आयआयटी बाबश्रींचा उदयास्त
बाबा, बाबा मी आधुनिक पध्दतीनं कृषीआधारित उद्योग करण्याचा संकल्प केलाय, मोरुने घरी घोषणा केली आणित्याच्या घरी जल्लोष सुरु झाला. मोरुने त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच शहाणपणाचं प्रदर्शन केलं होतं. त्यामुळे, पार्टी तोबनती है बॉस असं भूतनाथ अमिताभजींच्या आवाजातलं रॅप-फॅप गाणं म्हणत त्याच्या बाबाने जंगी पार्टी देण्याची घोषणाकेली. (कधी ते मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवलं. काही काही गोष्टीचं रहस्य कायम ठेवलं, की रहस्याची गोडी चौपट वाढतजाते असं त्यांनी जेम्स हेडली चेसच्या चोविसाव्या पुस्तकात वाचलं होतं.)
आता तुम्ही म्हणाल मोरुच्या संकल्पामध्ये जंगीपार्टीचा कण सुध्दा दडलेला नाही. मोरु काही एव्हरेष्टवर जाऊन किंवादक्षिण ध्रुवावर जाऊन किंवा मंगळावर जाऊन कृषिआधारित उद्योग सुरु करणार नव्हता. शिवाय तो काही जगातील पहिलाव्यक्तीही नव्हता, असा उद्योग करण्याची इच्छा बाळगणारा.
मोरुच्या वडिलांकडे जास्तिचा पैसा आला की काय? ते पीडब्ल्यूडीत आहेत की इरिगेशन मध्ये, असही आपणास वाटूशकतं. पहिली शंका वास्तवाला धरुन असेलही. पण मोरुच्या वडिलांची नोकरी पीडब्ल्यूडीत असो किंवा इरिगेशन, त्याचाइथे बादरायण संबंध जोडण्याचं काय कारण ? असले बादरायण संबंध जोडणाऱ्या व्यक्ती अतृप्त इच्छांचे धनी असतात, यावरच प्रल्हाद केशव अत्रे यांचे संशोधन प्रसिध्द आहेच की. (हे अत्रे सासवडचे नव्हे हो. हे धानोऱ्याचे. आपल्या गडचिरोलीजिल्हयातला तालुका बरं. शिवाय आम्ही खात्री करुन घेतलीय की हे अत्रे सॅनहोजे मधील सुध्दा नव्हेतच.)
मोरुच्या बाबांच्या नोकरीधंद्याच्या विषय निघालाच आहे तर ते इथं स्पष्ट करणं आवश्यक की ते ट्युशन क्लासचा धंदाकरतात. सॉरी सॉरी ट्युशन सारख्या पवित्र व्यवसायाचं वर्णन धंदा म्हणून करणं योग्य नव्हेच. मोरुचे बाबा हे ट्युशन क्लासचेडायरेक्टर आहेत. या ट्युशन क्लासची स्थापना त्यांनीच केली होती. आता तुम्हीच ठरवा त्यांना पीडब्ल्यूडी आणि इरिगेशनचीनोकरी करण्याची काय आवश्यकता? आता पटलय ना ,बादरायण संबंध जोडणं म्हणजे अतृप्त इच्छेचं धनी असणं, याप्रल्हाद केशव अत्रे यांच्या, संशोधनाचा खरा अर्थ.
