(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

उत्साहउर्जा आणि अतिरिक्त दहा मिनिटे

सर्वांनाच अपयशाची भीती वाटत असते. तो मानवी स्वभाव आहे. अपयशाच्या भीतिनेबरेचदा आपण कार्यप्रवणच होत नाही. त्यामुळे होतं काय की आपली प्रगती खुंटते. त्यामुळे अपयशाकडे सकारात्मकरीत्या बघितलं तर ? याचा अर्थ असा की आपणअपयशाकडे यशाची पायाभरणी म्हणून बघायला हवं. अपयशाचं रुपांतर यशामध्येकरण्यासाठी तो अनुभव उपयुक्त ठरतो. यासाठी पुढील काही बाबी मनात निश्चितकरायला हव्यात.

   1) सर्वोच्च धेय्य निर्धारित करा- प्रत्येकाला जीवनामध्ये सर्वोच्च यश प्राप्तकरावयाचं असतं. मात्र प्रत्येकालाच ते साध्य करणं शक्य होत नाही. व्यक्तिपरत्वे त्याचीकारणं बदलत जातात. ठरवलेलं उद्दिष्ट्य भव्य दिव्य असावयास काहीच हरकत नाही. मात्र हे मोठं स्वप्न साध्य करण्यासाठी सुव्यवस्थित असा कार्यपथ निर्धारित करावालागतो. त्यानुसार छोट्या टप्प्यांची आखणी करावी लागते. उंच शिखरावर चढण्यासाठीजसा एक- एक टप्पा पार करावा लागतो, तसच मोठ्या यशाबाबतही असतं. प्रारंभीच्या या छोट्या प्रयत्नांमुळे अंतिम मोठं ध्येय्य साध्य करणं कठिण जात नाही.

   2)स्वत:ला दोषी धरा- यश मिळवणं कठिण जात असेल, सतत अपयशचमिळत असेल तर त्याचा दोष दुसऱ्यांना वा परिस्थितीला देऊ नका. दुसऱ्यांना दोषदेण्याने तात्पुरतं समाधान मिळतं मात्र वास्तव आपणासच ठाऊक असल्यानं आपलं मनस्वत:ला गुन्हेगार ठरवत राहतं. याचा नकारात्मक परिणाम पुढील प्रयत्नांवर होतो. त्यामुळे अपयशाची जबाबदारी हिमतीने स्वीकारायला हवी. ही जबाबदारी स्वीकारलीकी कोणकोणत्या चुका झाल्या याची मांडणी वस्तुनिष्ठपणे करता येणं शक्य होतं.

   3)कामाची यादी तयार करा- उद्दिष्ट्यपूर्तीसाठी आवश्यक विविध कामांचीस्वयंस्पष्ट यादी कागदावर लिहावी. या यादितील कामांचा प्राधान्य क्रम ठरवावा. त्याबरहुकूम एकएक कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. अशी यादी आपले इप्सितसाध्य करण्यास, कार्यप्रवण ठेवण्यास आणि ज्याबाबींमुळे अडथळे येऊ शकतात, तेदूर करण्यास ही यादीच साहाय्यभूत ठरु शकते.

   4)पुरेशी झोप घ्या- धेय्यपूर्तीपर्यंत पोहचण्यासाठी आपलं मन आणि शरीरतंदुरुस्त असणं आवश्यक असतं. त्यासाठी दररोज किमान सहा ते आठ तासांचीकोणत्याही अडथळयाविना असलेली झोप घेणं अत्यावश्यक आहे. याबाबात सर्वमानसशास्त्रज्ञ आणि डॉक्टरांचं एकमत झालं आहे. पुरेशी झोप न झाल्यास कार्यावरएकाग्रचित्तानं लक्ष केंद्रित करु शकत नाही. परिणामी त्यात बऱ्याच त्रुटी राहण्याचीशक्यता असते. अंतिमत: या त्रुटी अपयशाकडे नेतात.

   5)काही कामे इतरांना सोपवा- उद्दिष्ट्यपूर्तीसाठी करावयाच्या प्रयत्नांवर लक्षकेंद्रित करण्यासाठी घरी किंवा कार्यालयात काही कामे इतरांकडे विश्वासाने सोपवावित. सर्वच कामे एकट्यानेच करण्याचा अट्टाहास करु नये. त्यामळे वेळ जातो आणि उर्जाहीखर्ची पडते.

   सहकारी आणि कुटुंबियांवर विश्वास दाखवला तर ते ही तुलनेने कमी महत्वाची कामेकाळजीपूर्वक पूर्ण करु शकतात. मोठ्या कार्यपूर्तीकडे जाताना अवतीभवती असलेल्यासंसाधनांचा उत्तम उपयोग करुन घेण्याचं कौशल्य प्राप्त करायला हवं.

