ओम आळसाय नम:
अरे, गधड्या असा कसा रे तू आळशी ? असं सतत कानावर पडत असणाऱ्या चिरंजीव मोरुला परवा मोठाच दिलासामिळाला. कारण त्याच्या पप्पांच्या महाचिंतेचा विषय झालेल्या त्याच्या आळसावण्याला तो अजिबातच जबाबदार नाही असंशास्त्रशुध्द सर्टिफिकेट सातासमुद्रापलिकडून आलं होतं. त्यामुळे त्याच्या तथाकथित आळसाचा पप्पांकडून होणाऱ्या सततच्याशंखनादामुळे त्याच्या मनाला विळखा घालून बसलेल्या नैराश्यरुपी काळी नागिनीच्या डंखाचा दाह कमी झाल्याची जाणीवत्याला झाली. त्याला हायसे वाटले.
चि. मोरु आळशी असल्याचं पप्पांना जे वाटायचं त्याचं उत्तर सातासमुद्रापलीकडून आलेल्या या सर्टिफिकेटनं दिल्यानंमोरुला, सहाराश्रींना न्यायालयीन कोठडीतून सुटका मिळाल्यावर जसा देमाय हर्षातिरेक झाला असता, तसा झाला..
000
2
चिंरजीव मोरु जन्मला तेव्हा काही तो त्याच्या पप्पांच्या मते आजच्या सारखा (आळशी आणि कामातून) गेलेला नव्हता. असं ते इतरांपेक्षा त्यालाच वारंवार सांगायचे. एकदा हिम्मत करुन तो पप्पांच्या नजरेला नजर भिडवत सिंघम स्टायलितम्हणाला,
पॉप कोणतच बाळ जन्मतं ते आजच्यासारखं कसं बरं असणार? बाळकृष्णाचं बघाना. बालपणी खोडकर, पुढे वयवाढलं तेव्हा खेळकर आणि मध्यमवयात तर चक्क फिलॉसॉफरच झालाच ना तो.
मोरुच्या पप्पांना त्याच्या बोलण्यातलं काहीही कळलं नाही. शहाणपणा करण्याऐवजी आळशीपणाला सोडचिठ्ठी दे असंकाहीसं बोलून आणि एक शिवी हासडून पप्पांनी ही चर्चा तिथेच थांबवली. आपल्या सारख्या हुषार मुलाला या निर्बुध्दमाणसानं कसा काय जन्म दिला असेल, हा प्रश्न मोरुला हजाराव्यांदा पडला. या प्रश्नाचं उत्तर बालकृष्णाला जमत नसेलतर फिलॉसॉफर कृष्णानं तरी द्यावं असं घरातल्या साईबाबांच्या तसबिरीकडे बघत तो मनातल्या मनात म्हणाला..
000
2
चिं. मोरु जन्मला तेव्हा त्याचं कोडकौतुक मोरुटल्या , मोरुटुली, मोर्री ते म पासून सुरु होणाऱ्या सगळ्या नावांनी केलंजायचं. फॅन्सी ड्रेस स्पर्धेत एकदा सुकन्येचं वेष लेवून सहभागी
झालेल्या चि.मोरुला त्याच्या आजोबानं हाय रे मेरा मधुबाला, असं म्हणून गालगुच्चा घेत लाड केल्याचं मोरुला आजहीस्मरतं. पण असलं मधुर आणि मोहक कौडकौतुक मोरुचं वय जसं जसं वाढत तसं कायम नाही राहिलं.
भिंतीवर टांगलेल्या तिरुपतीच्या तसबिरीकडे बघत मोरु तिरुपतींना विचारते झाला,
गोविंदा अरे, आत्ता आत्तापर्यंत ग्वोड ग्वोड वाटणारं हे लेकरु पप्पांना एकदमच खोंडया , दांडग्या , बिनकामाच्याबोंड्या आणि गधड्या कां वाटू लागलं. काहीही झकमारी करा पण पप्पा काही लय भारी म्हणतच नाही. पोरगा मोठा म्हणजेदहावित-बिववित गेल्यापासून त्याने पैशाची टाकसाळच उघडली पाहिजे असंच त्यांना वाटतं रे गड्या. गोविंदा तूच सांग असंकधी घडत का रे. ओबामांचं सुध्दा वय वाढलं तेव्हा काही त्यांचे फादरश्री त्यांच्यावर डाफरले नाहीत.
