एक नवा मंत्र–पगारातच भागवा
राजपत्रित अधिकारी महासंघ गेल्या काही वर्षापासून एक वेगळं अभियान राबवत आहे. पगारात भागवा, हेते अभियान. पारदर्शक कार्यसंस्कृतीचे हे सर्वात मोठं अधिष्ठान. याचं सर्वत्र कौतुक झालं आहे. पगारातभागवा याचा साधा अर्थ असा की आपल्या मर्यादेतच वागा. मर्यादेत राहिलो की आपण आनंदीराहतो. मर्यादाभंग झाला की दु:खाचे, असाधानाचे ढग आपल्या अवकाशात येऊ लागतात. हेढग मग जाता जात नाहीत.
केवळ शासकीय कर्मचाऱ्यांनीच असं पगारात भागवाचा निर्धार करुन वा त्याप्रमाणे वागून अपेक्षितबदल संभवत नाही. समाजातील प्रत्येकानेच पगारातच भागवाचा व्यापक अर्थ समजून घ्यायलाहवा.
अधिकाचा हव्यास
सामाजिक स्तरावरील, अनेक कुटुंबातील आणि व्यक्तिगत अस्वस्थतेचं मूळ कारण हे अधिकाचा हव्यासयात दडलेलं आहे. हा हव्यास काही केल्या कमी होत नाही. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांकडे बघा.पालकआणि शिक्षक त्यांना अधिकाधिक गुण मिळवण्यासाठी भरीस घालतात. विद्यार्थी त्यांच्या परिने अभ्यास करतचअसतो. पण अधिकच्या हव्यासापायी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण होते. त्यातून त्याचाआत्मविश्वासही डळमळीत होऊ शकतो. त्याला न्यूनगंडही येऊ शकतो. अधिक गुण मिळवण्याचा हा हव्यासविद्यार्थ्यांना खऱ्या ज्ञानार्जनाऐवजी अधिकाधिक गुण मिळवणाऱ्या विविध प्रकारच्या ट्रिक्स हस्तगत करण्याकडेनेत राहतो. ज्ञानार्जन कमी आणि गुण जास्त असं सध्याचं चित्र निर्माण आहे.
संपत्तीच्या हव्यासाची मर्यादा ओलांडल्याने कुटुंबाकुटुंबामध्येच वैमनस्य, दुरावा,दु:ख निर्माण होत आहेत. त्याचा कडेलोट झाल्याने आपल्याकडे आहे-रेंचे एक जग आणि नाही-रेंचे दुसरे जग निर्माण झाले आहे. हीविषमता पराकोटीची असून मुंबईसारख्या शहरात तर त्याचे विदारक चित्र पावलोपावली दिसते.
मर्यादा म्हणजे स्वनियंत्रण
मर्यादा पाळल्यानं सुख मिळू शकत नाही वा समाधान वा आनंद मिळू शकत नाही,असं कां समजलंजातं? मर्यादा पाळणं याचा अर्थ स्वत:वर नियंत्रण. ते कोणत्याही प्रकारचं राहू शकतं. मर्यादेच्या पलिकडेबोलणं गेलं की विसंवाद होतो. त्यातून बरचं विपरित घडत राहतं.
आयुष्याला यशस्वी करण्यासाठी मर्यादांचं कुंपण घालणं आवश्यक ठरतं. आपली क्षमता, उर्जा आणिबुध्दीमत्ता स्वत:स चांगली ठाऊक असते. त्यापलिकडे जाऊन साध्य करण्यासाठी जेव्हा आपण प्रयत्नशीलहोऊ लागतो, तेव्हा त्यातील फोलपणा हळूहळू लक्षात येऊ लागतो. पण आपलं पाऊल मागे पडत नाही. आपला अट्टाहास कायमच असतो. मग शॉर्टकट शोधू लागतो. हे लघुमार्ग मिळायाला सोपे असतात. त्यावाटेवरुन जाण्याचा मोह आपण टाळत नाही.स्वत:च्या क्षमतांना वस्तुनिष्ठपणे जोखलं नाही तर पाय घसरुशकतो. तो आणखी खोल जाऊही शकतो. सध्याचे दृष्य असेच दिसते.
