(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

तो मी नव्हेच….

   काही महिन्यांपूर्वी मंगळावर पुन्हा एकदा मानवाचं यान पोहचलं. पृथ्वीतलावर आनंदी आनंदजाहला. या खऱ्याखुऱ्या मंगळालाही आनंद झाला (असावा). इकडे मात्र पृथ्वीतलावरील अनेकमर्त्य मानवांच्या पत्रिकेतील त्यास न दिसणारा मंग ज्योतिष महाराजांना ठसठशितपणे दिसणारामंगळ खिन्न झाला.

   ज्योतिष महाराजांना पत्रिकेवरील मंगळाची फार काळजी. कारण म्हणे, हा मंगळ अमूक अमूकघरी असला तर बोंबला. तो तिथे अमंगळ. पण मुकेशभाईंच्या किंवा अनिलभाईंच्या किंवा अमिताभदद्दूंच्या घरी कुणी जन्म घ्यावा हे जसं सांगता येत नाही. तसं पत्रिकेत मंगळानं मंगलमय, पवित्रघरीच वास्तव्य करावं असा त्याला ऑर्डर कुणासही देता येणं शक्य नाही. तो त्याच्या मनाचा राजा. शिवाय पायलीचे पन्नास लाख सटरफटर शोध लावण्याचा पराक्रम गाजवणाऱ्या मानवानं, अमंगलघराकडे निघालेल्या मंगळाला उचलून मंगलमय ठिकणी त्याचं प्लेसमेंट करण्याचं शास्त्रसुध्दाडेव्हलप केलं नाही, एवढया लाख भर वर्षांत. हा त्याचा काही दोष नाही.

   पत्रिकेतील मंगळाचं अंमलगत्व हे शुभविवाहाशी नाजूकरीत्या जोडल्या गेलय. संभाव्य नवरानवरीच्या पत्रिकेतील त्याचं अमूक-तमूक घरी असणं किंवा नसणं हे शुभविवाहाच्या आड जाणारीकधी मांजर कधी बोका तर कधी लांडगा ठरत आलय. मांजर आडवी गेली तर सात पावलं मागं गेलंकी तिच्या आडव्या जाण्यामुळे निर्माण होऊ पाहणारा वाईट्ट प्लस इफेक्ट दूर होतो. (बोका निलांडग्यांबद्दल असं काही ऐकिवात नाही.) पण मंगळाला पत्रिकेतून काही सात घरं मागे जा असं तरम्हणू शकत नाही. पत्रिका म्हणजे बुध्दीबळाचा डाव नव्हे की मांडली पत्रिका आणि नेले त्यास सातघर मागे त्यास.

   पत्रिकेतील मंगळरावांचे विशिष्ट घरात असणे आणि नसण्यामुळे मॅरेज ऑर मेड इन हेवन्स याम्हणण्याला तसा काहीच अर्थच नाही. ही शुध्द लोणकधी थाप ठरते. खरं तर मॅरेज ऑर मेड किंवाब्रेक इन (पत्रिकेतील) मार्स (मंगळ) असं तिकडे शेक्सपियर सरांना आणि इकडे कालिदास गुरुजीया दोघांनाही कां सुचलं नाही. हा प्रश्नच आहे.

   असो, तर पत्रिकेतील मंगळरावांच्या जरा इकडे तिकडे असण्यानं किंवा डोकावण्यानं किती ह्रदयकमळे कोमेजून गेली असतील. लग्न म्हणजे दोन ह्रदयांचं जुळून येणारं गीत गुंजन पणमंगळरावांच्या कथित प्रतापामुळे ते साध्य होत नाही. त्यामुळे अनेक दोन जीव एकत्र येऊ शकतनाहीत. त्यामुळे तिसरा जीव निर्माण होऊ शकत नाही. हा तिसरा जीव कदाचित भविष्यात उत्तमशास्त्रज्ञ असू शकतो. कदाचित तत्वज्ञ, कदाचित नट असू शकतो. कदाचित लेखक, कदाचितएखादे ॲडव्हान्स्ड बापू- बुवा- महाराज-बाबा असू शकतो. पण हे सारं होऊ शकत नाही. कारणमंगळरावांचं नको त्या घरात असणं. हे त्याचं असणं केवळ ज्योतिष महाराजांनाच कळतं. तो तिथेचकां हा प्रश्न विचारणार कुणाला? हिटलर साहेबांना एखादा प्रश्न विचारण्यासारखचं हे. शिवायमंगळ काळा की गोरा हे ज्योतिष महाराजांनाही माहीत नसतं.

   मंगळरावांमुळे अनेक घरं बसू आणि वसू शकली नाहीत. संसार फुलू शकले नाही. ही कथितकरणी पत्रिकेतील मंगळाची. पण दोष मात्र वरच्या मंगळाला. एवढया वर्षात वरचा मंगळ खरोखरचअशा काळ्या की पिवळया कर्तृत्वाचा आहे का हे मानवानं जाणून घेतलं नाही.

   मात्र आता मानवाचं यान पुन्हा एकदा मंगळावर उतरल्यानं ही संधी आली आहे. हे यान मंगळाच्याअंतरंगाचा शोध घेणार आहे. त्यामुळे पत्रिकेत धुमाकूळ घालणारा मंगळ आणि हा वरचा मंगळएकच की दोन की जुळे भाऊ की सावत्र भाऊ की काका पुतणे की मामा भाचे की डबल रोल कीक्लोन याचा शोध घेता येणे शक्य होईल.

   पत्रिकेतला मंगळ जर मानवी जीवनात इतका दखल देऊ शकतो तर मग खराखुरा मंगळ पृथ्वीचीवाटच लावेल ना. पण तसं काही चिन्ह दिसत नाहीत. जी काही माहिती आलीय त्यावरुन वरचाखराखुरा मंगळ बिच्चाराच वाटतोय. धुळीने माखलेला. भुकेलेला. तहानलेला. बेंगरुळ. खिन्न. असांस्कृतिक. आपल्या भावविश्वात दखल देऊन संपूर्ण कायापालट करणाऱ्या एखाद्या प्रेषिताचीवाट बघत असलेला. असा हा मंगळ. व्हिटॅमिन्स, प्रोटिन्स ,कार्बोहायड्रेटस, फॅटस याचा अभावानेनिस्तेज आणि कुपोषित झालेला. असा हा दुर्बळ मंगळ एका कागदाच्या तुकडयावर कसा कायप्रबळ होऊ शकतो. तेच तर हा वरचा मंगळ शतकानुशतके सांगत असला पाहिजे. की बाबांनो तोमी नव्हेच. पत्रिकेतील मंगळ कुणीतरी दुसराच तोतया. सदाशिवरावांसारखा.

   खऱ्या मंगळाचं रुप-स्वरुप पूर्णांशनं समोर येइलच कधीतरी. तो पर्यंत पत्रिकेतील तोतया  मंगळानं  आपलं रुप बदलवलं नाही म्हणजे झालं. ज्योतिषमहाराजांनी त्याचा मृत्यू झालाय किंवातो कायम स्वरुपी अलकनंदेच्या तीर्थयात्रेला प्रस्थान करता झाला असं सांगू नये, म्हणजे मिळवलं

   000