या इंटरेस्टिंग स्टोरीचा मोरु मुखातून प्रारंभ ऐकून तसबिरीतले तिरुपती थेट फ्रेमच्या बाहेर येऊन त्याच्या समोर उभे राहिले. त्याला बाजूच्या सोफ्यावर बसवत म्हणाले,
वत्सा,ओबामाची कथा अशी उभ्या उभ्या सांगू नकोस. तब्येतीनं सांग. ऐकून कान कसे तृप्त झाले पाहिजे. म्हणून तर थेटवैकुंठाहून आलो बघ.
आपल्या फोकनाड कथेत एवढा दम असू शकतो, हा शोध लागून चि.मोरुचा आनंद त्याच्याशी निकाह करण्यासाठीसायना मिर्झाने होकार दिला असता तर जितका आणि जसा झाला असता तसा झाला. मोरुने त्या आनंदातच एक पॉजघेतला आणि तिरुपतीच्या मांडिला मांडी लावून त्याने आपल्या फोकनाड कथेत रंग भरायला सुरुवात केली.
मोरु तिरुपतींना सांगू लागला,
गोविंदा अरे, ओबामा झोपून राहत तेव्हा त्यांचे डॅडी त्यांना केवळ झोपूच देत नव्हते तर त्यांना आणखी गाढ झोपू देत. त्यासाठी त्यांच्या अंगावर वुलनचे ब्लँकेट टाकत. घरात पिनड्रॉप सायलन्स राहावे म्हणून स्वत: घराबाहेर निघून जात. ओबामांना भूक लागली तर एकच्या ऐवजी दोन दोन नॉनव्हेज पिझ्झा देत . सिनेमाला जायचं असेल तर मॅटनी सोबतचनाइटशोसाठी खिसा मोकळा करत. बीअर हवी असेल रमची तजवीज करत. अभ्यास करत नसेल तर गोष्टीचे पुस्तक आणून देतअसत. एकदा तर प्लेयबॉयच आणून दिलं होतं. शप्पथ खरच सांगतो गोविंदा ,यू नो प्ले बॉय..
वत्सा मला कसं माहीत असणार. तिरुपती सपाट चेहऱ्यानं म्हणाले.
काय राव मीच भेटलो होतो का टोपी घालायला, असं मोरुस म्हणावं वाटलं. पण आपण स्वत:च फोकनाडपूरची तिकिटफाडल्याचं लक्षात येताच, त्याने असं काही तिरुपतीला विचारलं नाही. ओबामा कथेच्या पुढच्या एपिसोडमध्ये शिरत तो तिरुपतींना सांगू लागला,
गोविंदा अरे, ओबामा एकदा नापास झाले तर त्यांचे फादरश्री त्यांना न रागवता, चिअरअप करत म्हणाले डोण्ट वरी बीहॅप्पी. असे धी ग्रेट फादरश्री असल्यामुळे ओबामा भूमिती श्रेणिनं वर वरच चढत गेले. पण माझ्या पप्पांच्या नाकापर्यंत हा गंधआलाच नाही रे. त्यामुळे तुम्ही आणि साईबाबा बघताच दररोज माझ्यावर कसे बरसत असतात ते माझ्यावर उठता बसता. माझ्या नसलेल्या आळसावर उखडतात ते सारखे.
असं बोलून मोरु हुंदके देऊ लागला. त्याच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूकडे ढुंकूनही न बघता, तिरुपती तडकभिंतीवरच्या तसबिरीत जाऊन बसले.
मोरु बिचारा कितीतरी वेळ हुंदक्यावर हुंदके देत राहिला. तसबिरीतल्या एकाही देव-पुरुषाच्या ह्रदयाला चिरे पडत हे नाहीहे बघून त्याने आपल्या हुंदक्याला फुटवलं आणि आणि पूर्ववत होऊन, मै बेबी डॉल सोनेदी असं डोळे मिटून बघत गुणूगूणूलागला.
दॅट इज द राइट स्पिरिट..तिरुपती गालातल्या गालातच उद्गारले.
