कुबेराचा रिता खजिना हे सत्य, पण त्यानंतर पुढे काय?
ही घटना आता आत्ताशीच असल्यानं यावर कुणीही शंका घेऊ नये.
देवादीदेव इंद्रसेन महाराजांना नको नको ते बोल कुबेरमहोदय लावल्याचं आम्ही स्वकर्णी ऐकलयं. आमच्या पिताश्रींच्यावार्षिक भेटिला आम्ही जेव्हा स्वर्गनगरी अमरावतीत गेलो तेव्हाची ही घडामोड.
पिताश्रींचे हालहवाल आणि हवापाणी यांची विचारणा केल्यावर, आमच्या असं लक्षात आलं की पिताश्री काही स्वर्गातआनंदी नाहीत. मजेत नाही. स्वर्गाचा भकासपणा लगेच लक्षात येतच होता. सोमालियाच्या कोणत्याही तालुकाच्यामुख्यालयी गेल्यावर आपल्या लक्षात येतं की, सोमालिया ही गॉन केस आहे. स्वर्गनगरी अमरावतीबाबत तसा निष्कर्षएकदमच काढणं हे ऐश्वर्या रॉय -बच्चन पुन्हा कध्धीच स्लीम-ट्रीम होणार नाही असा घायकुतीनं निष्कर्ष काढण्यासारखं ठरलंअसतं. त्यामुळे आम्हाला स्वर्गनगरी अमरावतीच्या प्रवेशद्वारी पाऊल ठेवताच सोमालियाची आठवण जरी झाली तरी आम्हीआमच्या निष्कर्षाला होल्डवर ठेवलं.
सध्या श्रीयुत ओमाबा सुध्दा हेच करतात. कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी ते त्यांचा विचार होल्डवर ठेऊन ठंडा करकेखावो या तत्वाचा अवलंब करतात. ते आम्हा रिलायन्सी इंडियन्सचे आदर्श. त्यांची बरिक आठवण योग्य क्षणी होताचअमरावतीला सोमालियात नेणाऱ्या मनास आम्ही थांबवलं.
000
तर पुन्हा मुद्यावर येऊ.
श्री कुबेर म्हणजे स्वर्गाचे खजिनदार किंवा फायनांस कंट्रोलर किंवा स्वर्गाच्या रिझर्व बँकेचे गव्हर्नर हे स्वर्गाधिपती इंद्रसेनांनावाट्टेल तसे बोलत होते. म्हणजे हे जणू श्रीयुत जेष्ठ भ्राता अबांणींना त्यांच्या अकौंट्स ऑफिसरनं बोलण्यासारखं होतं. असंसमजा प्रत्यक्षात काही घडलच असतं तर ज्येष्ठ भ्राता अंबाणींनी काही ऍ़क्शन घेण्याआधीच त्यांच्या सेक्युरिटी ऑफिसरनं त्याअकौंट्स ऑफिसरच्या पार्श्वभागावर लाथ हाणली असती. पण देवादीदेव इंद्रसेन महाराज मात्र श्री कुबेरांचे बोल बोलशांतपणे ऐकून घेत होते.
हे असं का? याचा आपण शोध घ्यायलाच हवा. हे माझ्या मनानं घेतलं अन् मी कामाला लागलो. त्यातून जे काहीगवसलय, ते जसच्या तसं इथे मांडलय..
अमरावतीचा प्रवास सोमालियाकडे कसा वेगानं चाललाय हे तुमच्याही लक्षात येईल.
000
सर्व घटनेचा आणि बोलण्याचा साकल्याने अन्वयार्थ काढल्यावर माझ्या लक्षात आलं की श्री कुबेरांचं इंद्रसेन महाराजांवररागावणं किंवा बोल बोल बोलणं यात काही चुकीचं नव्हतं म्हणा. (अकौंट्स ऑफिसरच जेष्ठ भ्राता अंबाणिंना रागावणंमातोश्री अंबाणिंना कदाचित चुकिचं वाटल नसतं.असो.)
तर आमच्या असं लक्षात आलं की श्री कुबेर नावाचेच खजिनदार अथवा रिझर्व बँक ऑफ स्वर्गाचे खालीपिली गव्हर्नरकिंवा राज्य गमावून बसलेल बाजीराव द सेकंड राहिले होते.
एवढा महाप्रचंड खजिना स्वर्गनगरीचा. अगदी रामायण – महाभारत काळापर्यंत या खजिन्यात नुसती भर पडत होती. कायदबदबा होता तेव्हा अमरावतीचा आणि इंद्रसेनांचा. पराक्रम महर्षी रावणाला सुध्दा अमरावतीवर आक्रमण करण्याचा मोहझाला होता. पण ते अशोकवन कांडात फसले. पुढे श्री हनुमंतांनी त्यांना वेगळ्याच आगित होरपळत ठेवले. अन्यथा अमरावतीहे लंकेचे मांडलिक राज्य झालेलं बघण्याचे आपल्या नशिबी आलं असतं. तसं काही झालं नाही. इंद्रेसेनांना घाम गाळावालागला नाही आणि श्री विष्णूंना नवा अवतार घेण्याचं कष्ट करावं लागलं नाही.
