नर्तकीच्या प्रेमात, मदिरापान करणारा असा औरंगजेब..
मोगलांच्या इतिहासाला जगाच्या इतिहासात महत्वाचं स्थान आहे. मोगलांचा इतिहास प्रतिभावंत लेखक, साहित्यिक, इतिहास संशोधक यांना अनेक शतकापासून आकर्षित करत आलाय. जसजशी नवी साधनंउपलब्ध होत गेली तशी मोगलांच्या इतिहासावर नवा प्रकाश पडत गेला. भारतातीलच नव्हे तर परदेशातीलअनेक अभ्यासक आजतागायत मोगलांच्या इतिहासाकडे आकर्षित होत आहेत. या इतिहासावर आधारितसंशोधनात्मक ग्रंथ, ललित साहित्य यांची सातत्यानं निर्मिती होत आहे. या साहित्याला उत्तम मार्केटअसल्याचं पुन्हा पुन्हा दिसून आलं आहे.
मोगलांच्या काळात मनुची हा इटालियन प्रवासी भारतात 1685 साली आला होता. त्याला बऱ्याचकला अवगत होत्या. या मनुचिने आपल्या अक्कल हुषारीवर मोगल सम्राट दाराच्या तोफखान्यावर काममिळवलं. शहाआलमचा खाजगी वैद्य म्हणूनही काही काळ त्याने काम केलं. त्याने पोर्तूगीज व इंग्रजांचाराजदूत म्हणून मोगल व मराठे यांच्यांकडे वावरला. सुमारे 50 वर्षे तो या ना त्या भूमिकेत हिंदुस्थानातवावरत होता. तत्कालीन राजकीय परिस्थिती व सामाजिक परिस्थितीचा त्याला डोळसपणे जवळून अभ्यासकरता आला. हा संपूर्ण कालखंड हिंदुस्थानाच्या इतिहासातील अनेकविध घटना-घडामोडी-उलथापालथी यांनी भरलेला आहे. या घटनांच्या नोंदी करुन ठेवण्याची हुषारी मनुचीकडे होती. त्याने अशा नोंदींचाउपयोग करुन पुढे Storia-Do-Mogor हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात तत्कालीन घटनांचा समावेशकरतानाच त्याने मोगलांच्या बहुरंगी-बहुढंगी व व्यापक अशा इतिहासाचेही अवलोकन केले व त्याचा परामर्शया ग्रंथात घेतला. मूळ ग्रंथ त्याने पोर्तृगीज भाषेत लिहिला. त्याचे इंग्रजी भाषांतर इर्विनने केले. चारखंडातला हा ग्रंथ 2000 पृष्ठांचा आहे. या इंग्रजी अनुवादावरुन,असे होते मोगल, हा मराठीतीलअनुवादित ग्रंथ साहित्य आणि संस्कृती मंडळानं 1974 साली प्रकाशित केला. मराठी भाषांंतरज.स.चौबळ यांनी केले.
दोन हजार पृष्ठांचा हा ग्रंथ चौबळांनी 500 पृष्ठांमध्ये आटोक्यात आणला. तो आणताना त्यांनीअनावश्यक माहिती, पाल्हाळ मजकूर वगळला. यामध्ये मोगल बादशाहांची ऐकिव माहिती, ख्रिश्चनांच्याविविध पंथामधील भांडणं, हिंदूंच्या चालीरीती, धर्म अशासारख्या माहितींचा समावेश आहे.
या ग्रंथांचा इंग्रजीत अनुवाद करणाऱ्या इर्विनने मनुचिच्या अनेक तळटीपा स्वत: तपासून बघितल्या. त्यामध्ये अपवाद वगळता त्यास त्रुटी आढळल्या नाहीत. मनुचिने ग्रंथाची रचना त्याच्या स्वत:च्याअनुभवावरुन व प्रत्यक्ष परिस्थितीच्या अभ्यासावरुन केली. त्याने इतरांच्या ग्रंथांचा अल्प असा वापर केल्याचेइर्विनला आढळलं.
