(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

आत्मविश्वास, आत्मजागृती आणि आत्मशक्ती

जगातील  सारेच तत्ववेत्ते सांगतात की, तुमचं भविष्य तुम्हीच घडवू शकता. तुमच्या आयुष्यामध्ये जे साध्यकरावयाचं असेल ते एका कागदावर लिहून काढा. ते जर योग्य वाटलं नाही तर तो कागद फाडून परत लिहूनकाढा, असं काही तत्ववेत्यांचं सांगणं आहे.आपली मन:शक्ती किंवा आत्मशक्ती आणि क्षमता अतिशयसामर्थ्यशाली असते. त्यामुळेच तुम्ही तुमचं भविष्य घडवू शकता. अपशयावर मात करु शकता. यशाची नवीव्याख्याही स्वत: पुरती पुनर्रचित करु शकता.

स्फटिकासारखी हवी संकल्पना

    तुम्हाला आयुष्यापासून नेमकं काय हवं, याची संकल्पना मनात स्फटिकासारखी असेल तर तुमचायशाचा मार्ग सहज आणि सुलभ होतो. किंबहुना न दिसणारा मार्गही दिसू लागतो. आत्मशक्ती जेव्हा जागृत होतेतेव्हा अशक्यप्राय बाबी शक्य होऊन जातात. त्यासाठी आपल्या आत्मशक्तीशी संवाद साधता यायला हवा. माझं हे उद्दिष्ट आहे नि ते मला साध्य करायचय,असं या आत्मशक्तीला आपण ठामपणे सांगू शकू तेव्हाच पुढचामार्ग दिसू लागेल. या मार्गाची  दिशा  स्वत: तुमच्यापर्यंत येऊ   शकेल.

आत्मशक्तीशी संवाद 

    आपण आत्मशक्तीशी फारसा संवाद साधत नाही. स्वत:वरचा विश्वास डळमळीत असल्यास असं होऊशकतं. मात्र स्वत:वरचा विश्वास कां डळमळीत होऊ द्यायचा ? आपली आत्मशक्ती स्वत:शिवाय कुणीहीनियंत्रित करु शकत नाही. कोणत्याही बाह्य बाबीला ते शक्य नाही. आत्मशक्तीबाबतची आत्मजागृती स्वत: भोवती निर्माण झालेल्या नकारात्मक भावांना दूर सारु शकण्यास समर्थ ठरत.

    स्वत:वरचा विश्वास कायम वर्धिष्णू होत ठेवायला हवा. थोर शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचं उदाहरण पुरेसंबोलकं ठरावं. त्यांची शारीरिक व्याधी अभूतपूर्व असून त्यांना कोणतेही कार्य स्वत: करणं अशक्य आहे. पणस्टीफन यांनी या व्याधीच्या पलिकडे जाण्यासाठी स्वत:वरील विश्वास कायम वर्धिष्णू होत ठेवला. व्याधीनेत्यांच्या शरीरावर मर्यादा आल्या. पण त्यांच्या आत्मशक्तीला मात्र ही व्याधीछेद देऊ शकली नाही. विश्वाचा शोधघेण्याचा भीमपराक्रम म्हणूनच स्टीफन हॉकिंग करु शकले.स्वत:च्या क्षमतांवरचा शंभरटक्के विश्वासचआत्मविश्वास- आत्मजागृती आणि आत्मशक्तीच्या अनुभूतीकडे नेणारा ठरतो.