ट्युशन क्लासचे चालक-मालक-संचालक असल्यानं मोरुच्या बाबांवर लक्ष्मीदेवींना प्रसन्न होण्यासाठी फार कष्ट घ्यावेलागले नाहीत. शिवाय ते तिरुपतींचे भक्तशिरोमणी. दरवर्षी त्याच्यासाठी केशवपन करणारे. म्हणजे इकडून श्रींचा वरदहस्तआणि तिकडून देवींचा आशीर्वाद. घर कसं धनधान्यानं भरुन गेलेलं. त्यामुळे पार्टी तो बनती है बॉस, असं मोरुच्या बाबांचंसांगणं अजिबातच बकवास नव्हतं. टायगर वूड हा त्यांचा जावई नसतानाही,तो जिंकला तेव्हा त्यांनी घोषणा न करताच पार्टीदेऊन टाकली होती. मोरु तर त्यांचा सख्खा मुलगाच होता. त्याच्यासाठी ते कबूल केल्याप्रमाणे कधीतरी पार्टी देतीलच ना. अच्छे दिन येणाच्या कल्पनेवर आपण विश्वास ठेवलाच की नाही. तसाच हा ही विश्वास ठेवायलाच हवा.
000
2
मोरुच्या बाबांना मोरुचा कृषिआधारित उद्योग करण्याचा संकल्प हा राहूल द्रवीडच्या, मी मोठं
झाल्यावर क्रिकेटपटूच होणार या संकल्पापेक्षा किवा शाहरुख खानची लेक सुहाना खान यांच्या मी हिरोईन होणारच यासंकल्पापेक्षा कितीतरी अधिक श्रेष्ठ दर्जाचा वाटला.
मुकेशभाई अंबाणी यांच्या चिंरजीवानं ,माझा संकल्प हा तेल उत्पादन करणाऱ्या एका आखाती राष्ट्राची निर्मिती करण्याचाअसल्याचं जाहीर केल्यावर मुकेशभाई आनंदाने नाचलेच असते किंवा त्यांनी नाचल्यासारखं तरी केलं असतं. कारण कावेरीखोऱ्यातच खनिजतेल शोधण्यापर्यंतच त्यांची स्वत:ची मजल गेली होती. पण लेकराचा संकल्प मात्र तेलनिर्मिती करणाऱ्याआखाती राष्ट्राची निर्मिती करण्याचा. सोचो तो कुछ बडा, असं ग्रँडपा धिरुभाईंचं सुकथन सुप्रसिध्दच आहे. या कथनाकडेआपण आणि कनिष्ठ बंधुनी फार गांभीर्यानं बघितलं नाही. पण आजोबांचं कथन वास्तवात आणण्यासाठी लेकरु संकल्पकरतोय याचा मुकेशभाईंना एक बाप म्हणून अत्यानंद झालाच असता. तसच मोरुच्याही बाबांचंही झालं. त्यांची उडी ट्युशनक्लास काढण्यापूर्तीच मर्यादित राहिली. पण मोरु मात्र उद्योग स्थापनेवर हायजंप करुन बसला. कोणत्याही वडिलांना याचाअभिमानच वाटला असता.
000
3
कृषिआधारित उद्योग स्थापन्याच्या मोरुच्या उत्साहाने पुढच्या काही दिवसात जेट विमानाचा वेग पकडला.पण मोरुच्याबाबांचे पाय मात्र हलकेच जमिनीवर आले. फुकाचे संकल्प आणि पाऊस न पाडणारा ढग हे दोन्ही सारखेच. हे त्यांनाचांगलच ठाऊक होतं. त्यांनी एकेदिवशी अचूक क्षण पकडत मोरुला जमिनीवर आणण्याचा डाव साधला. पण मोरुचं उंचउडालेलं विमान पंक्चर होण्याचं कोणतंही चिन्ह नव्हतं.
डोण्ट वरी बाबा, सब हो जाएगा. ज्याच्या पाठिशी बाबाजी त्याला चिंता कशाची. सोड्याची बॉटल फोडल्यावरफुस्सकन करत फेस जसा बाहेर येतो ना,तसा तो फुसफुसत म्हणाला.
आयजीच्या जीवावर बायजी करु नकोस म्हणजे झालं.
बाबा, मी बाबाजी म्हणालो बायजी नाही.
बाबाजी काय नि बायजी काय,सारखच.
अहो बाबा, सलमान खान म्हणजेच अक्षय कुमार असं म्हंटलं तर चालेल का..
अरे तू वेड पांघरुन पेडगावला कां चाललास ..