मनुचीच्या ग्रंथांचे पहिले 3 भाग 1699 आणि 1700 साली चौथा भाग 1701 ते 1705 सालीतर पाचवा भाग 1706 ते 1709 मध्ये लिहिला गेला.
मनुचीने बघितलेला औरंगजेब
हा ग्रंथ मोगलांच्या इतिहासाचा धंाडोळा घेणारा असला तरी प्रामुख्याने औरंगजेबाच्या कारकीर्दीची 50 वर्षे यात ठळकपणे आली आहेत. ही संपूर्ण कारकीर्द मनुचीच्या डोळयादेखत घडली आहे. मनुचिने याग्रंथाच्या पहिल्या भागाची दोन पुस्तके केली. व्हेनिस ते दिल्ली पर्यंतच्या प्रवासाचं वर्णन पहिल्यापुस्तकात रेखाटलं व दुसऱ्या पुस्तकात औरंगजेबाच्या भावांच्या मृत्युनंतर ते औरंगजेबाच्या राज्यारोहणापर्यंचावृतांत नोंदवला. दुसऱ्या भागात औरंगजेबाच्या लढाया व विजय तर तिसऱ्या विभागात मोगलांचे राजकारण, हिंदुस्थानातील राजांची थोरवी व महसूल यंत्रणेची माहिती त्याने दिली आहे.
शहाजहनाच्या राजवटीच्या उत्तर काळाच्या वर्णनानं मनुचीच्या पहिल्या भागाची सुरुवात होते. ताजमहालचा यात उल्लेख असून शहाजहानने आग्य्राला राजवाडयासमोर मुमताजची कबर बांधली. खूप पैसाखर्च केला. या इमारतीला दोन मजले होते. तळमजल्यावर मुमताजचे थडगे बांधले. ते कोणासहीपाहता येत नसे. त्यावर स्त्रिया व खोजांची देखरेख होती. शहाजहानने आपली आठवण कायस्वरुपी राहावी म्हणून यमुना नदीच्या काठी शहाजनाबाद हे शहर वसवले.
औरंगजेब–धैर्यवान,कपटी,ढोंगी..
औरंगजेबाबद्दल मनुची म्हणतो,औरंगजेब धैर्यवान व पराक्रमी असला तरी तो कपटी व दांभिकहोता.आपण संन्यस्त वृत्तीचे असल्याचे तो ढोंग करी. ऐहिक गोष्टीबद्दल उदासिन असल्याचं दाखवत असलातरी या सर्वांच्या आवरणाखाली तो विरुध्द जीवन घालवी. याची जाणिव शहाजहानला होती. त्यामुळेचत्याने औरंगजेबाच्या लहान मनसबित वाढ केली नाही. इतर मुलांकडे व विशेषत: दाराकडे त्याचा जास्तकल होता. त्यामुळे औरंगजेब दाराचा हेवा करायचा. आपल्या मुलांमध्ये एकेापा नसल्याचे शहाजहाननंओळखलं होतं. त्याने सर्वांना प्रांताच्या सुभेदाऱ्या देऊन वेगळं केलं. दाराला मात्र जवळ ठेवलं. आपल्यावर शहाजहानचं प्रेम नाही हे औरंगजेबाला ठाऊक होतं. त्यामुळे त्याने दारालाच आपल्याबाजूनंवळविण्यासाठी अनेक भावूक व ह्दस्पर्शी पत्रं लिहून त्याचं आपल्याबद्दलचं मत बदलवलं व त्याद्वारे मुलतानया प्रांताऐवजी दख्खनची सुभेदारी मिळवली. दख्खन हा इतर प्रांतापेक्षा समृध्द असल्यानं याठिकाणीमोगलांच्या लष्करी हालचाली सतत राहत असत. त्याद्वारे आपण आपली शक्ती प्रस्थापित करु शकू, असाकावेबाज विचार औरंगजेबाच्या मनात आला व त्याने तो प्रत्यक्षात उतरवला सुध्दा. औरंगजेबाची बाजू दारानंघेणं शहाजहानला आवडले नाही. शहाजहानने औरंगजेबाला विषारी सर्पाची उपमा दिली.्अशा विषारीसापाची तुलाच विषबाधा होईल. असा इशाराही दाराला दिला. पुढे हा इशारा सत्य ठरला.
