आयुष्याच्या अटी
तुमचं आयुष्य तुमच्या अटी-शर्तीनुसार जगण्याची क्षमता तुमच्याकडे नसेल तर आयुष्याने तुमच्यासमोरटाकलेल्या अटी-शर्ती स्वीकारा, असं थोर विचारवंत टी.एस.इलियट सांगून गेलाय. याचा अर्थ असा की, प्रत्येक व्यक्तिस त्याचं आयुष्य त्याच्या मर्जीनुसार आणि इच्छेनुसार जगता आलं पाहिजे. हे असं आयुष्यजगण्याची शक्ती, क्षमता त्यास प्राप्त करता आली पाहिजे. अशी व्यक्ती मग आयुष्य मनाप्रमाणे जगूशकते. शिवाय तिला कर्तृत्व गाजवण्याच्या विविधांगी संधी मिळू शकतात.
प्रत्येक व्यक्तिस तिच्या मनाप्रमाणे जगता येईल, अशी स्थिती आदर्शवत ठरते. सांप्रतकाली अशीपरिस्थिती नाही. विविध अडचणी, अडथळे, संकटं, बंधनं, नियम, उपनियम आदी बाबींनी आयुष्य बांधूनटाकलं आहे. त्यामुळे ते मनाप्रमाणं जगण्याची कल्पना सुंदर आणि रम्य असली तरी ती प्रत्यक्षात अस्तित्वातयेणं कठिणच असं बहुतेकांचं म्हणणं पडू शकतं. पण असं म्हणणं वा स्वत:ची समजूत करुन घेणं हेवास्तवदर्शी नाही. एखादी व्यक्ती कितीही मोठी वा लहान असो, तिने ठरवलं तर मनानुसार आयुष्य जगतायेतं.
मनासारखं आयुष्य
मनासारखं आयुष्य म्हणजे स्वच्छंदी आयुष्य नव्हे. असं आयुष्य उधळून टाकण्यासारखं असतं. इतकंमौल्यवान आणि एकदाच मिळणारं आयुष्य उधळून टाकण्यात हशील नाही. मनासारखं आयुष्य साधं आणिसरळ रस्त्यानं जाणारं राहू शकतं. या आयुष्याची दिशा आणि मार्ग आपण ठरवू शकतो. निश्चित करुशकतो.
दिवसाचा प्रारंभ हा नव्या उर्जेने भरलेला असतो. प्रत्येक दिवस ते वरदान घेऊन येतो. हे वरदान कसंस्वीकारायचं, हे प्रत्येक व्यक्तिवर अवलंबून असतं. दिवसाचा प्रारंभ आणि शेवट यामधील प्रवास सुखकारक, आनंददायी, समाधानकारक आणि उत्पादक करण्याकडेच सर्व क्षमता आणि उर्जा केंद्रित करणं हे सर्वस्वीआपल्यावर अवलंबून असतं. त्यासाठी कोणत्याही बाह्य शक्तिचे सहाय्य होत नसतं.
प्रत्येक दिवसाचा प्रवास काही गुलाबाच्या ताटव्यांवरुन चालणारा नसणारच. बहुतेक वेळेस कॅक्टसचीझाडं आणि त्याची काटे रुतण्याची शक्यता अधिक. कसोटी इथे लागते. ती कसोटी यशस्वी होण्यासाठीप्रयत्न करणं हे आपल्या हाती. कॅक्टस त्याचे काम करणार. त्यास गुलाबाच्या पुष्पात कसे रुपांतरीत करतायेईल याचा प्रयत्न करायचा. तो यशस्वी झाला तर उत्तम पण नाही झाला तर काट्यांचा दाह निश्चित कमीहोणार.