महाभारत काळात इंद्रसेनांचं बरच बरं चाललं होतं. वसुंधेरची सगळी मुलं आपसातच लढाया करण्यात आणि त्यांनामहासंग्राम वगैरे म्हणवून घेऊन स्वत:चे सिक्सपॅक फुगवण्यात रममाण झाल्याने अमरावतीकडे कुणाची दुष्ट नजर गेली नाही. उलट जो स्वर्गस्थ झाला तो कुबेराच्या खजिन्यासाठी नजराणाच घेऊन गेला. त्यामुळे खजिना ओव्हरफ्लो होतच राहिला.
पण पुढे आर्यावर्तालाच नव्हे तर ब्रम्हांडालाही कुणाची तर दुष्ट नजर लागली आणि त्याचा व्हायचा तोच परिणामइंद्रसेनांच्या खजिन्यावर झाला. हळू हळू खजिना रिता होऊ लागला. धनसंपत्ती झाडाला लागते नि ते हलवलं की खजिनाफुल्ल होतो. असंच इंद्रसेनांना नि श्री कुबेरांनाही आतापर्यंत वाटत होते. त्यामुळे इंद्रसेनांबसोबत श्री कुबरेही रम-रमा आणिरमणी यात रममाण
झाले होते. पण झाड हलण्याचं थांबल नि खजिना रिता होऊ लागला.
वसुंधरेच्या पोराटोरांना एमबीए इन फायनांस वगैरे प्रशिक्षण घेण्याची बुध्दी झाली. पण इंद्रसेन आणि श्री कुबेरांच्या तेध्यानीमनीही नव्हतं. दिल्ली विद्यापीठानं मास्टर ऑफ फायनान्स कंट्रोल असा अवघड वळणाचा अभ्यासक्रम सुरु केल्याचं तरया दोघांना जाऊ द्या पण त्यांच्या पोरांना आणि त्यांच्याही पोरांना ठाऊक नव्हतं. तीन चार पिढ्या अजुनही सोळाव्याशतकातच वावरत होत्या. म्हणजे परिस्थिती बघाना कित्ती वाईट्ट. 21 व्या शतकात ही मंडळी होती 16 व्याशतकाच्यामानसिकतेत. त्यांच्या हे गावीही नव्हतं की सोळावं शतक संपता संपता इंग्लंडमध्ये बँक निघाली होती नि तेथील राजा आणिराज्याचा खजिना ही बँक नीट बघू लागली होती.
000
समुद्राचं पाणी आटू शकतं, असं कोणत्यातरी पर्यावरणशास्त्र किंवा ओशनोग्रॅफीचा अभ्यास करणाऱ्या विद्वानालावाटल्याचं तुम्ही वाचलच असणार. मग इंद्रसेनांचा खजिना किस झाड की पत्ती. अलाउद्दीनचा जादूचा दिवा कधीचाचवितळून गेलेला. त्यामुळे मार फुंकर नि जिनला बोलाव नि सांग त्याला बँक ऑफ शिकागोतून खजिना आणायला, हाहीमार्ग खुंटला. मग व्हायचं ते झालं. विहीर आटू लागली. खजिना रिता होऊ लागला. हे जेव्हा श्री कुबेरांच्या लक्षात आलं. तेव्हात्यांच्या पायाखालची वाळू वगैरे घसरली नाही.
कारण ते एकटेच केवळ यासाठी जबाबदार नव्हते. याचं त्यांना हायसं वाटलं. वाळवंटात झरा दिसावा नि हसू यावं असंचकुबेरांचं वागणं होतं.
एक-दोनदा कुबेरांनी उडत उडत हा विषय इंद्रसेनांकडे काढला होता. पण रिता खजिना बघायला इंद्रसेनांना वेळच मिळेना.
वेळ काढावा लागतो, असं चारदा कुबेरांनी त्यांना समजावलं.
एकदा इंद्रसेन कुबेरांना म्हणाले की, बघण्याचा काळ अद्याप दृष्टिक्षेतातच नाही. तो चारपाचशे सहस्त्रप्रकाश वर्षे दूरच. म्हणजे त्यांना असं प्रतिपादित करावयाचं होतं की स्वर्ग ज्या अंतराळात वसलं होतं. त्यापासूनच हजारेक अंतराळाच्यापलिकडेच काळाची पावलं आत्ता आत्ता उमटू लागलीय. स्वर्गामध्ये यायला त्यास वेळच लागायचा. कदाचित हा काळस्वर्गाच्या वाटेलाही जायचा नाही. असं इंद्रसेनांनी कुबेरांना समजावलं. म्हणजे तात्विक बोलणं हा त्यांच्या डाव्या हाताचखेळच होता.