बाबा, वेडे होंगे मेरे दुष्मन..
म्हणजे मी तुला मी वेडा आणि दुष्मनही वाटतो की काय..
अहो बाबा, तुमचं चाललय तरी काय? मला जायचय चीनला आणि तुम्ही समजता श्रीलंकेला.
म्हणजे तसं नाहीय का..
नाही हो बाबा, समजून घ्या ना.
काय समजू मी..
अहो तुम्ही समजता, बाबाजी म्हणजे तुम्ही..होय ना..
करेक्ट..तुला दुसरा बाबाजीपण आहे की काय..आईनं कसं काय लपवून ठेवलय हे रहस्य..
अहो बाबा, तुम्ही आता श्रीलंका सोडून इराकमध्ये घुसता आहात हं. हे असच चालवत ठेवलत तर मी इस्लामाबादेतनिघून जाईन.मग बोंबलत बसा टँव टँव टँव असं. या अल्ला,या खुदा,या गधा करत.
अरे तुझ्या जिभेला काही हाड बिड..
अहो बाबा, आता मी डायरेक्ट मुद्यावर येतोच. मी काही तुमच्या बायकोच्या, तुमच्या मनी आलेल्या दुसऱ्या नवऱ्याचापोरगा नाही. तिला बिचारीला तुम्हीच एकमेव नवरा आहात. मी तुमचाच पोरगा आहे. डीएनए टेस्ट करुन टाका, तुमची निमाझी..
अरे मग हा बाबाजी कोण?
आता कसे तुम्ही बांद्रा इस्ट मधून बांद्रा वेस्ट कडे बरोबर निघालात हं.
मुद्यावर ये गधड्या,हे बाबाजी कोण?
माझे गुरु आहेत. पिंपळाच्या झाडावर राहतात.
म्हणजे भूत..
म्हणा तसं..
हे बाबाजी भूत तुझ्या पाठिशी आहे,म्हणून तुला चिंता नाही असं वाटतं?
तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला बाबाजी समजून मी तुमच्याकडून माझ्या कृषीउद्योगासाठी पैसा उकळणार..
तसच काही नाही काही.
म्हणजे तसच आहे बाबा..पण आय डोण्ट वान्ट यूवर हेल्प वेल्प टू स्टार्ट ऍ़ग्रीइंडस्ट्री..
मग तुला रतन टाटा की आदित्य बिर्लाने दत्तक घेतले की काय?
अहो बाबा,बाष्कळ पीजे आणि शिळी कढी एकसारखेच असतात, समजलं..
हो का, मग तू कृषीआधारित उद्योग स्थापन करणार तो कोणता करणार, कसा करणार हे सुध्दा सांग की.
असं विचाराना बाबा. अहो मी सारं काही सांगतो. माझं विमान खाली आणायचच नाही असा निर्धार केलाय मी..
वावा, मग सांगा की तुम्ही तुमचा निर्धार कसा पूर्ण करणार आहात ते..
000
4
मोरुने त्यानंतर बाबांसमोर त्याच्या संकल्पित कृषीआधारित उद्योगाचे जे सादरीकरण केले ते ऐकून हा आपलाच कापोरगा, अशी शंका त्यांना किमान पंचेवीस वेळा तरी आली. पण ही शंका घेणं म्हणजे स्वत:च्या पुरषार्थावर आणिबायकोच्या पावित्र्यावर शंका घेण्यासारखं होतं. दोन्ही बाबी असत्य असल्यानं त्यांनी हा विचार मनातून बाहेर काढला. आपलामुलगा नक्कीच आइनस्टाइनचा खूप खूप दूरदूरच्या नात्यातला असलाच पाहिजे याची मात्र खात्री पटून त्यांना हायसं वाटलंआणि अभिमानही वाटला. अगदी आइनस्टाइनला त्यांच्या सख्ख्या मुलाचा वाटला असता तसा.
हे झालं थोडसं विषयांतर..
