(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

घुसतो तो कसाब

आमच्या घरी आजकाल तीन-चार तरी पेपर येतात. हे सांगून मी माझी कॉलर टाईट करत नाहीय.कारणतुमच्या घरी सुध्दा चार-पाच पेपर येऊ शकतात, याची मला जाणीव आहेच. अहो, आज-काल पेपर घेणंफार सोप्प झालय ना. अनंत स्किम्स काढल्या आहेत,पेपरवाल्यांनी. इतकी रक्कम आगावू द्या, पेपर वर्षभरपडत राहणार. बरं ही रक्कम फारच शुल्लक. ती सुध्दा पेपरवाले कां मागतात? हा सवाल मला खूप दिवसपडला होता. पण काही प्रश्न सोडवायचेच नसतात, असा,शालांत परीक्षेला असल्यापासूनचा आमचा खाक्याआहे. याचा सिम्पल अर्थ असा की आम्हाला जे प्रश्न येत नाहीत, ते आम्ही सोडवत नाहीत. अगदीविद्यापीठाच्या परीक्षेतही आम्ही हा खाक्या कायम ठेवला.

   पेपरवाले मोफतच पेपर देण्याची स्किम कां राबवत नाहीत. या प्रश्नाचं उत्तर मिळविण्याच्या फंदात आम्हीपडलो नाही. या प्रश्नाचं उत्तर मिळविण्यापेक्षा या स्किम्सचा फायदा घेणं हे अधिक फायदेशिर असल्याचंआमच्या लक्षात आलं. कारण जेव्हढे पैसे वर्षभराच्या वर्गणीसाठी देतो, त्याच्या किमान सव्वापट रद्दीतून वसूलकरता येतात, हे आमच्या लक्षात आलं.त्यामुळेच एकाच पेपरची वर्गणी दोनदा भरयाला आम्ही  सुरुवात केली.

   शेजारच्या देशपांडयाने एकदा आमच्या या एका पेपरची दोन वर्गणी भरण्याच्या प्रकरणी आपलं नाकखुपसलं. तेव्हा आम्ही त्यांना एक पेपर माझा आणि एक पेपर बायकोचा, असं बाणेदार उत्तरदिलं.बायकोसाठी स्वतंत्र पेपर घेणारा मी ,देशपांडेला महामूर्ख वाटलो. कारण देशपांडया स्वत:साठीही पेपरघेत नाही.

   महागाईचे कृष्णमेघ गडद झाले असताना, फक्त पेपरलाच स्वस्ताई कशी काय परवडू शकते. असा प्रश्नमला पडायला हवा होता. पण तो मला पडला नाही, त्यामुळे देशपांड्‌याच्या इटुकल्या मेंदुला हा प्रश्न पडायचाप्रश्नच नव्हता. पानटपरीवरच्या पानापेक्षाही पेपर स्वस्तात मिळतो, हे त्याला अद्याप कळलेलं नाही. ते त्यालाकळलं तरी तो पेपर घेणारच नाही. हा भाग अलाहिदा. काही पेपरवाल्यांनी एक पेपर घेतल्यास दुसरा मोफतअशी, एक निकर घेतल्यास दुसरी मोफत,या स्टाईलनं विकायला सुरुवात केली आहे. हे ही देशपांड्‌याच्याकानावर नाही.समजा हे गेले असतं, तरी त्याने पेपर विकत घेतलाच नसता. त्याला एकावर एक वस्तू मोफतचालतं किंबहुना तो अशा स्किमच्या शोधातच असतो. पण पेपर मात्र स्ट्रिक्टली नो नो. कारण त्याच्या एकाबाजूला मी.दुसऱ्या बाजुला सोनकांबळे. आम्ही दोघेही पेपर घेणारे. एकावर एक फ्रीचाही फायदा घेऊन चारपाच पेपर घरी बोलावणारे. त्यामुळे देशपांड्‌याला फुकटात पेपर वाचायला मिळतो. त्याला नाही म्हणायचीसोय नाही.

“पेपरासारखी भुक्कड गोष्टही मोन्या म्हणजे आम्ही आणि सोन्या म्हणजे सोनकांबळे देत नाही,फारचलेकाचे खडूस आणि फत्रूड” असं देशपांड्‌या सोसायटीभर सांगत फिरणार. त्यामुळे भीक नको पण पेपरफुकटात बघ, अशी आम्हा दोघांचीही स्थिती.