इंद्रेसनांचा पराक्रम त्यातच. श्री कुबेरांना कितीही राग आला तरी त्यांच्यापुढे गप्प बसण्यावाचून पर्यायच नव्हता. तिन्हीत्रिकाळ अप्सरांच्या जुल्फ्यांमध्ये गुंतलेल्या इंद्रसेनांना स्वर्ग दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आलेला असताना त्याकडे लक्षदेण्याची गरजच भासली नाही. आवश्यकताही वाटली नाही. हवेत हात फिरवू आणि रिक्त खजिना ओव्हरफ्लो करु याभ्रमातच इंद्रसेन होते. भ्रमाचा भोपळा फुटतो नि अमिररावांचं गरिबराव होण्यास क्षणही लागत नाही हे त्यांना कळणार कसं? हे सांगण्यासाठी एकदा आलमगीर औरंगजेब डोकावून गेले होते. पण इंद्रसेनांचं कान नेमके तेव्हा बहिरे झाले. काय करणारनाही का, एकटे बिचारे श्री कुबेर अशा परिस्थितीत. व्हायचे ते झालेच.
श्री कुबेर यांची झोप उडाली.
000
इंद्रसेनाचा स्वर्ग त्यांच्या अवतीभवती फुदकणाऱ्या अप्सरा होत्या तर श्री कुबेरांचा स्वर्ग त्यांची ही निद्रादेवी होती.ती हिरावूनघेण्याचं घोर पातक ज्या इंद्रसेनांकडून घडलं त्यांचा क्रोध एकेदिवशी श्री कुबेरांना आला. त्या क्रोधाने त्यांना ते कोण आणिइंद्रेसेन कोण याचा विसरच पडला. अखरे व्हायचं ते
झालं. एकेदिवशी तिरमिरित ते इंद्रेसनांच्या महाली दाखल झाले. त्यांना वाट्टेल तसे बोल लावत बसले. एरव्ही एकांतातइंद्रसेनांना त्याचं काहीच वाटलं नसतं. पण नुकतंच रंगमहाल एन्ट्रन्स टेस्ट विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेल्या एकाषोडषवर्षीय अप्सरेच्या मुलाखतीमध्ये ते व्यस्त असताना श्री कुबेरांची भडास बाहेर पडली. हे त्यांना रुचलं नाही.
त्या प्रथमश्रेणीतील अप्सरेच्या नयनी विश्वासच बसेना. म्हणजे असं की, स्वर्गाधीपती इंद्रसेनांना असं कुणीही काहीहीबोलू शकतं, हे तिच्यासाठी अशक्यच होतं. एकदाचं तिने ती स्वत: अप्सरा नाहीय या विधानावर विश्वास ठेवलाही असता. पण श्री कुबेरांचं असं इंद्रसेनांवर भडासणं विश्वास ठेवण्याच्या पलिकडंच होतं. त्यामुळे ती चक्क बेशुध्द पडली. तिचं बेशुध्दपडणं इंद्रसेनाच्या जिव्हारी लागलं. श्री श्री रवीशंकरांच्या ग्रेट ग्रेट ग्रँडपांनी शिकवलेलं जिव्हा नियंत्रण तंत्र ते त्याक्षणीविसरले नि त्यांची जिव्हा नुसती गोमेसारखी वळवळली. इमानेइतबारे सेवा देणाऱ्या श्री कुबेरांवर नको नको त्या शिव्यांच्यावर्षावच झाल्या. पुढे याच शिव्या सर्व जगात पसरल्या. स्थिरावल्या आणि सन्मानित सुध्दा झाल्या. शिव्यांचा जन्म झाला तोअसा आणि तो क्षण असा. याची साक्षिदार ती प्रथमश्रेणीत उत्तीर्ण अप्सरा राहू शकली असती. पण बेशुध्द पडून तिने ती संधीगमावली.
असो. या शिव्यांच्या वर्षावानं श्री कुबेर गळपटलेच. नरकासुर श्रीरामासारखा वागू लागला तर श्रीकृष्णाचं जे झालं असतंतेच श्री कुबेराचं झालं. ते गारठले. त्यांना हा धक्का सहन झाला नाही. स्वर्गाच्या खजिन्याला अलिबाबाची गुहा दाखण्याचंअपिवत्र कार्य श्री कुबेरानंच केलय. असं इंद्रसेनांनी शिव्या देण्याच्या ओघात ठोकून दिलं. खर तर चाळीस चोरात अडतिसावाचोर श्री कुबेरच असल्याचं , त्यांना म्हणावयाचं होतं. पण ते त्यांनी तसं सांगण्याऐवजी असं सांगून टाकलं. इशारा काफीथा. श्री कुबरेनांना मेल्याहून मेल्यासारखं झालं. हेच काय फळ मम तपाला. असं ते बोलून धाय मोकलून रडू लागले. जा रे जागध्याच्या ढुंगणात असं रागारागानं खेकसून,बेशुध्द पडलेल्या प्रथमश्रेणीत उत्तीर्ण झालेल्या त्या नूतनशील अप्सरेला सोडूनपाय आपटत इंद्रसेन घटनास्थळातून प्रस्थान करते झाले. तिथं थांबून उपयोगच नव्हता. अश्रुंचा बांध फुटण्याआधी निघणंश्रेयस्कर होतं. हे त्या कठिण समयीही श्री कुबेरांच्या लक्षात येताच त्यांनीही तिथून काढता पाय घेतला. आता हे दु:ख दूरसारण्याचा एकमेव उपाय आणि दिशा त्यांना दिसत होती. ते म्हणजे देवर्षी नारदमुनींचे पेन्टहाऊस.
