अर्थनिरक्षरता @ वय वर्षे चाळीस
वीस वर्षापूर्वी आपल्या देशात साक्षरता अभियान फार जोर शोरसे सुरु होतं. संपूर्ण देशाला साक्षरतेच्यागंगेत न्हाऊन पवित्र करण्याचा कोण आटापिटा केला जात होता. याच अभियानाचा एक भाग म्हणून मगसाक्षरोत्तर कार्यक्रचाही डमरु जोरजोरात वाजला. बीस साल बाद क्या हुवा.. बहुतेक 20 वर्षापूर्वी जेथेहोतो, त्यापेक्षा फारतर एखादे वर्ष पुढे प्रगतीपथावर गेले असू. कार्यात्मक साक्षरता या गोंडस आणिगुबगुबित संज्ञेखाली नंतर नाव लिहिता आलं आणि सही करता आलं तरी साक्षरता अभियानाचा टिळा यशस्वीअसं समजलं गेलं. त्याच काळात लातूर येथे भूकंप झाला होता. शासकीय मदतीसाठी जेव्हा विविधसोपस्कार केल्यावर सही घेण्याची वेळ येई, तेव्हा अंगेठच समोर येत. प्रश्न होता सही गेली कुठे ? या20 वर्षाच्या आधीही कदाचित सही गेली कुठे हा प्रश्न होताच? साक्षरता अभियानाच्या 20 वर्षात किचिंतसाफरक पडला असावा. सह्या फार वाढल्या नाहीत आणि अंगठे मात्र जैस थे.कदाचित वाढ झालेली.
000
2
निरक्षरतेची ही साता उत्तराची कहाणी आर्थिक निरक्षरतेशी समांतर अंतर राखून आहे. चाळीस वर्षापूर्वी हीआर्थिक निरक्षरता ज्या ठिकाणी होती, त्याठिकाणाहून तिला एखादे पाऊल पुढे जावू असं वाटण्याची शक्यताकमीच दिसते. काही महिन्यापूर्वी डबलसिट या इंग्रजी नावाचा मराठी चित्रपट येऊन गेला. कथानायकमुंबईतला. कष्टाची कमाई ठेवतो कुठल्याही आगापिछा नसलेल्या सहकारी बँकेत. बँक बुडते आणि त्याचं घरघेण्याचं स्वप्नही अरबी समुद्रात बुडू पाहतं. मुद्या हाच की, चाळीस वर्षापूर्वी आर्थिक निरक्षरतेत गटांगळ्याखाणारा मुंबईचा स्मार्ट तरुण ऑगस्ट 2015 मध्येही तसाच गटांगळ्या खातो. जग कुठे पुढे सरकलं? आहेतिथेच आहे की. चित्रपटातील ही गोष्ट काल्पनिक असेलही. पण कालपरवा आपल्या अवतीभवती अशागोष्टी घडल्याची कैक उदाहरणं आहेतच ना. गेल्याच वर्षी नाही का नाशिकच्या एका हुषार व्यक्तिने पैसेदामदुप्पट करायची बतावणी करुन हजोरांना गंडा लावला. यास आपली आर्थिक निरक्षरता म्हणायची कीआर्थिक अंधश्रध्दा ?
पैसे दुपटीचा आपला मोह गेल्या चाळीस वर्षात होता तिथेच आहे किंबहुना तो वाढलेलाच दिसतो. पैसेझाडाला लागत नाही असं तिन्ही त्रिकाळ म्हणत असलो तरी दुपटीचा चमत्कार करण्याची भाषा करणारे समोरआले की आपल्यापैकी कैकजण हरखून जातात. क्रिकेट, सिनेमे, राजकारण आणि आर्थिक निरक्षरता याचार अतूट धाग्यांनी आपला महान देश आसेतू हिमालय बांधल्या गेलाय. आपण सारे भारतीय आहोत, हेशपथेवर सांगण्यासाठी या चार गोष्टी भक्कम पुरावे सादर करतात.
चमत्काराशिवाय पैसे दुप्पट होऊ शकत नाही. तरीसुध्दा एखादी व्यक्ती दामदुपटीचे आमीष दाखवतोतेव्हा त्याच्या गळ्यात आम्ही पडतो. तो सद्गृहस्थ कुठून बरे हे पैसे आणेल, हा साधा विचार आमच्यामनाला पडत नाही. जोपर्यंत 12 टक्के वार्षिक व्याज मिळत नाही, तोपर्यंत दुपटीचे (ते सुध्दा पाच वर्षात) स्वप्न बादच होते. सध्या पोस्ट किंवा शासकीय बँका वार्षिक 8 ते 8.50 टक्क्क्याच्या आसपास व्याजदेतात. हा महाभाग उर्वरीत चार टक्के पैसे कुठून बरे आणणार? अल्लाउद्दीनचाजादूचा दिवा गेल्या दहाहजारवर्षाततरी कुणालाही सापडला नाही. तो समजा असता तर गझनीच्या अलाउद्दिन खिलजीने संपत्तीमिळवण्यासाठी कशाला हिंदुस्थानावर वारंवार लढाया करण्याचा आटापिटा केला असता. त्याने नसता कात्याचा शोध घेतला? पण आपली आर्थिक निरक्षरता दामदुपटीचे आमीष दाखवणाऱ्या व्यक्तींमध्ये जादूचादिवा असलेला अलाउद्दीन असल्याची आपणास खात्री पटवत असते.