मुद्दा होता की बाबांना मोरु हा आइनस्टाइनचा दूरचा कां होईना नातेवाईक वाटला. मोरुच्या सादरीकरणाच्याकृषीआधारित उद्योगात मोठं रहस्य दडल होतं.
त्या रहस्याची व्याप्ती इतकी मोठी राहू शकते याची पुसटीशीही कल्पना देवाधीदेव त्रिकालदर्शी इंद्रसेन महाराजही करुशकले नसते. खरं तर भारताच्या राष्ट्रपतींनाही ही कल्पना सूचली नसती. सर्वश्रेष्ठ संकल्पनाकार भरत दाभोळकर आणि पियूषपांडे यांना पाच पंचेवीस जन्मातही अशी कल्पना सुचली नसती.
काय होतं या रहस्याच्या अंतरंगात दडलेलं?
000
5
मोरुला कृषीआधारित उद्योग करावयाचा होता, तो भारतीय आईच्या ह्रदयाला झंकारणारा आणि भारतीय बाबांच्यास्वप्नांना पंख लावणारा होता.
कारण, प्रत्येक भारतीय आई आणि बाबांस आपण आपल्या मुलाला जन्म दिला तो केवळ त्यास आयआयटी म्हणजेइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून इंजिनीअर होण्यासाठीच,अशी एकमेव खात्री असते. या खात्रीला खात्रीशिरकरण्यासाठी ते वाट्टेल ते करायला एका पायावर आणि एका कोऱ्या चेकवर तयार असतात. पूर्वी दहावी झालं की मुलासआयआयटी प्रवेश परीक्षा कोचिंग क्लासकडे ते धावत सुटत. आता आठवितच सुटतात. खरंतर अनेक पालकांना पहिल्यावर्गाचं नामकरण आठवीच कां करत नाही असं सुध्दा वाटू लागलय. म्हणजेच आयआयटीचं कोचिंग पहिल्याच वर्गापासून. जितकी तयारी लहानपासून तितकीच यशाची शक्यता अधिक असं नाही का सानिया मिर्झानं सांगून ठेवलय.तिचं सांगणं सिरआँखो पर.
नेमकं इथेच मोरुला कृषीआधारित उद्योगाच्या महाप्रचंड क्षमतेचा साक्षात्कार झाला.
000
6
त्यानंतर बाबा आणि मोरुमध्ये साक्षत्कारी संवाद घडला तो असा..
मोरुनं संवादाच्या प्रारंभी थेट सवाल केला , बाबा,जसं अमूल ,गोकूळ, हल्दीराम मिल्क असतं तसं आयआयटीमिल्क नाही का राहू शकणार?
सारं काही राहू शकतं लेकरा. कल्पनेची पतंग समुद्रातही उडू शकते आणि हत्ती ढगावर बसून मुंगीसोबत बॉलिवूड डान्स करुशकतात. कल्पनाच ती. अरे, या कल्पनेच्या गाढवावर बसून तू कैतरिना कैफशी लग्नही करु शकतो. कल्पना थोडचंकांद्यासारखी महाग आहे.बाबा संवादाला गती देत म्हणाले.
बाबा, कल्पनेत तुम्ही सुध्दा मेनका नावाच्या अप्सरासोबत रोमान्स करु शकता हो. पण मी कल्पनेत नाही. मी वास्तवातआहे.
ते कसं..
बाबा अहो, माझं सांगणं तुम्हास थोतांड वाटतय याची जाणीव असली तरी मला हे पक्क ठाऊकाय की आयआयटीमिल्क देणाऱ्या गायीची निर्मिती करता येणं शक्य आहे. मोरु ठामपणे म्हणाला.
वेड्या दुधाची अशी प्रतवारी करता येत नाही. डोकं फिरलय तुझं.
बाबा, मी करुन दाखवतो ना. गायीला आपण आयआयटी फूड मटेरिएल्स द्यायचं.