दिवसभराच्या प्रवासात सौम्य, शांत, धिरोदात्तपणे काम करण्याचं ठरवू शकतो. कुणाचं तरी वाकडंकरायचं आहे, कुणाला तरी धडा शिकवायचा आहे, कुणाकडून काहीतरी साध्य करुन घ्यायचं आहे, असंजर ठरवलं असेल तर विचारांचा प्रवाह गढूळ होणार. गढूळ विचार आणि गढूळ पाणी दोन्ही सारखेचअहितकारक. तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य धोक्यात आणण्याची क्षमता ठेवणारे. दिवसभराच्याप्रवासात आपण इतरांच्या प्रती सह्रदयता दाखवू शकतो. त्यांच्याशी प्रेमळपणे बोलू शकतो. त्यांचे मनदुखवणार नाही याची काळजी घेऊ शकतो. शब्द तोलूनमापून वापरु शकतो. इतरांशी संवाद साधताना कठोरशब्दात बोलण्याचं टाळता येतं. हे कठोर शब्द सुचण्यात आणि बाणासारखे मुखावाटे पाडण्यात काहीही उर्जालागत नाही. कडवड बोलणं हा काही पराक्रम नाही. हे असं बोलणं दोन मनांमध्ये कधीही न दुभंगणाऱ्याभिंतीच्या उभारणीचं काम करतं. ही अदृष्य भिंत पुढचा प्रवास अधिक कठीण, कष्टदायक आणि मानसिकत्रासाचा करुन जातो. याची जाणीव असूनही आपण वेळप्रसंग येताच त्यास बळी पडतो. हे बळी पडणंआयुष्याची ठरवलेली दिशा उलटफेर करण्यासाठी मोठी भूमिका बजावू शकतं.
खरी सोबत स्वत:ची
दिवसाच्या प्रवासात अनेकांची साथ-सोबत-संगत असली तरी खरी सोबत स्वत:चीच असते. त्यामुळेदिवसभरात जे काही घडू शकतं, घडत राहतं, त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली असते. त्यासाठी इतरांवरदोषारोपण करणं अयोग्य ठरतं. तुमची वाट बिकट ठरण्याची जबाबदारी इतरांवर ढकलण्यानं तत्कालिकसमाधान मिळू शकतं. काही क्षण हसूही येऊ शकतं. पण हे सारं फसवं असतं. ही अशी फसवणूक करुनघेणं हे प्रगतीसाठी मारक ठरतं . दोन पावलं मागं नेणारं ठरतं. हे सुध्दा चांगलं ठाऊक असूनही त्यापासूनकधीच सावध होत नाही. इतरांवर दोषारोपण केल्यानं कुणाचच कधीही भलं झालेलं नाही. होऊ शकतनाही. त्यामुळे मिळते केवळ सहानुभूती. ती सुध्दा पोकळ आणि बिनकामाची. सहानुभूतीनं आयुष्य सुखकारककरता येत नाही. कोणताही पराक्रम गाजवता येत नाही. कर्तृत्व गाजवता येत नाही. सहानुभूतीवरजगणाऱ्यांच्या आयुष्यात केवळ दैन्य, दु:ख, उपेक्षा वेळोवेळी येत राहतात. एकदा असं झालं की मगहताशपणा येतो. नैराश्य येतं. त्यातून सुटका करणं अवघड बनतं. हे सारं झालं असतं ते आपल्यावर्तणुकीमुळे.
परिस्थिती बदला अथवा तुम्ही बदला
असं नेहमीच सांगितलं जातं आणि ते प्रत्येकाच्या स्वानुभावावरुन खरंही आहे की जर तुम्ही परिस्थितीबदलवू शकत नसाल तर तुम्ही स्वत: बदला. कारण ते आपल्या हाती असतं. दिवसभराच्या प्रवासातआपला कार्यभाग साधण्यासाठी इतरांचा स्वभाव बदलण्याची वा त्यांची कार्यशैली बदलण्याची अपेक्षा ठेवतअसू तर त्यात बहुतेक वेळेस अपयश येण्याची शक्यता अधिक. ही शक्यता टाळण्यासाठी आपली कार्यशैलीबदलू शकतो. स्वभावाला मुरड घालू शकतो. त्यामुळे कोणतेही नुकसान घडत नाही. कोणताही कमीपणायेत नाही. अपमान होत नाही. उलट ठरवलेलं काम उत्तमरीत्या पूर्ण होऊ शकतं. एखादं उद्दिष्ट साध्य होऊशकतं. हे सारं शांतपणे आणि कुणालाही न दुखवता होऊ शकतं.