000
3
बऱ्याच बँका आपल्याच पैशाला चुना आणि काथ लावतात, हे तर आपल्या ध्यानीमनीही नसते. यासर्व बँकांचे काहीशे लाख कोटी रुपये बुडीत खात्यात आहेत. हे पैसे उद्योगपतींना दिलेले आहेत, कर्जम्हणून. हे उद्योगपती बाहेर सर्व उचापती करणार, वैभवात राहणार, जग फिरणार, ऐश करणार, रेसकोर्सवरघोडे उडवणार, अर्धनग्न पोरिंचे वार्षिक कॅलेंडर काढणार, क्रिकेट टीमचे मालक होणार, स्वत:ला किंग ऑफगूड टाइम असं विशेषण लावून घेणार, वगैरे वगैरे. पण उद्योगासाठी म्हणून घेतलेले कर्ज फेडायची वेळयेताच हे जातात दारिद्र्यरेषेच्याखाली आणि यांचा कारखाना वा उद्योग एकदमच गाळात. मग बँकांकडूनघेतलेल्या यांच्या कर्जाची थकबाकी वाढणार. तेव्हा बँका यांच्याकडे जाऊन म्हणतात कशा, अरेरे माय लॉर्ड, फार वाइट झाले हो, उद्योग चालत नाही म्हणे तुमचा. आमचं ह्रदय किती विदीर्ण झालय बघा, तुमच्याकाळजीनं. ही काळजी मिटावी म्हणून आलोय धावत तुमच्या सेवेला. डोण्ट वरी. काळजी करु नका. आम्हीपुन्हा कर्ज देतो. जुन्या कर्जाचे हप्ते नव्याने पुनर्रचित करुन देतो. तुम्ही म्हणत असाल तर व्याज माफीचाहीविचार करता येईल.,बर का. काळजी करु नका. बँक तुमचीच आहे.
आपल्या घामाच्या पैशावर बलाढ्य झालेल्या या बँका आपल्या आर्थिक निरक्षरतेमुळे मुजोर झाल्याआहेत. पैसे ठेवले की आपलं कर्तव्य संपलं असं समजून आपण झोपी जातो. बँकांना कधीच जाब विचारतनाही. विचारावा वाटत नाही. चाळीस वर्षापूर्वी अशीच स्थिती होती. आजही तीच स्थिती आहे. आपणकोणतेही प्रश्न उपस्थित न करणारे बँकांचे सन्मानीय ग्राहक आहोत. म्हणून आपला तोंडीलावण्यापुरतासन्मान. राजकीयदृष्ट्या महाजागृत आणि सामाजिकदृष्ट्या स्वप्नातही संघर्षासाठी तयार असलेला भारतीय माणूसबँकांच्या कारभाराबद्दल कधीच फारसं बोलत नाही की संघटित होत नाही की जाब विचारत नाही. आंदोलनवगैरे तर दूर की बात. बँकांमध्ये चाललय तरी काय हे समजून घेण्याविषयी जो निरुत्साह चाळीस वर्षांपूर्वीहोता, त्यात तसुभरही फरक पडलेला नाही. आपल्याच पैशाने श्रीमंत झालेल्या या बँका आपल्याला जराहीभीक घालत नाही त्याचं मुख्य कारण म्हणजे आपलं अर्थनिरक्षर असणं.
000
4
या आर्थिक निरक्षरतेनं गाठलेला पुढचा टप्पा म्हणजे,आपण गुंतवणूक आणि बचत या भोवऱ्याच्या बाहेरपडायला तयार नाही. गुंतवणूक म्हणजे काय आणि बचत म्हणजे काय, या बाराखडीची गाडी काहीआपल्या दिशेनं वाट वाकडी करत नाही. पारंपरिक पध्दतीच्या विमा योजनांना जणूकाही आपल्या आर्थिकनिरक्षरतेवर शिक्कामोर्तब करण्यासाठीच कुबेरश्रीने जन्मास घातल्या असाव्यात. या योजनांनी आपल्यावर असेकाही गारुड केले आहे की ते काही केल्या जात नाही. नोकरी लागली रे लागली मध्यमवर्गीयच नव्हेउच्चवर्गीय विचारसरणी सुध्दा विमा काढण्यासाठी उत्साहात कार्यरत होते. विम्याची सुरक्षितता, 100 टक्के, यात वाद नाही. पण गुंतवलेल्या रकमेवर व्याज किती मिळतं, सहा ते साडेसहा किंवा फार तर सात टक्के. महागाई किती टक्क्याने वाढतेय, दरवर्षी किमान 10 टक्क्याने. म्हणजे नुकसान चार टक्क्यानं आपलच. गुंतवायचे 100 रुपये आणि गुंतवलेली रक्कम मिळते तेव्हा त्याचे तत्कालीन बाजारमूल्याप्रमाणे होतात साठरुपये. हे काही केल्या आपणास समजत नाही. समजून सांगितलं तरी उमगत नाही. दोन-चार लाखाच्यायोजनेनं आजच्या काळात कोणती बरे सुरक्षिता मिळते? समजा मध्येच गचकलो तर त्या चारपाच लाखातकिती दिवस आपल्या घरचा गॅस जळणार ? या सगळ्या मनीबॅक पॉलिसी. त्याचे पैसे अधूनमधून म्हणजेतीन चार वर्षांनी मिळतात म्हणून आपण खुष. या राजीखुषीचे मोल हे कवडी इतकच असतं, हे आपल्यागावी नाही.