   तर मुद्दा असा की,एकाच पेपरच्या दोन प्रती घेतो,हे जेव्हा आम्ही देशपांड्‌याला सांगितलं.तेव्हा त्यालाआश्चर्याचा धक्का बसला. त्यातला एक पेपर माझा,एक पेपर बायकोचा म्हंटल्यावर भूकपांनतर जमीन जशीहादरते तसा तो हादरला. बायकोसाठी स्वतंत्र पेपर,असं म्हंटल्यावर मी घरात नवी बाई किंवा माझ्याबायकोची सवत तर आणली नाही ना, असही त्याला वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्याचेहऱ्यावरचे भाव अगदी तसेच होते.

   आमच्या घरी एकाच पेपरच्या दोन प्रती येतात ही बातमी देशपांडेनं लगबगीनं सोसायटीत पसरवली. तुम्हीम्हणाल यात काय आला डोंबल्याचा बातमीचा विषय.पण सूर्याखाली असलेली प्रत्येक गोष्ट बातमीचा विषयहोउु शकते, असं चीन आणि अमेरिकेतील असमान विचार करणाऱ्या विद्वानांनी सांगून ठेवल्याचं तुम्हास ठाऊक नसलं तरी आम्ही ते जाणतो,म्हणूनच इतक्या ठामपणे सांगताये. तर त्या दोघांच्या म्हणण्याचा प्रत्यय ,आमच्या घरी येणाऱ्याएकाच पेपरच्या दोन प्रतिच्या देशपांडेकृत बातमीमुळे आला.

   आमच्या सोसायटीचं  स्वत:चं  न्यूज चॅनेल असतं तर ही बातमी ब्रेकिंग न्यूज म्हणूनही लागली व  सतत वाजत राहिली असती.आमच्या सोसायटीचं एफ.एम चॅनेल असतं तर कदाचित सेकंदा-सेकंदाला रेडियो जॉकी याबातमीला दळत बसला असता. असं काहीही नसताना सुध्दा आमच्या घरी येणाऱ्या,एकाच पेपरच्या दोनप्रतीची ,ही बातमी हॉटकेक सारखी सोसायटीतल्या प्रत्येक फ्लॅट मध्ये पोहचली.

   यावर सर्वसामान्य प्रतिक्रिया होती की, ” मानसिंगेला म्हणजे आम्हास, बाहेरची कमाई बरीच चालूदिसतेय बर का. त्याच्याशिवाय का,हे शक्य आहे. “

   आता एकाच पेपरच्या दोन प्रती घेण्यासाठी कशाला हवी बाहेरची कमाई. सगळयांना फक्त बाहेरच्याकमाईचा, बाहेरख्यालीपणाच सुचत असल्यानं त्यांना जिथे तिथे तसचं दिसतं. युवराज दुर्योधनास भीमसेन आणि आलमगीर औरंगजेबाला, संताजी- धनाजी जिथे तिथे दिसत असे,असं अनुक्रमे पुराणात आणि इतिहासात कुणीतरीखरडवून ठेवलय. त्याची ही आधुनिक आवृत्ती.

   दुसरी प्रतिक्रीया होती,”मानसिंगे स्वत:ला ओव्हरस्मार्ट समजतो. त्याचा हा परिणाम. स्वत: मुकेश अंबाणीआणि रतन टाटासुध्दा एकाच पेपरच्या देान प्रती घेत नसणार. हा काय मुकेश अंबाणीचा बाप आणि रतन टाटांचा आजोबा लागून गेला की काय?” या प्रतिक्रियेवर आम्ही काय प्रतिक्रिया देणार बरं.

   मुकेश अंबाणीचा पिताश्री धिरुभाई अंबाणी होते , आणि रतन टाटा यांचे आजोबा जेआरडी टाटा होते हेसुध्दा प्रतिक्रिया देणाऱ्याला ठाऊक नसावं? प्रतिक्रियाकार पेपर वाचत नाही,त्याचा हा परिणाम. दुसरं असंकी, हा प्रतिक्रिया देणारा बहाद्दर मुकेश अंबाणी आणि रतन टाटा यांच्या महाली कधी गेला होता, त्यांचं पेपरवाचन बघायाला. शिवाय मुकेश अंबाणी किंवा रतन टाटा सांप्रतकील पेपर तरी वाचतात का? हाही मुद्दा आहेच.इंटरनेटवर सर्व पेपर सक्काळी सक्काळी फुकटात वाचण्याची सोय झाली असताना, मुकेश आणि रतन, पै पैजमवून अब्जाधीशच्या पलिकेडे पोहचेले आधुनिक कुबेर कशासाठी पेपरसाठी खर्च करणार? हे नको कळायला,त्याप्रतिक्रिया देणा-याला.

