अर्थकारणास गती आणि सामान्यांच्या जीवनात व्हॅल्यू ऍ़डिशन
भारतातील माध्यमांचा प्रभाव हा वस्तुनिष्ठ आणि पारदर्शक संशोधनाचा विषय आहे. तो तसा गेल्या 15-20 वर्षांतझाल्याचे दिसत नाही. माध्यमांचा खरोखरच प्रभाव असता पुढील काही बाबींमध्ये अच्छे दिन दिसू शकले असते.
1) सर्व प्रकाराची माध्यमे भ्रष्टाचाराबद्दल सतत बोलतात /लिहितात /चर्चा करतात. मात्र याचा शून्य परिणामसमाजमनावर झालेला दिसतो. भ्रष्टचाराच्या घटनांमध्ये कोणतीही घट झाली नाही. उलट त्यात भयावहरीत्या वाढ झालीआहे. भ्रष्ट आचरण करणाऱ्या व्यक्तींना माध्यमांनी सकृतदर्शनी प्रतिष्ठाही दिल्याचे दिसून येते.
2) शासन यंत्रणेमार्फत करण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा (रस्ते/ पुल/ सार्वजनक उद्दाने/ गटारे/ रेल्वे आणि बसस्थानके इत्यादी) यातील दुरावस्थेवर सतत प्रकाशझोत टाकूनही त्यात काहीही सुधारणा होत नाही.
3) शिक्षण आणि सहकार क्षेत्राला लागलेल्या किडीकडे माध्यमांचे लक्ष असते. पण या किडीवर नियंत्रण येणं दूरचराहिलं, या दोन्ही व्यवस्था संपूर्ण पोखरुन गेल्या आहेत.
4) शिवाजी, शाहू, फुले, आंबेडकर या थोर पुरुषांच्या मनातील समताधिष्ठित समाजनिर्मीतीसाठी माध्यमांचेप्रयत्न चाललेले असतात. पण गेल्या दशकाचाच विचार केला तर संपूर्ण समाजव्यवस्था कधी नव्हे ती अत्यंत विषम आणिविषयुक्त सामाजिक विघटनाकडे दौडत सुटली आहे. या विघटनवादी प्रक्रियेमध्ये संबंधित घटकांना प्रत्येकाला आत्मसन्मानआणि प्रतिष्ठा दिसू लागली आहे.
5) मुंबईसारख्या शहरात शिक्षितांची संख्या महाराष्ट्रातील इतर शहारांपेक्षा निश्चित अधिक आहे. विविध प्रकारच्यामाध्यमांची पोहच सुध्दा सर्वाधिक आहे. या माध्यमांनी गेल्या दोन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या काळातमतदार जागृतीचा कार्यक्रम लावून धरला होता. प्रत्येक वृत्तपत्र, टीव्ही चॅनेल्स, रेडियो चॅनेल्स, जाहिरात फलक, सोशल मीडिया याद्वारे ही मोहीम राबवली गेली. मात्र प्रत्यक्ष मतदान 50 टक्केही नीट होऊ शकले नाहीत. माध्यमांचा प्रभावअतिशयच अल्प असलेल्या गडचिरोली, गोंदिया आणि किनवट येथे 70 ते 80 टक्के मतदान होत असताना मुंबईतील हेअल्प मतदान माध्यमांच्या प्रभावावर प्रश्न चिन्हच निर्माण करणारे ठरत नाही का ?