विम्याची 40-50 लाखाची टर्म पॉलीसी (मुदत योजना) आहे. ही पॉलसी जितक्या तरुण वयातकाढाल तितके त्याचे हप्ते कमी. 25शीच्या तरुणास इतक्या रकमेच्या विमा पॉलिसीसाठी साधारणत: चार-पाच हजार रु.वार्षिक खर्च करावा लागणार. समजा अशा तरुणाचं दुर्देव्यानं काही वेडवाकडं झालच, तर हेचाळीस-पन्नास लाख रुपये मिळतील ना त्याच्या कुटुंबियांना. ही खरी सुरक्षितता झाली. मग कां घेत नाहीही पॉलिसी? कारण आपली निर्बुध्द मानसिकता. ती,आर्थिक निरक्षरतने आणखीनच दृढमूल बनलेली.
अशा प्रकारचा विमा घेणाऱ्या व्यक्तिस काही-बाही झाले तरच तीस याचा फायदा अन्यथा पैसे गेलेउडत. आता पैसे उडत जाऊ कसे द्यायचे, नाही का? मग या पॉलिसीवर फुली आणि सहा टक्के दरानेपरतावा देणाऱ्या योजनांचा सहर्ष स्वीकार. त्यासाठी तगडे प्रिमीयम देऊन स्वत:चं नुकसान करुन घेण्याचीतयारी आहेच. या तगड्या प्रिमियममध्ये आपण टर्म पॉलिसी, आयकर वाचवण्यासाठी इक्विटी लिंक सेव्हिंगस्कीम तसेच आरोग्य विमा योजना आणि अपघात विमा योजनेचा हप्ता, इतकं सारं करु शकतो.
आरोग्य विम्याचा विषय आलाच आहे तर त्याबद्दल असं सांगता येईल की, आम्हा भारतीयांनाअमरत्वाचापट्टा घेऊनच आल्याची ठाम खात्री असते. त्यामुळे एखादा मोठा आजार होईल, रुग्णालयात भरतीव्हावं लागेल, त्यावर काही लाखापर्यंत खर्च होऊ शकेल, असं चुकूनही वाटत नाही. त्यामुळे आरोग्यविम्याचा विचार नाही. शिवाय आर्थिक निरक्षरता एवढी मोठी की,पारंपरिक विमा योजना म्हणजेच आरोग्यविमा योजना अशी चाळीस वर्षापूर्वी असलेली समजूत काही केल्या जात नाही. बहुतेक पारंपरिक विमायोजना या आपल्या मृत्यूशी जोडलेल्या असतात. तुम्ही अवचित स्वर्गीय झाल्यासच त्याचा लाभ. एरव्हीनाही. आरोग्याशी त्याचा संबंध नाही. त्यामुळे आजच्या अत्यंत धकाधकीच्या तणावाच्या, पळापळीच्याकाळात कोणता आजार कोणत्या टप्प्यावर टपली मारुन जाईल याविषयी देवांचे डॉक्टर श्री अश्विनीकुमारांनासुध्दा सांगता यायचं नाही. त्यामुळे आरोग्य विमा असला तर कितीतरी गोष्टी सुलभ होऊ शकतात. चांगल्यारुग्णालयात चांगल्या वैद्यकीय सोई घेऊ शकतो. एवढा जर त्याचा फायदा असेल तर आपण का बिचकतो? कारण तेच, निर्बुध्द मानसिकता. आजारी पडलो आणि उपचार घेतले तरच या विमा योजनेचा फायदा. अन्यथा पैसा पाण्यात. अशी वेडगळ समजूत असल्यानं आरोग्य विम्याच्या फंदात बरेच जण पडत नाही.