औरंगजेब–नर्तिकेत रमणारा
औरंगजेबाबद्दल माहिती देताना मनुची म्हणतो की, सर्वसंग परित्यागाचे पांघरुण घेऊन औरंगजेबानेअनेकांना फसवले. आपण फकीर आहोत असे भासवूनच औरंगजेब थांबला नाही, तर तो नंतर एखादयामुल्लाप्रमाणे वागू लागला. त्याच्या अंत:पुरातील एका नर्तकीवर त्याचे प्रेम होते. त्याप्रेमापोटी त्याने बरेचदिवस प्रार्थना, व्रत या धार्मिक कृत्यांकडे कानाडोळा केला. नर्तकीच्या सहवासात रममाण होऊन तोमदिरापानही करु लागला.
कपटनीतीत माहीर
1657 च्या 17 नोव्हेंबरला शहाजहान आजारी पडला तेव्हा त्याच्या मुलांनी तख्त काबीजकरण्यासाठी प्रयत्न सुरु केले. शहाजहानाच्या शहाशुजा या मुलाने तक्ख या ताबूत (एक सिंहासन तरीनाहीतर शवपेटिका तरी) अशी घोषणा करुन बंड पुकारलं. औरंगजेबानं जेव्हा शहाजनाविरुध्द उघडपणेबंडाचा झेंडा फडकवला तेव्हा मनुची दिल्लीत होता. औरंगजेब आणि दाराच्या युध्दातही मनुचिनं प्रत्यक्षभाग घेतला. या युध्दाचा आँखो देखा हाल मनुचिनं या ग्रंथात रेखाटलाय. दाराचा पराक्रम जसा त्यानेरंगवला तसा औरंगजेबाच्या कपटनीतीचेही दर्शन घडवलं. औरंगजेबानं दिल्ली काबीज केल्यावरशहाजहानला बंदिवासात टाकले. या युध्दात मदत करणारा त्याचा लहान भाऊ मुरादबक्षला ठार केलं. शहाशुजा या भावाचाही पराभव केला. दाराचा शिरच्छेद केला. शहाजहान विरुध्दचे बंड आणि त्यानंतरआपण गाजवलेला पराक्रम याच्या नांदी लिहून घेण्याचे आदेश औरंगजेबाने बखरकारांना दिले. आपल्याविषयी त्याने बखरकारांना असे लिहावयास सांगितले.,परमेश्वराने मला बादशहा केले, त्याचे एकच कारणआणि ते म्हणजे मी नेहमीच एकनिष्ठेने कुराणाचे प्रतिपालन करीत आलो आहे. वास्तविक पाहता एक गरीबफकीर म्हणून काळ कंठावा असा माझा बेत आणि इच्छा होती. न्यायी परमेश्वर हा गर्विष्ठांना खाली पाडतोआणि दासांना वर चढवतो. त्याची इच्छा होती म्हणून मला हे पद मिळाले.
