(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

नाव विराट, हाती कथलाचा वाळा

कुणा एका शाळेनं सामान्यज्ञानाच्या पेपरमध्ये श्रीयूत विराट कोहली यांच्या प्रेयसीचं नाव काय, असा प्रश्नविचारला. हा प्रश्न म्हणजे जणू काही उत्तरेत भूंकप, दक्षिणेत चक्रिवादळ आणि पूर्वेला ज्वालामुखी असं काहीतरीअद्भूत घडलं अशी आपल्या स्वभावाशी सुसंगत खऊट प्रतिक्रिया व्यक्त झाली. विराट कोहलीच्या प्रेयसीचा हाप्रश्न एका क्षणात  राष्ट्रीय ख्यातीचा होऊन बसला. (तरी बरे, हा प्रश्न अद्याप आंतरराष्ट्रीय ख्यातीचा झालेलानसून तो  डोनाल्ड ट्रम्प यांच्यापर्यंत पोहचला नाही, हे विशेष.)

  अशा प्रश्नब्रिश्न विचारला जाऊ शकतो काय, काय चाललंय हे, अशा प्रकारातील प्रश्नही या अनुषंगानंविचारले जाऊन शैक्षणिक दर्जा चंद्रावरील दऱ्यापेक्षाही खोलवर गेला वगैरे छाप बुरसट अभिनिवेश व्यक्तझाला.  सामान्यज्ञानाचा असाही प्रश्न असू शकतो हे ऐकून किंवा वाचून अनेकांना धक्का बसला. हा धक्का सहनन होऊन कुणास अद्याप ह्रदविकाराचा झटका आलेला नाही इतकाच काय तो दिलासा.

  सामान्यज्ञानाच्या पेपरमध्ये  असा प्रश्न विचारणाऱ्या शिक्षकाचं चुकलं काय, हे सांगण्यासाठी कुणी कष्ट मात्रघेतलं नाही. मंगळावर गेलेल्या पहिल्या अंतराळयानाचं नाव काय, चीनमध्ये झालेल्या सामान्यवादी क्रांतीचेजनक कोण, जपानच्या राजाचं नाव काय असे प्रश्न सामान्यज्ञानात येऊ शकतात तर विराट कोहली यांच्याप्रेयसीचं नाव काय हा प्रश्न कां बरं येऊ शकत नाही ? 

  नावात काय आहे हे जरी शेक्सपिअर नामे लेखकरावांनी साडे-चारशे वर्षापूर्वी सांगून ठेवलं असलं व तो गोऱ्यासाहेबांच्या देशातला लेखकराव असल्यानं हे वाक्य जणूकाही काळ्या दगडावरची रेघ असल्याचं एत्तदेशीयम्हणजे आपल्याकडचे समस्त प्रतिभावंत समजत असले तरी, लेखकराव शेक्सपिअर यांचं हे विधान काळाच्याकसोटीवर एकदमच पुचाट आणि पोरकट असल्याचं सिध्द झालं आहे. कारण आपल्याकडील टॉप टू बॉटमपरीक्षेत अमूक-ढमुकाचं नाव काय, असे प्रश्न विचारल्याशिवाय ती परीक्षा सफळसुफल होतच नाही. असं हे नाममहात्म्य लेखकराव शेक्सपियरवरील प्रेमापोटी एत्तदेशीय मान्य करत नाही, हा भाग अलाहिदा. साहेबांच्या देशाचंनाव ग्रेट ब्रिटन ऐवजी लिटिल  किंवा स्माल ब्रिटन असं तर अशा या लिटिल ब्रिटनवर सूर्य कधीच मावळत नाही, या विधानाला पावित्र्य राहिलं असतं काय ? ज्या महाभागास पहिल्यांदा हे विधान सूचलं त्यास तत्कालीन क्विनअथवा किंग हे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत थेम्स नदीतच बुडवत राहिले असते. हिटलर साहेबांचं नाव सोम्याकडाळे असतं तर या नावाचा एवढा दबदबा अद्याप कायम राहिला असता का ? आलमगीर औरंगजेबाचं नावत्यांच्या अब्बाहुजूर यांनी फारुक ठेवलं असतं तर या नावातील ग्रेसच निघून गेली असती. मर्लिन मन्रोचं नावतिच्या मॉमनं विठाबाई ठेवलं असतं तर बघा काय झालं असतं. या विठाबाईच्या प्रेमात केनेडी सर पडले असतेका? नाही ना.. तेव्हा नावातच सारं काही सत्य आणि सत्व दडलं आहे.