000
3
चि.मोरुने जेव्हा वयाची विशी जेव्हा गाठली तेव्हापासून त्याच्या पप्पंना तो आळशी (अकाली ) शिरोमणी असल्याचंठामपणे वाटू लागलं. आता आतापर्यंत केवळ त्याच्यापुरतच असलेलं त्यांचं कुजकं बोलण त्यांनी आता इंटरनॅशनल केलं. त्यांनी चि.मोरु हा कुंभकर्णाची आवृत्ती 2014, असल्याचं आपल्या घरकुलात त्याच्या विसाव्या वाढदिवशी जाहीर करुनटाकलं.
श्रीयुत कुंभकर्ण हे सहा महिने झोपूनच राहत असं चि.मोरुच्या पप्पांना कुणीतरी सांगितलं होतं. ही फोकनाड होती कासत्याचा सूर्यप्रकाश होता हे तपासण्यासाठी त्यांनी पुरावा मागायला नको होता का, त्याच वेळी त्या कुणीतरी व्यक्तीकडे. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यामुळे श्रीयुत कुंभकर्ण यांना सहा सहा माहिने झोप कशी लागायची, हा सवाल त्यांना पडलाचनाही. आजच्या काळात सहा तास सुध्दा सुतासारखी सरळ झोप लागत नाही तिथे सहा महिन्याची दोरखंडी निंद नामुकीनहीनही, इम्पॉसिबलसुध्दा.
बेडकं सुध्दा फक्त उन्हाळ्यातच चार महिने झोपू शकतात, असं सांगितलं जातं. प्रत्यक्षात कुणी बघितलंय का त्यांचंझोपणं असं. डिस्कव्हरी चॅनलेवर सुध्दा बेडकाची चार महिन्याची झोप ही डाक्युमेंट्री लागलेल्याचं ऐकिवात नाही.
चि.मोरुच्या मते बेडूक प्रत्यक्षात झोपतच नाहीत. उन्हापासून बचाव करण्यासाठी ते अज्ञातवासात जातात. प्राणीशास्त्रज्ञांना बेडकांचं हे असं अज्ञातवासात जाणं म्हणजे झोपणं वाटलं, हे बेडकांचं दुर्देव्य. असा चार महिनेझोपण्याचा सिध्दांत मांडून प्राणीशास्त्रज्ञांनी बेडकांना त्यांच्या नशिबावर सोडून दिलं. पण श्रीयुत कुंभकर्ण हे काही एखाद्याबेडकाचे नाव नव्हे. समजा गृहतिकासाठी तसं असेलही तर त्यांच्या झोपण्याचा कालावधी चार महिन्याऐवजी सहा महिने कसा? आपल्या पप्पांना हा प्रश्न तर नक्कीच पडायला हवा. कारण त्यांनी आपले गणित कुंभकर्णासोबत जुळवले होते. पणआपण तर बेडूक नक्कीच नाही. आपण जर कुंभकर्णाची 2014ची आवृत्ती असेल तर सहा महिने झोपूनच राहायला हवं. पणदहा तासाच्यावर आपण कधीच झोपलो नाही. खर तर सातव्या तासानंतर आपण झोपण्याचं नाटकच करतो. हे मायलाठाऊक आहेच. म्हणजे आपल्या झोपण्याचा कालावधी हा प्रत्यक्षात सात तासाचा आहे. याच अर्थ आपण ना बेडूक नाकुंभकर्ण. हे आपोआपच सिध्द होत नाही का ? मोरु आळीपाळीने भिंतीवरील तिरुपती, साईबाबा आणिसत्यसाईबाबांच्या तसबिरीकडे बघत स्वत:शीच संवाद साधत म्हणाला.
हा संवाद कानावर पडताच तिरुपती फ्रेमच्या बाहेर आले. टेबलवर असलेल्या डायरीतील एक कागद त्यांनी
फाडला. त्यावर टेबलवरीलच बॉलपेनने पटापट लिहिलं. तो कागद साईबाबांकडे बायपास केला. आणि ते परत फ्रेममध्येपुन्हा परतले. तो कागद तिरुपती आपणास देतील, असं मोरुला वाटलं. पण तो साईबाबांकडे बासपास झाल्यानं मोरुहिरमुसला.
या कागदावर काय लिहिलं होत बरं..