000
2
लोकशाही व्यवस्थेत माध्यमांना चौथा स्तंभ संबोधलं जातं. माध्यमांना त्याचा सार्थ अभिमानही आहे. पण लोकशाहीबळकटीकरणासाठी माध्यमांचे योगदान खरोखर झाले आहे का, याचाही पारदर्शकरीत्या विचार होणे गरजेचे आहे. माध्यमांना नोकरशाहीवर वचक ठेवणे शक्य झालेले नाही. न्यायव्यवस्था सक्षम असल्याने तिकडे फारसे लक्ष देण्याची गरजनाही. राजकीय व्यवस्थेत सहभागी असणाऱ्या व्यक्तीचे माध्यमांकडून तसे खूप स्कॅनिंग सुरु असते. या व्यक्ती सॉफ्ट टार्गेटहीहोताना दिसतात. या स्कॅनिंगद्वारे राजकीय व्यवस्था आणि त्यात सहभागी असणाऱ्यांना वठणीवर आणण्याचीही भूमिकाबऱ्याच वेळा माध्यमांद्वारे स्वीकारली जाते. पण प्रत्यक्षात काय दिसते? राजकीय व्यवस्थेची स्वत:ची गती असते, प्रवाहअसतो. यातील सर्व प्रकारच्या विचारधारा या त्या गतीनुसारच समोर जात आहेत. माध्यमे मात्र आहेत त्या ठिकाणी राहिलीआहेत .माध्यमांच्या प्रभावाचा म्हणून आपण जेव्हा विचार करतो तेव्हा याही बाबींचा विचार आपण आवर्जून करायला हवा.
पंचेवीसेक वर्षांपूर्वी माध्यमांमध्ये असलेली अंगभूत शक्ती आता अशी क्षीण कां झाली किंवा हरवली असावी ? याचंबहुतेक एक कारण मोठ्या प्रमाणावर झालेलं व्यवसायिकरण, हे असू शकतं. माध्यमांचा मूळ उद्देश हा नफा आणि अधिकनफा कमावणे असा
झाला. व्यवस्थापन टर्नओव्हरवरच अधिकाधिक लक्ष पुरवू लागले. तेव्हापासूनच माध्यमांच्या अंगभूत शक्तीचा ऱ्हास सुरुझाला असे म्हटल्यास वावगे ठरु नये.
व्यवस्थापनाने टर्नओव्हरचा विचार करणे काहीही गैर नाही. माध्यमे चालवण्यासाठी आणि तंत्रदृष्ट्या अधिकाधिक दर्जेदार, गुणवत्तापूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी लागतो.तो उपलब्ध करुन देणे आणि नफाही कमावणे या दोन बाबीव्यवस्थापनाला साध्य करावयाच्या असतात. त्यामुळे व्यवस्थापन नामक यंत्रणा सक्रिय असते. ही सक्रियता नफ्यामध्येपरिवर्तीत होत असल्याने त्यांचे प्राबल्य आणि वर्चस्व असते. निर्णयप्रक्रियेत त्यांचा वरचष्मा असतो. त्यामुळेच माध्यमांचीरचना, भाषा शैली, मांडणी,विषयांची निवड, पुरवण्या आदी बाबींवरील प्रभाव दिसून येतो.
पत्रकार आणि संपादकांना समाजात काय घडत आहे असे समजले जाई किंवा आताही समजले जाते. पण व्यवस्थापनाच्याटर्नओव्हर धोरणाशी सुसंगत असं त्यांचं समजणं असेल तरच त्याला काळ्यावर पांढरं होण्याची किमान शक्यता असते. अन्यथा या अशा वाटण्यास वाटाण्याचा अक्षता लागू शकतात. सध्याचे चित्र नेमके तसेच आहे. माध्यमांचा प्रभाव म्हणून जीसंज्ञा वापरली जाते ती बहुतांश वेळेस मार्केट ड्रिव्हन (बाजार म्हणजेच व्यापरउदिमाशी समांतर चालणारी) असते. गेल्यादशकात ही बाब अधिकाधिक अधोरेखित झाली आहे.
000
3
माध्यमांचा प्रभाव या संज्ञेतून माध्यमांचे नियंत्रण पत्रकार/संपादक करत असल्याचे आपणास सांगावयाचे असते. पणप्रत्यक्षात तसे नाही. खाजगीमध्ये बोलताना संपादक/पत्रकार आपली हतबलता आणि हताशपणा व्यक्त करत असतात. अशी हतबल मानसिकता कोणत्याही प्रकाराचा प्रभाव टाकण्याच्या प्रक्रियेमध्ये अल्प टक्केवारीनेच सहभाग देऊ शकते. नेमकेसध्या तेच चित्र भारतीय माध्यमांमध्ये दिसून येते.
