एक्स्टेंडेड शुक्रवार आणि ध चा मा
शुक्रवारचं मटन आणि शनिवारची मारुतीरायाची वारी एटापल्ली (जिल्हा गडचिरोली) चा सरपंच मुकरु एडकाकोव्यानं कधी चुकवली नाही. दोन्हीकडचा त्याचा भाव आणि भक्ती समसमान होतीच. कधीकधीमटनाकडच्या भक्तिचा काटा जास्त झुकू लागायचा. म्हणजे शुक्रवारनंतर पुन्हा शुक्रवारचं कां येत नाही असंत्याला अधूनमधून वाटत राहायचं. त्याने त्याच्या बापाला- एडका बोडका कोव्याला हा प्रश्न बरेचदाविचारला. पण त्याने या प्रश्नाचं कधीच उत्तर दिले नाही. त्याऐवजी चिलिमीचा झुरका घेण्याचा आनंदअधिक महत्वाचा मानला.
एकदा मुकरुने त्याच्या ग्रामसेवकालाही हा प्रश्न केला होता. ग्रामसेवक म्हणाला होता की, आजआपल्याकडे शनिवार असला तरी तिकडे म्हणजे अमेरिकत शुक्रवारच आहे. तेव्हा आपण शनिवारच्या दिवशीअमेरिकेत आहोत असं समजून मटन प्लस मोहाचीचा बेत करायला काहीच हरकत नाही. आपल्याकडच्याशुक्रवारी मोहाचीचे दोनच पेग घ्यायचे आणि अमेरिकेतल्या शुक्रवारी मोहाचीचे डोळे झाकून पेग रिचवायचे. एकदा डोळे बंद केले की मग शुक्रवार काय नि शनिवार काय सगळे सारखेच नाही का? शिवाय दिवसालाथोडाच चेहरा असतो. शनिवारचा चेहरा मिस्टर ओसामासारखा आणि शुक्रवारचा चेहरा श्रीयूत ओबामासारखाअसला असता तर मग गोष्ट तशी गमतीची झाली असती. पण सध्या तसे काही नाही. त्यामुळेच आलादिवस गेला दिवस असं उगाच म्हंटलं जात नाही. शेंदूर फासला की दगडाचा मारुतीही होतो आणिगणपतीही होतो. डोळे झाकून अमेरिकेच्या शुक्रवारमध्ये जायचे नसेल तर मग एटापल्लीतल्याच शनीवारचेनामांतरण विस्तारित म्हणजेच एक्सटेंडेड शुक्रवार असे येईल. सध्या जमाना असा विस्तारिकरणाचाच आहे. एक्सटेंडेड प्लॅटफार्म, एक्सटेंडेड इमारत एक्स्टेंडेड विकएंड तसेच हा एक्स्टेंडेड शुक्रवार. म्हणजे मग भानगडचनाही. शुक्रवारची बैठक मग एक्स्टेंडेड शुक्रवारपर्यंत जोमात आणि जोशात सेलिब्रेट करता येईल.
ग्रामसेवकाची बुध्दी अशा कामी तुरुतुरु चालायची. कोणतेही काम नियमात बसवावे ते त्यानेच. त्यामुळेमुकरु त्याच्यावर फार प्रसन्न होता. ग्रामसेवक मुलगी असती तर तो तिच्या प्रेमातच पडला असता. आणिमौका साधून तिचा मुकाही घेतला असता. पण त्याच्या दुर्देव्याने तसे नव्हते.
ग्रामसेवकाने एक्स्टेंडेड शुक्रवारची मांडलेली कल्पना ऐकून मुकरुला आनंदाच्या उकळ्याही फुटल्या. पणसुखाबाईची मूर्ती त्याच्या डोळ्यासमोर आली आणि त्याच्या आनंदावर विरजण पडले. एक्स्टेंडेड शुक्रवारलाजन्मास घातले तर सुखाबाई वाड्यातच घेणार नाही आणि आपला विरोधक प्रो.सुखदेव इरपातेला आणखीएक कारण मिळेल, आपल्या विरोधात काड्या करायला. हे मुकरुने ओळखले आणि एक्स्टेंडेड शुक्रवारच्याकल्पनेने नादावयाचे नाही हे त्याने दु:खद अंत:करणाने स्वत:लाच समजावले.
