना असं वाटतं की, अरे यार, गेल्या वर्षी आपल्याला कुठे संधी मिळाली, किंवा काहीतरी वेगळं नवं करायला वेळकुठे मिळाला. सगळं वर्षं गेलं ते धावपळीत आणि कार्यालयीन कामकाज करण्यात. त्यामुळे जे ठरवलं ते करता आलं नाही. जे करायला घेतलं त्यात पहिल्या काही दिवसानंतर खंड पडला. सिंहावलोकन केलं तर काय आढळतं की गेल्यावर्षीच्यागेल्यावर्षी जिथं होतो तिथेच यंदा होतो.
ओ.के.नो प्रॉब्लेम. तुम्ही जिथे होतात तिथेच होतात किंवा आणखी दोन पावलं मागं गेलात, त्याचं वाईट निश्चितचवाटायला हवं. कारण आपल्या आयुष्यातून हा काळ या सतत प्रसरणशील असलेल्या व आदी आणि अंत नसलेल्याअंतराळात कायमस्वरुपी अंतर्धान पावला आहे. त्यामुळे त्याबद्दलची काळजी, चिंता किंवा हळहळ वाटून शून्य उपयोग. जेझालं ते झालं. आता परत एकदा नवी संधी नव्या वर्षात आलीय.
इच्छा आणि मन:शक्ती
तुम्ही ठरवलेल्या किंवा ठरवू इच्छिणाऱ्या अनेक गोष्टी तुम्ही यावर्षात करु शकता. तशी तुमची इच्छा हवी आणि त्याइच्छेला मूर्तरुप देण्यासाठी मन:शक्ती हवी. या दोन्ही गोष्टी आपल्यापैकी प्रत्येकाकडे असतेच असते.
आपल्यापैकी बहुतेकांना आजकाल असं वाटायला लागलाय की वेळ अपुरा पडू लागलाय किंवा 24 तासांच्या ऐवजीआपणास 25 तास मिळाले तर काय बहार होईल. काही व्यक्ती एकाच वेळी ते इतक्या गोष्टी लिलया करत असतात कीत्यांच्याकडे 25 चतास काय 35 तास सेवेशी हजर आहेत असं वाटावं. हे त्यांना जसं शक्य आहे की आपणास होऊ शकतनाही का? नक्की शक्य आहे हे.
व्हॉटस ॲप ते फेसबूक लॉक करु या–
ही दोन्ही समाजमाध्यमे सध्या आपल्या जीवनाचा अविभाज्य झाली आहेत. त्यातही व्हॉटस ॲप तर डिअर जिंदगी बनलय. एकमेकांशी तत्काळ संपर्कासाठी व्हॉटस ॲप मोठीच भूमिका बजावतोय. त्यामुळेच कदाचित आपली त्यातली भावनिकगुंतवणूक वाढत चाललीय. इतकी की अनेकजणांना सुपारी-पान-खर्रा यांची सवय लागते नि ती जशी सुटता सुटत नाही. तशीसवय व्हॉटस ॲपची लागलीय. एखादी सवय आपणास कधी गुलाम करेल हे आपणासही कळत नाही. तसं होण्याच्याटप्प्यावर बहुतेकजण पोहचले आहेत. काहीजण नजिकच्या काळात पोहचतील. एका कृत्रिम आणि आभासी जगाचं आपणभाग बनलो आहोत. त्यामुळे आपण स्वत:पासून आणि स्वत:च्या कुटुंबापासून तुटत चाललोय हे किती जणांच्या लक्षातआलय. आपणास बरेचदा व्यायाम करण्यासाठी अर्धातास सुध्दा वेळ मिळत नाही असं वाटतं. आता तुम्हीच विचार करा, तुम्हीप्रत्येक दिवशी व्हॉटस् ॲपचे संदेश बघणं, त्याला लाईक करणं किंवा एखादी चित्रविचित्र इमोजी पाठवणं किंवा संदेश वाफोटो शेअर करणं किंवा काहीतरी संदेश लिहून पुढे पाठवणं यात किती वेळ घालवतो. हा वेळ घरी घालवतो. कार्यालयातघालवतो. प्रवासात घालवतो. सकाळी उठल्याबरोबर बरेचजण बाथरुमच्या ऐवजी व्हाटस्ॲपकडे धाव घेतात. कुणाकडूनकोणत्या फुलाची करंडी आलीय किंवा सकारात्मक विचार देणाऱ्या पाट्या आल्या हे बघतो. यावर वेळ घालवून आपलीनिर्मितीक्षता आणि कार्यक्षमता किती कमी करतो हे तुमच्या लक्षात आलय का?
आभासी चावडी
फेसबूकने तर प्रत्येकाला आपणास कधी व्यक्त होतो, कधी आपला नवा फोटो शेअर करतो, कधी कुठे गेलो होतो याचीमाहिती देतो, असं वाटत राहतं. फेसबुकचे जे काही फायदे असतील ते असतील. पण अभ्यासकांच्या असं लक्षात येतय की , लोक फेसबूकवर एकमेकांच्या पोस्ट बघून तुलना करायला लागले आहेत.