तिरुपतींनी असं नोंदवलं होतं की,
चार महिने झोपण्याचा सिध्दांत मांडणाऱ्या प्राणीशास्त्रज्ञांनी बेडूक आळशी आहेत, असं कुठेही अजिबात म्हंटलेलं नाही. त्याचा कोणताही पुरावा नाही. विकिपीडियात याची नोंद नाही. गुगलमध्ये एकही रेफरन्स नाही. श्रीयुत कुंभकर्ण हे जरी सहामहिने झोपत होते तरी ते त्यांच्या महाराज श्रींच्या दृष्टिने साम्राज्याचे भूषण होते. मोक्याच्या क्षणी उपयोगाला येणारे ऍ़सेटहोते. समजा श्रीयुत कुंभकर्ण सहा महिने झोपतही असतील तरी साम्राज्याचे भूषण ते ऍ़सेट या अर्थाने आळशी नव्हतेच, असंअसताना चि.मोरुच्या पप्पांनी त्याचा उध्दार कुंभकर्णाची 2014ची आवृत्ती , अशा विशेषणानं करावं हा श्रीयुतकुंभकर्णाचा महाअपमान आणि चि.मोरुचा घोरअपमान होता.
तिरुपतींची ही नोंद साईबाबांकडून सत्यसाईबाबांकडे बाय-बायपास होत असताना मोरुच्या हातात पडली. बोका जसामटनाच्या तुकड्यावर झडप घालतो तसं त्याने या नोंदीवर झडप घातली. अध्याशासारखं ही नोंद त्याने वाचून काढली. आपल्या बद्दल तिरुपतींची अशी उत्तम भावना बघून त्याचे ह्रदय भरुन आलं. तिरुपतीला जे कळंत ते आपल्या पप्पांना आकलन कां होत नाही? मोरु तसबिकरींकडे बघत म्हणाला.
गोविंदा,साईबाबा,सत्यसाई यावरुन माझ्या पप्पाचह उडी ही बेडूक उडीच असल्याचं स्पष्ट होतं नाही का?
एकाही तसबिरीनं मोरुच्या या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही.
मोरुने आपल्या पप्पांच्या मायला तिरुपतीची मत जेव्हा सांगितलं तेव्हा त्या माऊलिनं त्याच्या पप्पांच्या लक्षात ही बेडूकउडी आणून दिली. पण मोरुच्या पप्पांच्या मेदूंचा कुंभकर्ण झाल्याने ते फक्त हॅहॅहॅहॅच करत राहिले
आजीच्या लाडानेच मोरुचा मुरांबा होऊन त्याला बुरशी लागल्याचं ,त्यांनी उलट मायला सुनावलं. ज्याचं करावं भलं तोम्हणतं माझचं ढिशक्याँव..आजी असं काहीशी पुटपुटली तेव्हा..
000
4
या आळश्याचं व्हायचं कसं ? हा निपजलाच कसा ? तो सुध्दा आपल्याच घरी कसा ? असे सवाल दर दोनचारदिवसांनी चि.मोरुचा पप्पा आपल्या बायकोला करु लागला. प्रारंभी हे सवाल चि.मोरुच्या मायने काळजीपूर्वक ऐकून त्यांचीउत्तरेही दिली होती .
या आळशाच काय व्हायचं? या प्रश्नाचं तिचं उत्तर होतं की, होऊन होऊन काय होणार? वजन वाढणार. आजच्याकाळात वजनदार माणसाची चलती असते. चलती पाहिजे का पडती पाहिजे रोजेहो तुम्हीच ठरवा. (त्या काय बोलल्या हेत्यांनाच कळलं नाही त्यामुळे चि.मोरुच्या पप्पांच्या भेज्यात शिरण्याचा प्रश्नच नव्हता.)
हा निपजलास कसा? या प्रश्नाचं उत्तर देताना त्या म्हणाल्या की, हे तर ब्रम्हदेवच सांगू शकेल. विचाराना जावून त्याला. चि.मोरुच्या पप्पांना ब्रम्हदेव राहतो कुठं असा प्रश्न विचारण्याचा मोह झाला होता पण आपल्या पोट्टयाच्या निपजण्याचीदोरी आपल्यापर्यंतच हलतडुलत पोहचत असल्याचं लक्षात येताच त्यांनी जिभ चावली.
