(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

नपंसूक गोष्टीचा अभिमान

पैसे झाडाला लागत नाहीत, हे ठाऊक असूनही भारतीय मानसिकता ही भारत सरकारनामे अथवा राज्य सरकार नामे संस्थेकडे असे जादूचे झाड असल्याचे समजते,  अशीमानसिकता बाळगून आहे. अलिबाबाची गुहा कठेतरी असेलच किंवा मनी इच्छिलेले सर्वदेणारा जादूचा दिवा असेलच किंवा धनसंपत्ती देणारा एखादा कल्पवृक्ष असेलच याचांदोबीय मानसिकतेला शोभेशी ही वृत्ती गेल्या 60 वर्षात बदलली नाही. पुढील 60 वर्षेबदलेल अशी सध्याची स्थिती नाही. अशा परिस्थितीत देशात अर्थक्रांती घडवण्यासाठीपाच पन्नास हॅरी पॉटर जन्मास यावे लागतील.

   विरोधाभास की दुर्देव्य !

   देशातील सरकारांकडे पैसा गोळा होण्याचे मुख्य स्त्रोत हा विविध प्रकारचा करअसतो. हे सांगण्यासाठी, अर्थसत्ता होण्याच्या दिशेने घोडदौड करत असल्याच्या स्वप्नातगुंग असलेल्या देशाला या जाहिरातींवर 2016 साली भरपूर निधी खर्च करावा लागतो. हा विरोधाभास नसून मोठे दुर्देव्य आहे. कारण कर कसा बुडवता येईल याचा विचारकरणारे किंवा सरकारचा पैसा कसा फुंकून टाकता येईल याचा बारकाईने विचार करणारेअ,ब,क,ड श्रेणीतील विजय मल्या ही देशाची महत्वाची ओळख बनली आहे. जोयाविषयी संवेदनशील बोलू पाहतो त्याचीही पारदर्शकता शंभर टक्के आहे की त्यातहीअ,ब,क,ड श्रेणीतील सहाराश्रींच्या विचारांचे मिश्रण झालेय हे मोजमाप करणारेअर्थोग्रॉफ अद्याप कुणी शोधलेले नाही.

   प्रश्नांकित सेवा

   कर वाचवण्याची श्रीमंत युक्ती करणारे महाभाग कोट्यवधींची माया सहज इकडच्यातिकडच्या मंदिरात भक्तिभावाने देतात. हा व्यक्तिगत प्रश्न झाला. पण करचोरीकरणाऱ्या अशा भक्तांची ही सेवा समोरच्या सर्वशक्तीमान मूर्तीने प्रश्नांकित केल्याचेकाही दिसून येत नाही. ही सेवा म्हणजे अशा भक्तांसाठी समृध्दीच्या नव्या वाटाउघडणाऱ्या ठरतात असे जेव्हा सामान्य भक्त पाहतो, तेव्हा तोही त्याच्या क्षमतेनेदानपेटीत सेवा टाकतो. हा सामान्य भक्तही महानगरपालिका वा नगरपालिकेचाकिरकोळ पाणीकर मात्र भरु इच्छित नाही वा नळ मीटर टॅम्पर करुन तो कमी कसा होइलहे बघण्यात आपली बुध्दी खर्ची घालतो.

   अर्थगतीचा टायर पंक्चर

   आपल्या कडील या आणि अशा अगदीच किरकोळ भासणाऱ्या अ(न)र्थ-कारणांनीअर्थगतीचा टायर पंक्चर केलाय हे दिसत असूनही आपल्या डोळ्यांनी धृतराष्ट्राशी गाढमैत्री केली आहे. कोणत्याही नागरी संस्थेला त्यांचे कार्य करण्यासाठी पुरेसा निधी यामुळेमिळू शकत नाही. त्यांच्याकडेही पैशाचे झाड नाही. त्यामुळे गटारं स्वच्छ होऊ शकतनाही. नाल्या बांधल्या जाऊ शकत नाही. पाण्याचा निचरा व्यवस्थित होऊ शकत नाही. कचऱ्याची विल्हेवाट नीट लावता येत नाही. डेंग्यू-चिकनगुणीयासारखे आजारफैलावतात. त्यांच्या निराकारणासाठी पैसा खर्च करावा लागतो. तो विकासकामांसाठीराखून ठेवलेल्या निधीतूनच. असे हे दुष्टचक्र साठ वर्षात बदलेले नाही.

