(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

अपयशातलं सुयश

अपयश किंवा पराभवाची प्रत्येकच व्यक्तिला भीती वाटत असते. पण प्रत्येक व्यक्तिला त्याच्या व्यवसायिकअथवा व्यक्तिगत आयुष्यात कोणत्या न्या कोणत्या टप्प्यावर अपयशाचा सामना करावा लागतो. ज्या व्यक्तिंनादेवत्व मिळालेलं असतं किंवा आपल्या मनात ज्यांची तशी प्रतिमा असते त्यांनाही कधीना कधी अपयशाचं धनीव्हावं लागलं आहे.

    अपयशामुळेच कदाचित जीवनाला पूर्णत्व येत असावं. कदाचित त्यामुळेच अधिक चांगलं आणि अधिकउत्तम करण्याची प्रेरणा मानवाला  मिळत असावी. अपयश आपणास नवं काही तरी शिकवत असतं. ते जर आपणलक्षात ठेवलं आणि तशी पुढच्या खेपेस तशी सावधीगिरी बाळगली तर आपणास अपयशाचा सामना करावालागणार नाही.

    अपयशातून शिकण्यासारख्या काही बाबी पुढीलप्रमाणे नोंदवता येतील.

1)  एकदा अपयश आलं की पुढच्या प्रयत्नांच्या वेळी विचारपूर्वक पावलं टाकायला हवीत. घिसडघाईटाळायला हवा. अधिक सुक्ष्मपणे गृहपाठ करायला हवा. कृती करण्यासाठी विलंब लागत असला तरी सुक्ष्मनियोजन करायला हवं. अनावश्यक धाडस दाखवणं धोक्याचं ठरु शकतं.

2) अपशयाची जबाबदारी ही आपली स्वत:ची असते. त्यामुळे इतर कुणालाही दोष देऊ नका. त्यामुळे आपलीचूक लक्षात येऊनही इतरांवर दोषारोपण केल्यानं खोटं समाधान मिळतं हे कायम लक्षात ठेवा. असं खोटंसमाधान हे फसवं तर असतच शिवाय स्वत:च्या चुकांची  दुरुस्ती करण्याकडे कानाडोळा करण्यास आपणासबाध्य करत असतं.

 3) अपयशामुळे आपणास नवी आव्हानं दिसू लागतात. ती स्वीकारण्याची मानसिक तयारी ठेवल्यासआपणास यशप्राप्तीसाठी नव्या उत्साहानं प्रयत्न करण्याची उर्जा मिळू शकते.

4) अपयश आपणास नवे बदल स्वीकारण्याची प्रेरणा देतात. हे बदल आपण सकरात्मकतेनं स्वीकारल्यासअधिक जोमानं प्रयत्न आपलं उद्दिष्ट्यसाठी प्रयत्न करु शकतो.

5) अपयशामुळे आपणास निराशा येणं  स्वाभाविक असतं. पण या निराशेला आपल्या मनावर स्वार होऊ दिलंनाही तर आपलं व्यक्तिमत्व अधिक कणखर बनू शकतं. कणखर व्यक्ती अधिक जोमानं कार्यरत होत असतात. तसेच कोणत्याही आव्हानांचा समर्थपणे मुकाबला करण्याची त्यांची तयारी असते.

6) आपणास आपल्या चुकांची आणि घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी स्वीकारण्याचा धडा अपयश देत असते. हा धडा आपण जर प्रामाणिकपणे आणि पारदर्शरीत्या गिरवला तर आपल्या प्रयत्नांमधील उणिवा आणि त्रुटीस्पष्टपणे दिसू लागतात. त्यामुळे त्यावर मार्ग काय काढायचा याचा आराखडा आपण स्पष्टपणे तयार करु शकतो.

7) अपयशामुळेच आपणास यशाचं महत्व थेट लक्षात येतं. त्यामुळे यशप्राप्तीसाठीचे आपले प्रयत्न अधिकप्रामाणिक आणि वस्तुनिष्ठ होतात.

8) अपयशामुळे इतरांशी तुलना करण्याचा मोह होत असला तरी त्यातून काही साध्य होत नाही. प्रत्येक व्यक्तीआपल्या मगदुराप्रमाणे आणि अनुभवानुसार मार्ग काढून वा आराखडा आखून पुढचं पाऊल उचलत असते. तीपावलं आपल्यासाठी जशीच्या तशी उपयुक्त ठरतील असे नाही. त्यामुळे इतरांशी तुलना न करता स्वत:चा मार्गस्वत:च निर्धारित करायला हवा.

9) अपयशामुळे नैराश्य येणं हे स्वाभाविकच आहे. पण त्यामुळे हातपाय गाळून बसणं अयोग्य ठरतं. कारण यशआणि अपयश या तात्कालिक बाबी असतात. यश किंवा अपयशापेक्षा जीवनाचा आनंद हा अधिक मोठा आणिअधिक मौल्यवान असतो. ही बाब ध्यानात घ्यायला हवी. त्यामुळे यशासाठीचे प्रामाणिक प्रयत्न जरी अपुरे पडलेतरी त्यामुळे ,आता सारं काही संपलं असं अजिबात समजू नये. आपलं व्यक्तिमत्व अधिकाधिक सकारात्मकघडवण्यावर आपण लक्ष केंद्रित केलं तर ते आपलं सर्वात मोठं आणि कायमस्वरुपी यश ठरु शकतं.

10) अपयशामुळे आपणास कळतं की या जगात कुणीही परिपूर्ण राहू शकत नाही.हे वास्तव आपणस्वीकारायला हवं. त्यामुळे अपयश आल्यावर चुकांचा शोध घेणं सोपं जातं. तसच या चुकांवर मात करणारेवस्तुनिष्ठ  उपायही सुचतात.

11) अपयशामुळे आपणास इतरांबद्दलच्या उत्तम गुणांची पारख करण्याची आणि त्यामुळे त्यांचा आदरकरण्याची संधी मिळते.

12) अपशायावर मात करण्यासाठी केलेल्या आपल्या प्रयत्नांमुळे आपलं व्यक्तिमत्व अधिकाधिक समृध्दहोऊ शकतं.

13) कोणत्याही आव्हानांवर मात करण्याची आपणास क्षमता सुध्दा प्राप्त होऊ शकते.