(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

आत्मभान

एखादे दिवशी शांतपणे बसून स्वत:चं ऑडिट केलं तर? तसं करायला हवं, असं व्यक्तीमत्व विकासाशी निगडित सर्वचतज्ञ सांगतात. स्वत:चं ऑडिट करणं उपयुक्त आणि लाभदायक ठरु शकतं.मात्र आपल्यापैकी कुणालाच स्वत:चं ऑडिटकरायला आवडत नाही. कारण त्यातून आपली प्रतिमा स्वच्छपणे दिसू लागते.तीच आपल्याला नको असते.

     आपण स्वत:कडे इतरांच्या नजरेतून बघायला हवं. आपण इतरांकडे बघून त्या व्यक्तीचं मूल्यमापन करतो किंवात्याच्याबद्दल मत बनवतो. आपण केलेलं त्या व्यक्तीचं हे ऑडिटच असतं. तेच आपण स्वत:साठी करायला हवं. स्व-ऑडिटम्हणजे आपल्या अंतरंगात बघणं. यामुळे आपल्या  सकारात्मक आणि  नकाराकात्मक बाबी दिसतात. मनात येणाऱ्या किंवाघर करुन राहिलेल्या नकारात्मक विचारचक्राचं खरं रुप दिसेल. आपली वृत्ती,प्रवृती यांचं मूल्यमापन प्रामाणिकपणे करतायेऊ शकेल.

आत्मभानाचा प्रवास

     स्वत:ला वस्तुनिष्ठरीत्या समजून घेण्यासाठी असं स्वऑडिट महत्वाचं ठरतं. त्यामुळे मनातील तळ दिसू लागतो. काळेढग दिसू लागतात. आत्मभानाचा प्रवास सुरु होतो,या अशा आत्मपरीक्षणातून. यामुळे लक्षात येतं की आतापर्यंत उगाचचआपल्या गूणसूत्रावर, लहानपणीच्या अनुभवांवर किंवा मग आजूबाजूच्या परिस्थितीवर ,सध्याच्या रुपाबद्दल, कुटुंबाबद्दल आणि नशिबाबद्दल, चरफडत होतो. पण जेव्हा आपल्या अंतरंगात डोकावून बघतो तेव्हा काळोख दूर व्हायलामदत होते.वस्तुस्थिती लक्षात येऊ लागते.तेव्हा कळतं की उगाचच मनात पूर्वग्रह होते,उगाचच आपण इतरांना दोष देत होतो. खर तर या आपण शोधलेल्या पळवाटा होत्या. अनेक कृतींना आपण प्रत्यक्ष जबाबदार असताना इतरांवर दोषरोपण करतहोतो.

     आपल्या चुका जशा लक्षात येत जातील तसं मनातील न्यूनगंड जाऊ लागेल. न्यूनगंडाचं जाणं म्हणजेआत्मविश्वासानं मन भरून जाणं. आत्मविश्वासानं भारलेलं मन आपल्याला उद्दिष्टांचं नेमकं चित्र रेखाटण्यास सहाय्य करुलागतं. हे उद्दिष्ट करीयर , कुटुंब, छंद, आर्थिक नियोजन अशा कोणत्याही बाबींबाबत राहू शकेल. हे उद्दिष्टसाध्यकरण्यासाठीचा मार्ग आपणास दिसू शकेल. भावनेपेक्षा कार्यकारणभावाला महत्व देणं गरजेचं असल्याचं लक्षात येईल. ठरवलेल्या उद्दिष्टपूर्तीसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे यशप्राप्ती अशक्य नसल्याचं ध्यानात येईल.

व्यक्तीगत दृष्टकोनात स्वयंस्पष्टता  

     स्वत:चं असं ऑडिट म्हणजे व्यक्तीगत दृष्टकोनात स्वयंस्पष्टता आणणे होय. तुम्ही यशप्राप्तीसाठी आवश्यक सर्वकृती मनात नोंदवू लागता. ही नोंद जीवनाला दिशा देणारं दस्तावैज असतो. या दस्तावैजात तुमच्याकडे असलेल्या गुणांनाजेव्हा समाविष्ट करता,तेव्हा स्व-प्रेरणा आणि आंतरिक उर्जा मिळू लागते.त्यामुळेच प्रत्येकाने स्वत:चं ऑडिट करण्यासाठी वेळकाढायला हवा.