   गृहनिर्माण क्षेत्र वाढले आहे. वाढत आहे. त्याचे अधिकृत व्यवहार किती आणिअनधिकृत किती यावर कुणाचे नियंत्रण नाही. अधिकृत व्यवहारातून स्टॅम्पड्युटीआदीमधून जो पैसा शासनाकडे जायला हवा तो असाच इकडून-तिकडे गेलास्वीत्ज्ञर्झलँकडे अशी रम्य स्थिती. अडीच लाख कोटी रुपयांच्या आसपास सार्वजनिकबँकांमधील पैसा हा श्रीमंत उद्योजकांनी न दिसणाऱ्या सातव्या बंकरमध्ये टाकला आहेकिंवा अदृष्य अशा प्लॅटफार्म क्रमांक पावनेसहावरुन हॉगवर्ट स्कूल ऑफ मॅजिककडेजाणाऱ्या रेल्वे गाडीत नेऊन ठेवला आहे. बँकांची परिस्थिती म्हणूनच तोळामासा. तीआणखी तोळामासा होणारच नाही याची शाश्वती श्री व्यंकटेश्वरही देऊ शकणार नाहीत. एकिकडे संशोधन कार्यासाठी देशातील महत्वाच्या शासकीय संस्थांना पुरेसा निधी मिळूशकत नाही, दुसरीकडे ही अशी स्थिती.

   फुकटचंबू अर्थकारण

   देशात अर्थक्रांती येण्यासाठी मानसिकता बदलायला हवी असे जेव्हा बोलले जाते. तेव्हा ती कुणाची ? हाही प्रश्न विचारला गेला पाहिजे. फुकटचंबू अर्थकारणाचे गोडवेगाण्यात  आपल्याकडे धन्यता मानली जाते. त्यातच समाजाचे हित असल्याची आपलीधारणा झाली आहे. आपल्या अवतीभवती पैशाचे झाड नाही हे दिसत असूनहीमोफतचक्राचं सूदर्शन हाती घेऊन कल्याणमस्तू म्हणायची आपणास सवयच लागलीय. गेल्या काही दशकात ही मानसिकता झपाट्याने वाढली आहे. अधिक सुशिक्षित आणिआधुनिक अर्थव्यवहाराचे भान असण्याचा दावा करणाऱ्या व्यक्तींची यात सतत वाढहोणे हे भयसूचक आहे. यात आता, तू पुढे की मी पुढे अशी स्पर्धा. फुकटचंबूविचारसरणीने आपली अर्थव्यवस्था फाटकी होत चालल्याचं दृष्य आहे.

   आभासी बदल

   काही आभासी आणि किरकोळ दृष्य बदल म्हणजे अर्थक्रांती नव्हे. कालानुरुप काहीगोष्टी या घडत असतात. पारतंत्र्यात रेल्वेसारखी महत्वाची पायाभूत सुविधा देशात उभीराहिली. ती इतकी मजबूत होती की स्वातंत्र्यानंतर त्याचाच आधार सध्याही घ्यावालागत आहे. प्रत्येक टप्प्यावर अशा पायाभूत सुविधा बाय डिफॉल्टसुध्दा होत राहतात. पण आता त्याच्या पलिकडे बघणे गरजेचे आहे. बाय डिफॉल्ट हा आशावाद मर्यादितस्वरुपात फलदायी असतो. तसेच सध्याचे स्वरुप आहे.

   जबाबदारी कुणाची

   सारे काही सरकारवर सोडू नका, तुमची जबाबदारी ओळखा असे साने गुरुजींनीसांगितलं होतं. पण गेल्या साठ वर्षातील आपली वर्तणूक ही अशी नाही. टॅक्स भरा, हेसांगण्यासाठी आपल्याच पैशातून सरकारला जाहिराती द्याव्या लागतात. स्वच्छता कराहे सांगण्यासाठी सरकारला पैसा खर्च करावा लागतो. शौचालये बांधा हे सांगण्यासाठीसरकारला पैसा खर्च करावा लागतो. सार्वजनिक ठिकाणी थूंकू नका, सार्वजनिकमालमत्तेची नासधूस करु नका हे सांगण्यासाठी सरकारला पैसे खर्च करावा लागतो. आजारांपासून वाचण्यासाठी गाळलेले आणि उकळलेले पाणी प्या हे सांगण्यासाठीसरकारला पैसे खर्च करावे लागतात. या किती साध्या गोष्टी आहेत. आपण सुज्ञ आणिशहाणे समजतो स्वत:ला. पण सुज्ञपणाने वागा बाबांनो हे सांगण्यासाठी सरकारला पैसाखर्च करावा लागतो. हा पैसाही झाडास लागत नाही. इतकं करुनही आपण काठावरराहून गंमत बघतो. पुन्हा पुन्हा हेच सांगण्यासाठी सरकारला आपलाच पैसा खर्च करावालागतो.

   कॉलनीतली आपली सदनिका एकदम टामटूम आणि कॉलनीबाहेरचा रस्ता आणिगटार एकदम गचाळ अशी विसंगत स्थिती, हे आपल्याकडचे चित्र. कुणीतरी देवदूतयेऊन परिस्थिती बदलेल ही आशा टीव्हीवरील मालिका बघून बघून आपणास वाटूलागली आहे. टीव्हीमधील मालिकांमध्ये दिसणाऱ्या भव्यतेच्या आभासी जगात आपणहरवून गेलो आहोत.