   6)महत्वाच्या टप्प्यांच्या नोंदी- कार्यपूर्तीसाठी आवश्यक महत्वाच्या नोंदी स्वत: एका नोटपॅडवर कराव्यात. स्मरणशक्तीवर विश्वास ठेऊ नका. विविध ठिकाणी या नोंदीकरु नका. अशा नोंदी करण्यासाठी आवश्यक असलेलं नोटबूक कायम सोबत ठेवा. अशा नोंदी हाताशी असल्या की त्यांच्या शोधासाठी वेळ दवडावा लागत नाही. महत्वाच्या नोंदी जेव्हा तात्काळ सापडत नाहीत तेव्हा आपण अस्वस्थ होतो. चिडचिडहोते.त्यातून कार्यपूर्तीसाठी अडथळे निर्माण होऊ शकतात.

   7) अडथळ्यावर मात- काळजीपूर्वक कामांवर लक्ष केंद्रित केले असतानाच तेकाम पुढे सरकत नसल्याची स्थिती येऊ शकते.  अशावेळी आपणास काहीच सूचतनाही. उर्जा आणि उत्साह संपल्याचं वाटू लागतं. अशावेळी निर्माण झालेली समस्यासोडवण्यासाठी आपण प्रयत्नशीलही होतो. पण उत्तर सापडत नाही. समोर जाता येतनाही. अशावेळेस त्याच समस्येत गुंतून राहण्याऐवजी इतर छोट्या आणि कमी महत्वाच्याकार्याकडे लक्ष पुरवावं. हे सहजतेनं होणारं कार्य जेव्हा घडून जातं तेव्हा मनावर आलेलाशिण दूर होतो. मनास नवी उर्जा प्राप्त होते. नवा उत्साह मिळतो . या नव्या उत्साहानेपुन्हा ज्या ठिकाणी अडकलो होतो किंवा ज्या समस्येची उकल करता येणे अशक्यप्रायझाले होते, तिकडे वळू शकतो. उत्साही मन आणि मिळालेली उर्जा  याद्वारे आपणनक्किच ती समस्या सोडवून पुढे जाऊ शकतो.

   8)वेळापत्रक-आपल्या कार्यपूर्तीसाठी वेळापत्रक आखून घेणं आवश्यकआहे.कुणालाही 24 तासांपेक्षा अधिक वेळ मिळू शकत नाही हे वास्तव एकदा लक्षातघेतलं की वेळापत्रकाचं महत्व लक्षात येऊ शकतं. अमूक वेळेत मी ई- मेलला उत्तरेदेईन, अमूक वेळेत मी फाइलिंचा निपटारा करीन, अमूक वेळेत मी बैठका घेईन , अमूक वेळेत मी दुपारचे जेवण घेईन, अमूक वेळेत मी कार्यालयीन टपाल बघूनआवश्यक पत्रांची उत्तरे देईन अशा बाबी ठरवून आपण त्या निर्धारित  वेळेत करायलाहव्यात. हे वेळापत्रक आपल्या मुख्य कार्यासाठी अधिकाधिक वेळ उपलब्ध करुनदेण्यास साहाय्यभूत ठरु शकतं.

   9) छोट ब्रेक- कार्यपूर्तीसाठी सर्व लक्ष केंद्रित करणं आवश्यकच असतं. मात्रत्याचवेळेस कामामुळं येणारा शिण घालवण्यासाठी थोडासा ब्रेक घेणही आवश्यकठरतं. एकाच ठिकाणी खूप वेळ बसून राहिलो तरशरीर थकंत. डोळे दुखायला लागतात. पायांना त्रास जाणवू लागतो. गुडघे दुखू लागतात. यामुळे कामाचा दर्जा खालावण्याचीशक्यता असते. त्यामुळे जेव्हा आपणास शिण जाणवू लागतो तेव्हा लहानसा ब्रेकघ्यावाच.

   हा ब्रेक, एक कप चहा- कॉफीचा असू शकतो. पाच मिनिटांचं चालणं असू शकतं. पाच मिनिटे डोळे बंद करुन शांत बसण्याचा असू शकतो किंवा मग सहकाऱ्यांसोबत वाकुटुंबियांसोबत हास्य विनोद करण्याचाही असू शकतो. असे छोटे ब्रेक नवी उर्जा प्राप्तकरुन देतात.

   10) संपर्कात राहा-आपल्या कार्यपूर्तीसाठी जेव्हा इतरांशी संपर्क साधण्यासाठीइमेल किंवा पत्र पाठवतो किंवा निरोप ठेवतो, तेव्हा आपण दुसऱ्या बाजूने तात्काळप्रतिसादाची अपेक्षा ठेवतो. पण तसं प्रत्येक वेळेस घडेलच असं नाही. त्यामुळे वेळ नदवडता स्वत: संबंधितांच्या संपर्कात राहायला हवं. आपणास हव्या त्या बाबींसंबंधितांकडून करवून घेणं ही आपलीच जबाबदारी असल्याचं समजायला हवं. समजाप्रतिसाद मिळत नसल्यास तेच काम कसं करायचं हे ठरवता आलं पाहिजे. ते कामकरण्याची क्षमताही प्राप्त करायला हवी.

