(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

एक घाव नि असंख्य तुकडे

बऱ्याच व्यक्तिंच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनातील संकटांचं मूळ कारण बरेचदा त्यांचं कठोर बोलणंअसतं. अशा व्यक्तींच्या मुखातून निघालेलं शब्द बाणासारखे असतात. ते घायाळ करुन जातात. प्रत्यक्षातीलबाणानं झालेली जखम कालांतरानं भरुन निघू शकते. पण आपल्यापैकी अनेकांचा अनुभव असा आहे कीशब्दबाणांनी झालेली जखम कालौघात भरुन निघणं शक्य होत नाही. या जखमेच्या वेदना मनाच्या एकाकोपऱ्यात ठसठशित असतात. चेहऱ्यावर ते दिसत नसलं तरी या शब्दबाणांनी केलेल्या अपायांची आठवणप्रसंगपरत्वे अंतर्मन मात्र करुन देत राहतं.

मन:स्वास्थ्य बिघडतं

    जिव्हारी लागणारे शब्दबाण हे मन:स्वास्थ्य बिघडवतात. याचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी असतो. नकारात्मक विचारांचे तरंग भोवऱ्यासारखे फिरत राहतात. स्वत:वरचा आत्मविश्वास डळमळित होऊ लागतो. आपलीच आपल्याला भीती वाटू लागते. ज्याच्या शब्दबाणांमुळे आपण व्यथित होतो, त्याच्याबद्दलची अप्रीतीनिर्माण होते. दुरावा निर्माण होतो. एकमेकांमध्ये भिंती उभ्या राहातात. अगदी,अत्यंत जवळच्या नात्यांमध्ये सुध्दाअसं घडतं. नंतरचं आयुष्य औपचारिक  व्यवहार ठरतो. आपणास हे कळत नाही अशातला भाग नाही. पण तरीसुध्दा शब्द जपून वापरले जात नाहीत ते नाहीतच. आपली जीभ ही तलावरीपेक्षाही तीक्ष्ण होऊ शकते. तीक्ष्णधारेची तलवार शिरच्छेद केल्यावरच शांत होते.आयुष्याचा शेवट करुन जाते. तीक्ष्ण जिव्हा सुध्दा वेगळ्या अर्थआणि संदर्भाने हीच कृती करते.

    जिव्हेची ही विध्वंसकारी शक्ती ठाऊक असूनही आपण तिला नियंत्रणात ठेवत नाही. उचलली जीभलावली टाळ्याला, ही म्हण त्यावरुनच सिध्द झाली असावी. घराघरातील कटू प्रसंगांची जननी ही जिव्हा असते.महाभारत घडलं ते मुख्यत्वे अशा कठोर बोलांनीच. एकमेकांची मनं दुखावली आणि त्यातून मोठा संघर्ष झाली. एक पिढी नष्ट झाली. व्यासमुनिंनी मोठ्या खुबिनं हे सारं मांडलं. पण आपण ते वाचतो आणि विसरुन जातो.जिव्हेबाबतची सावधगिरी बाळगत नाही ती नाहीच.

सावध व्हा

    जिव्हा जेव्हा उचलली जाते तेव्हा आपण सावध होण्याची गरज असते. पण त्याक्षणी आपण पूर्णपणेतिला शरण गेलेलो असतो. किंवा या जिभेनेच आपल्यावर ताबा मिळवलेला असतो. ती सांगते नि आपणऐकतो, असच बहुदा घडतं. अनेक समस्यांचं मूळ यात दडलेलं असतं. हे टाळता येणं शक्य आहे. सहज सुध्दाआहे. फक्त आपला अहं त्यात आडवा यायला नको. हा अहं नेमका अशा वेळी नागासारखा फणा काढतो.आत्मसन्मान, तथाकथित प्रतिष्ठा , कथित मूल्ये वगैरेची जाणीव करुन देतो. हे नागोबा आणि तलवाररुपीजिव्हा असं विषारी समिकरण घडतं तेव्हा विपरित प्रसंग घडणार, हे ओघानं आलच. या समिकरणामुळे दोन्हीव्यक्तिंचं नुकसान होतं. एकाचा तेजोभंग होतो. दुसरा मन:शांती आणि नात्यातला गोडवा, व्यावसायिकजीवनातील आपुलकी आणि संधी घालवून बसतो.

    जिव्हा ठेवावी स्वाधीन, तरी देहा न ये बंधन अशी एक म्हण आहे. जिव्हेवर नियंत्रण ठेवता आलं तर  मुखातून बाहेर पडू पाहणारे कटू शब्द घशातच अडकू शकतात. कटू शब्दांचं असं अडकणं हिताचं असतं. एक घावदोन तुकडे करण्याचा जो क्षण असतो तो त्यामुळे टळू शकतो. ते त्याक्षणी जरी खूप कठीण आणि अशक्यप्रायअसलं तरी ते करायलाच हवं. कारण त्यामुळे पुढील कित्येक अप्रिय बाबी त्यामुळे टळू शकतात. आपल्याला जेकाही बोलायचं असतं ते शांतपणे, प्रेमळपणे पण ठोसपणे सांगता येऊ शकतं.