कमकुवत पैलुंचा पाठलाग

    आपल्यापैकी प्रत्येकाचे काही कमकुवत पैलू असतात. हे पैलू स्वभावाचे किंवा चारित्र्याचेही राहू शकतात. या पैलूंचा पाठलाग करुन त्यांच्याशी दोन हात करता येतो का हे आवर्जून बघायला हवं. याचं कारण असं की हेपैलू आपल्या मनात द्विधा परिस्थिती निर्माण करतात. अशी द्विधास्थिती बहुतेक वेळा नकारात्मक बाजूने ठोसपणेउभी राहते. आपणही मग त्या नकारात्मकतेला शरण जातो. त्याची अनेक कारणे स्वत:लाच पटवून देत राहतो. हेटाळलं तर स्वभावातील किंवा चारित्र्यामधील दोष किंवा कमकुवत पैलू टाळता येऊ शकतील किंवा त्याकडेसमक्यपणे बघण्याची शक्ती प्राप्त होऊ शकेल. ही शक्ती आपणास नकारात्मक पैलूंपासून परावृत्त करण्यासाठीसाहाय्यभूत ठरु शकते.नकारात्मक पैलू जितके कमी होत जातील तितकीच अंतर्मनातील सकारात्मक शक्तीअधिक प्रभावी होत जाईल.

कार्यप्रवणतेची शक्ती

    सकारात्मकता ही नेहमीच नवी उर्जा प्राप्त करुन देणारी असते. ही उर्जा मानसिक आणि शारीरिक दोन्हीप्रकारची राहू शकते. एडमंड हिलेरी आणि तेनसिंग नोरके यांनी ज्या काळात एव्हरेष्ट सर केले त्याकाळात आजच्याइतक्या सोई-सुविधा-तंत्रज्ञान साहाय्याला नव्हतं. ही दोन्ही माणसं तुमच्यामाझ्यासारखीच होती. पण सकारत्मकउर्जेने त्यांनी अत्यंत कठिण परिस्थितीत एव्हरेष्ट सर केलं.

    सकारात्मक उर्जा व्यक्तिच्या मनात निर्माण होते तेव्हाच त्यास सतत कार्यप्रवण राहण्याची शक्ती मिळतराहते. त्याला विश्रांतीची गरज भासत नाही. कार्यप्रवणता हीच त्याची विश्रांती ठरत असते. हा सुंदर समन्वय योगसाधणारे ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक हे 80 वर्षीसुध्दा तरुणांना लाजवील अशा रीतिने कार्यप्रणव राहूनअनेक सर्जनशील बाबी लिलया करताहेत.

    कार्यप्रवण असणारी व्यक्ती कधीच किंवा फारशी थकत नाही. आपण थकल्याचं बरेचदा वाटतं याचंकारण आपल्या सकारत्मक उर्जेचा नीट वापर आपण करत नाही. आपलं दैनंदिन आयुष्य आपणास खूप उर्जास्वंयस्फुर्तीने देत असतं. याशक्तिचा जितका अधिक उपयोग करु तितकाच आपला विकास सक्षमतेनं होतो.

कार्यप्रवणता हीच विश्रांती

    आयुष्य किती छोटं आहे हे एव्हाना आपणास चांगलचं ठाऊक झालय. आपल्या अवती- भवती इतक्याअनपेक्षित घटना घडत असतात की पुढचा क्षण आपल्या हातून कधीही निसटून जाऊ शकतो. असं असतानाआपण विश्रांतीची अपेक्षा कां करावी? कार्यप्रवणतेलाच विश्रांती कां समजू नये.

    विश्रांतीची इच्छा मनी बाळगणं आणि त्या इच्छेस शरण जाणं म्हणजे आपल्या पराजयाला स्वत:हूननिमंत्रण देणं होय. अशा परिस्थितीत आपण आपल्या जीवनाविषयी उद्दिष्ट तरी निर्धारित करु शकू का? केलंतरी ते अर्धवट मनानं केलेलं राहील. असं अर्धवट उद्दिष्ट कधीही यशाच्या सोपानाकडे नेत नाही. आपण निर्धारितकेलेल्या उद्दिष्टांकडे मार्गक्रमण करतो तेव्हा आपलं आयुष्य खूप छान आणि मनोहारी प्रवासाला निघालेलं असतं. हा प्रवास आव्हानात्मक आणि आनंददायी असतो.या आनंदायी प्रवासात आत्मशक्ती जागृत होऊन निश्चित असंदिशादिग्दर्शन घडून जातं. अंतिमत: हे सारं काही आपल्या हातातच असतं. म्हणूनच आपण स्वत: आपल्याभविष्याचे उध्दारकर्ते ठरतो …