000
श्री कुबेर रडत, रेहकत, कुथत, कुंथत, अश्रूभरल्या नयनांनी ते देवर्षीच्या पेन्टहाऊसच्या दारी पोहचले.नारदमुनींच्यासेवकवर्गाने श्री कुबेरांना त्यांच्यापर्यंत पोहचवलं. नारदमुनींचे दर्शन होताच आतापर्यंत रडूबाईसारख फुटकळ मुख करुनबसलेले श्री कुबेर धाय मोकलून रडू लागले. नाक कापल्या गेल्यावर शुर्पणखा अशीच बोंबलली असावी. स्वर्गाच्या रिझर्वबँकेचा गव्हर्नर असा रेहकतोय म्हंटल्यावर नारदांना हर्षद मेहतांची आठवण झाली. कुबेरांचा हर्षद झाला की कुबेराला हर्षदभेटला याचा विचार त्यांची मनी आला. पण याविषयी नेमकं कुबेरच सांगू शकले असते. त्यांनी कुबेराला कवेत घेतलं. त्यांचीपाठ थोपटली. सोफ्यावर बसवलं. व्हाइट वाइन ऑफर केली.
श्री कुबेरांना किंचितसं हायसं वाटलं. त्यांनी आपलं मन नारदमुनींकडे मोकळं करायला सुरुवात केली. मात्र त्यांचे हुंदकेकाही थांबेना.
चाणाक्ष नारदमुनींनी ओळखलं की कुबेराच्या या हुंदक्यात इंद्रसेनासोबतचं जुनं देणंघेणं बरोबरीत करण्याची संधी दडलेलीआहे. त्याला तोंडघशी पाडण्याची संधी ते शोधतच होते. आर्थिक परिस्थितीचं काळं जोकर कार्ड समोर करुन महागाई, मनोरंजन आणि प्रवासभत्यात वाढ करण्यासाठी कायम नकार देणाऱ्या इंद्रसेनाला कोंडित पकडण्याची चांगली संधी आयतीचमिळाली होती.
त्यामुळे कुबेराचे हुंदके तिखट, मिठ आणि हळद आले यांच्या तडक्यासह व्यवस्थितरीत्या त्यांनी कैलासनिवासी महादेव,वैकुंठ निवासी नारायण, अयोध्या निवासी श्री राम, प्रभादेवीनिवासी सिध्दीविनायक, तिरुमालानिवासी तिरुपतीयांच्यापर्यंत पोहचवण्याचं काम केलं. परिस्थिती इराक, गाझापट्टी आणि युक्रेन पेक्षा गंभीर, अल्जेरियापेक्षा वर्स्ट, होंडूरसपेक्षा वाईट्ट
झाल्याचं या महनीयांच्या लक्षात आलं. या महानियांची एकमेकांमध्ये मोबाईलयना – मोबाईलनी झाली. चार्टर्ड विमांनाचीजुळवाजुळव करण्यात काही वेळ गेला. पण तिरुपती महाराजांचं व्यवस्थापनच उत्तम होतं. त्यांनी सारं काही विदीन फ्यूमिनिट्स मॅनेज केलं. चार्टर्ड एरोस्पेस शटल अरेंज केलं. त्यात स्वार होऊन श्री महादेव, श्री नारायण, श्री तिरुपती, श्रीसिध्दीविनायक,श्री राम,श्रीकृष्ण तडक अमरावतीत हजर झाले.
000
सगळी महनीय स्टारकास्ट नारदमुनींच्या पेन्टहाऊसी गोळा झाली. प्रोटोकॉलनुसार प्राथमिक पाद्यपूजा वगैरे आटोपल्यावरनारदांना श्री कुबेर एपिसोड त्यांच्यासमोर साभिनय सादर केला.
आयजीच्या जिवाजी बायजी होऊन बायांच्या संगतीत रमलेल्या इंद्रसेनांमुळेच प्रामाणिक, पारदर्शक आणि म्हणूनचपवित्र असलेल्या श्री कुबेरावर अश्रू ढाळण्याची वेळ आल्याचं स्टारकास्टच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. बिनकामाचाअसूनही इंद्रसेन कोणत्यातरी कलमानुसार इंद्रप्रस्थाच्या गादीवर बसला होता. हे कधीच या स्टारकास्टला रुचलेलं नव्हतं. तोकाटा त्यांनाही सलतच होता. त्यामुळे हा काटा काढून सल मिटवण्याची संधी आता आयतीच मिळाली होती.
स्टारकास्टने एकमेकांच्या नयनी इशारे करुन इंद्रमहाली कूच केलं. इंद्रसेनांना धारेवर धरुन विशेष दरबाराचं आयोजनकरण्याचं फर्मान सोडलं.