    हितमं मितं मधुरम् / प्रियं स्निग्ध भोजनं वचनंचापि युक्तं / मुक्तं प्रशस्यते  परिणामियत् // याश्लोकाचा भावार्थ असा की आपलं बोलणं गोड आणि मधुर , आनंदायी आणि प्रेमळ असलं तर ते हितकरठरतं. जिभेवर साखर असावी असं नेहमी आपल्याला सांगितलं जातं. याचा अर्थ खोटी साखर पेरणी करत राहावीअसाही नाही. हिताचं बोलणं सुध्दा संबंधित व्यक्तिला  न दुखावता सांगता येऊ शकतं.

काळजी घ्या

    दोन व्यक्तींमध्ये वाद होऊ शकतो. पण हा वाद कोणत्या टोकापर्यंत न्यायचा हे मात्र आपण ठरवू शकतो.शिवाय वाद होताना तो शांतपणे करावा. या वादांचं रुपांतर वितंडवादात होऊ न देण्याची काळजी घेण्याचाप्रयत्न करायला हवा. वितंवाडातून मग जिव्हेवरील ताबा सुटतच जातो. शब्द सुसाट होतात. खरं तर त्या क्षणीआपलं भान हरपून जातं. आपली कानशिलं तापतात. ह्रदय धडधडू लागतं. मस्तक तापतं. शरिरात कंपही निर्माणहोतो. अंतर्मनात दडलेला राग उफाळून येऊ लागतो. या बाह्य स्थितीचा प्रभाव रक्तावर पडतो. रक्तात विषारीपदार्थांची निर्मिती होऊ लागते. लाल पेशिंवर त्याचा परिणाम होतो. रक्तदाब वाढू शकतो. हे वारंवार घडत राहिलंतर बऱ्याच मानसिक आणि शारीरिक व्याधींनी आपण ग्रासलं जातो. हे सारं वैज्ञानिकदृष्ट्यासिध्दही झालं आहे.याची आपणास कल्पनासुध्दा असते. यावर अनेक तत्ववेत्ये, संत, प्रवचनकार, विद्वान आणि सज्जनांनीसांगून ठेवलय. हरघडी ते सांगत असतात. आपल्या कानावरुनही ते गेललं असतं. असं वागलो तर त्याच्याहोणाऱ्या विपरित आणि अनर्थकारी घटना – प्रसंगाची साक्षसुध्दा आपण झालेलो असतो. असं असतानाहीआपण जेव्हा अशा स्थितीत सापडतो तेव्हा स्वत:चा सुज्ञपणा कां घालून बसतो ?

शब्दांवरचं नियंत्रण

    शब्दांवरचं नियंत्रण ही संपूर्णपणे आपल्या नियंत्रणातील बाब आहे. मधूर शब्दांनी कुणाचं नुकसान होतनाही. विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या व्यक्तींनी हे पथ्य बहुतांशवेळा पाळलेलं दिसतं. येशू ख्रिस्तानं मधुरबोलण्यानं जग जिंकलं. शिवाजी महाराजांनी हजारो मावळ्यांना आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनवूनआपलं साम्राज्य स्थापन केलं. साप्रंतकाली श्री श्री रवीशंकर यांचं उदाहरण ठळकरीत्या आपल्या समोर आहेच.

    व्यावहारिक आणि व्यावसायिक आयुष्यात आपल्याला चार पावलं पुढे राहायचं असेल तर शब्दांचा वापरअतिशय काळजीपूर्वक करावा लागतो. आपल्या कठोर आणि कटू बोलण्यानं अपयशाच्या गर्तेत गेलेल्या अनेकव्यक्ती असतात. अशांना सर्वत्र टाळलं जातं. आपणावाचून कुणाचं काहीच अडत नाही. त्यामुळे जर नीट बोललोनाही तर आपल्याला बाजूला करण्यात आणि अडगळीत टाकण्यात इतरांना काहीच  वाटणार नाही. यामुळेहोणारं नुकसान हे भरुन निघणारं नसतं. मग पुढे आयुष्यभर आपणास कुंठित आणि व्यथितरीत्या मार्गक्रमण करावंलागतं. मग आपण स्वत:ला आणि नशिबाला आणि ग्रहताऱ्यांनाही दोष देत राहतो.

अकल्पित हानी

    व्यक्तिगत जीवनात होणारी हानी अकल्पित अशी राहू शकते. म्हणजे आयुष्य, संसार उध्दवस्तझाल्याची कित्येक उदाहरणं आहेत. व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्यात अशाप्रकारे कडेलोट करण्याचीक्षमता असणाऱ्या शब्दबाणांची विषारी शक्ती प्रत्येकानं लक्षात घ्यायलाच हवी. त्यातच आपले  व आपल्याकुटुंबियांचे हीत दडलेले असते. आयुष्य आनंदायी, समाधानानं आणि यशस्वीरीत्या जगायचं आहे की रडतकुथतआणि निराश होऊन, दोषांना उगळत जगायचं हे फक्त आपणच ठरवू शकतो. आपले गुरु वा आपण मानतअसलेली धार्मिक वा इतर श्रध्दास्थानं ही बाब ठरवू शकत नाही. आपली वैखरी ही एकतर यशरुपी वैकुंठाचा मार्गदाखवू शकते किंवा नैराश्यरुपी पाताळात कडेलोट करु शकते.