ओळख स्वत:ची स्वत:ला

    आपल्या अवतीभवती असणाऱ्या व्यक्ती आपला पोषाख, आपली सांपत्तीक स्थिती, भौतिक प्रगती, व्यक्तिमत्व, कौटुंबिक पार्श्वभूमी याबाबत बरीच मतं-मतांतरं व्यक्त करीत असतात. त्याचा खूप विचार आपणकरतो. प्रयत्न करुनही त्यापासून मुक्त होत नाही. आपण समाजात राहत असल्याने त्यापासून आपली मुक्ततानाही हे सुध्दा वास्तव आहे. मात्र कानांवर पडणाऱ्या स्व:बद्दलच्या लोकांच्या मतांना कितपत मनावरघ्यायचं,याची सीमारेषा आपण ठरवू शकतो ना. तसं जर केलं नाही तर आपण आत्मविश्वास गमावून बसू.

    मानसशास्त्रज्ञांच्या मते मनुष्य हा स्वभावत: सामाजिक प्राणी  आहे. त्यामुळे मनाच्या कोपऱ्यात आपणाससामाजिक मान्यतेची एक आस दडलेली असते. त्यामुळे कोण काय बोलेल याबद्दल आपण कायम जागृत असतो. इतरांची आपल्याद्दलची मते मनात सकारात्मक विचारांची प्रेरणा देत असल्यास उत्तमच. पण आपण जेव्हाइतरांच्या मत प्रदर्शनाने निराश होऊ लागतो तेव्हा ती स्थिती प्रगतीच्या दृष्टिने घातक ठरणारी असते. अशावेळीआपण सर्वांना सर्व काळ खुष ठेवण्याचा प्रयत्न करु लागतो. त्यातून आत्मविश्वासही कमी होऊ लागतो. लोकआपल्याबद्दल चांगले विचार ठेवत नाही, त्यांना आपण स्विकारहार्य वाटत नाही. असं आपणास जेव्हा इतरांचीमते ऐकून वाटायला लागतं तेव्हा आपलं खरं व्यक्तिमत्व गमावून बसण्याच्या प्रक्रियेला स्वत:हून सुरुवात केलेलीअसते. त्यामुळे स्वनियंत्रणापासून हळू हळू दूर जाऊ लागतो. एक प्रकारची असाहय्यता आणि उदासिनता दाटूनयेते. स्वत:ला दोषी ठरवू लागतो. नैराश्याला जवळ करतो. व्यक्तिमत्व दुभंगलं जातं. त्यामुळेचआपल्याविषयीच्या इतरांच्या मताला कितपत महत्व द्यायचं याची सीमारेषा निर्धारित करायला हवी. तुम्हीतुमच्या आयुष्याकडे नीट बघितलं तर लक्षात येईल की अरे,आपणाकडे सुध्दा अनेक चांगले गुण आहेत. इतरसमजतात तसं आपलं व्यक्तिमत्व खुरटं किंवा दोष असलेलं नक्किच नाही. आपण केलेलं आत्मनिरीक्षणस्वविषयी आत्मजागृती करण्यास उपयुक्त ठरु शकतं. ही प्रक्रिया आनंददायी ठरु शकते. त्यामुळे तुम्ही पूर्णक्षमतेनं कार्यरत होऊ शकता. ही कार्यक्षमता तुम्हाला इतरांपासून वेगळी करु शकते. त्यामुळे तुम्ही ठरवलेल्याउद्दिष्टांकडे तुम्ही काळजीपूर्वक आणि ठोस पावलं टाकू शकता..