कार्यप्रवणतेची प्रेरणा
आपण ताण -तणावाशिवाय कार्यरत राहू शकणार नाही का, असं बहुतेकांना वाटत असतं. आरोग्याच्या विविधसमस्या या ताण-तणावांमुळे अधिक तीव्र होतात यावर बहुतेक डॉक्टरांचं सांगणं असतं. मात्र कार्पोरेट क्षेत्रातताण-तणाव हे उद्दिष्टपूर्तिसाठीचं टॉनिक समजलं जातं. अनेक पालक त्यांच्या मुलांनी परीक्षेत किंवा स्पर्धेमध्येउत्तम कामगिरी करावी यासाठी विशिष्ट पध्दतीनं मुलांना ताण-तणावात ठेवत असतात. ताण-तणावाचं महत्वखरोखरच आहे का ?
अनेकांना ताण हा त्यांच्या कार्यप्रवणतेसाठी एखाद्या वाहनासारखं ठरतं. म्हणजे ताण आला की ते सुसाटसुटतात. त्यांना कार्यप्रवणतेसाठी प्रेरणा मिळते. अशाव्यक्ती आळस झटकून टाकतात. हा ताण सकारात्मकसमजावा. मात्र बऱ्याच व्यक्तिंना ताण सहन होत नाही . ताणामुळे ते त्यांची कार्यक्षमता घालवून बसतात. त्यांच्याहातून आणखी चुका घडतात किंवा घडू शकतात. या चुका निस्तारण्यात त्यांचा अधिक वेळ वाया जातो. त्यातूनत्या व्यक्तिची अकार्यक्षमता दिसून येते.
बऱ्याच व्यक्ती ताण आला की कार्य करणं थांबवतात. आजच्या अत्यंत धकाधकीच्या जीवनात कोणत्याना कोणत्या स्वरुपाचा ताण येणं स्वाभाविक आहे. पण या ताणाला स्वत:वर किती स्वार होऊ द्यायचं हे ठरवणंमात्र आपल्याच हाती असतं. ताण ही मानसिक अवस्था असल्यानं स्वत:शिवाय या ताणाचं संनियंत्रण इतरकोणतीही बाह्य शक्ती करु शकणार नाही.
सकारात्मक उर्जा
ताण हा शरीरासाठी वाईट असतो. हे वास्तव स्वीकारलं तर या ताणाला सकारात्मक उर्जेत रुपांतरकरण्याची प्रयत्न करायला हवा. हे सांगणं सोप असलं तरी हताश होऊन आणखी नैराश्याच्या गर्तेत जाण्याऐवजीप्रयत्न करायाला हवं.तणावापासून पूर्णपणे मुक्ती, ही आदर्श कल्पना झाली. त्यामुळे ताण-तणाव हे आजच्याजीवनातील अविभाज्य भाग बनले आहेत. त्यांच्याशी सामना करण्यासाठी आंतरिक शक्ती विकसित करणं गरजेचंआहे. ताण-तणावास अनेकदा बाह्परिस्थिती जबाबदार असली तरी बहुतेकदा आपणही तितकेच जबाबदारअसतो. आपण जो त्रागा करुन घेतो त्याचा सर्वाधिक त्रास स्वत:सच होतो.
अवतीभवतीची परिस्थिती एखादेवेळेस आपण बदलुही पण त्यामुळे आपल्या मनात निर्माण झालेलाताण-तणाव आणि चलबिचलतेला दूर सारताच येईल याची खात्री देता येत नाही. त्यामुळेच मन स्थिर ठेवणंगरजेचं ठरतं. स्वत:ला ताण-तणावापर्यंत नेणारी अवतीभवतीची परिस्थिती बदलण्याची शक्यता मावळते तेव्हास्व- व्यक्तित्वामध्ये बदल करायला हवेत. या परिस्थितीचं निरपेक्षपणे विश्लेषण करु शकलो तर असं लक्षातयेईल की बरेचदा नको त्या बाबींचा बाऊ करुन अनामिक ताणाला आपण ओढवून घेत असतो.
मनाची स्थिरता आणि एकाग्र कृती
आपल्या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने ठाम आणि ठोसपणे जावयाचे असेल तर मनाची स्थिरता आणि एकाग्रकृती आवश्यक ठरते. खेळांडूमध्ये हा गुण ओतप्रोत भरलेला दिसतो. आपलं मन विचलित होतं कारण आपल्याइच्छापूर्तीच्या मध्ये अनेक अडथळे येत असतात. त्यामुळे नकारात्मतेची भावना मनावर स्वार होते. नकारात्मककारणांना योग्यरीत्या नियंत्रित करायला शिकलो तर मनाचे अवघडलेपण दूर होऊन बाह्य परिस्थितीचा सामनाआपण सक्षमतेनं करु शकतो.