माध्यमांनी काय करायला हवं ? असं कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षरीत्या व्यवस्थापनच ठरवत असते. त्यादिशेनेचलेफ्टराइट करत चालत राहणं, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उच्चरवानं उल्लेख करत राहणं ,लिखाणात, सादरीकरणातकर्कशपणा (लाऊडनेस) आणून आपली बहादुरकी सिध्द करण्याचा आटापिटा करणं एव्हढच कर्तूत्व पत्रकार/संपादकांनागाजवता येतं.
अशा वेळी समाजात एखादी चांगली गोष्ट घडली तर ती माध्यमांच्या प्रभावामुळे म्हणजे आपल्यामुळे घडली असं ही मंडळीउच्चरवानं सांगू लागतात. सर्वांचा एकत्रित गोंगाट इतका असतो की ते सांगतात तेच सत्यही वाटू लागतं. यासाठी काहीमोजकी उदाहरणं मग वारंवार पुढे केली जातात. उदाहरणार्थ अणा हजारे यांचे दिल्लीतील आंदोलन. या आंदोलनाला उभेकरण्याचं आणि तीव्र करण्याचं श्रेय माध्यमांनी आपल्याकडे घेतलं आहे. हे पुर्णांशानं सत्य जर असेल तर मग त्यानंतर लगेचचरामदेवबाबांच्या अशाच प्रकारच्या आंदोलनाला गती देण्यास माध्यमे कां अयशस्वी झाली ? अण्णांपेक्षा रामदेवबाबा हेअधिक ग्लॅमर असलेले व्यक्तीमत्व आहेत. एखाद्या सेलिब्रेटिंसह इव्हेंट साजरे करुन डोळे दीपवून टाकण्याची आजची रीतआहे. माध्यमांना रामदेवबाबांच्या रुपाने बोलघेवडा किंवा आजच्या भाषेत हॉट सेलिब्रेटी मिळाला असूनही फारसा प्रभावपाडता आला नाही. हे वास्तव कसे नाकारता येईल. अण्णांच्या पुढच्या टप्प्यातील आंदोलनाला गती देण्यासाठी माध्यमेकमी पडली. जर लोकमानसावर माध्यमांचा प्रभाव खूप पडत असता किंवा असेल तर मग अण्णांची हाक माध्यमांद्वारेपोहचताच पहिल्या टप्प्याचीच तीव्रता अनुभवायला यायला हवी होती. पहिल्या टप्प्याचे यश माध्यमांचे आणि दुसऱ्याटप्प्यांपासूनचे अपयश अण्णांचे,असे कसे राहू शकेल?
एक राजकीय नेता मुख्यमंत्री पदापासून ते पंतप्रधानपदी विराजमान होण्याची यशकथा संबंध देशासमोर काहीचमहिन्यांपूर्वी घडली. हे सारं माध्यमांच्या प्रभावामुळेच घडलं असं अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला जातो. या कथनातपारदर्शीपणाचा आणि वस्तुनिष्ठतेचा अभाव आहे.
त्या राजकीय नेत्याचे देशाच्या सर्वोच्चपदी आरुढ होणे यात अनेक घटकांचा समावेश आहे. त्यातील एक घटक माध्यमेआहेत. समजा हे घटक जर दहा असतील, तर या क्रमवारीत माध्यमांचा प्रभाव हा सातव्या आठव्या क्रमांकावर येतो. संबंधित व्यक्तिने केलेलं सुक्ष्म नियोजन, त्यानुसार केलेलं कठोर परिश्रम, त्यांच्याकडे असलेल्या मनुष्यबळासह इतरसंसाधानांचा अत्यंत प्रभावीपणे केलेला उपयोग आणि आपल्या उदिष्ट्याप्रती असलेली निसंदिग्धता या घटकांचा सर्वाधिकप्रभाव हा या यशकथेवर आहे.