म्हणजे काय, बाबा डोळ विस्फारत विचारते
झाले.
अहो बाबा, कोटा आयआटी कोचिंग संस्थांचे सगळे स्टडी मटेरिएल्स मी आणणार. त्याचा सुक्ष्म लगदा करुन त्यात योग्यप्रमाणात बदाम , व्हिटॅमिन्स आणि प्रोटिन्सयुक्त हिरवं गवत टाकणार. या सर्वांची एकत्र प्रक्रिया करुन ते हे स्पेशलाइज्डआयआयटी फूड मटेरिएल गायिंना देणार..आता मला सांगा अशा गायी जे दूध देतील ते आयआयटी इनपूटसह असेल कीनाही. जी मुलं राइट फ्रॉम द डे वन हे आयआयटी मिल्क प्यायला लागतील त्यांचा पहिला स्वर आई ऐवजी आयआयटी असाराहील. आयआयटी इनपूटसह या दुधाचं नित्यप्राशन करणाऱ्या बालकाच्या नसानसात आयआयटी रक्त धावू लागेल. मेंदुमध्ये आयआयटी शिवाय कोणतेच विचार येणार नाहीत. पहिल्या वर्षाचा होता-होता जरी या बालकास आयआयटीच्याप्रवेश परीक्षेला बसवलं तरी ते मुलं फ्लाईंग कलरने उत्तीर्ण होणार आणि थेट पाहिजे त्या ब्रँच मध्येच. कसा आहे प्लॅन बाबा.
000
7
बाबांना सूचेना की मोरुच्या प्लॅनला वाव म्हणावं की टाव म्हणून वाकुल्या दाखवाव्या. ही कल्पना म्हणजे वेडाचा बाजारहोती. पण वेडी माणसंच मोठं शिल्प घडवू शकतात अशा शेडचं वाक्य पंचेवीसवेळा शेक्सपिअरनं लिहून ठेवलं होतं. कोकाकोल्याच्या निर्मात्यानं ते वाक्य वाचलं त्यातूनच त्याला कोकाकोलाची प्रेरणा मिळाली नाही का? बाबांना नेमक्याक्षणी ही बाब आठवून त्यांनी स्वत:लाच सवाल केला.
आता त्यांच्यापुढे दुसरा सवाल असा होता की हसावं की रडावं. हसलं तर प्रेरेणचं फुस्स व्हायचं आणि रडलं तर प्रेरणाकुस्करुन जायची. बालक मानसशास्त्रात हे काही बसत नव्हतं. त्यांच्या सारख्या ट्युटरनं म्हणजे हाडाच्या शिक्षकानं असंवागणं शोभादायक ठरणारं नव्हतं. उलट चारचौघात उगाचीच शोभा वाढवणारं ठरलं असतं. म्हणजे म्हंटल तर इकडे मुर्खपणाआणि तिकडे वेडेपणा. करायचं तर काय करायचं, अशा वेळी शहण्यासुरत्या माणसांनी. बाबा स्वत:शीच संवाद करते झाले.
अहो बाबा, असे स्वत:शीच संवाद करत बसू नका. त्यासाठी व्टीटर पुरेसा आहे. पटलं तर हो म्हणाना. नाही तर आहेतचकी बाबाजी.
तसं नाही मोरु..
अहो बाबा, बूस्टचा शोध जेव्हा ज्या मुलाने लावला तेव्हासुध्दा त्याच्या वडिलांना असाच प्रश्न पडला होता की,बुस्टकसं काय एनर्जीचं सिक्रेट होऊ शकतं. पण झालंच ना ते पुढे.अगदी आपला कपिलदेवही म्हणू लागला, बूस्ट ही मेरे उर्जाका रहस्य है. म्हणजे बघा, तो सक्सेसफूल झाला कारण त्याच्या आईनं त्याला तो पहिल्या दिवसाचा झाला तेव्हा बुस्टदिलं,म्हणूनच की नाही. मग सानिया महिवालही तसच म्हणाली. और तो और मराठी प्राध्यापकाच्या घरचा मराठी वीर सचिनतेंडुलकरही किरट्या इंग्रजित म्हणाला बूस्ट (च) इज सिक्रेट ऑफ माय एनर्जी.