आपल्याच घरी कसा? या प्रश्नाच्या उत्तरात त्या म्हणाल्या, हा आपल्या घरी नाही तर काय अंबाणीच्या, राकेशरोशनच्या ,रजनीकांतच्या घरी निपजला असता का? तुमच्या मायला चालल असतं का असं. चि.मोरुचा पप्पा निरुत्तरझाला ही उत्तरं ऐकून.
मोरुच्या पप्पाला वांरवार पडणाऱ्या सवालांच्या केंद्रस्थानी तो स्वत:च असल्याचं लक्षात येऊनही मोहाचीची जास्त झालीकी चि.मोरुच्या आळशीपणावर बोंबलण्याची हुक्की येई. हेच प्रश्न तो पुन्हा पुन्हा बडबडत राही. रोज मरे त्यास, गाढव नापुसे या म्हणीला जागत चि.मोरुच्या मायने आता या सवालांना इकडून तिकडचा मार्ग दाखवला. सध्या तर तिला हे सवालऐकायलाच जात नाहीत. पप्पा कोकलतो. माय हसते. चि.मोरु मजा घेतो.
0000
5
चि.मोरुच्या पप्पांचं बोंबलणं त्याच्या बायकोनं आधी कानावर आणि मग मनावर कां घेतलं नाही? याचं महत्वाचं कारणअसं की चि.मोरु आळशी आहे, हेच मुळी त्या माऊलीस मान्य नाही. जी गोष्ट मान्य नाही ती पुन्हा- पुन्हा कुणीही सांगितलीतरी कशी पटणार? कौरवश्री दुर्योधन यांना नाही का कुणी कुणी येऊन सांगितलं की हस्तीनापुरचं राज्य हे पांडवाचं , ते तूत्यांना देऊन टाक. पण कौरवश्री दुर्योधन यांनी इकडून ऐकलं नि तिकडून सोडून दिलं. त्यांचही चि.मोरुच्या मायसारखं झालंहोतं . आधी दोनदा ऐकलं. मग त्यांनी इकडून तिकडे सोडून दिलं. नंतर त्यांना ते ऐकायला येईनासं झालं. जे मान्य नसतं तेऐकायलाच नं येण्याची अशी लाँग हिस्ट्री असल्यानं चि.मोरुच्या मायचं काही चुकतं होतं असं कसं बरं म्हणता येईल. पिताश्री धृतराष्ट्राला सुध्दा प्रारंभी हस्तिनापूर पांडवाचं असल्याचं वाटलं होतं. पण कौरवश्री दुर्योधनांनाच जेव्हा ते ऐकायलाचयेइनासं झालं तेव्हा त्याच्या डोळयावरचा पडदा कानाकडेही सरकला. त्यांना कौरवश्री दुर्योधनाचं कौतुक वाटू लागलं. हाइतिहास झाला. चि.मोरुचा पप्पा पोट्टयाबद्दल जे बोलतो ते जेव्हा मायला ऐकूनासं झालं तेव्हा तिलाही लेकराचं भारी कौतुकवाटू लागलं.
00
6
चि.मोरु दिवसभर खादाडत असला, झोप-झोप झोपत असला, कोणतही काम-धाम करत नसला, टीव्हीच बघतअसला म्हणून काही बिघडलं का ? मुळीच नाही. उलट घडलेच घडले. असे तो करतो, वागतो म्हणून तो कसा गोल-मटोल म्हणजे हेल्थी झालाय. हेल्थ इज वेल्थ असं कोण कोकलतं ? तुमच्या गुरुजींनी प्राथमिक शाळेत हेच सांगितलं नाहीका ? माझ्या गुरुजींनी माध्यमिक शाळेत हेच सांगितलं. चि.मोरुच्या गुरुजींनी तर त्यास नर्सरित असतानाच सांगितलं. श्री श्रीरवीशंकर गुरुजी उठता-बसता तेच सांगतात. श्री कृष्ण आणि श्री बलारामांना सांदिपनी गुरुजींनी हेच सांगितलं. आता योगागुरु माँ बिपाशाजी बसू डीव्हीडीसह सांगतात. मग या सर्व गुरुजींची आणि गुर माँची अक्कल मोठी की तुमची ? असं आणिअशा शेडचा प्रतिवाद चि.मोरुच्या मायने त्याच्या पप्पांकडे आळसाचा सवाल जेव्हा जेव्हा त्यांच्याकडून उपस्थित केला गेला, तेव्हा-तेव्हा केला होता. या सवालाचं उत्तर देणं दिवसेंदिवस पप्पांना अवघड आणि अवजड जात राहिलं.