अनियंत्रित इच्छा
श्रीकृष्णाने भगवत्गीतेमध्ये अनियंत्रित इच्छांना शत्रुची उपमा दिली आहे. असं असुनही आपण आपल्याविविध छोट्या-मोठ्या इच्छांना सतत खतपाणी घालून ताण – तणावाच्या गर्तेत सापडत असतो. एक इच्छा पूर्णझाल्यावर मनात आसक्ती निर्माण होते. या आसक्तीमुळे आपल्यापेक्षा अधिक साध्य केलेल्या व्यक्तिचा हेवावाटतो. शिवाय आसक्तीतून हव्यास वाढू शकतो. हा हव्यास आपल्या इच्छापूर्तीला साद देत नसेल तर मनातपरिस्थितीसाठी क्रोध निर्माण होतो. हा क्रोध समक्यपणे विचार करण्यापासून प्रवृत करतो. अंतिमत: अपयशाचासामना करावा लागतो. भूतकाळाचं भूत अंगावर बसतं. भविष्याची भीती वाकुल्या दाखवायला लागते.
आपल्या मन हे आपणाकडे नसलेल्या बाबींकडे आकर्षिंत करण्याचा सातत्यानं प्रयत्न करतं. ते आपल्यालक्षात आलं नाही तर या सापळ्यात सापडून स्वत:लाच त्रास करुन घेऊ लागतो. त्यामुळे अनावश्यक इच्छांच्यामागे लागू नये असं साऱ्याच थोर संतमहात्म्यांनी सांगून ठेवलं आहे. अशा इच्छापूर्तीसाठीचा आपला हेतू स्वच्छआणि शुध्द राहत नाही. त्यामुळे ही इच्छापूर्ती होणं बरेचदा दुरापास्त होऊन बसते. इच्छा आणि आकांक्षाचंसुव्यस्थित व्यवस्थापन आपण करु शकलो तरच आपणास तणावापासून मुक्ती मिळू शकते. इच्छा आणिआकांक्षाना आपण कमी कमी करत गेलो तरच स्व-चित्ती समाधानाची भावना निर्माण होते. इच्छा आणिआकांक्षापासून पूर्णपणे मुक्ती मिळवली तर मन शांत होऊ शकतं. हे प्रत्यक्ष अंमलात आणणं कठिण असलं तरीप्रयत्न करायला हवाच.
मानसिक अवस्थेचा नित्य आढावा
बरं किंवा वाईट घडवण्याची क्षमता स्वत:मध्येच सर्वाधिक असल्याने या प्रयत्नांना प्रामाणिकतेची साथद्यायला हवी. त्यासाठी स्वत:च्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेचा आढावा नित्य घेणं गरजेचं ठरतं. मनातसाचलेल्या विखारी आणि विषारी विचारांवर वस्तुनिष्ठतेनं मंथन करता येऊ शकेल. त्यापासून मुक्तीमिळविण्यासाठी आपण प्रयत्न करु शकतो.
मनाची मशागत सकारात्मकरित्या करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करायला हवेत. तसं आपण केलं नाही तरआपलं मन वन्यपशुसारखे इकडे तिकडे उंडारत राहील. त्यामुळे कोणत्याच बाबींवर स्वत:ला लक्ष केंद्रित करतायेणार नाही. असं इकडे तिकडे उंडारणारं मन उद्दिष्ट्यपूर्तीच्या साहाय्यला फारसं उपयुक्त ठरत नाही. हे असं मनबहुतेकवेळेस ताण-तणावासाठी कारणीभूत ठरत असतं.
आत्मशक्तीची उर्जा
स्थिर मन हे सकारात्मकेतंचं प्रतिक तर उंडारणारं मन हे नकारात्मकतेचं प्रतिक होय. सकारात्मक मनामुळेचसुयोग्य निर्णय घेऊन कार्यप्रवण होता येतं. आत्मशक्तीची उर्जा जागृत ठेवण्यासाठी सकारात्मक मन उपयुक्तठरतं. अशा व्यक्ती भाग्यापेक्षा कर्तृत्वावर विश्वास ठेवतात. किंबहुना भाग्य हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नसतो. त्यामुळेच मनाला सकारात्मक विचारसरणीची सवय लावायला हवी . निधार्रानं हे करु शकतो. यासाठी बाह्यशक्ती साहाय्य करणार नाही ही बाब ध्यानात ठेवायला हवी. स्वनियंत्रित मन हे स्मरणशक्तिची वृध्दी, व्यक्तिमत्वातील बदल, व्यापक दृष्टिकोनाची निर्मिती आणि आंतरिक शांतता अशासारख्या गुणांसाठी उपयुक्तठरत असतं.