मोरुचा मुद्या अगदीच टाकावू नव्हता. बूस्ट मध्ये जर ही शक्ती निर्माण होऊ शकते तर आयआयटी मिल्क मध्ये कां नाहीहोऊ शकणार? त्यानींच स्वत:ला प्रश्न केला.
बाबा आता प्रश्न नकोतच. ते आले की फाटे फुटतात. आता कृतीच करु आपण.
म्हणजे काय करु..
अहो आपण आयआयटी स्पेशल इकॉनॉमिक
झोनसाठी हजार एकरभर जमीन संपादित करु.
हजार एकर..मोठा आ वासून बाबा म्हणाले. जमीन झाडाला लागत नाही रे मोरु.
ते मलाही माहीत आहे हो बाबा. खर्च करुन टाकू शंभरेक कोटी खर्च.
बँकेवर दरोडा टाकावा लागेल त्यासाठी?
ते कशाला? तुमच्याकडे असतीलच की..ते बँकेत जिरवण्यापेक्षा जमिनित जिरवू या नं. शंभराचे एक हजार कसे होतील हेतुम्हाला कळणार सुध्दा नाही.
कळलं हो सारं कळलं .. तुझ्या बौध्दिकपातळीची उंची आणि खोली कळली.
मग काढा चेक आणि लिहा आकडा..घेऊन टाकू आजच जमीन, विकत आणू कोटा कोचिंग मटेरिएल्स आणि सुरु करुप्रक्रिया उद्योगाला.
इतक सोपं वाटलं ते..
मग, अहो बाबा, 10 हजार गायी आपणास देण्यासाठी गौरक्षा संघटना एका क्षणात तयार होतील.
फुकटात ..बाबांनी आश्चर्यानं विचारलं.
मग..या स्पेशल इकॉनॉमिक झोनपेक्षा आणखी कुठे बरं सुरक्षित राहू शकतील त्या. शिवाय पुण्याचं काम करता म्हणून तेकेंद्राच्या आणि राज्याच्या उद्योगमंत्र्यांकडून सवलतीही देतील मिळवून. आयआयटी मिल्क देणाऱ्या गायी आपण कृत्रिम रेतनपध्दतीने या एसइझेडमध्ये जन्मास घालू शकू.
अरे आयआयटी दुधापर्यंत तुझं स्वप्न ठीक होत. पण आयआयटी गायींची निर्मिती म्हणजे जरा अतिच होत असंवाटत नाही तुला. अती तिथे माती ही म्हण तू चौथित शिकला होतास की.
अहो पण बाबा, आता मी पदवीधर झालोय. आता अती तिथे गती आणि गती तिथे प्रगती अशी नवी म्हण प्रचलितआलीय. च्युऑन हून सांगत होता.
हा कोण चुहा.
बाबा चुहा नव्हे च्युऑन माय फेसबुक फ्रेंड फ्रॉफ चायना.
म्हणजे डायरेक्ट हिंदी चिनी भाई भाई. अरे तो महामानव नेहरु तोंडघशी पडला रे. तू असल्या भानगडित पडू नकोस. चिनी जेसांगतात ते आपण उलट समजायचं. त्या चुहा – फुहाने जे सांगितलय त्यावर अजिबात विश्वास ठेऊ नकोस. अती तिथे मातीआणि गती तिथेही माती हेचं खरं.असं तुकारामांनाही सांगितलय ना..
कोणता अभंग सांगा बरं.
संत तुकाराम नाही रे ..
मग..