सत्ताप्राप्ती नि जश्न
सर्वकष सत्ता हातात येताच औरंगजेबानं 9 दिवसांचा जशन म्हणजे उत्सव साजरा करण्याची लोकांनाआज्ञा केली. त्याचबरोबर सुव्यवस्था आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले. राज्यारोहणानंतर त्याने दिल्लीत 500 चोरांना जाहीरपणे फाशी दिली. विविध प्रांतावर नवीन सुभेदारांच्या नेमणुका केल्या. मद्यपानाविरुध्दमोहीम सुरु केली. भंागसेवानाविरुध्द मोहीम उघडली. संगीतकलेवर बंदी आणली. नर्तकींना लग्नकरण्याची सक्ती केली. भोंदू फकिरांच्या ढोंगीपणाकडे त्याने दुर्लक्ष केले. विश्वासू हेरांची मोठी पलटणउभारली. शहाजहानपेक्षा आपण अधिक कार्यक्षम असून लोकांनी आपली कीर्ती व बापाची अपकीर्ती गावीअसा त्याचा प्रयत्न असे.
महिलांनी मद्य प्राशन करु नये व तंग कपडे घालू नये असा आदेश औरंगजेबाने काढला होता. पणऔरंगजेबाची बहीण जहांआरा बेगम हिने या आदेशास विरोध केला व मुल्ला व मौलवींच्या बायकांनाआपल्या महालात बोलावून त्यांना यथेच्छ मद्यपान करु दिले. ती मद्यधुंद अवस्था तिने औरंगजेबालादाखविली. धर्ममार्तंडांच्याच बायका जर मद्य प्राशन करत असतील तर विरोध कशाला? हा सवाल तिनेऔरंगजेबाला केला. औरंगजेबाने आपला आदेश मागे घेतला.
देशातील राज्यकारभाराची घडी व्यवस्थित बसवल्यावर औरंगजेबाने समुद्रावर आपली सत्ता स्थापनकरण्याचे प्रयत्न सुरु केले. मात्र त्याला स्वत:चे आरमार काही स्थापन करता आले नाही.
औरंगजेबाला चार मुले आणि चार मुली अशी अपत्ये होती. मोगल बादशाहीत मुलींची लग्ने लावूनदेत नसत. मात्र औरंगजेबाच्या झीनत-उन-न्निसाबेगम आणि बद्र-उन-न्निसा बेगम या दोन्ही मुलींनी त्यालाआपले लग्न लावून देण्यास भाग पाडले. ओरंगजेबसुध्दा या लग्नास तयार होईना तेव्हा त्यांनी ,मोहम्मदपैगंबराने आपल्या कन्येचा विवाह अलीशी लावून दिला होता. मोगल बादशहा पैगंबरापेक्षा श्रेष्ठ कसा? असा सवाल केला. या सवालाने औरंगजेबाला निरुत्तर केले.
1 फेब्रुवारी, 1766ला शहाजहान आग्य्राला मरण पावला. त्याचे प्रेत गुपचूपपणे ताजमहालातनेऊन पुरण्यात आले. त्याच्या मृत्यूनंतर औरंगजेब आग्य्राला गेला.
मुलांना नकोसा झालेला..
औरंगजेबाचे आपल्या मुलांशी कसे संबंध होते यावर प्रकाश टाकताना औरंगजेबाचा मुलगा अकबराचं एकपत्र लेखकानं उद्धृत केलं आहे. अकबरानं औरंगजेबाविरुध्द बंड केले होते. तरी त्याला क्षमा करुनऔरंगजेब परत आपल्याकडे बोलावित होता. वारंवार पत्र लिहित होता. याला उत्तर देताना अकबर एकापत्रात लिहितो, मी निश्चितपणे तुमच्याकडे येईन, पण हातात तलवार घेऊन. तुम्हाला ठार करुनहिंदुस्थानाची बादशाही संपादन करण्यासाठी प्राणाची बाजी लावेन.औरंगजेबाचा दुसरा मुलगा शहाआलम याचामुलगा मुइजुद्दिन हा सुध्दा औरंगजेबाला म्हणजेच आपल्या आजोबाला ठार करण्याच्या पक्षाचा होता.
औरंगजेबाच्या विरोधात जवळपास त्याचे सर्व मुलं,नातू गेले होते. त्यांच्या कारवाया सतत सुरुअसत. पण वयाच्या 84व्या वर्षी औरंगजेब उपजत शहाणपणा आणि मुत्सदिगिरीनं या सर्वांना पुरुन उरतअसे. मनुची म्हणतो की 84 व्या वर्षातही तो घोडयावर बसून स्वारीसाठी निघत असे.