स्वनियंत्रण म्हणजे सकारात्मकता
आपल्या संस्कृतीत स्वनियंत्रण आणि मर्यादांवर भर दिलेला आहे.स्वनियंत्रणामुळे आयुष्याची दिशाभरकटण्याची शक्यता कमी असते. स्वनियंत्रणाचा दुसरा समान अर्थ सकारात्मकता असा घ्यायला हवा. हव्यास हा अनियंत्रित व्यक्तिमत्वाचं दर्शन घडवतो. अशा व्यक्तिमत्वात नकारात्मकतेच्या अधिकाधिक छटा असतात. आहारविहारावर स्वनियंत्रण नसल्यानं आरोग्यविषयक विविध समस्या निर्माण होत आहेत. मुलांपुढेतेच आदर्श असल्यानं मुलं गुटगुटित होण्याऐवजी गुबगुबित होऊन ह्रदयविकार,मधुमेहादी आजारांनी ग्रस्तहोताहेत.
स्वनियंत्रण हे मनाला शांती देऊ शकतं. स्वत:ला स्थिर ठेऊ शकतं. सारासार विचार करण्याची शक्तीदेतं.अनियंत्रण वागणं सारं काही उलटं करतं. जगातील विविधांगी भीषण समस्याचं मूळ यात दडलेलं आहे.
वनावरील अतिक्रमणातून केवळ प्राण्यांचा अधिवासच आकुंचला नसून पर्यावरणावर त्याचे वाईट परिणातहोताहेत. संयम आणि स्वनियंत्रण न राखण्याचा हा परिणाम. सध्या सारे काही ठीक-ठाक वाटत असलं तरीपृथ्वीच्या संतुलनास धोका निर्माण झाला आहे. किंवा त्या धोक्याच्या दिशेनं झपाट्यानं वाटचाल होऊघातली आहे. अधिकाच्या हव्यासातून चीनची अर्थव्यवस्था सुदृढ झाल्यासारखी वाटली. पण हा हव्यास कसाकृत्रिम होता हे गेल्या काही दिवसात यादेशाच्या युआन या चलनदरात त्यानेच केलेल्या घटीमुळे दिसून आलं. ही घट होताच जगाच्या अर्थकारणावर वेगवेगळे परिणाम झाले.आपला रुपया कोसळला. विविध कंपन्यांच्या/उद्योगांच्या शेअरमध्ये घट झाली. मर्यादेत न राहिल्याचा हा परिणाम. याचा प्रभाव लगेच दिसत नाही. पणहळूहळू हे प्रभावक्षेत्र आपल्या दारापर्यंत येऊन पोहचतं.
जीवनाचा दर्जा आणि गुणवत्ता सतत वाढत राहणं हे आवश्यक आहे. पण सध्या तशी स्थिती नाही. उपकरणं आधुनिक आहेत. तंत्रज्ञान खूप पुढे गेलं आहे. पण शुध्द पाणी, शुध्द अन्न, शुध्द वातावरण, चांगलं आरोग्य याची वाणवा आहे. आपण स्वनियंत्रणाला फाटा दिल्यानं ही स्थिती उद्भवली.
सध्या वाहतूक अनियंत्रित होण्याचं सुध्दा हेच कारण. दोन गाड्यांमध्ये भागत असूनही चारांचा सोस. चारगाड्या म्हणजे इंधनात वाढ, प्रदूषणात वाढ, पार्किंगची व्यवस्था अपुरी म्हणून रस्त्यावर वाहनांची गर्दी, यागर्दीमुळे रस्त्यावरुन चालणाऱ्या सामान्य माणसाचा जीव मुठीत, सतत होणारे अपघात, जाणारे जीव, बिघडणाऱ्या गाड्या आणि बरच काही.
