(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

आजचा दिवस आनंदाचा

सध्या सर्व जगात कुठेना कुठे हल्ले होत राहतात. त्यात कधी दोन-पाच तर कधी शेकड्याने निष्पाप व्यक्ती ठार होतात. आत्ता आत्ता जगाची ओळख होऊ घातलेल्या निरागस मुला-मुलींचाही यात समावेश असतो. कशासाठीहे घडतं असावं?  इतरांचा जीवन जगण्याचा आनंद असा कां बरं हिरावून घेतला जातो. आयुष्यखूप छोटं मर्यादित असूनही आपण आनंदी राहत नाही, इतरांना राहू देत नाही. यातून काय बरंसाध्य होत असावं ?

  आनंदी, मजेत आणि समाधानानं राहणं  वा असणं हा आपल्यातीलच काही बांधवांना अपराध कां बरंवाटतो?

आनंदी राहण्यासाठी धनसंपत्तीची गरज भासत नाही. कुणाच्या मार्गदर्शनाची वा सल्ल्याची वा गुरुकिल्लीची गरज भासत नाही. सत्संगाची गरज भासत नाही. प्रवचनाची गरज भासत नाही. प्रत्येकजण आनंदी राहण्याची स्वत:ची व्याख्या करु शकतो नि तसा राहू शकतो. आपण इथेपृथ्वीतलावर आलो ते आनंदी आणि सुखी होण्यासाठीच ना.

आनंदाचा गाभा

खरतर प्रत्येक धर्म तेच सांगतो. त्यांचा मूळ गाभा याभोवती फिरतो. इतरांना दु:खीकरण्यात आनंद राहू शकत नाही. साध्यासाध्या गोष्टी या आनंद देतात. गरजूंना मनापासून केलेलीमदत आनंददायी असते. शांतपणे आणि कोणताही मानसिक गोंधळ न ठेवता केलेली ध्यानधारणाआनंददायी ठरते.अतिशय प्रामाणिकपणे केलेले शासकीय काम आपल्यासाठी आणि इतरांसाठीही आनंददायी ठरते.

  चेहऱ्यावर असलेलं हसूसुध्दा आनंदायी ठरतं. हे हसू घालवून बसल्यानं या आनंदापासून मुकलोआहोत. टीव्हीवरील विनोदी कार्यक्रमातील पंचेसमुळेच हसायला पाहिजे असा  काही नियम नाही. चेहऱ्यावर हसू ठेऊन गंभीर राहता येत नाही असं थोडच आहे. चेहरा गंभीर आणि कृती मात्रहास्यास्पद किंवा निरर्थक, असं नसावं. हसतहसत गंभीर गोष्टी करता येतात. श्रीकृष्णाच्या चरित्रातूनही बाब दिसून येते. श्रीकृष्णाचं व्यक्तिमत्व बहुतेक साऱ्याच प्रतिभावंतांनी कायम हसरं आणिखेळकर असच रंगवलं. हा असा हसरा श्रीकृष्ण गीतेसारख्या महाग्रंथाचा आणि महातत्वज्ञानाचाजनक ठरला. श्रीकृष्ण कायम आनंदी असे. इतरांच्या जीवनात आनंद देत असे.

निसर्गाच्या सानिध्यात

  निसर्गाच्या सानिध्यात अधिकाधिक जात राहिलो तरी मनस्वी आनंद मिळतो. पण असं जाणंआपण कितीदा करतो. वेळ नाही या सबबीखाली टाळलं जातं. नित्य व्यायाम हाही आनंदाचाठेवा ठरतो. अर्धातास त्यासाठी पुरेसा ठरतो. पण हा अर्धातास बरेचजण देऊ शकत नाही. आनंदासाठी अर्धातास सुध्दा जर काढता येत नसेल तर त्यासाठी कुणास जबाबदार धरणार? कुणीकितीही व्यस्त असेल, अमुकतमुक वेळेची लोकल पकडायची असेल तरी सुध्दा अर्धातासकाढायलाच हवा. तो तर हात जोडून आपल्या सोबत असतो. पण आपण त्यालाच हातदाखवतो.आनंदी राहण्याचं हे साधं,सोपं गणित जुळवत नाही.