बाण बरोबर लक्ष्यावर बसल्याचं नारदांनी ताडलं.
000
देवांचा राजाबिजा असला तरी इंद्रसेन या स्टारकास्टला वचकून होते. ते कधीही त्यांच्या वाटेला जात नसत. वाघालानमस्कार केल्यानं काहीच फरक पडत नाही. असा अर्थहीन सुविचार त्यांनी कधीतरी वाचला होता. त्याचे त्यांनी आतापावेतोतंतोतंत पालन केलं होतं. आताही तेच केलं. स्टारकास्ट काय चार दिवसाचे वाजंत्री आणि दोन दिवसाचे वऱ्हाडी. त्यांचीखातीरदारी केली की पुढे काही शतकं रान मोकळं आणि महाल ढोकळं. त्यामुळे कोणतेही आढेवेढे न घेता इंद्रसेनांनी विशेषदरबार भरवला.
000
या विशेष दरबारी सर्व महनीय स्टाकास्टच्या समोर श्री कुबेरानं रिता होत असलेल्या खजिन्याच्या वृत्तांत अश्रू ढाळतसांगितला. वसुंधरा पुत्र टॉम क्रुझ, वसुंधरा सुकन्या ऐश्वर्या रॉय, वसुंधरा राजपूत्र रणबीर कपूर यांचे खजिने, जेष्ठ आणिकनिष्ठ भ्राता अंबाणी भाऊरावांचे आणि सर्व शिक्षण संस्थाचालकांच्या तिसऱ्या पिढिचे खजिने हे दिन दुने रात चौगुने भरतअसताना स्वर्गाचा खजिना रिता रिता व्हावा हे विपरित आहे.विचित्र आहे. आणि वैफल्याला निमंत्रण देणारं असल्याचं कुबेरानंसांगून टाकलं.
इंद्रसेना, पैसे झाडाला लागत नाही, शेतात उगवत नाही. पाण्यात पिकत नाही, हे लहानपणी पिताश्रींनी सांगितलेलंसुवचन विसरलास कसा? महादेव म्हणाले.
तुला फक्त आठवण राहते ती नव्या अप्सरेच्या डोक्यात माळलेल्या फुलांच्या रंगांची. विष्णू बोलले.
कल्पवृक्ष नावाची फोक वसुंधरेच्या पुत्रांना सांगूनही बरीच शतके लोटली. तू या फोकानाडीच्या रम्य स्वप्नातच दिवसरात्ररममाण राहतोस रे. ब्रम्हदेव बोलले.
लक्ष्मी चंचलच नाही तर हॅरी पॉटरच्या जादूसारखी असते. युव केलं की छू मंतर. छू मंतर केलं की फू. तुला कळल कसंनाही. तिरुपती महाराज म्हणाले.
पहिलीच्या पोरांनाही हे कळत असताना तू असा कसा रे अजून नर्सरतीच. श्रीरामाने कान टोचलं.
000
असा काही भडिमार होईल. क्षेपणास्त्र अंगावर पडतील. हे इंद्रसेनांनी अपेक्षितच केलं नव्हतं. आताचा पेपर अवघडचनव्हता तर प्रश्न सिलॅबसच्या डोक्यावर बसणारे होते. त्यामुळे इंद्रसेनांना रडू कोसळलं. आता शरणागती पत्करण्यावाचून दुसरापर्याय नव्हता. वाघाला नमस्कार करण्याचा सुविचार त्यांना आठवला.
खजिना भरण्यासाठी आता काय करावं, तुम्हीच सांगा, रडकुंडिला आलेले इंद्रसेन गुडघे टेकत म्हणाले.
सर्व देवांनी एकमेकांकडे बघितलं. कुणालाही निश्चित उपाय सूचेना.
काहीच करता नाही आलं तर मी माझा फंड ट्रान्सफर करीन इकडे, तिरुपती महाराज म्हणाले.
तो तात्पुरता उपाय झाला .शिवाय वसुंधरेची सुपूत्रं त्यात बऱ्याच कायदेशीर अडचणी निर्माण करतील. त्यामुळे एकखडकूही इकडे यावयाचा नाही. श्रीकृष्ण म्हणाले
मग आता काय करावयाचे? इंद्रसेन येऊन म्हणाले.
हे मंथन या टप्प्यावर आले. धिरगंभीर चर्चा सुरु झाली आणि हाच तो टप्पा जिथे आमचा प्रवेश झाला.
000
खरच बाय गॉड.आम्ही प्रवेशलो.
आम्ही सर्व महनीय स्टारकास्टचे भक्त असल्यानं कोणत्या ना कोणत्या वर्षी कधी केदारनाथ, कधी द्वारका, कधीजगन्नाथपुरी, दरमंगळवारी प्रभादेवी आणि अनंत वेळा तिरुपती येथे दर्शनवारी केल्यानं साऱ्या स्टारकास्टला आम्हीपरियचाचे वाटलो. त्यांच्या मुखी स्मित आलं. पण इंद्रसेनांचा आमचा काहीच परिचय नव्हता. त्यामुळे आम्ही त्यांना आगावूआगंतूकच वाटलो. आमच्या अटकेचा आदेश त्यांच्या मुखातून सुटण्याआधीच तिरूपती महाराज आमची वास्तुपुस्त करतेझाले.
