(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

अपेक्षांचं ओझं आणि तणाव

आजची तरुणाई ही कायम तणावग्रस्त दिसून येते. हा तणाव कदाचित अभ्यासचा राहू शकतो किंवा पालकांच्यादबावाचा राहू शकतो. किंवा सामाजिक अपेक्षांच्या ओझ्यांचा राहू शकतो. काही मानसोपचार तज्ञांच्या मतेपालकांच्या अपेक्षांचा ताण हा विद्यार्थ्यांवर सर्वाधिक असतो. घरातलं वातावरण मुलांसाठी प्रसन्न, आशादायीआणि सकारात्मक असावं अशी अपेक्षा असते. पण घरीच त्याच्यावर विविध प्रकाराचा ताण टाकला जातो. स्वत:कडून जे स्वप्न साध्य होऊ शकले नाहीत ते मुलांनी पूर्ण करावेत अशी सुप्त अपेक्षा पालकांची असते. याअपेक्षापूर्तीची पूर्तता मुलांनी करावी याचा आग्रह धरला जातो. मुलांच्या आवडीनिवडी किंवा कल फारसा लक्षात  घेतला जात नाही. त्यातूनच मुलांमध्ये तणावाची बिजं रोवली जातात. कालांतराने त्याचा महावृक्ष होतो. यातणावाच्या महावृक्षाखाली बालपण हरवून जाण्याची दाट शक्यता असते.  

अपेक्षांचं ओझं

    सामाजिक अपेक्षांचं ओझं घेऊन बरीच मुलं इच्छा आणि ऍ़प्टिट्यूड नसताना अभियांत्रिकी शाखांकडेजातात. समजा एखाद्या विदयार्थ्यांने उत्तम गूण असूनही अभियांत्रिकी शाखेला प्रवेश न घेता कला शाखेला प्रवेशघेतला तर त्याला सातत्याने तू असं कां केलसं हे विचारलं जातं.हे विचारण्यानं त्याच्या मनात तणावाची भावनानिर्माण होत जाते.आवडीचा विषय घेऊनही या मुलाला निष्कारण तणावाखाली वावरावं लागतं.आजच्याकाळातील अतिशय जीवघेण्या स्पर्धेचाही ताण मुलांवर पडत असतो. यातून मार्ग कसा काढायचा?

अनुभवाचा  बटवा

    मानसोपचार तज्ज्ञांच्या मते आजी – आजोबांच्या अनुभवाचा  बटवा यावेळी उघडायला हवा. या बटव्यातंगुपित असं सांगत की, आरोग्यदायी भोजन, पुरेशी निद्रा, नियमित व्यायाम, दारु – सिगारेट, सततइंटरनेटवर असणे अशासारख्या वाईट आणि अधिक वाईट सवयीपासून दूर राहणं, कोणत्याही प्रकारच्या ताण-तणाव व्यवस्थापनाचे हे मुख्य घटक आहेत.

    आपल्या मनात जे चित्र-विचित्र विचार येतात, त्यांचं सातत्यानं संनियंत्रण करणं आवश्यक ठरतं. याविचारांची दिशा नकारात्मक आहे की सकारात्मक आहे, हे यामुळे लक्षात येऊ शकतं. आपल्याला जेव्हास्वत:बद्दल वाईट वाटतं किंवा स्वत:चीच दया वाटते तेव्हा सर्वत्र नकारात्मकतेचा अंधकार आपल्याभोवतीपसरलेला असल्याचे वाटत असते.अशा वेळी मानसोपचार तज्ज्ञांच्या मते स्वत:शीच सतत संवाद करत राहणेगरजेचं ठरतं. या संवादातून मनातील नकारात्मक विचार कसे सकारात्मक होतील याकडे लक्ष द्यावे लागेल. शक्यझाले तर मनातील  विचार एखाद्या कागदावर जसेच्या तसे उतरवून काढावेत. हे विचार पुन्हा पुन्हा वाचावेत आणित्याचे विश्लेषण करावे. या विचारांचा ग्रॉफ हा नकारात्मकतेच्या दिशेने जाणाराच दिसत असेल तर सकारात्मकविचारांचे मुद्दे लिहून काढावेत. हे सकारात्मक मुद्दे वारंवार आपण उच्चारत राहिलो तर ,नकारात्मक विचारांनाकाही प्रमाणात कां होईना दूर सारण्यास सहाय्यभूत ठरु शकतात. त्यामुळे तणावसुध्दा कमी होतो.

    तणावाची तीव्रता खूपच वाढलेली असल्याची जाणीव होत असेल, तर दीर्घ स्वशनासारख्यातणावमुक्तीचे व्यायाम करावेत. सकारात्मक विचारांची चित्रे कल्पनेने रंगवण्याने सुध्दा तणाव कमी होण्यास मदतहोते.

मानसोपचारतज्ज्ञांचे सहाय्य

    या उपायांनी तणाव कमी होत नसेल व्यावसायिक मानसोपचारतज्ज्ञांकडे न चुकता जायलाच हवे. हे तज्ञआपली विचारप्रणाली कशी बदलायची याचं मार्गदर्शन करतात. ताण तणावाचं व्यवस्थापन कसं करायचं याचंतंत्र आणि कौशल्य शिकवतात. तसच गरज असेल तर औषधीही देतात.

    आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या काळात सर्वांनाच ताण-तणावाला तोंड द्यावं लागतं. त्यामुळेतणावांचा सामना करणं हे जीवनातील महत्चाचा घटक ठरतो. त्यापासून कुणाचीही सुटका नाही. तणाव ही एकमानसिक अवस्था आहे. ती सकारात्मक किंवा नकारात्मक राहू शकते. त्यानुसार आपणच या तणावाला प्रतिसाददेत राहतो. तणावाच्या परिस्थितीत सकारात्मक विचारप्रक्रियेला चालना दिली तर शरीराला उपयुक्त ठरणाऱ्यारासायनिक पदार्थांचा स्त्राव होतो. तर नकारात्मक विचारप्रक्रियेला चालना दिली तर कोर्टिकास्टेरॉइड नावाच्याविषारी पदार्थांचा स्त्राव होतो. त्यामुळे आपल्या मनाला नकारात्मक भावभावनांपासून परावृत्त करण्यासाठीअटोकाट प्रयत्न करणे आवश्यक आहे. या भावभावनांशी सामना करण्याची मानसिक तयारी केली पाहिजे. पलाययन करणं किंवा भीती वाटून घेणं या दोन्ही बाबी घातक ठरतात.

नियोजन – तणावमुक्तीचा आधार

    दररोजच्या प्लॅनिंग म्हणजेच नियोजनाला मानसोपचारतज्ञ तणावमुक्तीचा महत्वाचा आधार मानतात. मुलांना प्लॅनिंगची लहानपणापासूनच सवय लागायला हवी. लघु मुदतीचे आणि दीर्घ मुदतीचे नियोजन करणंआवश्यक ठरतं. जसंजसं त्याचं वय वाढत जाईल तसतसं त्यांच्या दृष्टिकोनातही बदल घडत जाईल. ताणतणावांचं व्यवस्थापन करणं आणि त्यांचा सामना करणं हा आयुष्यातील एक आनंददायी प्रयत्न सुध्दा ठरुशकतो.