शनिवारला एक्स्टेंडेड शुक्रवारचे स्वरुप न देण्याचं एक कारण मुकरुच्या नंतर लक्षात आलं की शनिवारच्यापहिल्या प्रहरीच मारुतीरायाच्या मंदिरात दर्शनाला जाण्याचा पायंडा सुखाबाईने लग्न होऊन कोवांच्या घरीआल्यापासून घातला होता. तेव्हा नव्या नवरीच्या तालावर नाचणऱ्या मुकरुला सुखाबाईसाठी काय करु आणिकाय नाही करु, असे झाले होते. सुखाबाई म्हणाली, चाल तर मुकरु निघाला. सुखाबाई म्हणाल्या थांबातर हा बसला. कोव्यांच्या घराण्यात कोणी कधी रामप्रहारी मारुतीरायाच्या मंदिरात गेलं नव्हतं. बायकोसोबततर कधीच गेलं नव्हतं. पण सुखाबाईने मुकरुला मारुतीच्या मंदिरात रामप्रहारी न्यायला सुरुवात केली. त्याचवर्षी मुकरु ग्रामपंचयातीचा सदस्य झाला. मग सरपंचही झाला. ही सगळी मारुतीरायची कृपा. हेत्याच्या मनात पक्क बसलं. त्यासाठी सुखाबाईच कारणिभूत असल्याचं त्याला पटलं. शनिवारी सुखाबाईसांगेल असच वागायचं हे त्याचं धोरण होतं. त्यामुळे शनिवारचा, एक्स्टेंडेड शुक्रवार करुन रामप्रहरीमारुतीरायाच्या मंदिरात जाण्याची प्रथा बंद पाडण्याचा आलेला कुविचार त्याला नाइलाजानं बाजूला सरकावालागला. त्याने शनिवारला शनिवारच राहू दिले आणि रामप्रहरी सुखाबाईसोबत मारुतीरायाच्या मंदिरातजाण्याचेही सुरु ठेवले.
तर, अशाच एका शनिवारी मुकरु आणि सुखाबाई रामप्रहारी मारुतीरायांच्या मंदिरात नित्यनेमाने गेले. मारुतीरायांचे मनोभावे दर्शन झाले. नारळ फोडला. शेंदुराचा टिळा लावून घेतला. मारुतीरायाच्या पितळेच्यामूर्तीवर तेल ओतून झाले. मारुतीरायाच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या सिंहाच्यामुखी खोबरे ठेवूनझाले. मूर्तीला फेऱ्या मारत असताना सुखाबाईचं मुकरुकडे लक्ष गेलं. मूर्तिच्या पाठिमागच्या भिंतीवर तोकाहीतरी लिहित होता.
सुखाबाईच्या मनात उत्सुकता चाळवली. दर्शन आणि फेऱ्या संपल्यावर दोन क्षणांसाठी मंदिराच्याआवारातील आसनावर ते दोघे बसतच नाही तोच, सुखाबाईनं मुकरुपुढे आपली उत्सुकता उघड केली.
सुखे, तू दर्सन घेत व्हतीस का माह्यावर लक्स ठेवून होतीस बॉ, एव्हढ लक्ष्य तं बेनझिर भुत्तो बीत्यायचा नवरा असिफराव जरदारी आणि हिलरी वैयनी बिलभौवर ठेवत नोव्हती. रुक्मिनींनं बी एवढी नजरक्रुस्नावर ठेवलं नोव्हती. मुकरु म्हणाला.
सरपंच सायेब, तुमच्यावर नजर नायी ठेवलं तं गडी बहकून कोनाच्याबी गाडीले कसा आन कवा ठोसमारन हे सांगता नाही याचं. तुमाले वाटते का आपन मदनाचे पुतळे आन किंगकाँगचे बाप, ऋतिक रोशनचेभाऊ. पन सरपंच सायेब हिकडं मारुतीरायाचा, घरी माहा आन गरामपंचायतीत गरामसेवकाचा तिसरा डोयाउघडा आस्तो मनुनशान तुमचं हलनं-डुलनं-लुढकनं, हिकडंच तिकडं आन तिकडचं तिसरीकडं होतं असलं तरीते कन्ट्रोलमंदी राह्यतं का नायी, तुमीच मले सांगा..तसं राह्यलं नसतं तं तुमच्या जागी इरतापे भावजी नसतेका बसले आतापावतो ? सुखाबाईने मुकरुच्या मर्मावरच बोट ठेवले. तो नाराज होत म्हणाला..
सुखे, तुले चान्स भेटला का तुह्य पुरान इदर्भ एक्स्प्रेसवानी लांबतच जाते बॉ.. मी सरपंच हाये, फस्टपरसन आफ अवर विलेज. माहा कायी मान-सन्मान हाये का नायी. हेमामालिनी भाभी कसी आपल्यानवऱ्याले, धर्मेंद देवल सायबाले फुलावानी झेलत असते, धरमजी धरमजी करुन. आन तू माह्या इज्जतीवरचटपून असते बाँ. माह्या दिलाले किती दरद होत असन याचा इचार बी तू करत नायी. हेमाभाभीपासून सिकथोडसं…
सरपचं सायेब, हेमाभाभी-फिबीले राह्यलच तं जयाकाकू बच्चनले, हळदीकुंकवाले बोलावून मी सिकीननवऱ्याचा मान-पान-सन्मान कसा ठेवाचा ते, त्यायच्यापासून समदं. पन माहा मुद्या हा नायीच हाये. तुमालेएखादा सवाल इचारला का तुम्ही त्याचा जबाब देत नायी आन दुसराच सवाल इचारता. सरपंच सायेब, आपल्या देशात लोकसाही हाये. सरपंचाले प्रश्नाचं उत्तर द्या लागते. मंग तो गरामपंचयातीचा सदस्य आसोनाही तं तुमची बायको. सुखाबाई म्हणाली.