11)अतिरिक्त दहा मिनिटे

   यशस्वी होण्यासाठी तक्रारींचा सूर लावण्याऐवजी कार्यपूर्ती कशी होईल याकडेअधिक लक्ष द्यायला हवं. याप्रयत्नांमध्ये चिकाटी आणि सातत्य राखलं पाहिजे. आपल्या क्षमता आपणास ठाऊक असतातच. त्यापलिकडे जाऊन प्रयत्नांना दिशा दिलीतर आपण या क्षमतांच्या परिघात अडकून पडणार नाही. उद्दिष्टपूर्तीसाठीची  वाटचालसुयोग्य पध्दतीने होईल.

   सारं काही शक्य आहे, हाती घेतलंलं कार्य सिध्दीस जाऊ शकतं, असं आपल्यामनास सतत सांगत राहिलं पाहिजे. घडू शकत नाही, असं जर मनास वाटलं तर तेअपयशाचं कारण ठरु शकतं.

   इतरांकडून ज्या अशक्यप्राय अशा गोष्टी घडल्या , अस्तित्वात आल्या, त्याचंकारण त्यांनी त्यांच्या मनाला हे होऊ शकतं, असं घडू शकतं, हीच शिकवण कायमदिली असल्याचं आपल्या लक्षात येईल. विज्ञानाचे विविध शोध, साहस वीरांचेसाहस, खेळाडूंचे विक्रम , हे घडू शकतं या मंत्रामुळेच शक्य झाले आहेत.

   यशस्वी होण्याची इच्छा असणं आणि तशी अपेक्षा ठेवणे या दोन भिन्न बाबी आहेत. इच्छा ही आपणास सृजनाची दिशा दाखवते. आपल्या प्रगतीच्या वाटेवरील प्रकाशदीपठरते. मात्र आपण जेव्हा अपेक्षा करतो वा ठेवतो तेव्हा इतरांवर अवलंबून असतो. त्यामुळेयशाला मर्यादा पडतात.

   स्वशक्तीची जाणीव इच्छा करुन देते. अपेक्षा आपणास समाधानी ठेवत नाहीत. तत्ववेत्त्यांच्या मते अपेक्षा मनाची शत्रू ठरते. कारण अपेक्षेची परिपूर्ती आपणासइतरांकडून हवी असते. इच्छा विविध संधीचे दिशादर्शन करते.अशा संधी जेव्हा हस्तगतकरतो तेव्हा यश प्राप्त  होऊ शकतं. कोणतीही संधी हस्तगत करताना उत्साह आणिस्पष्टता हवी. स्पष्टतेमुळे मनातील गोंधळ दूर होतो . यशस्वी होण्यासाठीच्या प्रयत्नांमध्येसातत्य राहते.

   आपल्या स्वक्षमता, आतापावेतो मिळवलेलं यश, आणखी उच्च टप्प्यावरजाण्यासाठी अचूक कार्यदिशा लक्षात येतात. भूतकाळातील अपयश किंवा चुकांचा फारविचार करणे योग्य ठरत नाही. कारण हे विचार नकारात्मकतेकडे म्हणजचे हे शक्य नाहीकिंवा घडू शकत नाही , याबाबीकडे वळवत असतात.

   राल्फ डब्ल्यू इर्मसन हा विचारवंत सांगून गेलाय की, तुम्ही इतरांपेक्षा यशस्वी होतायाचा अर्थ तुम्ही पराक्रम गाजवला असाच आहे. इतरही पराक्रम गाजवतातच पण तुम्हीत्यांच्यापेक्षा दहा मिनिटे अधिक पराक्रम गाजवता. ही अधिकची दहा मिनिटे तुमच्याधेय्यपूर्तीकडे घेऊन जाणारी असते. तुमचं श्रेष्ठत्व तुमच्याकडे असलेले ज्ञान, तुमच्यामनातील उत्तम भावना किंवा इच्छा ठरवत नसते तर ही अंतिम उद्दिष्टपूर्ती ठरवते, हीबाब लक्षात ठेवायला हवी. मात्र साधारणत: असं दिसतं की त्या अतिरिक्त दहामिनिटांपर्यंत आपण प्रयत्न करण्यासाठी कमी पडतो. त्यासाठी उत्साह आणि उर्जाकायम ठेवत नाही. कारण आपणास यश तात्काळ हवं असतं.त्यासाठी आतुर झालोअसतो. हे आतुरलेपण आपल्याला अतिरिक्त दहा मिनिटे प्रयत्नांपासून थांबवतअसतात. स्वामी सुखबोधानंद हे तत्ववेत्ते असं सांगतात की जेव्हा तुम्हाला कोणत्याहीकृतीचा आंनद घेता येत नाही तेव्हा तुम्ही अस्वस्थ आहात असं समजावं. ते टाळण्यासाठीआपल्या प्रयत्नांचा प्रत्येक क्षण आनंदी करायला हवा. हे आनंदी क्षण अधिकाधिकउर्जा देतात .उत्साह कायम ठेवतात. हा उत्साह आपणास ,अतिरिक्त दहा मिनिटेप्रयत्नशील राहण्यासाठी प्रेरित करत असतात. ही प्रेरणाच यशाच्या शिखरावरनेण्यासाठी सर्जनशील शक्ती प्रदान करते.

– सुरेश वांदिले