आणखी एक मुद्दा असा की एकाच पेपरच्या दोन प्रती घेतल्यानं आम्ही ओव्हरस्मार्ट कसे काय झालोबुवा. मी ओव्हरकोट बद्दल एैकलं होतं.ओव्हरस्मार्ट बद्दलही एैकलं आहे. चा अर्थ जरा जास्तच आगावूपणाकरणारा स्मार्ट. म्हणजे तुम्ही मुळात स्मार्ट पाहिजे ना. आम्ही स्मार्ट आहोत काय? याचा तरी आधी त्याप्रतिक्रियाकर्त्याने शोध घ्यायला हवा ना. आम्ही स्मार्ट असतो तर कारकून कसा झालो असतो. आम्ही सलमानखान सारखे चित्रपटात नसतो का हिरो झालो. शिवाय, सलमानखान स्मार्ट असूनही तो पेपर वाचतचअसेल काय? हाही प्रश्नच नाही का?

   तिसरी प्रतिक्रिया होती, “मानसिंगेच्या घरी भानगड हाय. “एकाच पेपरच्या दोन प्रती घेतल्यानं, भानगडकशी काय होऊ शकेल? ही प्रतिक्रिया देणाऱ्याला सुचवायचं होतं की, मानसिंगे आणि त्याच्या कुटुंबाचंअजिबात पटत नाहीय. ते केवळ नावाला एकत्र राहतात. भांडणाची सुरुवात सुप्रभातीपासूनच होऊ नये म्हणूनएकाच पेपरच्या दोन प्रती ते घेतात.

   लग्नानंतरच्या पहिल्या वर्षानंतर कुणाचं तरी शंभर टक्के पटतं का हो आजच्या काळात. तेव्हाच्या काळातराजेश खन्ना आणि डिंपलच पटलं नव्हतं. आजच्या काळात ऋतिक रोषण आणि सुझान खान यांचं जुळलं नाही. आम्ही तर अतिसामान्य पामर. भांडयाला भांडं लागणारच नाही का? पण याचा अर्थ आमच्यामध्ये केवळभांडणापुरताच संबंध उरलाय असं म्हणणं हा दुष्टपणा झाला. त्याला काय माहिती की आमचा संबंध भांडणाएव्हढाच भांडी घासणं, भाजी चिरणं, भाजीपाला आणनं, भाडे (इलेक्ट्रिक, टेलिफोन इत्यादी)भरणं, भेळखाणं, भेजा फ्राय करणं, भजन म्हणणं, भायखळयाला जाणं, भरत जाधवसाठी सहि रे सहिसाठी पुन्हा पुन्हा जाणं,अशा अनेक भ+(रताड) गोष्टींसाठीही अद्याप उरलेला आहे ते.

   एक प्रतिक्रिया अशी होती की,”मानसिंगे चमचेगिरी फार करतो. म्हणून त्याच्या बॉसचाही पेपर तोचघेतो.” आता आम्ही चमचेगिरी करतो की नाही,हा वादाचा मुद्दा आहे.कारण चमचेगिरीची व्याख्या नाऑक्सफर्डवाल्यांनी केलीय ना कोकाटेंनी ना चाऊसने. चमचेगिरीच्या व्याख्येबाबत केतकर आणि कुबेर, रायकर, पानवलकर यांच्या प्रसंगपरत्वे व्याख्या बदलत असतातच की. आपलं हित बघून सरळ नाकानं काम करणारा सुध्दाचमचेगिरीच्या कॅटेगिरीत येऊ शकतो की नाही? गल्लित तिस्मारखाँ असलेला थोर पुरुष दिल्लीत चमचेगिरीचाआदर्श पुरुष होतोच की. पण त्या थोर पुरुषाला ते मान्य होईल का? चमचेगिरीची स्वयंस्पष्ट व्याखानसण्याचा हा परिणाम. त्यामुळे संबंधित प्रतिक्रियाधारकाने कशाच्या आधारावर आम्हाला त्या कॅटेगरीतबसवलं, हे कळत नाही.त्यामुळे त्याच्यावर आमच्या बदनामीचा खटलाच  दाखला करायचा,असं आमच्यामनानं पक्कं  घेतलं आहे.

