कलाटणी: भोवऱ्यातले पूर्णत्व
कलाटणी आणि क पासून सुरु होणाऱ्या मालिकांना जोडणारा समान धागा म्हणजे सुश्री एकता जितेंद्र कपूर. या जगात कलाटणी नावाचं जे काही आहे, ते नसतं तर क पासून सुरु होणाऱ्या एकाही चित्रवाहिनीमालिकेचा जन्मच झाला नसता. आणि गेल्या 20 वर्षात हिन्दुस्थानातील समस्त भगिनी मंडळाला कमालिकेच्या अथांग, अगाध आणि अनाकलनीय आनंदापासून मुकावं लागलं असतं. एकदाचं वटसावित्रीलावडाच्या झाडाला फेऱ्या घालण्यास काही भगिनी मंडळ कंटाळा करतही असतील पण क पासून सुरु होणाऱ्यामालिका पाहण्यासाठी त्या आपल्या शब्दकोशातून कंटाळ्यास हद्दपार करुन टाकतात.
क च्या मालिका इतक्या ह्रदयात जाऊन बसण्याचं कारण म्हणजे,या मालिकेतील कथानकलाक्षणोक्षणी मिळणाऱ्या कलाटण्या. बायको जशी भाजीला सफाईदाररीत्या फोडणी देते, तशी सफाईदारकलाटणी एकताताईंचे दिग्दर्शक या मालिकांना देत असतात. मिठाशिवाय भाजी अळणी तसेचकलाटणीशिवाय मालिका बेचव आणि टीआरपी थेट वाळवंटात आणि पॅसिफिक समुद्राच्या तळाशी, अशीसध्याची स्थिती व वस्तुस्थिती. नुकत्याच संपलेल्या जोधा -अकबर मालिकेत इतक्या कलाटण्या होत्या कीत्या बघून खरे-खुरे जोधा- अकबर एकतर बेशुध्द पडले असते नाहीतर हे असं काही आपल्या जीवनात कधीबरं घडलं असा विचार करुन करुन वेडे झाले असते. त्यांचं जे झालं असतं ते झालं असतं, पण याकलाटणी प्रयोगामुळे एकताताईंच्या श्रींमतीच्या इमल्यावर इमले चढताहेत आणि आपणा प्रेक्षकांचा अमूल्य वेळमस्त मजेत आणि उत्सुकतेत टाइमपास करण्यात सत्कर्णी लागत आहे (!).
जग पुढे गेलं
कलाटणी नावाचं हे जे काही असतं ते नसतं तर जग पुढे गेलं असतं का, हा प्रश्न पडतो. श्री श्रीरावणराजे श्रीलंकेकर यांचच उदाहरण बघा ना. सीताहरणाची एकच घटना त्यांच्या आयुष्याला कोण कलाटणीदेऊन गेली. या प्रसंगापर्यंत श्रीरामांचा प्रवास कसा एका सरळसुरळ रेषेत आणि लंकाधिपतींचा प्रवासहीफारशा वाटा आणि वळणा नसलेलाच. ही एक कलाटणी आली आणि सारेच कसं एक्सायटिंग घडलं. चित्तथरारक घडलं. हनुमानाला द्रोणागिरी पर्वत उचलून लाखो मैल नेण्याचा पराक्रम दाखवता आला. याब्रम्हांडातला पहिला सी लिंक बांधण्याची प्रेरणा वानरसेनेला मिळाली. अहिरावण-महिरावण नावाची अनपेक्षितकलाटणी सुध्दा जगाला कळली. पुढे श्रीरावण निजधामास गेले. लंकेची रया गेली. इथे हॅप्पी एंडिंग होऊशकलं असतं. पण वाल्मिकीं त्यानंतर एकाहून एक कलाटणीचे धक्के देत राहिले. त्या धक्क्यातून सीतेचंपुन्हा एकटच वनात जाणं, लव कुश एपिसोड आणि पुन्हा धरतीत लुप्त होणं असा अचंबित करणाराघटनाक्रम घडला. हे समजा घडलं नसतं तर गदिमांना, लवकुश रामायण गाती, असं लिहिण्याची स्फुर्तीमिळाली असती का सांगा बरं? काव्यप्रतिभा जागृत करण्यासाठी कलाटणीच कशी कामी येते, यापेक्षा दुसरंकोणतं संयुक्तीक उदाहरण राहू शकेल.