तुकाराम दयाराम काळमेघ , माझा वर्ग मित्र
अहो, तुम्हाला तुमच्या वर्गमित्राचं कथन योग्य वाटतं पण माझ्या एफबी मित्राचं वाटत नाही. बाबा गती म्हणजेच प्रगती, हे चिन्यांना समजलं म्हणून ते आपल्या समोर आहेत की नाहीत.
बरं बाबा. तुझच खरं.आयआयटी मिल्क झालं ,आयआयटी गायींची निर्मितीही झाली. आता पुढे काय? सांगून टाकएकदाचं आणि होऊ दे माझे कान पवित्र.
बाबा आय ऍ़म नॉट जोकिंग..त्यामुळे सिरियसली ऐका. तुम्ही भविष्यातील फोर्ड ,रॉकफेलर, टाटा, मित्तलाच्या पुढेउभे आहात. आजच्या गर्भात उद्याचा उष:कला असतो. आजच्या स्वप्नात उद्याच्या (अँटेलिआसारखा ) स्वप्नमहालाच्यानिर्मितीची पायाभरणी असते.अहो बाबा, त्या स्वप्नमहालात तुम्हालाच सम्राटाच्या वडिलांसारखं ऐश करता येईल. त्यामुळेबी सिरीयस..
अरे मी सिरियस होण्यापूर्वी तुझा पुढचा प्लॅन सांगून टाक बरं.
हे बघा बाबा. मी या एसईझेडमध्ये आयआयटी ब्रँड तांदूळ, गहू आणि तुरीची डाळ यांची शेतीही करण्याचं नियोजनकेलय.
अशी शेती?
कां नाही. सारं काही शक्य आहे. म्हणजे जे धान्य निर्मिती होईल त्यामध्ये इतर गुणधर्मासोबत आयआयटी प्रवेशासाठीआवश्यक असलेले प्लस व्हिटॅमिन्स , प्रोटिन्स आणि एनर्जी असेल. या धान्याची खिचडी जी गर्भवती माता दिवसातूनकिमान एकदा सेवन करेल, तिच्या बुध्दीची तलवार अशी काही चककित होईल की विचारुच नका. गरोदरापणात अशीखिचडी म्हणजे एकावर एक फ्रीच.
आँ. बाबांनी तोंड फाकले. एकावर एक फ्री म्हणजे दोन दोन बाळ होणार की काय त्या मातेला.
नाही हो बाबा. अहो एकावर एक फ्री म्हणजे की आयआयटी ग्रेन्स पासून बनवलेल्या खिचडीचं सेवन जर गरोदर मातेनं केलंतर बाळाचा मेंदू आयआयटीसाठी सूपर फिट होईलच पण ती माता सुध्दा आयआयटीसाठी फीट होईल. या अर्थाने एकावरएक फ्री असं म्हणायचं होतं.
आँ.. बाबांनी पुन्हा आश्चर्याने तोंड फाकले.
बाबा,असं क्षणाक्षणाला आश्चर्यचकित होऊ नका. चीनमध्ये असं कुणी आश्चर्यचकित होत नसतं हो. माझे वडील चिनीअसते ना तर माझं हे स्वप्न ऐकून आतापावेतो त्यांनी पाच पन्नास लाख युऑन रेनमिन्बी पोरासमोर ठेवले असते. पण तुम्हीफक्त आँच करताहात, एक खडकूही बाहेर काढायचं नाव घेत नाही.
म्हणजे तू आलास ना बरोबर आयजीच्या जीवावर बायजी होण्याच्या वळणावर.
अहो बाबा, तुम्ही कसले आयजी बायजी करत बसलात हो. बाबाजी सोबत आता मला ब्रिक्सचं साहाय्य आहे. तुमचाआयजी तुमच्या खिशातच ठेवा.
हा ब्रिक्स कोण तुझानवा पिता का?
बाबा, तुम्ही तुमचा पुरुषार्थ एकदाचं कन्फर्म करुन घ्या हो. त्यामुळे तुमच्यावर तुमचाच विश्वास बसून पुन्हा पुन्हा माझ्यापितृत्वावर तुमचं संशय घेणं थांबेल..