  आनंद अवतीभवती

दररोजची शांत झोपसुध्दा आनंद आणि समाधान देणारी असू शकते. पण झोपेसाठीआपल्या तक्रारीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसते. अनेकांना तर झोप शत्रू वाटायला लागलीआहे. काहीजण खूप झोपतात. तरी ते कायम खंतावलेले दिसतात. त्यांना झोपचे वरदान आहेअसं कौतुकानं बोललं जातं. हे असलं कौतुक काय कामाचं. खंतावलेली व्यक्ती आनंदी कशीराहणार. त्याचा दिवसही खंतावलेला जाणार.

  पारदर्शक आणि प्रामाणिक कौटुंबिक नातेसंबंध हे सुध्दा प्रत्येक व्यक्तिच्या जीवनात छानआनंदायी ठरु शकतात. पण ही नाती मात्र दिवसागणिक गढूळ होताना दिसते. ही नाती दृढकरण्यासाठी, टिकवण्यासाठी कोणत्याही तांत्रिक-मांत्रिक-गुरु-महाराज-बाबा यांची गरज वा मध्यस्थीनसते. यासाठी आपणच आपले स्वामी (समर्थ) असतो. पण जी बाब शंभर टक्के आपल्याचनियंत्रणात आहे ती घालवून निम्मा काळ खंत करण्यात,निम्मा काळ दोषारोपण करण्यात घालवूनस्वत:चा आनंद घालवून बसतो.

  आनंद हा असा अवतीभवतीच असतो. तो कुठेही बाह्यरीत्या शोधायची गरज नसते. असंसांगितलं जातं की आनंद हा ह्रदयात साठवेला असतो. त्यामुळे आपली ह्रदयस्पंदनं कळायलाहवी. ह्रदय वाचता यायला हवं. त्याच्याशी सुसंवाद करता यायला हवं. पण आपणास ते शक्यहोत नाही. कशाकशापासून आनंद मिळतो याची यादी तयार करायला हवी. ही यादी तयारकरण्यासाठी ह्रदय नक्किच सहाय्य करु शकतं.

  तुलना स्वत:शी करावी

  आपल्या दु:खाचं महत्वाचं कारण, इतरांसोबतची स्वत:ची तुलना. तुलना करायशीच असेल तरस्वत:शीच करावी. कारण आधी कसे होतो,आता कसे आहोत हे त्यातून कळेल. काही चुकाघडल्या असतील तर त्या कळतील. त्या दुरुस्त करण्याची प्रेरणा आणि उर्जा मिळेल. चुकांचीदुरुस्ती ही आनंददायी बाब ठरते. कारण त्यामुळे रुळावरुन घसरलेली वा घसरु पाहणारी आपलीगाडी पूर्ववत धावू शकते किंवा धावत राहते.आव्हानं स्वीकारण्यातही आनंद असतो. तो स्वत:शीचस्वत:शी तुलना करुन घेता येतो. म्हणजे सुरक्षित आयुष्य जगण्याचा अट्टाहास या आधी केल्याचंया तुलनेत दिसून आलं तर आपण पुढच्या काळात नवी आव्हानं घेण्यासाठी मानसिकरीत्या तयारव्हायला हवं. अशी आव्हानं स्वीकारुन ती यशस्वीरीत्या पूर्ण केल्यास मिळणारं समाधान खूप मोठंअसतं. अशी आव्हानं स्वीकारली की कसोटी लागते. अधिक परिश्रम करावे लागतात. नियोजनकरावं लागतं. क्षमता आणि शक्ती एकटाव्या लागतात. हे सारं काही आनंददायी आणि मनासशांती देणारं असतं. वेगळं काहीतरी साध्य केलं याचा आनंद शब्दातीतच असतो. तो आनंदअनुभवयाला हवा. कारण आपल्या कल्पनेत असणारी अनेक स्वप्न यामुळे प्रत्यक्षात अस्तित्वात येऊशकतात. त्यामुळे दैनंदिन जगणं अधिक सुसहय होतं.