     शांतपणे बसून अंतरंगात बघा. या एकांतात स्वत:लाच अनंत प्रश्न विचारा. त्यांची उत्तरे शोधा. आडवळणाचे किंवान आवडणारे प्रश्नही विचारा. त्यामुळे मन पारदर्शक राहील .विचार प्रक्रिया सकारात्मक होईल. स्वत:कडे बघण्याची दृष्टीअधिकाधिक स्वच्छ आणि निकोप होत जाईल.

     मनात चालणारं हे ऑडिट लिहून ठेवावं.त्यामुळे ते अधिक सुयोग्य किंवा फूलप्रुफ करता येऊ शकतं.त्यामुळे तुम्हीअधिक फोक्स्ड व्हालं.काहीतरी चमत्कार घडून आयुष्य बदलेल किंवा यश आपल्याकडे चालत येईल,असं वाटणंथांबेल.स्वयंस्पष्ट धेय्य किंवा उद्दिष्ट ठेवून कार्यरत झाल्याशिवाय काहीही प्राप्त होत नाही,हे तुमच्या लक्षात येईल.हेच यास्वंय ऑडिटचं खरं यश.

000

मनाशी बोलÖ दोन क्षण शांततेत...

     बहुतेक सर्व सदगुरुचं सांगणं हेच असतं की, बहुतेक सर्व समस्यांची जननी हे आपलं मन होय.अशांत मन हेनरकाकडे नेतं तर शांत मन स्वर्गाचं द्वार उघडतं असं स्वामी सुखाबोधानंद याचं सांगणं आहे.

     स्वर्ग आणि नर्क या दोन्ही बाबी मनाच्या अवस्था आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना त्यांच्या झोपडित स्वर्गीयसुखाचा आनंद मिळतो. ही मनाची सुंदर अशी अवस्था. मात्र अनेकांपुढे हात जोडून ऐश्वर्य उभं असलं तरी स्वर्गीय सुखाचीअनुभूती त्यांना मिळत नाही. हे असं कां घडावं? याचं कारण म्हणजे आपण मनाचं नीट प्रशिक्षण करत नाही. स्वामीसुखाबोधनंदांनी मनाला हत्तीची उपमा दिलीय. प्रशिक्षित गजराज हा अत्यंत उपयुक्त ठरतो. तर अप्रशिक्षित गजराज होत्याचंनव्हतं करण्यासाठी एक क्षणही घेत नाही.

     आपल्यापैकी कितीजण स्वत:च्या मनाला समजून घेतात? आपलं मन ही काही स्थिर वस्तू नाही. मन म्हणजेअसंख्य विचारांची आंदोलने सतत सुरु असलेली प्रक्रिया. मनातील सुक्ष्म आंदोलनातूनच असंख्य आभासी प्रतिमा निर्माणहोत राहतात.

     मनातील विचारांचं परिवर्तन करता येतं. याचाच अर्थ मनाला परिवर्तन करु शकतो. मनात सुरु असलेल्या विचारआणि भावनांच्या कल्लोळ्ळात कुठे काही फटी दिसतात का,याचा शोध घ्यायला हवा.असा शोध घेता आला तर विचारांवरनियंत्रण ठेवता येऊ शकतं.

     विचार हे मानवीय मूल्यांचे विस्तारित रुप असतात. एखादी सवय असेल, तर त्याचेच विचार मनात येत राहतात. मूल्ये बदलली तर विचारप्रक्रिया सुध्दा बदलाला स्वीकारेल. आयुष्य जगण्यासाठी निर्धारित केलेल्या मानसिक तत्वांना मूल्येम्हणू शकतो. म्हणजे असं की ,मी असत्य वागणूक करणार नाही. मी भ्रष्टाचार करणार नाही.मी इतरांची निंदा नालस्ती करणारनाही.

     वाईट सवयी विचार प्रक्रियेच्या भाग असतात.या सवयींपासून कदाचित क्षणिक आनंद, सौख्य आणि भ्रामक शांतीमिळत असेल, पण त्यासाठी चुकवावे लागणारे मूल्य  मोठे असते. असे मूल्य चुकवनं योग्य की जीवनमूल्यात बदल करुनवाईट सवयींपासून मुक्ती मिळवणं योग्य याचा निर्णय आपलं मनचं देऊ शकतं.फक्त त्याच्याशी काही क्षण शांततेतबोलायला हवं.