आजच्या दिवसभराच्या प्रवासात कालचा विचार करायचा नसतो. हे खरं असलं तरी काल केलेल्याचुका आज करायच्या नसतात हे त्याहून खरं. कालच्या चुकांना आजही कुरवाळत बसलो तर आजच्याप्रवासात अधिकाधिक अडथळे येणार हे सांगण्यास भविष्यवेत्याची गरज नाही. हे अडथळे मग दिवसागणिकइतके मोठे होत जातात की येणारी हतबलता काही केल्या जात नाही. त्यामुळे नशिब, प्रारब्ध वगैरे अशाअदृष्य गोष्टींचा विचार करायला लागतो. आपला प्रवास कृत्रिम उपायांकडे सुरु होतो. हात दाखवतो. पत्रिकादाखवतो. गंडेदोरे बांधतो. मिरचीलिंबू ओवाळून रस्त्यावर टाकतो. या कृत्रिम उपायांनी मिळणारं समाधान हेपुन्हा फसवं राहतं. यात वेळ, पैसा आणि मानसिक स्वास्थ्य घालवून बसतो. हातातल्या गोष्टी घालवूनबसण्याचा हा असा फटका वेळोवेळी बसूनही आपण सावध होत नाही. परिस्थितीस शरण जाण्याची स्थितीआपणच ओढवलेली असते हे लक्षात येऊनही त्याकडे दुर्लक्ष करतो. एखाद्या आजाराची दुरुस्ती डॉक्टरांकडूनव्यवस्थित तपासणी करुन घेण्याआधी मांत्रिक वा बाबा-महाराजांकडे उपयांसाठी धाव घेण्यासारखं हे ठरतं. शारीरिक व्याधी या औषधातील रसायनांमुळेच दुरुस्त होतात हे शास्त्रीय सत्य आहे. ते जसं कायम लक्षातठेवलं पाहिजे तसचं दिवसभराच्या प्रवासात मानसिक स्वास्थ्य घालवून बसवण्यासाठी जबाबदार घटकांचीनिर्मिती आपणच केलेली असते हेही तेव्हढेच सत्य आहे. या सत्याचा स्वीकार प्रामाणिकरीत्या करायला हवा. असा प्रामाणिकपणा असेल तरच उपाय दिसतील. ते आपल्याजवळ असतात. इतर कुणाकडे बघण्याची वामार्गदर्शनाची त्यास गरज नसते. त्या उपयांचा स्वीकार केला व स्वत:मध्ये बदल केले तर दिवसभराचा प्रवाससुसह्य होण्यास सहाय्य होऊ शकतं.
प्रामाणिकता हवी
आपल्या अटींवर आयुष्य जगण्यासाठी स्वत:सोबत प्रामाणिक असणं हे महत्वाचं ठरतं. हीप्रामाणिकता शंभर टक्के असावी. सोईनुसार बदलणारी नसावी. त्यामुळे मनात स्वत:लाच फसवल्याची भावनानिर्माण होते. त्याचं एक दडपण मनास खात राहतं आणि दैनंदिन प्रवास आनंददायी घडण्याऐवजी क्लेशदायकठरु शकतो. स्वत:शी प्रामाणिक असलो की इतर व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करतात याविषयी फारचिंता किंबहुना कोणतीही चिंता करण्याची गरज भासत नाही. तुम्ही सच्छिल, प्रामाणिक,कर्तव्यकठोर, पारदर्शक, इतरांची काळजी घेणारे, इतरांची मनं जपणारे असाल तर इतरांनी दोष दिले तरी त्यांचंच हसूहोणार. आयुष्य स्वत:च्या अटिवर जगणाऱ्या व्यक्ती या स्वत:ची व स्वत:च्या कार्याशी प्रामाणिक असतात. त्यामुळे त्या इतरांच्या दोषारोपण वा टीकाटीपणीकडे लक्ष देण्यात वेळ दवडत नाहीत.त्यामुळे त्यांच्याआयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी घडतात. त्यांना सर्जनाचा आनंद मिळतो. छोट्या-छोट्या गोष्टिंनी प्रत्येकासस्वत:च्या अटींवर एक सुंदर आणि सफळ असं जीवन जगता येणं शक्य आहे. या छोट्या गोष्टी जर साध्यकरता येत नसतील तर मग आयुष्य खडतर बनणार. ते जसं आणि ज्या दिशेला नेणार त्या दिशेला तुम्हीवाहवत जाणार. त्याच्या अटी तो तुमच्यावर लादणार.या अटी स्वत:वर लादून घ्यायच्या की नाही हे असतं आपल्या हाती. त्या लादून घेतल्या तुम्ही गटांगळ्या खाणार आणि त्यावर मात केली की तुमचं आयुष्य सुंदर होणार.जरा प्रयत्न तर करुन बघा.