सुखे, लोकस्याहीत एकाद्या प्रस्नाचं उत्तर म्हणून दुसरा प्रश्न इचारालेच पालटिक्स मनत्यात. असं ज्यालेजमते तो अमरिकेत राष्टपती ,चीनमंदी पंतप्रधान आन एटापल्लीत सरपंच होऊ सकते .तुहा भाऊ अजूनसरपंच कावून नायी झाला,याचा कदी त्यानं आन तुनं इचार केला का ? एकाद्या सवालाचं उत्तर जबावअसत नाही तं सवालच असते. ज्याले हे जमते तो पुढे जाते नाही जमत तो बोंबलत बसते.
लय झालं तुमचं स्यानपन, आन पालिटिक्स-फिलटिक्स . बायकोले पालिटक्समंदी गुंडाळू नोका. देवाच्यादेवळातबी तुमाले पालटिक्सच दिसते.मले तुम्ही सरळ उत्तर कावून देत नायी .द्याचं नसन तं तसं सांगा. मीचएखाद्या दिसी इचारिन मारुतीरायाले. सुखाबाई वैतागून म्हणाल्या. मुकरु खो खो हसत म्हणाला.
तुले, तो तुह्या प्रश्नाचं उत्तर देईन असं वाटते..
कावून नायी देनार. तुमचे सारे परताप त्याले मी जवा सांगन तवा दया येऊन तो माह्या प्रश्नाचं उत्तरदेनारच. सुखाबाई ठामपणे म्हणाली.
पन सुखे, मी मन्तो तुले कावून इन्टरेस्ट हाये बाँ मी मंदिराच्या पाठिमांग काय लिवल तेच्यात.
मी तुमच्यात इन्टरेस्ट नायी घेऊ तं का सलमानखानात घेऊ. का अक्षयकुमार तुमाले चालल का? लयहाटपाट हाये सल्लू आणि अल्लू.
सुखे, मारुतीरायाच्या मंदिरात तरी असी बहकू नोको..
मंग तुम्ही मले सांगून टाका ना, तुम्ही मंदिराच्या पाठिमांगं काय लिवत होता ते ?
मी एकटाच लिवत नवतो ना सुखे.दुसरे बी तं लोक लिवत होतेच ना..
मनुनस्यानच तुमाले मी इचारते, एवढं का लिवत होता ?
सरपंचाची सेकंड चान्स मले दे गा मारुतराया, असं लिवलंय मी. आता कोनाले सांगत बसू नोको. माह्या काकिले जावून सांगसील आन ती काकाले. तो दिवसभर मंग इथं येवून लिवत बसन. त्याचा डोयाआहे कवापासून माह्या खुर्चिवर.
मुकरुचं उत्तर ऐकून सुखाबाई हसू लागली.
तुले का झालं पिवरे पिवरे दात दाखवाले.मनून मी सांगत नोव्हतो.
तुमी जे कायी लिवलं ते मारुतीरायाले समजलं तं पायजेल ना..
मनजे..
तुमी जे कायी गिचमिड लिवता ते तुमाले तरी कधी समजते का ? मनून तं गरामसेवक तुमाले कायीचलिवू देत नायी. लिवते तो आन सही करता तुमी.
मारुतीरायाले समद समजते.
कसं समजन? तुमचं लिवनं गिचमीड. त्येचावर कोनतरी दुसरा त्येच्या भाषेत लिवून गेला. त्याच्यावरतिसरा लिवून गेला, त्याच्या भासेत. तो तुमचा मद्रासी दोस्तबी मले दिसला लिवताना. त्यायची तं भासाचअकडमतकडू. मगं मले सांगा असी गिचमीडची खिचडी मारुतीरायाले कसी समजन.
तुह्या बोलन्यात पाइन्ट हाये बॉ.
पाइन्ट काय मनता तलवार मना तलवार..आवो ध चा मा कवा होऊन जाईन हे समजाचं बी नायीतुमाले. खुर्ची बी जाची नं मुंडकी बी. दीडसे वर्स्याआधी पुन्याच्या एका वाड्यात घडलं व्हतं असच पुरान. घरी चाला आनं पोराकडून इतिहास जानून घ्या. सुखाबाई म्हणाल्या.
मंदिराच्या पाठिमागच्या भिंतीवर एकावर एक लिहिल्याने ध चा मा झाला आनं आपल्या काकानचं आपलागेम केला तं..असं मुकरुला वाटून गेलं. त्याला दरदरून घाम सुटला. त्याने मारुतीरायाकडे बघितले..त्यांनीकधीचेच डोळे मिटून घेतले होते..
सुरेश वांदिले