महाभारताची मजल त्याही पुढे गेलेली दिसते.या कथेत काहीच सरळ नाही. कथानकाचे दुसरे पृष्ट येतनाही तोच एक नवी कलाटणी. युध्द संपले आणि आता स्थिरस्थावर होणार तोच पुन्हा अश्वत्थामाच्या रुपातप्रगटलेली अतर्क्य अशी थरारक कलाटणी. व्यासमुनींना इतक्या कलाटण्या सुचल्या तरी कशा, हा प्रश्नपडतो. वस्तुत: महाभारताचे नामकरण महा-कलाटणी-भारत असच करायला हवं. कुणी तरी महाभारतावरभाष्य करणारं, हा जय नावाचा इतिहास आहे,असा एक ग्रंथ लिहिलाय. खरेतर या ग्रंथाचे नाव, हाकलाटणी नावाचा इतिहास आहे,असे हवे होते. एकता कपूरताईंच्या मालिकेतील कलाटण्यांना धोबीपछाडकरण्याऱ्या महाभारतातील या कलाटण्या आहेत. हॅरी पॉटर लिहिणाऱ्या श्रीमती जे.के.रौलिंग वहिनींच्या यशाचंसूत्रच मुळी कलाटणी हेच आहे. चिरंजीव हॅरी पॉटरकडे असलेल्या जादूपेक्षाही त्याच्या आयुष्यातील कलाटण्याचित्तथरारक आणि चमत्कारिक आहेत. म्हणजे बघा, व्यास मुनी, वाल्मिकी, गदिमा, एकता कपूरताई, जे.के.रौलिंगवहिनीं यांच्या प्रतिभेची फुलबाग कलाटणीच्या अवतीभवती फुलली आहे. म्हणूनच कलाटणीनसेल तर आयुष्यरुपी सागराचा प्रवाह थबकून त्याची मिठी नदी झालीच म्हणून समजा.
टोकावर नेणारी आणि पाताळातही ढकलणारी
कलाटणी एका टोकावरही नेऊ शकते नि पाताळातही ढकलू शकते. बिल क्लिंटन-मोनिका लेविंस्कीप्रकरण आठवा बघू. ती एक कलाटणी बिल भाऊंना कुठून कुठे घेऊन जायला निघाली होती. अश्रूंचीझाली फुले आणि बिल वाचले. असं काहीसं तेव्हा घडलं. राजकारणात तर कोणत्या क्षणाला कोणतीकलाटणी मिळू शकेल हे ब्रम्हदेवासही सांगता आले नसते. एका रात्रीतून एका पक्षाचे आख्ख्ये सरकारचदुसऱ्या पक्षाचे बनवण्याची आयारामी गयारामी अद्भूत किमया घडवणाऱ्या लालांनी, कलाटणी शब्दाला नवाअर्थ (जो प्रत्यक्षात होता अनर्थ तो) मिळवून दिला.
व्टेटीं व्टेंटी क्रिकेट सामान्यांचा आत्मा हा कलाटणीच नाही का? गोलंदाजाचा कोणता बॉल आणिफलंदाजाचा कोणता शॉट या सामन्यांना नेमकी कोणती कलाटणी देईल हे काही सांगता यायचं नाही. पणमैदानावरच्या या कलाटणीच्या पलिकडे श्रीयुत राजमान्य राजेश्री मयप्पन, श्रीयुत राज कुंद्रासारखी महा-हुषारखेळाडू तिसरीच कलाटणी देण्याचा पराक्रम गाजवतात, आणि मैदानापैक्षा मैदानाबाहेरुनच पाहिजे तसा खेळघडवून आणता येतो, हे सुध्दा दाखवून देत असतात. हेही आपण गेल्या काही वर्षात बघतोच आहोतकी.या कलाटणी- कलाटणीच्या खेळाला ललित मोदी साहेबांनी इतके रोमहर्षक बनवून ठेवले आहे की आताकोणती नवी कलाटणी मिळतेय याची वाट मीडिया दर क्षणास आतुरतेने बघू लागली आहे.