000
5
आपल्या अर्थनिरक्षतेच्या तेजोगोलातून हर्षद मेहता ऍ़ण्ड त्याच्या नंतरकालीन भावडांचा जन्म झाला. श्रीयूत हर्षद मेहता यांचं अवतारकार्य संपल्यावर आपण शहाणं व्हायला हवं होतं. पण टप्प्याटप्प्यानंहर्षदरावांची भावंड येत राहिली. त्या भावंडानी भूरळ पाडलीच,आपल्यावर. गेल्या चाळीस वार्षिक वर्षात यातकाहीही फरक पडलेला दिसत नाही. पुढच्याही चाळीस वर्षात हर्षदरावांची सख्खी भावंड मुंबईत जन्मास येतचराहतील अशीच सध्यस्थिती. हर्षदरावांचे दूरचे काही नातेवाईक इतर छोट्या छोट्या शहरांमध्ये अधूनमधूनअवतार घेत असतात. एका अ- बापूंनी 10 हजार कोटी रुपयांची मालमत्ता गोळा केल्याची चित्तथरारकसत्यकथा इंडिया टुडे नावाच्या साप्ताहिकानं प्रकाशित केली. हलवलं झाडं आणि पडले बोरांसारखं पटपटदहा हजार कोटी, असं तर शक्य नाही. सहारा श्री म्हणून जे कोणी महाभाग आहेत ना त्यांनी तर काहीहजार कोटी रुपये असेच इकडे चिट आणि तिकडे फंड करत करत उभे केले. गेली 30-35 वर्षे त्यांनीमजा केली. आता कुठे जराशी सजा त्यांना झालीय. तिकडे आमार सोनार बोंगलामध्ये काही हजार कोटीरुपयांचा शारदावतार अद्यापही गाजतोच आहे.
आपली अर्थसाक्षरता या महान व्यक्तिंच्या समोर लुळीपांगळी होते मात्र तेच आपण भाजीबाजारात आणिकपड्याच्या दुकानात बेडुकराव होऊन डराँव डराँव करतो. घासाघीस करतो. माल कसा स्वस्तात मिळालायाचं स्वकौतुक करुन या कौशल्याला वाहवाही आपणच करतो. कपडेवाला आणि भाजीपालावाल्याचे आपणजावई आहोत का? त्यांच्याकडे जाताच ते प्रसन्न होऊन चार पैसे सोडून देतील,जावयाच्या प्रेमासाठी.
बिल्डरमंडळी सुध्दा आपली अर्थनिरक्षरता स्वत:च्या बायकोला ओळखत नसतील इतकी चांगली ओळखूनअसतात. गेल्या चाळीस वर्षात त्यांची धन झाली आणि आपली वनवन संपली नाही. गृहविश्वातील किंवारिऍ़ल्टी क्षेत्रात असणारी टर्मिनालॉजी काही आपल्या आकलनात येत नाही. बिल्डरराव कधीकधी आपणअमुकाचे तमूक म्हणून किंवा तमुकांच्या रिलेशनमधले म्हणून किंवा कुणी तरी सांगतं म्हणून दरचौरस फुटालाकाहीतरी सूट देतो. आपला आनंद गगणात. पण हा बिल्डरराव कशासाठी बरे कर्णाची पादुका वाहूइच्छितो, हा असा विचार केल्यास तो अविचार ठरु शकतो असं आपणास वाटतं. अशी बरीच उदाहरणंआपल्या अवतीभवती पिंगा घालत असतात.
मॉलचा विस्तार आणि विकास कसा झाला बघा. एक घ्या आणि तीन फुकट. कशासाठी बाँ. आम्हास तर अद्याप कळलं नाही. फुकटाच्या शास्त्राचं अर्थकारण हे अनाकलनीय नाही का? एकावर एकफुकट देणाऱ्या कंपनीचा जन्म नफा कमवण्यासाठी झालाय. मग ही फुकटची चैन कशी परवडते त्यांना आणिमॉलवाल्यांना. पण या फुकटाच्या चैनमधून मॉल फुलले, मालामालही झाले. फुकट मिळवल्याची हुषारीआपण मिरवली आणि हसत हसत खिसा हलकाही केला.
आपल्याला समाजकारण, राजकारण, क्रिकेटकारण, चित्रपट/टीव्ही/नाटककारण लय भारी कळण्याचीप्रौढी फार. आईच्या पोटातच याचे बाळकडू घेऊन या जगात आल्याची आपली समजूत आणि खात्री. मात्र ब्लॅक होल (कृष्ण विवर) मध्ये असतो तसा गडद अंधकार घेऊन अर्थकारणाच्या बाबत इथलं अवतारकार्य सुरु राहतं. गेल्या चाळीस वर्षात फरक असा पडलाच नाही. भाग्याला संधी द्या म्हणत गल्लोगल्लीच्यालॉटऱ्या आल्या आणि आपल्याला गुंगारा देऊन गेल्या. त्यांचं गुंगारा देणं अजून थांबलेलं नाही.