  शिवाय ऑस्कर मिळवणाऱ्या पहिल्या भारतीयाच्या नाव काय, दादासाहेब पुरस्कार मिळवणारी पहिली अभिनेत्रीकोण, कोणत्या गायिकेनं सर्वाधिक तेलगू गाणी गायली, कोणत्या तामीळ नायकाचा चित्रपट जपानमध्ये देमारचालतो, रशियाला सर्वाधिक आवडणारा भारतीय नट कोण, अशाच टाइपचे प्रश्न प्रश्नयूपीएस्सी,एमपीएस्सी,एनडीए ते सातवी आणि चौथीच्या परीक्षेत विचारले जातात. या परीक्षा म्हणजे देशघडवण्यासाठी बुध्दीमान आणि गुणवंत प्रज्ञावंताची निवड करणाऱ्या नंबर वन परीक्षा. तिथे जर असं ह्याचं नावकाय, त्याचं नाव काय असले प्रश्न बुध्दीमापन कसोटीचं परीक्षण करणाऱ्या प्रश्नाचा दर्जा मिळवू शकतात तर याकथित शाळेनं विराट कोहली यांच्या प्रेयसीचं नाव विचारलं तर या प्रश्नासही तोच दर्जा कां मिळू नये बरं.

   सामान्यज्ञान म्हणजे चौकस बुध्दीची परीक्षा. तुमच्या अवतीभवती काय चाललय, चाणाक्षरीत्या कोण इकडेतिकडे बघतो आणि कोण इकडच्या-तिकडच्या 12 च नव्हे 112 भानगडी लक्षात ठेवतो याची तपासणी जरलहान वयापासूनच केली जात असेल तर प्रश्नकर्त्या शिक्षकावर दोषारोपण कां बरं करायचं ? असे प्रश्न विचारुनकथित शाळा किती महत्वाचं आणि ऐतिहासिक कार्य करत आहे, याचं आपणास कौतुकच वाटायला हवं.

  ज्या विद्यार्थ्यांचं सामान्य ज्ञान असं असामान्य असतं तेच पुढे स्मार्ट म्हणून गणले जातात. हीच स्मार्ट मुलं स्पर्धापरीक्षा  फ्लाईंग कलर्सनं उतीर्ण होऊन आयएएस होतात, आयपीएस होतात. परदेशात राजदूत म्हणून जातात. बँकेचे अधिकारी होतात. आपल्या शाळेतील मुलं सुध्दा अशी स्मार्ट होऊन त्यांनी शाळेचं, गावाचं, महाराष्ट्राचं, राष्ट्राचं आणि त्यानंतर पृथ्वीचं नाव महा-उज्वल करावं असा शुध्द हेतू विराट कोहलीच्या प्रेयसीचं नाव काय, असाप्रश्न विचारण्यामागे राहू शकतो. हे आपण अज्ञानी  जणांनी ध्यानात घ्यायला हवं की नाही? हा प्रश्नच होऊशकत नाही. असं कुणा अडाण्यास वाटत असेल तर तो भाग वेगळा.

  तुमच्या आमच्या घरातील चिंटू-पिंटू-बाळू असणारा विराट हा  विराट कोहली होऊ शकत नसेल तर ओरिजनलविराटचा काय बरे दोष? आपल्या सुपुत्राला कुणी बरं थांबवलं विराट कोहली होण्यापासून. तोही जर याओजिनल विराट सारखाच विराट झाला असता तर त्यालाही प्रेयसी भेटली असती. त्याचाही प्रश्न एखाद्या शाळेनंविचारला असता. आपलातुपला सुपुत्र हा कॉलनीतला विराट होऊन उपयोग शून्य. कारण अशा 24 कोटी 79 लाख 33 हजार 23 कॉलन्या हिंदुस्थानात आहेत. प्रश्नकर्ता शिक्षक कोणकोणत्या विराटच्या प्रेयसीचं नावंविचारणार.  नावाला सुध्दा नावाची झळाळी प्राप्त करुन घेतली तरच विराट कोहली होतो अन्यथा नाव विराटमात्र हाती कथलाचा वाळा…