सध्या वेगवेगळ्या कथित देव-बाबा (गॉडमेन),देवी-माँ (गॉडवूमेन) यांच्या चमत्कारिक कथा आणिउपकथा कानावर पडताहेत. आपण प्रत्यक्ष बघतही आहोत. सारे काही हव्यासातून घडते आहे. आसारामबापूंची संपत्ती 10 हजारकोटींची असल्याचा अहवालच इंडिया टुडे या नियतकालिकानं प्रकाशितकेलाय. पगारात भागवा असं जेव्हा म्हंटल जातं तेव्हा, मिळतं तेव्हढ्यातच भागवा असा होतो. यासाधुसंतांच्या जवळ परमेश्वराच्या नामस्मरणाची अमाम संपत्ती असताना ते या भौतिक संपत्तीच्या मोहात कांपडताहेत? या पडण्यातूनच आज त्यांची अवस्था घर का ना घाटका झाली. ते होणारच होते. पणसर्वसामान्यांचा विश्वास आणि आस्थेचं काय, त्याला तडा गेला. त्याचं दु:ख मोठं असतं. हे दु:खफसवणुकीचं असतं. या अशा फसवणुकीमुळे सगळ्यांवरचा विश्वास उडतो. हे टाळता आलं असतं.जेव्हामर्यादा ओलांडली जाते तेव्हा असं घडतं. मग ही मर्यादा ओलांडणं कथित साधू -संतांच्या बाबतीत असो कीव्यक्तीगत स्वरुपाची असो.
हव्यास आणि प्रगती
हव्यास आणि प्रगतीचा अर्थ जोडण्याचा प्रयत्न बालीश स्वरुपाचा आहे. ठेविले अनंत तैसेचीराहावे,असाही त्याचा अर्थ नाही. प्रत्येकला पुढच्या टप्पा गाठायचा असतो. ते आवश्यकही आहे.पणत्यासाठी मर्यादा ओलांडण्याची गरज भासू नये. विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्यांची उदाहरण यासाठी पुरेसीआहेत. मर्यादेचं उल्लंघन न करताही श्रीमंत होता येतं. जीवनातल्या चांगल्या गोष्टींचा मनमुराद आनंद घेतायेतो. दर्जेदार आयुष्यही जगता येतं. पण आपलाच यावर विश्वास नसतो. अधिकचं आल्याशिवाय सुख मिळूशकत नाही, समाधान मिळू शकत नाही,असं वाटत राहतं. मग अधिकचं मिळवण्यासाठी आपले कथितप्रयत्न असतात ते स्वऱ्हासाठी कारणीभूत ठरत जातात.
सध्या सर्वप्रकारच्या व्यवस्थेला किड लागल्याचं आपणच इतरांना सांगतो. त्याला आपलाही हातभारलागला आहे.नुकताच आपण स्वातंत्र्यदिन साजरा केला. गेल्या ७० वर्षात व्यक्ती आणि समाज म्हणून आपणपुढच्या टप्प्यावर पोहाचला हवं होतं. पण अवतीभवती दिसते ते सार्वत्रिक असमाधान, असुया, असुरक्षितता, एकमेकांप्रती असलेला दुष्टावा, कटकारस्थाने, बिघडलेली सामाजिक व्यवस्था, एकमेकांपासून तुटलेली मने, संघर्ष आणि परस्परांमध्ये उभ्या राहत असलेल्या भिंती. बाह्य वातावरण छान वा सुंदर वा प्रसन्नही असेल. पण अंतरंगात मात्र अस्वस्थता खदखदत आहे. कुणालाही कुणाशीही देणंघेणं नाही. समोर व्यक्ती मरुनपडला असेल तरी मनाला त्याचं काहीही वाटत नाही. एखादा असहाय्य मदतीसाठी आक्रोश करत असेल तरीत्याचेही काही वाटत नाही.
स्वनियंत्रण घालवून बसल्यानेच सामाजिक अस्वस्थतेची निर्मिती झाली आहे. पगारात भागवा हे काही याचेउत्तर ठरु शकत नाही. पण स्वनियंत्रण आणि मर्यादांचं भान ठेवण्यासाठी हा मंत्र उपयुक्त ठरु शकतो. हामंत्र आपले व्यक्तिगत आणि कौटुंबिक जीवन सुखी आणि आनंदी ठेवण्यासाठीही उपयुक्त ठरु शकतो.