   साहेबासाठी मी पेपर घेतो, अशी दंतकथा आमच्या सोसायटीत पसरली आहे, हे बॉसला कळलं तर तो आमचा खिमा नाही कां करणार? आमचा बॉस म्हणजे काही सोसायटीचा सचीव नव्हे. आमचा बॉस स्व:ताच्याखिशातून पैसे खर्च करुन पेपर विकत घेतही नसेल. पण साहेबानं पैसे खर्च कराययलाच हवे असाही काहीनियम नाही.पैसै खर्च न करता त्याला सर्वच काही विनासायास मिळतं. पेपरसारखी चिल्लर वस्तू दुसरीकोणती बरं राहू शकेल. प्रतिक्रिया सुध्दा चिल्लरच्या पलिकडे देऊ शकत नाहीत  ही मंडळी, याचाच मलाजास्त विषाद वाटला.

  आणखी एक प्रतिक्रिया अशी होती, “मानसिंगे हा दुसऱ्या घरासाठी असं करत असला पाहिजे.” हीप्रतिक्रिया अनाकलनीय होती. एका कारकुनाला एक घर नीट सांभाळता येणं जिथं कठीण कर्म,तिथे तोदुसऱ्या घराचं स्वप्न पाहायला धमेंद्र देवल थोडाच लागून गेलाय.प्रतिक्रिया देताना सुध्दा लोक कॉमनसेन्स कांबरं वापरत नाहीत?

   सोसायटीच्या बहुतेक सदस्यांना एकाच पेपरच्या दोन प्रति आम्ही विकत घेण्यामध्ये काळेबेरं असल्याचंवाटलं हे वरील प्रतिक्रियांवरुन दिसून येतं. या मंडळींचा या दोनवर आक्षेप कां बरं असावा? याचं आश्चर्यवाटत. आपल्या देशात हम दो हमारे दो, असा नारा अधिकृतपणे दिलाच जातो की नाही. हे या मंडळींनीलक्षात घेतलेलं नाही. कुणाच्या घरी दोन फ्रिज असतात. कुणाच्या घरी दोन टीव्ही असतात. कुणाच्या घरीदोन बेडरुम्स असतात. धमेंद्र सारख्या पुरुषश्रेष्ठाला दोन बायकाही राहू शकतात. गरज नसताना दोन दोनगाडया असतातच की नाही.(यात आणखी दोन चार गाडयांची भर घालणाऱ्यास लई भारी समजलं जातं.त्याच्याकडे कौतुकानं,बघितलं जातं.तो त्याचा पराक्रम समजला जातो.)असं असताना आमच्या घरी एकाचपेपरच्या दोन प्रती येण्यामागं काय काळेबेरं राहू शकेल?

   या काळेबेरेचा शोध घेण्याचं आमच्या सोसायटीच्या काही सदस्यांनी ठरवलं. अध्यक्ष आणि सचिवांनात्यांनी त्यासाठी भरीस घातलं. सोसायटीची सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली. आमच्याकडे येणाऱ्या एकाचपेपरच्या दोन प्रतिची चर्चा या बैठकित खमंगपणे करण्यात आली. देशपांडयासह प्रतिक्रिया देणारे सारेचजणया बैठकीला उपस्थित होते. आम्हाला विशेषत्वानं बोलावणं धाडण्यात आलं होतं.

   सोसायटीच्या काही सदस्यांनी पेपर घेणं न घेणं हा प्रत्येक सदस्याचा व्यक्तिगत प्रश्न असल्याचंसांगण्याचा प्रयत्न केला. “एक पेपर घेतला तर चालू शकतो हो,पण एकाच पेपरच्या दोन प्रती,म्हणजेसंशयाला जागा आहे.जिथे जिथे संशयला जागा असेल त्या सर्व जागांवर बारिक लक्ष ठेवण्याचं सरकारचचंसांगणं आहे. तेव्हा आपण मानसिंगेच्या या संशयास्पद वागणुकीवर लक्ष ठेवणं काहीच चूक नाही.”एकासदस्यांनं तर्क मांडला.

   “या अतिरिक्त पेपरचा उपयोग मानसिंगे काय करतो? तो जरी म्हणत असला की एक त्याच्यासाठी आणिएक बायकोसाठी. यावर विश्वास कसा ठेवायचा? तो दुसरा पेपर अबू सालेमसाठी असेल तर? आजच्या काळातकुणाचेही पाळं-मुळं कुठंही जावू शकतात.” तिसरा सदस्य म्हणाला.