000
6
सोन्याच्या मोहाची आपली महती काय वर्णावी. यात चाळीस वर्षात एक अंशानं फरक पडलेला नाही. सोन्यासारखी सून ते सोन्यासारखा जावई ही विशेषण होती तिथच आहेत. मात्र सोन्याची झोपमोड व्हावीअशी आजची स्थिती. सोन्याबाबतची आपली अंधश्रध्दा आणि निरक्षता या दोघांचं डेडली कॉम्बिनिशेनझालय. गुरुपुष्य आलं की आपली दे-धाव सोन्याच्या दुकानाकडे. इतक्या आतुरतने आपण आईबाबांकडेहीजात नाहीत. सोन्याच्या किमती वाढतच असतात हा भ्रम गोजिरवाणा आहे. वस्तुस्थिती काय दर्शवते, गेल्याकाही वर्षात 1 तोळे सोन्याचा भाव 37 हजार रुपयांवरुन आता 26 हजाराच्या आसपास रेंगाळतोय. सोनेखरेदी ही चांगली गुंतवणूक कदाचित चाळीस वर्षापूर्वी असेलही. या गौरवशाली इतिहासाची आठवण,(कभी) मेरे देश की धरती सोना उगले हिरे-मोती या स्वप्नरंजनातच रमण्यासारखी आहे.
सोन्याबद्दलच्या वस्तुस्थितीविषयी साक्षरता वाढवण्याचे प्रयत्न सुध्दा होत नाहीत. उलट देव-भगवान-बाबा-बापू-कुंभमेळ्यात सहभागी साधू सोन्याने मढताहेत मढताहेतच. आता काही आद्य आणि नव श्रीमंताचेहात-कान -मनगट-गळ्याची व्हल्यू ऍ़डिशन सोन्यानं होताना दिसते. याचा अर्थ हाच की सोन्याच्या मोह हापुढच्या चाळीस वर्षातही कमी होईल याची कोणतेही चिन्ह नाहीत. सोन्याची झळाळी कमी झाली किंवाभविष्यात होणार असली तरी त्याच्या गुंतवणुकीतलं आपलं प्रेम हे मिरेच्या कृष्णावरच्या प्रेमाइतकच अतूटराहील.
000
7
आपण हुषार नक्कीच आहोत, त्यापेक्षाही बिलंदर अधिक आहोत. सरकारनं सारं काही फुकट द्यावंआणि किंवा सवलतीत द्यावं असं चोवीस तास आपणास वाटत असतं. जी व्यक्ती असं काही देण्याचं गाजरदाखवेल, त्याच्या पाठीमागे आपण पळतो.अशांना विचारावं वाटतं की, अरे बाबा, सरकारकडे पैसा येणारकाय तो स्वर्गात बसलेल्या कुबेराच्या ओंजळीतून की जो कोणी अर्थमंत्री असतो त्याने मंत्र टाकला झालीपैशाची खाण सुरु. आपल्याच पैशातून देशाचा कारभार चालतो ना. मग सवलत आणि फुकटाची इच्छा होतेतरी कशी ? याबाबत चाळीस वर्षापूर्वी जिथे होतो ना तिथेच चाळीस वर्षानंतरही आहोत. याबाबतचीआपली बालबुध्दी वाढतच नाही.
या अर्थनिरक्षरतेनं किती नुकसान करुन घेतलंय,आपलं. सरकार फुकटात आणि सवलतीत आपल्या अनेकइच्छा पूर्ण करत असतं. तरीसुध्दा सरकारलाच शिव्याशाप देतो. चितभी मेरी आणि पटभी मेरी,असं आपलंवागणं.रेल्वेच्या फलाटांची किंवा रेल्वे डब्यांची सुधारणा होण्याची इच्छा तर मोठी दांडगी आहे आपली. पणत्यासाठी लागणारा पैसा सरकार तिकिट दर वाढीतून उभा करायची देर,आपली टँव टँव सुरु. फुकट आणिसवलतीत इतका पैसा इकडे तिकडे जातो की आपणास त्याचे मूल्यच कळेनासं झालेय.
000
एक अशी परिस्थिती तर दुसरीकडे आपल्या रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत जे घसरायला लागलेय तेकाही थांबण्याची चिन्हे नाहीत. एक डॉलरची किंमत किती तर 67 रुपयाच्या आसपास. हे नातं कधी,कुणीआणि कशासाठी जोडलं हे आपण समजून घेत नाही. जगाची दुनियादारी हा डॉलर्सरावच चालवतो. तोपडला तर सारेच पांगळे बणतात. तो शिंकला तरी इतरांना सर्दी होते. खोकलाही होऊन जातो.आपलंअर्थकारण हे या डॉलर्सरावांच्या वर-खाली होण्यावर बरचसं अवलंबून असतं. त्यात आता कहानी मे व्टिस्टआलय ते चिनी ड्रॅगनच्या युआन या चलनाचं. डॉलर्सरावांना फाइट करायला गेली काही वर्षे ऐटित दौडतअसलेला युआन गेल्या दोन महिन्यात डिसेंट्री झाल्यासारख्या व्यक्तिसारखा मुरझा हुवा फूल झालाय. त्यामुळेडॉलर्सरावही हडबडले. मग रुपयारावांची काय स्थिती झाली असेल? अर्थकारणाची गुंतागुंत अशीच असते. एकमेकांवर अवलंबून असण्याचा हा काळ आहे. आपली अर्थनिरक्षरता आपणास या गोष्टी समजून घेऊ देतनाही. आपले चलन फुकट आणि सवलतींनी सक्षम होणारे नाही. त्याला पोलिओ न होण्यापासून आपणचवाचवू शकतो. साधी गॅसची सबसिडी सोडायला आपण तयार नाही. या सवलतींनी कित्येक पायाभूतसुविधांच्या निर्मितीचा प्राण घोटला आहे. हे लक्षात घ्यायला हवं.