असाही मिळू शकतो यू टर्न
एक मच्छर साला आदमी को नपूसंक बनाता है, असंच काहीसं नाना पाटेकर फार पूर्वी म्हणून गेलेआहेत. त्याचा सिम्पल अर्थ असा की एक मच्छर तुमच्या सरळसाध्या आयुष्याला भलतीच कलाटणी देऊशकतो. नपुसंक बनवतो की नाही हे पाटेकर सरच खात्रीपूर्वक सांगू शकतील. पण मलेरिया ते डेंग्यू ते डेथबेड अशी आपल्या आयुष्याला यू टर्न देणारी कलाटणी देण्याची क्षमता मादी मच्छरात असते हे मात्र आपण-तुपणही जाणतोच की.
आचार्य अत्रे पुण्यात राहिले असते तर फारच फार प्राध्यापक, प्राचार्य किंवा पुणे महापालिकेचे महापौरझाले असते. पण ते मुंबईत आले आणि त्यांच्या आयुष्यला मोठीच कलाटणी मिळाली. आमदार- संपादक- लेखक- कवी- नाटककार-चित्रपटनिर्माते असा त्यांच्या प्रतिभेचा दबंग आविष्कार अवघ्या महाराष्ट्राला बघायलामिळाला. समजा ते लंडनला गेले असते तर त्यांच्या आयुष्याला आणखी वेगळीच कलाटणी मिळून कदाचितते ग्रेट ब्रिटनचे पंतप्रधानही झाले असते. हे जरा जास्तच मोठी बतावणी वाटत असेल तर आचार्य अत्रे यांचेपंतप्रधानपद बाजूला ठेऊ या. पण त्यांनी लंडनमध्ये आपला साहित्यिक डंका दहा हजार वर्षात वाजला नाहीइतका वाजवला असता, ही बाब ना.सी.फडके सोडून कोणासही अमान्य करणार नाही.त्यामुळे सर विल्यियमशेक्सपिअर बाराच्या भावात गेले असते नि आचार्य अत्रे यांच्या प्रतिभेनं थक्क होऊन महाराणींनी त्यांना सरआणि नाईटहूड अशा दोन्ही पदव्या दिल्या असत्या.
एका गावातून दुसऱ्या गावात गेल्यावरच आयुष्याला अशीच कलाटणी मिळते हा रम्य इतिहासअलाहाबाद निवासी पद्मभूषण अमिताभ बच्चन यांनी मुंबईत येऊन लिहिला की नाही. कोल्हापूर निवासीशिवाजी गायकवाड यांनी मद्रासमध्ये जाऊन स्वत:ला रजनिकांतात रुपांतरीत करुन एक नवा इतिहासघडवलाच ना. दिलिपकुमार, राजेंद्रकुमार, धमेंद्र हे सुध्दा याच श्रेणितले कलाटणीवीरच.
आलमगीर औरंगजेबाचं उदाहरण घ्या ना. ते त्यांचं गावं दिल्ली सोडून दख्खन दिग्विजासायाठी आलेआणि संपूर्ण हिन्दुस्थानच्या इतिहासालाच 360 डिग्रीतील कलाटणी मिळाली. सूक्ष्मात जाऊन बघितलं तर यानंतरचा कालावधी महाभारतकालीन इतक्याच कलाटण्यावर कलाटण्या मिळण्याचा. आलमगीर गेले, मराठेसैरभैर झाले, मुघल संपले, पेशवाई गेली, पहिले स्वातंत्र्ययुध्द, दुसरे स्वातंत्र्ययुध्द, फाळणी, दंगली, इंगजांची एक्झिट आणि मधल्या काळात आणखी किडूक मिडूक घटना घडामोडी होत्याच. आलमगीरदिल्लीतच ठाण मांडून बसले असते तर काय बिषाद होती इंग्रजांची हिंदुस्थानभर ऑक्टोपसासारखी हातपायपसरविण्याची. किंवा कल्पना करा की आलमगिरांना इकडे दक्षिणेत येण्याऐवजी थेट पूर्वेकडून चीनदेशीच्याशांघाय मध्येच जावे वाटले असते तर हिंदुस्थानच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासालाही अनदेखी कलाटणीमिळून गेली असती.