   ही थिअरी कुणाच्या फारशी पचनी पडली नाही.

“मानसिंगे एक नंबरचा बुळा असल्यानं तो सालेम-बिलमच्या भानगडित पडणारच नाही. “असं माझ्याबुळेपणाची शंभर टक्के खात्री असलेला माझा विरोधक म्हणाला.

   “अहो आजच्या काळात जे दिसतं,ते तसं असतंच असं समजायचं नसतं.त्यामुळेच आपली फसवणूकहोते की नाही. नित्यानंद स्वामी बघा ना.वरुन वरुन देवपुरुष.पण प्रत्यक्षात तुमच्या आमच्या सारखाच स्खलनपुरुष.तसंच मानसिंगेचं राहू शकतं.दुसरी प्रत तो अबूलाच देत असला पाहिजे. “असं आग्रही प्रतिपादन केलंगेलं.

   “पण मानसिंगे ,ही दुसरी प्रत कशाला बरं  देत असेल कसाबला? “

   “कशाला म्हणजे? अबूला पेपर बॉम्ब बनवायला. “

   “बापरे बाप. ” सदस्य एका दमात म्हणाले. त्यांचा तो दमदार आवाज एैकून आमचा दम जातो कीकाय असं आम्हास वाटू लागलं.

   “एकदा का पेपर बॉब्म तयार झाले की तो सर्व मुंबईभर पेरणार. “आणखी एक सदस्य म्हणाला.

   “अहो तो कसा पेरणार? तो तर तुरुंगात आहे ना. “

   “त्याने कशाला बाहेर पडायला हवं.मानसिंगे सारखे मुर्ख माणसं असतातच की मदतीला. पण या मूर्खमानसिंगेला कळायला नको का ते. “

   “अहो त्याला तरी कुठे ठाव असणारं ते.पण तुम्हाला कसं बरं कळलं की अबू पेपरबाम्ब बनवून मुंबईभरपेरणार ते.” एकाने  सवाल उपस्थित केला. या सवालाने तो सदस्य जरा सावरासावर करु लागला.

   “म्हणजे असं घडू शकतं,असं मला म्हणायचं होतं.कारण दररोजच्या पेपरचं तो करणार तरी काय?शिवाय जेलमध्ये शी स्वच्छ करायला पेपर नाही तर पाणी लागतं” अशी अमूल्य माहिती त्याने पुरवली.

   “मानसिंगे कसाही असला तरी तो अबू-फबू पर्यंत जाणं शक्य नाही” असं शेवटी बहुमत झालं. आणिमाझी अबूच्या तावडीतून सुटका झाली.

   पण प्रश्न इथे संपला नाही. कारण पुन्हा चर्चा मूळ मुद्यावरच आली होती. मानसिंगे कशासाठी एकाचपेरच्या दोन प्रति घेतो ते. ” या प्रश्नाची तड नाही लागली तर आपल्या सोसायटीला धोका उत्पन्न होऊशकतो. “असं एकानं निदर्शनास आणलं.

   “या धोक्यापासून आपला बचाव करण्यासाठी मानसिंगेलाच सांगाना एका पेपरची एकच प्रत घ्यायला.तसा ठराव करु या. हा ठराव त्याला मान्य नसेल,तर त्याला सोसायटीतून हाकलून लावू या” एकजणम्हणाला.

   “पण सोसायटीच्या बायलॉजमध्ये एखाद्याला हाकलून लावण्यासाठी हे कारण नमूद नाही. त्यासाठीबायलॉज बदलावे लागतील. “सचिवांनी स्पष्ट केलं.

   आमच्याकडे येणाऱ्या एकाच पेपरच्या दोन प्रतिच्या प्रश्नाचं करायचं काय? यावर सोसायटीच्या सदस्यांचंएकमत होईना. त्यामुळे काही सदस्य हमरीतुमरीवर आले. अध्यक्ष आणि सचिवांना त्यांनी धमकावलं सुध्दा.आमच्याकडे येणाऱ्या  दोन प्रतिमध्ये बहुतेक सर्वांनाच रहस्य वाटू लागलं होतं. हॅरी पॉटरने व्हाल्डेमॉचं  रहस्यउलगडलं होतं.कट्टपानं बाहुबलीला कां ठार केलं होतं याचंही रहस्य उलगडलं होतं. पण आमच्याकडे येणाऱ्या एकाचपेपरच्या दोन प्रतिच्या (सिम्पल)रहस्याच्या मुळापर्यंत त्यांना पोहचताच येईना.