   प्रामाणिक करदाते

   अर्थक्रांती होण्यासाठी प्रामाणिक करदाते होण्याची गरज आहे. त्यासाठी सतत कानीकपाळी सांगण्याची गरज भासू नये. पण ते होत नाही. उच्च श्रेणीतील व्यावसायिक वित्तनियंत्रण व व्यवस्थापन करणारे तज्ज्ञ ठेवतात. कर वाचवण्याचा आनंद मनवतात. यातकसलाच पराक्रम नाही. हे आपण कधी लक्षात घेणार.

   एकमेकांकडे बघून अर्थव्यवहार करणाऱ्या आपल्या देशात आदर्श ठेवायचा कुणाचा? तो तसा करतो म्हणून आपणही तसे करतो. याला व्यवहारावादाचे नाव दिले जाते. वडीलांचे वागणे बघून मुलगा तसेच वागतो. नागरिकशास्त्राचे धडे शिकवणारे गुरुजीप्रत्यक्षात त्याच्या विपरित वागतात. इकॉनामिक्सचे धडे देणारे प्राध्यापकही विरुध्दवागणूक करतात. साधनसुचितेचे सतत गोडवे गाणारे आधुनिक संत-महंत-स्वामी -बापूयांची धनसंपत्ती चमत्काराने वाढते असे त्यांच्यासह भक्तगणांसही वाटू लागते. आपल्याकडचे सामाजिक अर्थकारण हे  फसवे ठरले आहे. विकासाचा मानवी चेहरा हीएक भंपकबाजी बरीच लोकप्रिय आहे. शुध्द पाणी , किमान आरोग्याच्या सोयी,चांगल्या शैक्षणिक सुविधा या विकासाच्या मानवी चेहऱ्यांपासून दिवसागणिक आपणलांबच जात आहोत. सार्वजनिक श्रीमंती वाढावी, सार्वजिनक सेवा, पायाभूत सुविधासक्षम- समर्थ- खऱ्या खुऱ्या स्मार्ट व्हाव्यात असे आपणास मनापासून वाटत नाही. हीअनास्था जो पर्यंत दूर होत नाही तो पर्यंत अर्थक्रांतीचा कोंबडाही आवरणार नाही. सूर्यउगवणे तर दूरच राहिले.

   विविध क्षेत्रात अग्रस्थानी आलेली आणि येत असलेली तरुणांची पिढी याविषयी फारअनभिज्ञ दिसते. ज्या पोटतिडकीने आणि संवेदनशीलपणे या विषयावर त्यांनी बोलायलाहवे किंवा त्यासाठी नेतृत्व करायला हवे तसे काही होताना दिसत नाही. त्याच त्यापारंपरिक आणि खुज्या विषयांमध्ये जनतेला गुंगवण्याचे शाब्दिक कौशल्य ही तरुणनेतृत्व मंडळी प्राप्त करत आहेत. याचा परिणाम असा आहे की जे काही विविध निर्देशांकजागतिक पातळीवर नित्य नियमाने प्रसिध्द होतात त्यात आपण कधी 100 क्रमांकावरकधी 123 क्रमांकावर तर कधी 200 क्रमांकावर असतो. फक्त आपली श्रीमंती पहिल्यादहा-विसात दिसते ती फोर्ब्स मासिकाच्या श्रीमंत लोकांच्या यादितून. अपवाद वगळताही मंडळीसुध्दा व्यक्तिगत अर्थभानास प्राधान्य आणि सार्वजनिक अर्थभानास दुय्यमस्थान देणारी दिसते. सर्वाधिक उत्पन्न असणाऱ्या जगातील पहिल्या दहा अभिनेत्रीमध्येभारतातील दीपिका पदूकोन ही एक असल्याची यादी कोणती तरी अमेरिकेतील संस्थाप्रकाशित तर त्याचा आनंद होतो आपणास. पण हा फुकाचा आनंद नाही का ? यानेकाही अर्थक्रांती होत नाही. आपल्या देशातील अमूक तमूक अभिनेत्याचे ट्वीटर फालोअर्सहे अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांच्या तोडीस तोड आहेत हे सांगण्यासारखंच असं आहे. यानपंसूक गोष्टीचा आम्ही अभिमान बाळगत आलो आहे. त्यातून अर्थक्रांती कशी साध्यव्हायची? प्रत्येक व्यक्तिने प्रामाणिकपणे ठरवले की त्याच्या वाटेला जो काही कर येईलतो मी देईनच, तरच अर्थक्रांतीच्या दिशेने पहिले पाऊल टाकता येईल. तो प्रामाणिकदिवस कधीतरी उगवेल अशी आशा करु या..

   सुरेश वांदिले