000
7
चिं मोरुची आजी सुध्दा तिच्या नवऱ्याला म्हणजेच चि.मोरुच्या आज्याला हज्जारदा त्याच्या पप्पाबद्दल असच काहीबाहीबोलायची. चि.मोरुची माय या घरात सून म्हणून आल्यापासून हे असलं बोलणं ऐकत होती. म्हणजे त्याच्या आज्याला त्याचापोरगा म्हणजेच चि.मोरुचा पप्पाही महाआळशीच वाटत होता. त्याच्यावरुन आजी आणि आजोबामधील कचाकचा भांडणाचंसाक्षिदार होण्याचं भाग्य चि.मोरुच्या मायला लाभलं होतं.
तुम्ही सुध्दा कोणतं काम करता. गावात उंडारत राहता. पानठेल्यावर जाऊन खर्रा कोंबता मग पचपच थुंकता, भट्टीतजाऊन गावठी ढोसता.पत्ते कुटता, असं चिं. मोरुची माय लग्नानंतरचा घरातला तिचा एक्सपिरियन्स वाढल्यावर आणिसासऱ्याच्या मनात स्थान पक्क झाल्यावर बेधडक म्हणत तिच्या नवऱ्यावर धडकत असे. गंमत म्हणजे चिं. मोरुचा आजासुनेच्या या बेधडक कथनाकडे कौतुकाने बघायचा. त्याला ती झाशीची राणीच वाटायची. तो आपल्या पोट्याला म्हणूनम्हणून थकून गेला होता. पण नव्या दमाच्या सुनेने मात्र ते करुन दाखवलं होतं.
सुनेच्या या बेधडक बोलांनी घरात दुसऱ्या महायुध्दाची परिस्थिती निर्माण व्हायची. पण कोणत्याही शुल्लक कारणांवरुनसुनेच्या माय-बाप-मावशीचा उध्दार करणारी चिं. मोरुची आजी मात्र या एका प्रसंगी स्वत:चा रामबाबा करुन ध्यानयोगातजायची.
तिलाही मग चेव यायचा. प्रेरणाही मिळायची. चि.मोरुच्या मायची टकळी सुरु झाली की, चि.मोरुची आजीही तिच्यानवऱ्यावर बरसायची, तुम्ही कोणते दिवे लावले , त्या दिव्याचा इथं मी प्रकाश पाडला तर लाडाकोडाची सूनबाईइस्लामाबादलाच जाईल दुसरा निकाह लावायला. असं काहीबाही आजी, तेव्हा आज्याला म्हणायची.
000
8
याचा साधा, सोपा, सरळ, स्पष्ट आणि स्वच्छ अर्थ असा की, चि.मोरुच्या घराण्यातल्या सर्व आद्य पुरुषांचाइतिहास कथित आळसानं समृध्द आणि आशयसंपन्न असलेला होता. त्याचा उध्दार स्वत:च्या सोइनुसार प्रत्येक टप्प्यातलेमाय-बाप करत राहिले होते.
मात्र हे ही खरच की या कथित – अकथित आळसाला मिठी मारुनही कुणाचच काही बिघडलेलं नव्हतं. हे चि.मोरुलास्पष्टपणे दिसत होतं. अशा या समृध्द इतिहासाची फळं आपला पप्पा आणि आपला आजा चाखतो. मात्र आपण त्याचइतिहासाचे पाईक होण्याचा पारदर्शक प्रयत्न करत असताना पप्पा मात्र कां जीव खातो? याची खंत चि.मोरुला लागलीअसायची.
ही खंत कशी दूर होईल या चिंतेत तो रात्रंदिवस असायचा. मिरेला जशी तिच्या प्रभुची धून लागली असायची ना, तसचहे होतं. त्यामुळे खाणं-पिणं आणि चिंतन-मननासाठी झोपणं. या चक्राला चिं. मोरुनं ज्ञानलालसेच्या पावित्र्यानं स्वीकारलंहोतं. पप्पाला जरी तो आळशी वाटत असला तरी खरं वास्तव हे असं होतं.