भक्तशिरोमणी इथे कसा काय नेमक्या वेळी आलास रे.
पूर्वी नेमक्यावेळी देव यायचे.आता मानवासही शक्य झाले गोंविदा ते. आम्ही तिरुपती महाराजांकडे भक्तिभावाने बघतम्हणालो.
अत्युत्तम. महादेव उद्गारले
आमचं आगमन ही ऐतिहासिक घटना आहे महादेवा असं समजा.
कसं बुवा ?
महादेवा, आम्ही फायनांस कंट्रोलर आहोत. तुमच्या या इंद्रसेनांनी जो स्वर्गाच्या खजिनाच्या खटारा केलाय ना तो पुन्हातुमच्या दिमतीला साजेसा करण्याची क्षमता आहे आमची देवा.
अरे वा..वा
मग करा की सुरुवात. श्रीकृष्ण म्हणाले
00
झालं आम्हाला संधीच मिळाली. आम्ही पॉवर पाईंट जनरेशन युगाचे बांशिंदे.
मग काय विचारता. आमची जिव्हा पॉवर पाँईट झाली आणि पुढे असं घडत गेलं…
आम्ही स्टारकास्टला सुचवलं,
तुम्ही आयआयटीच्या प्रवेशासाठी कोचिंग क्लास काढा.
या पहिल्याच्या बुलेट पाइंट्सने सिध्दीविनायक एनर्जीटिकच झाले. त्यांच्या नेत्रपटलापुढे प्रभादेवीस्थित त्यांच्यानिवासाच्या आजुबाजूला आयआयटी कोचिंग क्लासेसच्या कायम होत असलेला जाहिरातींचा वर्षाव आला. त्यांच्यानिवासस्थानी येणाऱ्या वृत्तपत्रांचा शुभप्रारंभ बातम्यांनी होण्याऐवजी या कोचिंगक्लासच्या जाहिरातींनी होतो, हा बदलहीत्यांनी अचूक टिपला होता. आयआयटी कोचिंग क्लासचे प्लॅटिनम पर्व महाराष्ट्रदेशीच नव्हे तर संपूर्ण आर्यवर्तातच आल्याचेहीमुषकस्वामीं आणि त्यांच्या भक्ताने त्यांच्या निदर्शनास आणलं होतं. सिध्दीविनायकांनी इंद्रसेनांच्या दरबारात सविस्तरपणेमांडलं.
आयआयटी कोचिंग क्लासेस हे स्वर्गाच्या खजिन्यासाठी कल्पतरुवृक्ष ठरु शकतो याकडे सिध्दीविनायकांनी लक्ष वेधलं. सिध्दीविनायकांच्या चौकस बुध्दीचं सर्वांनी कौतुक केलं. सर्व स्टारकास्टने आमच्यावर अभिनंदनांचा वर्षाव केला.
000
पण हे काही कुबेरप्रेकरणाचं द एंड नव्हतं.
मध्येच एक उपकथानकही घडलं.
000
सिध्दाविनायकांचं बोलणं संपताच श्री विष्णू नारदमुनीवंर गरजले..
नारदा, तू वारंवार पृथ्वीवर भ्रमंतीस जातोस, तुझ्या कसं लक्षात नाही आलं या आयआयटी कोचिंग क्लासकल्पवृक्षाबद्दल.
नारद त त त प प प करु लागले.
इंद्रसेना ,नारदाचा आतापर्यंतचा टीएडीए खारीज करुन टाका. कुबेराचा खजिना यांच्या प्रवासभत्यात आणिखाणेपिणेभत्यातच रिता होत चाललाय. आता फुकट फौजदारी बंद. जोपर्यंत 10 लक्ष विद्यार्थी कोचिंग क्लासमध्ये नारदआणत नाही तोपर्यंत त्यांना पुढचा दौरा देऊ नका, महादेव गरजले.
दुसऱ्याचं घर जळावं म्हणून लावलेली आग कधीकधी आपल्यावर उलटते, याचा अनुभव नारदांना यानिमित्त आला. मानखाली घालून ते मटकन खालीच बसले. आम्ही कसं बसं हसू आवरलं.
000
चर्चा पुढे नेणं हे आमचं कर्तव्य ठरत होतं. कारण आयआयटी कोचिंग क्लासेस ही धनाची पेटी असली तरी खजिनाभरण्यासाठी ती पुरेशी नव्हती. त्यापलिडकचा विचार फायनान्स कंट्रोलरला करावा लागतो. आम्ही तेच केलं.
आम्ही सांगितलं की,
आता सातवी आठवी पासूनच आयआयटी कोचिंग क्लास निघाले आहेत. सर्वज्ञानी आणि सर्वशक्तीमान देवांचे कोचिंगक्लासेस त्यापलिकडचे हवेत
याचा अर्थ काय ?