सहारा श्री सुब्रोतो रॉय यांच्या सुरम्य इतिहासाला कुरम्य वळण मिळालेय ते त्यांच्या आयुष्यातीलवेगळया कलाटणीमुळे. एक अशीही कलाटणी आधुनिक कुबेराच्या डोळ्याला पाणी आणू शकते हे सध्यादिसून येत आहे. कोणत्यातरी टप्प्यावर कलाटणी मिळून आधुनिक काळातील किंग (फिशर)च असलेलेविजयराव मल्यांच्या तिजोरिला अशी गळती लागली की आता थांबता थांबेना.
कलाटणीत भविष्यातील उज्वलकाळ
काही अपवाद वगळता बहुतेक कलाटणीत भविष्यातील उज्वलकाळ दडलेला असतो. तो काळआपणास दिसला पाहिजे. आपल्या आयुष्याला कलाटणी मिळावी म्हणून बरेचजण सातत्याने प्रयत्न करतराहतात. लॉटरीची नियमित खरेदी हा त्याचाच एक भाग. पण लॉटरीदेवी काही प्रसन्न होत नाही. लॉटरीदेवी प्रसन्न व्हावी म्हणून आपल्या खिशातील लक्ष्मीदेवी मात्र अदृष्य होत राहते. काहींच्या आयुष्यात विशेषप्रयत्न न करताही कलाटणी मिळून जाते. बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारणात नुकतेच पहिले पाऊलटाकलेल्यांना आमदारकीची तिकिट दिली आणि त्यासर्वांच्या आयुष्याला अशी काही कलाटणी मिळाली कीबस्स ज्याचे नाव तेच.
पृथ्वीच्या नैसर्गिक वातावरणास लाख लाख वर्षाच्या टप्प्याटप्प्याने कलाटणी मिळत राहिली त्यामुळेचआजचा प्रगत मानव उत्क्रांत होऊ शकला. समजा अशी कलाटणीच मिळाली नसती आज आपल्यापैकीकुणीही दिसला नसता. पृथ्वीवर राहिले असते ते डायनोसॉर, ऱ्हायनोसार किंवा असेच कोणते तरी लहानसॉर. पृथ्वी थंड वायुचा गोळाच बणून राहिली असती कदाचित.
आयुष्यातला जिवंतपणा, रसरशितपणा, सळसळतेपणा कायम ठेवण्याचं महत्कार्य कलाटणीच करतअसते. आयुष्यातील विविध प्रकारच्या दुर्घटना या आपल्या जीवनाला कलाटणी देऊन जातात. अणुबाँम्बनेजपानच्या इतिहासाला अशी काही कलाटणी दिली की हे चिमुकले राष्ट्र जगातले एक प्रबळ राष्ट्र होऊनबसले. आपल्या आयुष्यातील कलाटणी आपणास कुठे नेऊन ठेवेल किंवा आयुष्याला कोणती दिशा देईल हेसांगता येत नाही. कलाटणीकडे आपण सकारात्मकेतनं बघायला हवं.
कलाटणी मिळते याचा अर्थ असा की बदल घडतो. कोणताही बदल हा प्रगतीच्या पुढच्या टप्प्यांपर्यंतनेण्यासाठी सहाय्यभूत ठरु शकतं. मनुष्याचं लग्न झालं की त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळते असं चारहीखंडात समजलं जातं. काहींच्या मते ही कलाटणी त्या मनुष्यास पूर्णत्व देणारी असते. तर काहींच्या मते हीकलाटणी संबंधित मनुष्याला भोवऱ्यात टाकणारी असते. एकिकडे पूर्णत्व देणारी आणि दुसरीकडे भोवऱ्यातटाकणारी अशी ही कलाटणी नसती तर आयुष्य मिळमिळ होऊन राहिलं असतं.
कलाटणी आहे म्हणून जीवनाला गती आहे. गती आहे म्हणूनच नवी नवी शिखरं मनुष्यप्राणी गाठतचालला आहे.
सुरेश वांदिले