तसं नाही रे,पण..
बाबा मी माझ्या कृषीआधारित उद्योगासाठी तुमच्याकडून नाही हो घेणार पैसा. उद्योजकानं स्वत:च्या पैशाने उद्योगकरायचा नसतो, हे ज्येष्ठ अंबाणीचं सुप्रसिध्द कथन तुमच्या कर्णपटलावर पडलेलं दिसत नाहीय. पण मला ते माहिताय. मीब्रिक्स बँकेकडूनच आता कर्ज घेणारेय माझ्या आयआयटी स्पेशल एकॉनॉमिक झोनसाठी. आयआयटी मिल्क, आयआयटीकाऊज ,आयआयटी ग्रेन्स, आयआयटी प्रोसेस्ड खिचडी, संपूर्ण पॅकेज. बाळ गर्भात असल्यापासूनच त्याचं पोषण याआयआयटी फूड प्रॉडक्ट्सवरच. प्रत्येक पालकाचं स्वप्न पूर्ण करणारे प्रॉडक्ट्स. शेकडो टन आणि लिटर मध्ये उत्पादन. अहोबाबा लोकांना जसं साबण लागतं, टूथपेस्ट लागतं, चहापत्ती लागतं तसच आता आयआयटी फूड प्रॉडक्टसही घरोघरीलागतील. टाटांना जे करायला शंभर वर्षे लागले. बिर्लांना 77 वर्षे लागले , अंबाणी 40 वर्षे लागले ते तुमचा हा लेकअवघ्या चौथ्या महिन्यात करुन दाखवेन.
अरे तुझं स्वप्न उत्तम, तुझा आशावाद अत्त्युत्तम. पण मोठी स्वप्न पाहणाऱ्याने बॅकअप प्लान तयार ठेवायचा असतो. तेजमलच नाही तर कपाळमोक्ष होण्याची शक्यता कमी असते.
असं रामदास स्वामी म्हणाल्याचं,तुम्हाला म्हणायच का?
विनोद पुरे झाला.
तेच म्हणतोय बाबा. मी अजिबातच विनोद करतच नाही. पण तुमचा माझ्यावर विश्वासच नाही ना..
अरे, समजा तुझ्या आयआयटी फूड प्रॉडक्ट्सने एकाही मुलाला आयआयटीत प्रवेश मिळालाच नाही तर.
तर डोण्ट वरी बाबा माझे सगळे प्लान्स तयार आहेत.
आँ बाबांनी पुन्हा तोंड फाकले..
बाबा अहो, ब्रिक्स अर्थसाहाय्यीत आयआयटी फूड प्रॉडक्ट्सला अयशस्वी होणेच नाही. कारण भारतीय आशीर्वादलाभलाय ना या शाघांय येथील या बँकेला. शिवाय प्रत्येक राज्यात एक आयआयटी सुरु करण्याची घोषणाही झालीय. आता (कदाचित) पहिल्या टप्प्यात देशातील सर्व जिल्ह्यात आयआयटी स्थापनेची घोषणा कोणत्याही क्षणी होईल बघा. म्हणजे किती पालकांना आयआयटी फूड प्रॉडक्टची गरज भासेल. मला तर आताच असं वाटतय की एकच आयआयटीएसइझेड अपुरं पडेल फूड प्रॉडक्टसाठी. तेव्हा शांघायमध्येही एक याची उपशाखा काढून टाकू. दसो उंगली घीमे म्हणजे नेमकंकाय हे कळेल बाबा तुम्हाला.
आँ. बाबांनी पुन्हा तोंड फाकलं.
एका आयआयटी बाबाश्रींचा उदयास्त त्यांच्या नजरेसमोर होत होता. हा क्षण जपून ठेवायचा की हेच काय फळ ममतपाला असं म्हणत बापूंची आराधना करायची या विवंचनेत सध्या बाबा आहेत…
000
सुरेश वांदिले