चाळीस वर्षापूर्वी आणि आताही आपली अर्थसाक्षरता जागृत होते ती आयकर भरण्याच्या वेळी. हुषारकरसल्लागारांच्या सल्लेबिल्ल्यांनी कर वाचवण्याचा, त्यातून पळवाट शोधण्याचा आणि करमुक्तीचा भरपूरप्रयत्न करतो. त्यासाठी अधिकचे चार पैसेही ओततो. टॅक्स वाचवण्याचा वा बुडवण्याचा आपला आनंद हाआनंदाचे डोही आनंद तरंग अशा श्रेणीतला.आपण कर भरला ,त्यातून सरकारची संपत्ती वाढली आणि त्यातूनचार चांगले रस्ते झाले वा उद्योगधंदे उभे राहिले तर आपल्या ग्लानी येईल, की आपण बेशुध्द पडू कीआपणास देवांचे राजे इंद्रसेन महाराज गावाबाहेर हाकलून देतील, असं तर वाटत नाही ना..
000
8
चाळीस वर्षापूर्वी आपल्याकडे लैंगिक शिक्षणाबाबत घोर अंधार होता. गेल्या चाळीस वर्षात त्यात विशेषफरक पडलेला नाही. ही बाब अर्थसाक्षरतेलाही लागू पडते.आपले पालक या दोन्ही गोष्टींविषयी मिठाचीगुळणी घेऊन वावरले. आपणही आपल्या पाल्याबाबत तेच करतो. जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारेबरेच संस्कार मुलांवर करतो किंवा करण्याचा प्रयत्न तरी करतो. पण अर्थसाक्षरतेचा प्रांत हा आपणासप्लुटोपलिकडचाच वाटतो. क्रेडिट, डेबिट वा एटीएम कार्डामार्फत सिनेमाची तिकिटे बूक करण्याच्या वास्पॅनडिल वा ओएलएक्स या सारख्या डिजिटल मार्केटिंगच्या कंपन्यांडून माल बूक करण्याच्या अर्थहिनहुषारीपलिकडे अजूनही मुलांनी अर्थसाक्षर बनावे असा प्रयत्न होत नाही. मुळात आपणच अर्थनिरक्षरतेच्याकोरड्या विहिरीत अडकलेलो असल्यानं आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार हा सवाल आहेच.
आपल्याकडे विविध प्रकारच्या जागृतीचे अभियान जोरा जोरात कधी अमिताभ बच्चन तर कधी विद्याबालन तर कधी अमिर खान या सेलिब्रेटिजना घेऊन चाललेलं असतं. पण अर्थसाक्षरतेचं अभियान अशापध्दतीनं झालेलं नाही. त्यामुळे आपण गुंतवणूक, बचत, अर्थकारणाच्या बाबत ज्या चुका केल्या किंवाशहाणपणा केला, तोच कित्ता बऱ्याच प्रमाणात नवी पिढीही गिरवीत आहे. मुलं उच्चशिक्षित होतात. पीचडीघेतात. बँकेच्याही नोकरीबिकरीत जातात. पण बचत म्हणजे विमा पॉलिसी हे समिकरण काही केल्या जातनाही.अर्थकारण समजून घेणं एव्हढं का कठिण वाटावं हा तसा मिलियन डॉलर प्रश्नच आहे. अर्थकारणाचेघटक समजून घेतल्याशिवाय आपणही समृध्द होणार नाही आणि देशही समृध्द होणार नाही. अर्थसाक्षरतेच्यासाध्यासाध्या बाबी आपल्या कानावरुन अनेक वर्षे जात नाहीत.
मुलांसमोर लैंगिकशिक्षणविषयक बाबी आणि अर्थविषयक बाबींची चर्चा करुच नये असं एखाद्याशिलालेखात वा ऐतिहासिक कागदपत्रात वा पौराणिक ग्रंथात नोंदवलेलं तर नसावं ना? अनेक महान परंपरेचाआपणास अभिमान असतो, तसं तर काही नसेल ना. यातील गमतीचा भाग सोडला तरी अर्थनिरक्षरतेचाअंधार हा गेल्या चाळीस वर्षात गडदच झाला आहे.
अर्थभान जागृतीसाठी काही वृत्तपत्रे वा नियतकालिके लेखन करतात.दुपारच्या वेळेत काही वृत्तविषयकवाहिन्यांवरून कार्यक्रम होतात. पण ते वाचायला वा बघायला आपणाकडे वा आपल्या मुलांकडे वेळ नाही. आपण व्यस्त जुळून येती रेशीम गाठीत आणि मुलं बिझी व्हॉट्सऍ़पवर.