अशी आणखीही उदाहरणे सांगता येऊ शकतात. ही उदाहरणे सांगून माध्यमांचा काहीच प्रभाव पडत नाही, हे सांगण्याचाहेतू नाही. पण या प्रभावाला बऱ्याच मर्यादा आहेत. हे लक्षात घ्यायला हवं. माध्यमांच्या प्रभावामुळेच समाजजीवनात चांगलंघडतं. क्रांती घडण्याची प्रक्रिया सुरु होते. समाजपरिवर्तन होतं. राज्यव्यवस्था बदलते. अंधश्रध्दा थांबते. बाबा, महाराज, बापू, यांच्याकडे लागणाऱ्या रांगांवर नियंत्रण येते. व्यापारी घाबरु लागतात. भ्रष्टाचारी चळचळ कापू लागतात. असा जोआभास निर्माण केला जातो तो फसवा आहे, हे लक्षात घ्यायला हवं.
गेल्या दशकभरात तरी किमान असं दिसून येतं, की माध्यमांचा समाजावर प्रभाव पडतो की समाजाचा माध्यमांचा प्रभावपडतो, यावरसुध्दा नीट शास्त्रशुध्द अभ्यास झालेला नाही. जुन्या सिध्दांतानुसारच माध्यमांच्या प्रभाव प्रमेयाची मांडणीकेली जाते.
सामन्यांच्या मनातलं आम्ही प्रतिबिंबित करतो, असं गेल्या दशभरात माध्यमांच्या कर्ताधर्त्यांकडून सांगितल जात आहे. याचा अर्थ सामान्यांचाच प्रभाव माध्यमांवर सर्वाधिक आहे असा घेतला तर वावगं ठरु शकत नाही. पत्रकार /संपादक त्यांच्यामनातील एखाद्या विषयाचा प्रभाव जनमानसावार पडावा यासाठी जेव्हा सरसावतात, ते जर त्या त्या माध्यमांच्या रुपर्टमर्डाक नामे सूत्रधाराच्या बिझिनेस इंटरेस्टला (व्यावसायिक किंवा व्यक्तीगत हितास बाधा पोहचवणारे) मारणारे वा मातदेणारे असेल तर असे विषय पुढे सरकू शकत नाही. हे कटू सत्य सूर्यप्रकाशाहून अधिक स्वच्छ असे आहे.
000
4
मग माध्यमांचा उपयोग काय असा प्रश्न निर्माण होतो. आपल्या जीवनात त्याचे काहीच स्थान नाही का? या प्रश्नाचं उत्तरहे नकारार्थी नक्कीच नाही. कारण रोटी, कपडा, मकान या आपल्या मूलभत गरजा आहेत तसच माध्यमांचेही आहे. अल्पजनांसाठी माध्यमेही मूलभूत गरज झाली आहेत. बहुतेकांच्या जीवनाला माध्यमे पूर्णत्व देऊ शकतात. दिवसाची सुरुवातवृत्तपत्रे चाळलं नाही तर व्यवस्थित होत नाही अथवा एफएफवर सकाळी सकाळी भक्तीगीते ऐकली नाहीतर काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. दहाच्या प्राइम टाइमच्या बातम्या ऐकल्यावरच आपण झोपी जातो. असं आपल्या कानावर नित्य येत असतं. किंबहुना आपणही कदाचित तेच म्हणत असू.