औरंगजेब आपल्या मुलांवर सतत लक्ष ठेऊन असे. आपण जसे आपल्या वडिलांशी, भावांशी वागलोतसंच आपली मुलं आपल्याशी वागतील अशी भीती त्याला सतत वाटत असे. औरंगजेब हेरांकरवी मुलांवरपाळत ठेवी. स्वत:ही कधीकधी हेरगिरी करत. औरंगजेबाला आपण 120 वर्षे जगू असे वाटत असे. राजपुत्रांनी फक्त चार पुत्रे वाढवावित असा प्रघात पडलेला होता.
बादशहाची राज्यव्यवस्था
या ग्रंथाचा तिसरा भाग हा मोगलांची राज्यव्यवस्था कशी होती याचं विवेचन करणारा आहे. मोगल बादशहांचं वैभव, ऐश्वर्य हे कोणत्याही युरेापिअन सम्राटांसोबत बरोबरीच होणार नाही इतके प्रचंड होतं .
बादशहांच्या अंत:पुराचा कारभार महिला अधिकारी सांभाळत. या स्त्रिया चतुर आणि बहुश्रूत असत. औरंगजेब रात्री 12 पर्यंत काम करायचा. फक्त 3 तास झोप घ्यायचा. दररोज सकाळी दीड तास प्रार्थनाकरीत असे. तो एकदाच जेवत असे. तो झोपला की त्याचे रक्षण शस्त्रास्त्रे चालवू शकणाऱ्या महिलाकरीत.
अंत:पुरातील राण्या व राजकन्यांची नावे ताजमहाल, नूरमहाल, फर्झाना बेगम, रोशनआरा बेगम, शादमान खानूम, शाहखानूम, उदेपुरी, केशर छत्रवती, माहखानूम अशासारखी असत तर रखेल्यांची नावेरानादिली, बदामचष्म, नाजूक चष्म, मतलूब, सुखदेन, कुतूहल, शिंगार, प्यार, महान अशी होती. अत्तर, सुगंधी द्रव्ये, विडयाची पाने यावर बादशहा बराच खर्च करी. औरंगजेबाची राहणी साधी असली तरीअंत:पुरातील त्याच्या स्त्रियांची राहणी वैभवशाली होती. राजकन्या जन्मली तर केवळ अंत:पुरात उत्सवसाजरा केला जाई. राजपुत्र जन्मला तर दरबारात उत्सव साजरा केला जाई.
तेव्हा सुध्दा वशिला
बादशहाच्या काळात वशिला प्रकार होता. राजपुत्रांना सुध्दा अनेक कामे वशिला देऊन करावीलागत असे असं मनुचिचं निरीक्षण आहे. राजपूत्र 5 वर्षाचे झाले की त्यांना तुर्की भाषेचे शिक्षण सुरुकेले जाई. राजपुत्रांना वाईट सवयी लागू नये म्हणून काळजी घेण्यात येई. भावना आवरणं, विवेकराखणं, चेहरा निर्विकार ठेवणं अशा पध्दतीचं शिक्षण देण्यात येत असे. शिकार व मशिदीत जातानाबादशहा राजपुत्रांना सोबत घेऊन जाई. लग्न झाले की राजपुत्रांना स्वतंत्र वाडेदिले जात. हकीम, वैद्यांनास्पर्श करता यावा म्हणून अंत:पुरातल्या अनेक स्त्रिया आजारीपणाचे सोंग करीत.