कोणत्याही प्रकारची तुलना ही नकारात्मक असते. आत्मविश्वास घालवणारी असते. फेसबुकवरच्या तुमच्या पोस्टला चटकनलाईक मिळाले नाहीत किंवा लाईक्सची संख्या तुमच्या अपेक्षापेक्षा कमी असली तरी तुम्हास वाईट वाटतं. हे असं वाईटवाटणं हे एका वेगळ्याप्रकारच्या सिंड्रोम किंवा समस्येला जन्मास घालू शकते. काही अभ्यासकांच्या निरीक्षणानुसार यासमस्येचा जन्म झालाय. आता ही समस्या रांगून उभी राहण्यासाठी धडपडतेय.
फेसबूकने मित्र मिळतात असं समजलं जातं. त्याचं स्वत:चं एक मोठ जगच निर्माण झालयं. या अशा जगाची निर्मितीम्हणजे आपली वाढलेली लोकप्रियता, असं सुध्दा बऱ्याच जणांना वाटू लागलय. आभासी जगातील ही लोकप्रियता कायकामाची? फेसबूकवरील तुमचे 500 मित्र तुमच्या कामाला येणार की तुमच्या सुखदु:खात सामील होणार? या आभासीचावडीवरच्या मित्रांकडे आपल्या भावना व्यक्त करुन आपल्या समस्या, दु:ख कमी होणार आहेत की या दु:खाची किंवासमस्येची तीव्रता कमी होणार आहे? आपणास वास्तवातले चार जीवभावाचे मित्र असले तरी पुरे आहेत. हे चार मित्रएकमेकांसाठी सपोर्ट सिस्टिम ठरु शकतात. सध्या त्याची अधिक गरज आहे. आभासी चावडीवर येणाऱ्या पाचशे लाईक्सचीनाही.
आधुनिक माध्यमांचा उपयोग आपल्या हितासाठी आपली गुणवत्ता आणि दर्जा वाढवण्यासाठी निश्चितच करायला हवा. पण, हीच माध्यमे आपला बहुमूल्य वेळच पळवत असतील, चोरत असतील तर त्यांना सोनं चिटकवलं तरी काय उपयोग ?
मोठ्या माणसांचे इतके लाख फालोअर्स आहेत किंवा अमूकतमूक सिलेब्रिटी इतक्या जणांना फालो करतो] अशामाहितीचा मारा आपणावर सतत होत असतो. ही श्रेष्ठमंडळी त्यांच्या व्यस्ततेतूनही व्हॉटस् ॲप ते फेसबूक/व्टिटरसारख्यासमाजमाध्यमांमध्ये वावरतात. मग आपण वावरलो किंवा त्यासाठी वेळ दिला तर बिघडलं कुठं? पण वस्तुस्थिती तशी नाही. जवळपास सर्वच मोठ्या सिलेब्रिटी किंवा ज्यांची समाजात मोठी नावं आहेत, त्या मंडळीचं व्हॉटस् ॲप किंवा फेसबूक सारखीमाध्यमे दैनंदिन अपडेट करण्यासाठी तांत्रिक अंगांची माहिती असलेली एक टीम असते. आपल्या बॉसच्या निर्देशानुसार हीमंडळी समाजमाध्यमांचा वापर करत असतात. समाजमाध्यम हाताळण्यासाठी, अगदी अमिताभ बच्चन सुध्दा यांचीही एकटीम आहे. ते स्वत:ही बऱ्यापैकी यामाध्यमांवर सक्रीय असतात. पण त्याचबरोबर पाहटे चार वाचता उठून व्यायामही करतात. याचा अर्थ ते विशिष्ट असाच वेळ समाजमाध्यमांसाठी देतात नि उर्वरित वेळेचा उपयोग ते इतर गोष्टी करण्यासाठी करतात.
यंदा आपणास 25 तास मिळवायचे असतील तर समाजमाध्यमांचा किमान आणि गरजेपुरताच वापर करण्याची नवीसवय अंगी बाणवावी लागेल. अशा अनेक गोष्टींपासून नव्यावर्षात सहजरीत्या सुटका करुन घेऊ शकतो. हे केलं की वेळनाही,अशी जी आपली तक्रार असते ती सुध्दा नाहीशी होऊ शकते. ही तक्रार नाहीशी झाली तर आपणास जे छंद जोपासायचेआहेत, जी पुस्तकं वाचायची आहेत, भ्रमंती करायची आहे. नातेवाईंकासमवेत क्वालिटी टाइम घालवायाचा आहे, कार्यायलाचं काम आणखी गतिने आणि दर्जेदारपणे करावयाचे आहे. ते साध्य होण्यास काहीच प्रत्यय राहणार नाही.
गेल्यावर्षी हे शक्य नसेल झालं, पण यंदा तर ते शक्य आहे ना. त्यासाठी काही उद्दिष्ट ठरवा नि ते पूर्ण करणारचअसा निर्धार दररोज करा. तुम्हाला नक्किच 25 तासाचे वरदान मिळेल बघा..