गाडी पुरतीच पंक्च्र
सामान्य ज्ञान संवर्धन आणि व्यक्तिमत्व विकास हे आपलेइतिकर्तव्यच आहे असे मनापासून समजणाऱ्या गुरुजींनी गेल्याआठवड्यात वर्गात जे काही घडलं त्याच्या कटूस्मृती स्वत:च्या मनरुपीहार्डडिस्क वरुन पूर्णपणे पुसून टाकल्या. आणि नव्या आठवड्यात त्यांनीपुन्हा एकदा वर्गाचे सामान्य ज्ञान संवर्धनाचे आपले व्रत जुन्याच उत्साहानेपुढे सुरु ठेवले.
वर्गात आल्या आल्या त्यांनी विद्यार्थ्यांना आपला उदात्त हेतूसांगितला. विद्यार्थ्यांना गुरुजींवर दया आली. आपल्या सामान्य ज्ञानसंवर्धनाची गुरुजींना किती आस आहे याची जाणीव झाल्याने विद्यार्थ्यांनीगुरुजींना गो-अहेडचा सिग्नल दिला.
गुरुजींनी अतिव उत्साहाने विद्यार्थ्यांवर, जोधा-अकबर कशामुळे संपलेविद्यार्थ्यांनो, हा प्रश्न फेकला.
सर, बहुतेक त्यांना बाजीराव-मस्तानीचे दु:ख सहन झाले नसावे, प्रदीपउत्तरला.
असे जर असेल तर, आपण आधी बाजीराव-मस्तानीस कोणते दु:खहोते याचा शोध घ्यायला हवा. गुरुजी उत्तरले.
पण सर, ते दोघेही कुठे राहतात हे आपणास ठाऊक नाही. त्यांचामोबाइल नंबरपण आपल्याकडे नाही. विनयने स्वाभाविक प्रश्न विचारला. सामान्य ज्ञान संवर्धन गाडी प्रारंभीच पंक्चर होण्याच्या दिशेने निघालीय हेचाणाक्ष गुरुजींच्या लक्षात आले. त्यांनी स्टेअरिंग आपल्या हाती घट्टपकडून गाडीस थांबवले आणि विद्यार्थ्यांना पुन्हा मुळ रस्त्यावर आणले.
बाजीराव मस्तानी यांना आपण थोडं विसरुन जाऊ नि जोधाअकबरवर लक्ष केंद्रित करु या, गुरुजी म्हणाले.
पण गुरुजी, लक्ष केंद्रीत करायला जोधा आणि अकबर तर दिसायलाहवे की नको. स्मिताने विचारले.
अगदी बरोबर, जोधा काळी की गोरी हे आम्हास माहीत नाही. अकबरचकना की लंगडा हेही आम्हास ठाऊक नाही, तेव्हा आम्ही ते दोघे कशामुळेसंपले हे कसे बरे सांगणार गुरुजी, चंद्रकातने विचारले.
हे उत्तर ऐकून गुरुजी फार आनंदले. आपल्या विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञानसंवर्धनाची किती गरज आहे, ही बाब पुन्हा एकदा या उत्तरावरून सिध्द होतहोती. या आनंदाच्या भरात त्यांनी चंद्रकांतचे कौतुक केले.
म्हणजे गुरुजी, तुम्हास जोधा-अकबर कसे होते हे ठाऊक आहे तर, विनयाने विचारले.
वा क्या बात है गुरुजी, फार बारीक लक्ष असतं हं तुमचं, तोमेश्वरउद्गारला.
म्हणजे याचा अर्थ काय घ्यायचा आम्ही, गुरुजींनी तोमेश्वरलाविचारले.
गुरुजी, याचा अर्थ साधा आणि सरळ आहे, दुसऱ्यांच्या लफड्यांचीबित्तमबातमी तुमच्याकडे असते. तोमेश्वर उद्गारला.
पण मग, आम्हास कसे ठाउुक नाही. इंदरशहाने हळहळ व्यक्तीकेली. कारण शाळा आणि गावातीन सर्व लफड्यांचा तो स्वत:सविकिपीडिया समजत असे.
अरे बाळांनो, जोधा-अकबर यांचे लफडेबिफडे काही नव्हते. संयमराखत गुरुजी महणाले.
मग गुरुजी जाऊ द्या ना त्यांना मसनात, आपल्याला काय करायचेआहे. सुचिताने सल्ला दिला.
हा आपल्या वर्गाच्या सामान्य ज्ञान संवर्धनाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. गुरुजी म्हणाले.
गुरुजी, इतरांच्या लफड्यांची माहिती ठेऊन आमचे सामान्य ज्ञानथोडेच वाढणार आहे. असल्या गोष्टी लक्षात ठेवायला लागलो तर इंग्रजीचेव्याक्रण लक्षात ठेवणे कठीण नाही का जाणार. गणिताची सूत्र कशीलक्षात ठेवणार आम्ही. आधीच आम्ही इंर्फमेशन ओव्हरलोड झालोआहोत. त्यात तुम्ही जोधा-अकबरचे लफडे लक्षात ठेवा म्हणता, नंदूझल्लावून बोलला.
गुरुजी, तुम्ही आम्हास सांगायला पाहिजे की मर्ढेकरांचे एका पिंपातमेले उंदिर लक्षात ठेवा. राम गणेश गडकरी यांचा एकच प्याला लक्षातठेवा. हरिवंशराय बच्चन यांची मधुशाला लक्षात ठेवा. शरतचंद्रचटोपाध्याय यांचा देवदास लक्षात ठेवा. प्रकाश मेहरा यांचा शराबीलक्षात ठेवा. विज्य मल्या यांचे किंगफिशर लक्षात ठेवा. रमेशने गुरुजींनासल्ला दिला.
पु.ल देशपांडे यांची म्हैस लक्षात ठेवा. केशवकुमारांची झेंडुची फुलेलक्षात ठेवा. शेक्सपियरचा गाढव लक्षात ठेवा.विनयने हा सल्ला पुढेखेचला.
गाढव नाही रे हॅम्लेट असेल. जयदेवने दुरुस्ती केली.
तेच ते गाढव आणि हॅम्लेट हे एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या. वनिताने दुरुस्ती केली.
एक्झाटली, जगात इतक्या गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या असतानाजोधा-अकबर यांचे लफडे काय लक्षात ठेवायचे आणि मी म्हणतो आपणया उचापती कशासाठी करायच्या. दासू ठासून म्हणाला.
पण विद्यार्थ्यांनो, सामान्य ज्ञान संवर्धन म्हणजे उचापती नव्हे. गुरुजीकसेबसे म्हणाले.
गुरुजी, लोकांच्या पर्सनल आयुष्यात नाक खुपसणे यास उचापतीचम्हणतात. असे आलिया भट नेहमीच म्हणते. जॅकेलिन फर्नांडीस सुध्दाम्हणते .प्रीती सप्रू सुध्दा म्हणायची.
कोण ही मध्येच कलमडली प्रीती सप्रू.
जोधाची अमरावतीत राहणारी काकी रे. विनयने अमूल्य माहितीपुरवली.
सामान्य ज्ञान संवर्धन गाडी पुरतीच पंक्च्र झाल्याचे लक्षात आल्यानेगुरुजींनी कपाळावर हात मारुन घेतला…
0000