बादशहा व राजपुत्रांना तलवारी, ढाली, हत्ती, तोफा यांचा फार शौक असायचा. औरंगजेबाच्यातलवारीचे नाव आलमगिर होते. दर शुक्रवारी बादशहा त्याच्या शस्त्रांची तपासणी करायचा. बादशहा ढाली, घोडे, हत्ती, तोफा यांना नावे दयायचा. बादशहाच्या दरबारी 114 प्रमुख सरदार होते. त्यांचाधर्म मुसलमान असला तरी मात्र वंश वेगवेगळा असायचा. निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याला त्याच्याउपजिवीकेसाठी वेतन मंजूर करण्यात येत असे.
मनुचीच्या निरीक्षणानुसार मोगल साम्राज्यात 24 प्रांत होते. शेतसारा धरुन वार्षिक उत्पन्न 38 कोटी72 लाख 59 हजार रुपये होते. वजीर, दिवाण, मीरसामान या तीन मुख्य अधिकाऱ्यांचं सहाय्यबादशहाला मिळे. त्यांच्यानंतर काजी व कोतवाल या अधिकाऱ्यांचा समावेश होतो. मोगल साम्राज्यात480 च्या आसपास किल्ले होते. मोगल साम्राज्यात कायस्थ नावाचे हिंदू फर्डे लेखक व हिशेबात हुषारअसणाऱ्या लोकांना महत्वाचे स्थान होते. ते आपल्या देवतांना दारुचा नैवेद्य दाखवायचे. देवाजवळ दौत, टाक, कलमदान व मद्याची बाटली ते ठेवत असत. जिल्हयाचे मुख्य अधिकारी फौजदार नावानं ओळखलेजात. मोगलांच्या पायदळात बुंदेले राजपूत आणि अलाहाबादचे पुरभैय्ये असत. बादशहाचे दिल्ली, आग्राआणि लाहोर या तीन ठिकाणी निवासस्थान होते.
महाराज आणि औरंगजेब
औरंगजेब आणि शिवाजी महाराजांच्या संबंधाविषयी बरीच माहिती मनुचिने या ग्रंथात दिली आहे. शिवाजी महाराज दरबारात औरंगजेबाला भेटायला गेले तेव्हा जयसिंगानं त्यांना भक्कम संरक्षण पुरवलं. आपला मुलगा रामसिंग याला लिहिलेल्या पत्रात जयसिंग म्हणतो, न जाणो बादशहा शिवाजीचा वधकरावयाचा, तुम्ही अत्यंत सावधगिरी बाळगावी. कोणत्याही परिस्थितीत तुझे संरक्षण करीन असे मीशिवाजीला वचन दिले आहे. माझ्या वचनाचा आडोसा घेऊन औरंगजेब शिवाजीचा विश्वासघात करील असेतू होऊ देऊ नकोस. त्यापेक्षा आपले कुटुंब नष्ट होऊन गेले तरी चालेल.
फिदाईखानच्या वाडयात शिवाजी महाराज राहण्यास गेले की तेथे गळा दाबून त्यांचा खून करण्यातयावा व तेथेच त्यांना पुरण्यात यावे असा औरंगजेबाचा हेतू होता. पण महाराजांनी हा हेतू सफल होऊ दिलानाही. महाराज आग्य्राच्या तुरुंगातून निसटले. लेखकाने नमूद केले आहे की, महाराजांचा प्रवास अत्यंतअडचणीचा व डोंगरदऱ्यातून होत होता. इतरांना ते अंतर कापायला तीन दिवस व तीन रात्र लागले असतेते अंतर महाराज एका रात्रीत कापून काढत.
मनुचीने महाराजांबद्दल नमूद केले की,शिवाजी महाराजांनी तलवारीच्या बळावर एक नवीन राज्यनिर्माण केले. बलवान मोगलांना त्यांनी क्षणाची उसंत मिळू दिली नाही.
शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्यावर काही काळानंतर राजा जयसिंगही मरण पावले. त्यानंतर हिंदूंचारक्षणकर्ता उरला नाही. ही संधी साधून औरंगजेबाने हिंदूंवर जिझीया कर बसविला.