000
9
म्युच्युअल फंडामध्ये सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेन्ट म्हणजेच सिप पध्दतीने गुंतवणूक केल्यास पारंपरिक पध्दतीच्याबचतीपेक्षा चार ते पाच टक्के अधिक गुंतवूणक परतावा मिळण्याची शक्यता 99.99 टक्के असते, असंबऱ्यापैकी सांगण्याचा प्रयत्न काही अर्थसल्लागार जमेल त्यापध्दतीने जमेल त्यामाध्यमातून करताहेत. म्युच्युअलफंडातील गुंतवणूक ही शेअर मार्केटमध्ये केली जाते. पण या मार्केटचा धसका आपण चाळीस वर्षापूर्वीघेतला होता. चाळीस वर्षात किंचितसा फरक पडलेला दिसतो. थोडीफार हालचाल होताना दिसते. पण हीहालचाल आदिम काळात पहिल्यांदा मानवानं चालण्यास सुरुवात केल्यानंतर त्यास सरळ होऊन चालायलाबऱ्यापैकी काळ लागला तशापध्दतीची. शेअर मार्केटमध्ये थेट गुंतवणुकीचा फायदा जसा अमाप तसा तोटाहीअमर्याद, ही भीती आहेच. हा तोटा सहन करण्यासाठी आपल्याकडे वाघाचं,सिहांचं वा कोल्ह्याचं ह्रदय नाहीहे मान्य. पण म्युच्युअल फंडाद्वारे शेअर्समध्येच गुंतवणूक होत असली तरी ती अप्रत्यक्षरीत्या होते. आपल्यावतीनं या क्षेत्रातील तज्ज्ञ सारा व्यवहार बघतात. दररोज देखरेख ठेवतात. संपत्तीची वाढकरण्यासाठीचा हा एक महत्वाचा राज नसला तरी मार्ग आहे.यात धोका असला तरी दीर्घमुदतीसाठी अशीगुंतवणूक केल्यास किमान 12 ते 15 टक्क्यापर्यंतचा परतावा मिळतो. हा गेल्या 15 ते 20 वर्षांचा याक्षेत्रातील जाणकार आणि वित्तीय नियोजकारांचा अनुभव आहे. हा मार्गही आपणास तितकासा अद्यापभावलेला नाही. चाळीस वर्षातील अर्थनिरक्षेतेनं घेतलेला बळी असं याचं वर्णन किंचित अतिरंजित वाटतअसलं तरी करण्याचा मोह टाळता येत नाही.
करचुकवेगिरी करुन वा सवलतीचा शोध घेऊन वा भ्रष्ट मार्गाचाच अवलंब करुन श्रीमंत होता येतं ही जीनिर्बुध्द अर्थनिरक्षरता गेल्या चाळीस वर्षात ठसली ती सिपमुळे दूर होण्याची शक्यता होती. 500 रुपयेमहिना अशी लहान रक्कम सुध्दा गुंतवणूक करता येते. मुलगा नोकरीस लागला वा कमाईला लागला त्यावर्षापासून म्हणजेच 22 -23 व्या वर्षापासून सिप सुरु करुन त्यात सातत्य ठेवलं तर पुढील 15-20 वर्षातमुलास करोडपती होण्यासाठी, कौन बनेगा करोडपती वगैरे सारख्या भाकड कार्यक्रमांच्या नादी लागून वेळवाया घालवण्याची पाळी येणार नाही. चाळीस वर्षापूर्वी आपल्याला याच्याशी काही देणंघेणं नव्हतं. आजच्या पिढीला ते जेव्हा चाळीशित पोहचतील तेव्हा कधीतरी त्यांच्या लक्षात ही बाब येईल. तेव्हा बराचवेळ गेलेला आणि पाणी वाहून गेलेलं असेल. अल्पगुंतवणुकीत करोडपती होण्याची संधी जवळजवळ त्यानेघालवली, असं समजायचं. गेल्या 40 वर्षात घराघरातील अर्थनिरक्षरतेनं हा केलेला मोठाच घात म्हणा वाघोळ म्हणा झालेला आहे.
000
10
अर्थतज्ज्ञ सांगतात की आपली गुंतवणूक ही महागाईच्या दराला मात देणारी असावी. सध्या कायदिसतं. महागाई 10 टक्क्याच्या जवळपास. आणि गुंतवणुकीवरील व्याज आठ टक्क्याच्या थोडं वर , थोडंखाली घुटमळलेला.