   “आपल्या देशात घटनेनं व्यक्तिस्वातत्र्य दिलं आहे.त्यामध्ये हे करता येईल नि ते करता येणारनाही,अशी स्पष्टता आहे.पण एकाच पेपरच्या दोन प्रती घेऊ नये अस कुठही नोंदवलेलं नाही” ही बाब आम्हीसोसायटीच्या निदर्शनास आणली.

   “हा खोटा बोलतोय”, देशपांड्‌या तिथेच कोकलला. घटना दाखवा म्हणाला. आता ही घटना आम्हीआणणार तरी कुठून. पण आम्हालाही चेव चढला. आम्ही तिथेच देशपांडेला फटकारले,

   “देशपांड्या. तुझं म्हणणं खरं करुन दाखवायचं असेल तर तू आण ना घटना.आमचं म्हणणं खोट असेलतर आम्ही दोन खेटरं मारुन घेऊ आणि तुझं म्हणणं खरं निघालं तुला दोन खेटरं मारु” देशपांड्‌याला याचंकाहीच वाटलं नाही. त्याचा चेहरा खेटरं मारल्यासारखा होईल असं आम्हास वाटलं होतं. पण तसं काहीचझालं नाही.तो ताडकन उठला नि म्हणाला.

   “गुन्हेगारानचं आपण निर्दोष असल्याचं सिध्द करायचं असतं. समजल का? कसाबला सुध्दा त्याचंनिर्दोषत्व सिध्द करण्याची संधी दिलीच की नाही आपण. मग तू कोण लागून गेला आहेस एवढा शहनशहा. ” देशपांडेचा तर्क सोसायटीच्या सदस्यांचा पचनी पडल्याचं दिसलं.

   देशपांड्यानं आम्हास आता  या जगाचा कायमचा निरोप घेतलेल्या कसाबच्या लायनित अलगद आणूनसोडलं.. मात्र काही सदस्यांना देशपांडेतला खुटीउपाडपणा लक्षात आलाच. त्यांनी देशपांडेलाच सुनावलं.

   “देशपांड्या तुला एक पेपर विकत घ्यायचा म्हंटलं तर तुझ्या पँटिला भोकं पडल्याचं कारण सांगतफिरतोस आणि याच्या त्याच्या घरी घुसतो पेपर वाचण्यासाठी.जसा कसाब मुंबईत घुसला होता ना.तसाच.”कुणी तरी म्हणालं.

   “एखाद्याचा घरात घुसतो तो कसाब” अशी नवी व्याख्या तिथं जन्माला आली. देशपांडे कसाब बनून  सोसायटीतल्या प्रत्येकाच्या घरी कधीकधी ना कधी घुसला होता.त्यामुळे या व्याखेचं सर्वांनी टाळया वाजवूनस्वागत केलं.

आमच्याकडे येणाऱ्या एकाच पेपरच्या दोन प्रतींवरची चर्चा ऍ़केडमिक होईल अशी माझी अपेक्षा होती.मानसिंगे कारकून असूनही वाचनसंस्कृतिला चालना देतो, एका प्रतीएैवजी दोन प्रती घेऊन पेपरवाल्यांना श्रीमंतकरतो. पेपरवाले श्रीमंत झाल्याने पेपर वाटणारे, पेपर विक्रिचे एजन्सी घेणारे, पेपरमध्ये काम करणारे शिपाईते संपादक ते व्यवस्थापक वर्गाला उत्तम पगार देण्यासाठी हातभार लावतो, अशी समाजवादी चर्चा होईल.अशी अपेक्षा होती. पण ही चर्चा, घुसतो तो कसाब ,या व्याख्येला जन्म देऊन संपली.

झालं ते बरचं झालं असच मला वाटलं.

   सभा तशी अनिर्नित संपली. आमच्या विरुध्द सभेत बोलणाऱ्यांनी आमचं अभिनंदन केलं.

देशपांड्‌याची घुसखोरी आमच्याकडे येणाऱ्या एकाच पेपरच्या दोन प्रतिंमुळे अशी चव्हाट्यावर आणताआली,याचा आंनद साऱ्यानांच झाला होता.

   देशपांड्‌यानं  कधीचाच पोबारा केला होता..

   000

   सुरेश वांदिले