मात्र ही ज्ञानलालसा पप्पाला समजणार कशी या प्रश्नाचा तिढा बम्युर्डा त्रिकोनाच्या तिढ्यासारखा होता. पण म्हणतातना भगवानके घर देर है लेकीन अंधेर नही. तसंच झालं.
000
9
परमेश्वराला (भिंतीवर टांगलेल्या तसबिरींना) चि.मोरुची दया आली असावी. कारण या अशा बिकट प्रसंगातून चि.मोरुचीसन्मानपूर्वक सुटका करण्याची प्रेरणा त्याने ग्रेट ब्रिटनच्या शास्त्रज्ञांना दिली. ती दयाळू विद्वान मंडळी चिं. मोरुच्या साहाय्याला- श्रीकृष्ण जसे द्रोपदीच्या सहाय्याला वस्त्रहरण प्रसंगी धावले तसे धावून आले .
कोणत्याही देशातील शास्त्रज्ञ हे चांगल्याअर्थी बऱ्याच उपद्व्यापात गुंतलेले असतात. दयाघनाकडून प्रेरणा मिळालेल्याग्रेटब्रिटनमधील त्या उपद्व्यापी शास्त्रज्ञानं परवाच त्याचं नवं संशोधन जगापुढे आणलं.
एक्सक्ल्युजीव.
चि.मोरुसाठीच असणारं.
या संशोधनाचा सार असा की, चि.मोरु असो की तुम्ही आळशी आहात किंवा असलात तर हा काही तुमचा अजिबातदोष नाही. हा परिस्थितीचाही दोष नाही. हा काही शिक्षण व्यवस्था, सामाजिक व्यवस्था, आजुबाजूची सांस्कृतिकव्यवस्था किंवा मार्केट व्यवस्थेचाही दोष नाही. तर या दोषाच्या होकायंत्राची सुई तुमच्या बापाकडेच पहिल्यांदा जाते. कारणआपल्या शरीरात आपल्याला घडवणारे, बिघडवणारे, वाकणवारे, नाचवणारे, नादावणारे लाखो जिन्स असतात. त्यात आळसाचेही जिन्स असतात. हे जिन्स एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, तिकडून पुढच्या पिढीकडे सुखाने आणिअभिमानाने ट्रान्सफर होत राहतात. तेव्हा मुलाच्या आळसासाठी बाप, बापाच्या आळसासाठी त्याचा बाप अशी ही थोरआणि श्रेष्ठ परंपरा सुरु राहून पुढे पुढे जात राहते.
000
10
ग्रेट ब्रिटनच्या शास्त्रज्ञांचा हा निष्कर्ष चिं.मोरुने पप्पांपुढे दबंग स्टाइलने ठेवला. तरी मनात भीतीच होती की पप्पाआपल्याला खेटराने हाणू शकतो याची. त्याने आपल्या मनाची तशी तयारी सुध्दा केली होती. पण विपरितच घडले राजेहो. सूर्य कधीतरी आग्नेय दिशेतूनही उगवू शकतो, यावर शिक्कामोर्तब करणारी घटना तिथे घडली. चिं. मोरुला त्याच्या पप्पानेसलमानखान शाहरुख खानला इफ्तार पार्टित जशी प्रेमाने घट्ट मिठी मारतो तशी मिठी मारली. चि.मोरुला आपण त्याक्षणीडिस्ने लँड मध्ये गेल्यासारखच वाटलं. पोराचा गालगुच्चा घेत चि.मोरुचा पप्पा नाचू लागला. दोघेही मिळून खटल्यालाखिळलेल्या चिं. मोरुच्या पप्पांच्या पप्पांकडेे गेले. चिं. मोरुने आज्याला हा निष्कर्ष वाचून दाखवला. तेव्हा बुढा ताडकनउठलाच नि तोही फेंगड्या पायानं थुई-थुई नाचायला लागला..
00000
आपल्या घरातली काहीच न करणारी आळशी पुरुष मंडळी पागलावानी कां होईना नाचताहेत, हातपाय हलवताहेत हेबघून चि.मोरुच्या मायचे आणि आजीचे डोळे भरून आले. त्या दोघांनी कुलदैवतेला दंडवत घातला.
भिंतीवरच्या तसबिरींनी समाधान सुस्कारा सोडला..
000
सुरेश वांदिले,