आचा अर्थ असा की तिरुपती महाराज, की आता बाळ आईच्या गर्भात असतानाच ते उत्तम निपजावं यासाठी विविधसंस्कार केले जातात.
मग..
याच धर्तीवर आता आयआयटी कोचिंग संस्कार हे राइट फ्राम डे वन म्हणजे गर्भधारणा झाली की त्याक्षणापासूनच सुरुवातकरायचे.त्यासाठीचे संस्कारक्षम वर्ग सुरु करायचे. त्यानंतर आयआयटी संस्कारघुटी ते मंत्र आणि तंत्र सारं काही दयायचं. फक्तदेवांनाच ते शक्य आहे. मुलाचा पहिला टाहो आई असा नव्हे तर आयआयटी म्हणून होण्याची क्षमता देणारे हे मंत्र आणिसंस्कार राहतील. हमखास गॅरंटी. तिरुपती ब्रँड आणि सिध्दीविनायक ब्रँड नाव देऊ आपण आयआयटी कोचिंग घुटिंना. बायकोचा नवऱ्यावर असता ेना त्यापेक्षा पन्नासलक्ष पट विश्वास आहे मनुष्यप्राण्याचा या दोघांवर. रांगांवर रांगावर रांगलागतील या घुटिंना हस्तगत करण्यासाठी आणि आयआयटी कोचिंग गर्भसंस्कार नोंदणी करण्यासाठी.
या घुटीची महा-निर्मिती करण्याची प्रेरणा तिरुपती महाराजांनी त्यांचे महाभक्त ज्येष्ठ भ्राता मुकेश अंबाणीला द्यावी. तेत्यांच्या मुंबईच्या आसपास असणाऱ्या एसइझेड जागेत याचा कारखाना दोन दिवसात सुरु करतील. तिरुपती-रिलायन्ससहकार्याचं नवं पर्व सुरु होईल. रिलायन्स म्हणजे विश्वास आणि तिरुपती म्हणजे महाविश्वास. विश्वास प्लस महाविश्वास यांचंडेडली कॉम्बिनेशन टाटा प्लस अंबाणी ( समजा यदाकदाचित कधीतरी झालच तर ) सारखं डेडली कॉम्बिनेशन ठरु शकतं.
या उद्योगात दडलेल्या लक्ष्मीची व्हॅल्यू ज्येष्ठ भ्रातांच्या काही सेंकदात लक्षात येईल. प्रॉडक्ट निर्मिती ते विक्री व्यवस्थापनसारं काही तेच आनंदानं करतील. प्रत्येक घुटीमागे एक टक्के नफा ते कुबेराच्या खजिन्यासाठी व्हाया तिरुपती महाराज देतील. तिरुपती महाराज ही टक्केवारी कुबेराच्या खजिन्याकडे डायरेक्ट ट्रान्सफर करतील. बघता बघता कुबेराचा खजिना पुन्हा भरुनजाईल.
रिझर्व बँक ऑफ स्वर्गाचं वैभव पुन्हा परतेल..
एका दमात मी हे सुरम्य स्वप्न महनीय सुपरस्टार देवतांच्या पुढे ठेवलं. ते जरी अरेबियन नाईटच्या सुरस कथेसारखं वाटतंअसलं तरी त्यावर अजिबात विश्वास ठेवायचा नाही. कारण ही कथा नसून वास्तव आहे. जगात काहीही घडू शकतं, असंबराका ओबामा म्हणतात आणि मोठी स्वप्न बघण्यासाठी पैसे लागत नाही, असं ज्येष्ठ भ्राताश्रींचे पिताश्री धिरुभाईम्हणायचे. जेव्हा दोन महान व्यक्तिमत्वांच्या कथनामध्ये सत्याचाच सूर असणार हे नक्कीच. ही बाब महनीय सर्वस्टारकास्टच्या लक्षात यायला क्षणही लागला नाही.
अरे मग वेड्याच्या बाजारा, सिध्दीविनायक माझ्याकडे वळून म्हणाले.
मी चमकून त्यांच्याकडे बघितलं. मकरंद अनासपुरी भाषा कशी काय सिध्दीविनायक मुखी, हा प्रश्न आमचा मुख सपाटकरुन गेला.
अरे असा चमकू नकोस, असं बोललं की भेज्यात लवकर शिरतं.
पण,विनायका जरा थेट बोलना..महादेव म्हणाले
अहो पितामहाराज, आयडीया किसकी आणि मुर्गी तिसऱ्यालाच कां..
म्हणजे ?
अहो, ही आयआयटी कोचिंग घुटिका कल्पना या आपल्या भक्तशिरोमणीस सुचलय. जो डिफरंट सोचते है, े वो बडेहोते है.
मग..
या भक्तशिरोमणीलाच मोठं होऊ दे ना …
म्हणजे..