संभाजी महाराजांना औरंगजेबानं कशा प्रकारे ठार केलं याचं वर्णन करताना मनुची सांगतो, संभाजीराजांची उंटावरुन धिंड काढल्यावर बादशहानं संभाजी महाराजांना आपल्यासमोर आणण्याची आज्ञाकेली. तेथे संभाजी राजांचे शरीर एका कुऱ्हाडीनं फोडून त्यांचं ह्दय बाहेर काढण्यात आलं. तेझाल्यावर राजांचं शरीर उकिरडयावर फेकून देण्यात आलं. कोल्हयाकुत्र्यांनी त्यांचा निकाल लावावा हा हेतूहोता.
चमत्कार की आतिशयोक्ती
या ग्रंथांच्या चौथ्या भागात मनुचिने औरंगजेबाच्या दक्षिणेकडील मोहिमेचा वृत्तांत दिलेला आहे. यामोहिमेच्या वेळी औरंगजेब अतिशय वृध्द झाला होता. युध्दाबद्दल आपल्याला खुमखुमी आहे हेदाखविण्याची त्याला हौस होती. पालखित बसल्या बसल्या तो म्यानातून तलवार बाहेर काढायचा वएकदा इकडे व एकदा तिकडे फिरवायचा. धनुष्याशी सुध्दा तो असाच चाळा करायचा. मात्र वृध्दत्वयेऊनही तो सैन्याच्या बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष पुरवायचा. छावणीत त्याचा अधिकाधिक वेळ कडकप्रार्थना व उपासतपास यात जायचा. 1705 च्या सप्टेंबर महिन्यात औरंगजेब आजारी पडला. 12 दिवसतो दरबारात आला नाही. हळूहळू तो सावरला. मात्र या काळात सर्व बाजूंनी त्याच्यावर संकटं कोसळतहोती. साम्राज्यात बंडाळया होत होत्या. मराठयांची आक्रमणे वाढली होती. 1706 सालच्या नोव्हेंबरमध्ये औरंगजेब पुन्हा आजारी पडला. पाच दिवस तो बाहेर आला नाही. मात्र त्यातून तो पुन्हासावरला.
चमत्कार की आतिशयोक्ती
औरंगजेबाचं तिसरं आजारपण 7 फेब्रुवारी, 1707 ला मनुचिने नोंदवलं.यावेळी औरंगजेबअहमदनगरजवळच्या छावणित होता. या आजारपणानंतर औरंगजेब उठू शकला नाही. आणि 4 मार्च, 1707 ला मध्यान्हांनंतर त्याचा मृत्यू झाला. तेव्हा प्रचंड वावटळ उठली. छावणीतील सर्व तंबू उखडूनपडले. अनेक लोक धुळीने गुदमरुन पडले. तीच अवस्था अनेक जनावरांची झाली. इतका काळोखनिर्माण झाला की आपण कोठे जात आहोत हे न कळून लोक एकमेकांच्या अंगावर कोसळत होते. झाडेउन्मळून पडली. खेडी उध्वस्त झाली. हे वादळ संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालू होते.
औरंगजेब हा मोठा सम्राट होता. मात्र त्याच्या मृत्यूनंतर मनुचीने वर्णिलेली परिस्थिती खरोखरचउद्भवली असेल तर तो चमत्कार समजला पाहिजे. एकिकडे क्रौर्याची परिसीमा आणि दुसरीकडे कठोरभक्तीचा (खरा वा खोटा) आदर्श असे औरंगजेबाचे जीवन होते. त्याच्या मृत्यूनंतर मुगलसाम्राज्य कोसळलेआणि नंतर हिंदुस्थानाला समर्थ शासक मिळू शकला नाही.
औरंगजेब आणि मुगलांच्या इतिहासाचा जवळून साक्षिदार असलेला मनुचीचा हा वृत्तांत एखादयाचित्तथरारक कादंबरीसारखा रंजक आणि तसाच दाहक सुध्दा.
000
सुरेश वांदिले,