प्रत्येकाच्या जीवनात माध्यमाचं महत्व किंवा स्थान असं वेगवेगळं असतं किंवा राहू शकतं. माध्यमांतून येणाऱ्या बातम्या, लेख, गंभीर आणि मनोरंजनादी कार्यक्रमाचं महत्व व्यक्तिनिहाय बदलत राहतं. कोण कशाशी अधिक कनेक्ट होईल हेमाध्यम -प्रभाव-अभ्यासकांनाही अजून स्पष्ट झालेलं नाही. एका चौकोनी कुटुंबाला एकच कोणताही कार्यक्रम शंभर टक्केआवडेल हे ठामपणे सांगता येत नाही. टीआरपीचा शोध त्यातूनच लागला असावा. पण त्याच्याही मर्यादा एव्हाना स्पष्टझालेल्याच आहेत. टीआरपीची भाषा किंवा वाचकसंख्या, श्रोत्यांची संख्या, दर्शकांची संख्या यास सामान्यजणांच्यादृष्टिने असलेलं महत्व जेवढ्यास तेव्हढं असतं. त्याला रंजन हवं असतं. करमणूक हवी असते. ते तो अशा कार्यक्रमांमधूनशोधत असतो. प्रवचनादी कार्यक्रम पाहणारेही प्रेक्षक मोठया संख्यने निर्माण होत असल्याने अशा चॅनेल्सची संख्या हळूहळूवाढत आहे. मुद्रित माध्यमांमध्येही वाचक त्याला पाहिजे त्या बाबींशी स्वत:स जोडून घेतो. त्यामुळेच सर्व प्रकारच्यामाध्यमांना एक संपूर्ण पॅकेज स्वरुपात समोर यावं लागतं. पॅकेज आणि प्रॉडक्ट या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आजचा काळ तोंडदेखला का होईना हा स्मार्ट काळ आहे. त्यामुळे माध्यमांचे पॅकेज किंवा प्रॉडक्ट हे स्मार्टच बनले आहे. ते मनप्रसन्न करणारे, चकचकित असे आहे. त्यामध्ये प्रभाव पाडण्याची क्षमता नसेलही पण व्यक्तीनिहाय सुख देणारे, त्याच्याआयुष्याला समृध्द करणारी माहिती वा सल्ला देणारे , कधी कधी थोडासा विचार करायला प्रवृत्त करणारे, दैनंदिन जीवनसुसहय करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींचे (प्रवासाला जाताना घ्यावयाची काळजी, विमा पॉलिसी घेतानाघ्यावयाची काळजी, पावसाळयात घ्यावयाची काळजी, नवे अभ्यासक्रम, शिष्यवृत्ती, नव्या फॅशन, सौंदर्य साधनावगैरे) टीप्स देणारे हे प्रॉडक्ट आहे. त्यात वावगं सुध्दा काही नाही.
माध्यमांचे हे रुप सर्वसामान्यांचे जीवन स्मार्ट करण्यासाठी, काहीसे रंगतदार करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरणारे आहे. माध्यमांची रंजन करण्याची शक्ती मोठी आहे. त्याचाच प्रभाव अधिक असतो. ही बाब व्यवस्थापनाच्या चांगलीच लक्षातआल्याने त्यांनी माध्यमांचे रुपांतरण तसं केलं आहे. रंजन मूल्यासह वाचक/ प्रेक्षक/ दर्शकांसमोर येणारे प्रॉडक्ट हेव्यक्तीनिहाय त्यास समाधान देणारे, आनंद देणारे ठरत आहे. माध्यमांचे समाजजीवनातलं हे पेनिट्रेशन (आत घुसने) अशाप्रकारे खूप मोठया प्रमाणावर झालं आहे. त्यामुळे विविध उपभोग्य वस्तू निर्माण करणाऱ्या उद्योजकांना आपल्या मालाचीमहती थेट लोकांच्या मनापर्यंत पोहचवणं सुलभ झालं आहे. याचा लाभ व्यापार उदिम वाढीसाठी झाला आहे. अर्थकारणाभोवती फिरणारे वर्तूळ असे पूर्ण होत आहे. त्याच्या मध्यभागी माध्यमे आहेत. अर्थकारणास गती आणिसामान्यांच्या जीवनात व्हॅल्यू ऍ़डिशन करण्याची क्षमता या दोन बाबी माध्यमांकडून साध्य झाल्या आहेत. त्याचा आपणखुल्या दिल्याने स्वीकार करायला हवा.
माध्यमांचा प्रभाव असेल तर तो हा असा असं मला वाटतं.
000
सुरेश वांदिले