  आत्ताच्या क्षणावर परवाचा पाया

  भविष्याची चिंता कधीच आनंदायी नसते. आत्ताच्या क्षणावर उद्या आणि परवाचा पाया उभाराहतो. तो ठिसूळ करायचा की मजबूत करायचा हे ज्याच्या-त्याच्या हाती असते. तुम्ही आजचखंतावलेले असणार तर उद्याही तसेच राहण्याची दाट शक्यता असते. उद्याचा दिवस आनंददायीकरण्याची हमी तुमच्याशिवाय कुणीही देऊ शकत नाही. ही हमी खात्रिशीर असते. परवा कायघडलं, याचं चर्वितचरण करण्यात बराच वेळ जातो. हा वेळ अनुत्पादक आणि क्लेषदायकअसतो. परवाच्या दिवसाचं महत्व हे आज आपल्या जीवनात शून्य झालेलं असतं. त्यामुळे त्यासकवटाळण्यात काहीही अर्थ उरत नाही. असं कवटाळणं हे सुध्दा दु:खाचं ,रागाचं ,त्राग्याचं, नैराश्याचं,किरकिरतेचं आणि अस्वस्थतेचं कारण बनतं. हे टाळलं तरी आजचा दिवस आनंददायीआणि समाधानाचा राहू शकण्याची मोठी शक्यता असते.

  आपण कायम काही आनंदी राहू शकत नाही, हे वास्तव आहे. पदोपदी असे क्षण येतात कीत्यामुळे जगण्यातली लय आणि ताल बिघडण्याची दाट शक्यता निर्माण होते. सुरळीत आयुष्यातवादळं निर्माण होतात. सरळ रस्ता वाकडा होतो किंवा हरवून बसतो. हे सारं जीवनप्रवासातअपेक्षित असतं. ते गृहित धरुन चालायचं असतं. हे वास्तव स्वीकारताना आयुष्य कायम दु:खीराहू द्यायचं का याचा निर्णय घेणं गरजेचं असतं. पर्यायाचा तराजू आपल्या हाती असतो. त्यापारड्यात कोणत्या बाजूने दान टाकायचं हे आपण ठरवायचं असतं. हे दान जर दु:ख आणि खंतया पारड्यात  टाकलं तर आनंदाचे क्षण अवतीभवती येणार नाहीत.

  उर्जा आणि उत्साह

  आनंद ही मानसिक स्थिती असते. दलाई लामा याचं सुप्रसिध्द वचन आहे, ते म्हणतात कीआपण आयुष्य जगतो ते आनंदी राहण्यासाठी. तोच त्याचा मूळ हेतू आहे. आपणास याआयुष्यापासून अधिकाधिक चांगल्या गोष्टी अपेक्षित असतात. त्या साध्य करायच्या असतील तरत्यासाठी तुम्हास आनंदी राहणं हे आवश्यकच असतं. अन्यथा तुम्ही काहीही साध्य करु शकणारनाही. कारण आनंद म्हणजे उर्जा आणि उत्साह. या दोन्ही गोष्टी कोणत्याही औषध वा गोळयांनीमिळत नाही. तो मनात आणि ह्रदयात असतो. या दोन गोष्टी जितक्या अधिक मिळवू तेवढंअधिक जीवन अधिक आनंददायी ठरेल. शिवाय यशस्वी ठरेल. जेव्हा यश मिळतं तेव्हा समाधानमिळतं. समाधान मिळत तेव्हा आणखी उर्जा मिळते. आणखी उर्जा मिळते तेव्हा उत्साह वाढतो. उत्साह वाढतो तेव्हा अशक्यप्राय गोष्टीही साध्य होतात. जेव्हा असं घडतं तेव्हा मिळणारा आनंद हाआभाळाएवढा असतो. तो आनंद आपणापासून कुणी हरवून घेऊ शकत नाही. आनंद हा असाचहवा. तो कृत्रिम नसावा. तो कायमस्वरुपी टिकणारा असावा. तो मानसिक, शारीरिक आणिभावनिकदृष्ट्या सक्षम आणि समृध्द करणारा असावा. इकडे तिकडे हल्ले करणाऱ्या किंवा त्यासाठी मानसिक तयारी करणाऱ्या मित्रांना हे कुणीतरी सांगायला हवं. स्वत:ही आनंदी राहा,इतरांनाही राहू द्या..