अहो श्रीरामा, तिरुपती-रिलायन्स आयआयटी कोचिंग घुटीच्या उत्पन्नातला एक टक्का उत्पन्न कां द्यायचं कुबेराच्याखजिन्याला..
हा आयतोबा इंद्रसेन पुन्हा ही संपत्ती उधळून टाकेल, श्रीकृष्णानं शंका व्यक्त केली. या शंकेवर इतर सर्व सुपरस्टार देवांनीसहमती दर्शवली.
मग,ही टक्केवारी कुणाकडे वळती करायची ? महादेवांनी विचारलं.
अहो हा एक टक्का या आपल्या भक्तशिरोमणीच्याच बँक खात्यावर ट्रान्सफर करु याना.
पण मग कुबेराचा खजिना रिताचा रिताच राहणार…
राहू द्या की.. पूर्ण खाली होऊ द्या. बँक पूर्ण तळास जाईल तेव्हाच कळेल इंद्र्याल्या बँक ऑफ अमेरिका बुडल्याचं दु:ख..
महादेव म्हणाले. रिझर्व बँक ऑफ स्वर्ग आणि बँक ऑफ अमेरिकेचा कोणता संबंध महादेवांना जोडायचा होता हे इतर देवांनाकाही कळलं नाही.पण महादेवांना प्रश्न विचारण्याची हिम्मत कशी करणार? त्यामुळे मंडळी गप्प राहिली.
000
गोष्टीतला हा व्टीस्ट अनपेक्षितच आणि अनवट होता. बराक ओबामा म्हणाले दुनियामे कुछ भी हो सकता है. ते आमच्याबाबतीत खरं ठरण्याची चिन्ह दिसू लागताच धिरुभाई म्हणाल्याप्रमाणे आम्ही बडे सपने तिथल्या तिथे बघू लागलो.
रिझर्व बँक ऑफ स्वर्गाचे गर्व्हनर जनरल, मुक्काम पोस्ट बांद्र पूर्व,असं आम्हीचं आमचं दर्शन घेऊन टाकलं.बँकेला एकचगर्व्हनर जनरल असतो.त्यामुळे अर्थातच श्री कुबेरांना ती जागा रिक्त करणं भागच होतं.
रिकामटेकडया इंद्रसेनांसोबत आम्ही स्वर्गात काम करुच शकत नाही, असं आम्ही सुपरस्टार देवांजवळ घोषित करुनटाकलं.
अगदी बरोबर बोलल्यास माझ्या तुरीच्या पुरी, श्रीगणेश अनासपुरी ट्रान्समध्ये आम्हाला पाठिंबा देत म्हणाले. श्री गणेशहे सर्व देवांमध्ये सर्वात लहान असल्यानं त्यांचं म्हणणं ऐकून इतर देवांनी रिझर्व बँक ऑफ स्वर्ग,पृथ्वीतली आणण्याचानिर्णय एकमुखी घेतला. इंद्रसेनांच्या हाती खडकू आणि कुबेराच्या हाती दडकू.हे सत्य आहे हं…खोटं असल्यास एकदाचव्हिजिट करा अमरावतीला.बरं का…
0000
पण कुबेराच्या हाती दडकू, हे काही आमच्या संवेदनशील मनाला पटेना. काही का असेना त्यांनीच रिझर्व बँक ऑफस्वर्गाला आता आतापावेता स्वर्गीय होऊ दिलं नव्हतं. इंद्रसेनांनी त्यांना सहकार्य केलं असतं तर ही परिस्थिती ओढवली नसती. ही बाब लक्षात घेऊन आमच्या ह्रदयाला पाझर फुटला.
आणि आम्हास त्याक्षणी आठवलं की, पृथ्वीतली चीन प्रांती शांघाय नगरीत ब्रिक्स नामे एक मोठ्ठीच बँक लवकरच सुरुहोतेय.या बँकेच्या अध्यक्षपदासाठी श्री कुबेरांपेक्षा कोण बरे लायक उमेदवार राहू शकेल.
पुढील काही महिन्यात ब्रिक्स बँकेचे पहिले अध्यक्ष श्री कुबेर झाल्यास मंडळी आश्चर्य वाटू देऊ नका. कारण आम्ही स्वत: चीनच्या पंतप्रधनांशी रदबदली केलीय.
नरेंद्रभाईंशी जस्ट बोलतोच नि फायनलच करतो श्री कुबेरांची नियुक्ती असं आश्वासन दिलाय बॉस आपणास त्यांनी..
000
माझं काय, इंद्रसेन धाय मोकलून रडू लागले.
इंद्रसेन का, रडतोस कां रे. वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजनेत तुझं नाव टाकून देतो ना. यायोजनेचे साहेब आपले फारमोठे भक्त असून दर मंगळवारी मंदिर वारी चुकत नाहीत. सिध्दीविनायक इंद्रसेनांना सांत्वना देत म्हणाले.
ही सांत्वना ऐकावी की बेशध्द पडावे हा प्रश्न इंद्रसेनांना पडला.
या प्रश्नाच्या उत्तरात अजूनही ते चाचपडत आहेत बघा..
000
सुरेश वांदिले,