चाळीसवर्षात अजिबातच न बदलेली अर्थनिरक्षतेबाबतची बाब म्हणजे आपली गुंतवणुकीच्या योग्य वेळेचीवाट बघणं. ही वाट चाळीस वर्षात पुढे सरकलीच नाही. कुणाला खूप नियोजन करायचं असतं. तरकुणाला खूप अभ्यास करायचा असतो. गुंतवणूक सरळ आणि सोपी असू शकत नाही असा ब-याच जणांचासमज. सिपसारखी गुंतवणूक साधी असल्याचा अनेकांचा विश्वास बसत नाही. त्यामुळे गुंतवुणकीची योग्यसंधी आणि वेळ याची वाट बघणं हे श्रेयस्कर मानलं जातं. यामुळे आपला पैसा हा बचत खात्यात आळसदेत राहतो. त्याचा काहीही उपयोग केला जात नाही. आपलं काही चुकणार तर नाही ना, मग त्यामुळेआपण खड्यात तर जाणार नाही ना, अशी भीती स्वत:लाच दाखवत आपण निर्णय घेण्याचं टाळत राहतो. आळसावलेला आपला पैसा बँकेत सुरक्षित असल्याची आपणास जाम खात्री असते. अपांरपरिक पध्दतीनंम्हणजे सिपद्वारे अप्रत्यक्षरीत्या शेअर बाजारात व प्रत्यक्ष गुंतवणुकीद्वारेच शेअर बाजारात उतरलो तर घरावरसंकट कोसळेल अशी असलेली धारणा चाळीस वर्षात गेली नाही. ही धारणा काढून टाकणं योग्य असल्याचंअजूनही आपलं मन म्हणत नाही. गुंतवलेल्या पैशामुळे जर 12 टक्क्यांपासून 15 टक्क्यांपर्यंत व्याज मिळतअसेल तर घरावर संकट कसं काय कोसळू शकेल. अर्थनिरक्षतेमुळे अर्थकारणाशी संबंधित सहनशिलता आपणगमावून बसतो. दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमी फायद्याची ठरत असल्याचं सारे गुंतवणूक तज्ज्ञ सांगतात. वॅरेन बफेट हे या क्षेत्रातील श्रेष्ठ व्यक्ती. त्यांनी गुंतवणुकीचे जे फंडे वापरले त्याचे सिध्दांत झाले असूनत्यावर अनेक ग्रंथ लिहिण्यात आले आहेत. त्यांचा एक सिध्दांत असा आहे की तुम्ही चांगल्या कंपनीचे शेअरघ्या नि ते घेतल्याचे दहा- पंधरा वर्ष विसरुन जा. त्याची काळजी करु नका. हे शेअर्सच तुमची काळजीघेतील. तुम्हाला करोडपती करतील. पण इतका काळ वाट बघण्याची आपणाकडे सहनशिलता नाही. आपणास झपटपट वृध्दी हवी. अर्थनिरक्षरच अशी अपेक्षा ठेऊ शकतात.
आरोग्याच्या काही समस्या निर्माण झाल्या तर त्यांच्या दुरुस्तीसाठी डॉक्टरकडे जावं लागतं किंवा साधीकुरबूर असली तरी आपण जागृत होऊन डॉक्टरकडे सल्ला घेण्यासाठी धावतो. वैद्यकीय सल्लागार हा उत्तमआरोग्यासाठी जसा आवश्यक असतो. तसा फायनांशियल ऍ़डव्हायजर म्हणजेच गुंतवणूक सल्लागारही आवश्यकअसतो. ही संकल्पना आपणास परग्रहावरची वाटते. चाळीसवर्षापूर्वी हा विषय सल्ला-बिल्ल्याच्या परिघातयेत नव्हता. हे मान्य. पण मागील काही वर्षात स्थिती तशी राहिलेली नाही. सुयोग्य गुंतवणूक आणिसंपत्तीची निर्मिती ही वित्तीय नियोजनकार व गुंतवणूक सल्लागाराच्या सहाय्यानं करता येऊ शकते. 15 ते20 वर्षांपासून असे सल्लागार प्रशिक्षण घेऊन सेवा देण्यासाठी तयार होते. पण संख्या अत्यल्प होती. गेल्या दहावर्षात ही संख्या वाढलेली असली तरी गुंतवणुकीच्या सल्ल्यासाठी स्वत:च्या खिशाला खार लावूनजावं ही बाब अजूनही पचायला जड जाते. आपली अर्थनिरक्षता या गुंतवणूक सल्लगारांकडे जाण्यापासूनरोखत असते. कोणताही सल्ला मोफत मिळत नाही. मिळाला तरी तो घ्यायचा नसतो.कारण मोफतसल्ल्याचं मूल्य लावलं जात नाही. त्यामुळे सल्लगारास त्याची फी देणं कधीही श्रेयस्कर. ही बाबआपल्यापैकी अनेकांना काही केल्या पटत नाही. फुकट आणि सवलत हेच अर्थसाक्षरतेचे दोन महत्वाचं तत्वआपण समजत असल्याने आपण विकतच्या सल्लागाराची भानगड चार हात दूरच ठेवतो. हे आपलं दुर्देव्य.
000
महालक्ष्मी प्रसन्न होण्याची अधिकाधिक शक्यता ही तिच्या नियमित दर्शनापेक्षा नियमित अभ्यासानं म्हणजेअर्थनिरक्षरता दूर करण्यानं होऊ शकते हा धडा आपल्या पालकांनी गेल्या चाळीस वर्षात दिला नाही. त्याचेदुष्परिणाम आपण भोगले आणि आपली नवी पिढीही भोगतेय. कदाचित किंचित तीव्रता कमी असेल. एवढाच काय तो दिलासा.
–सुरेश वांदिले