निरामय आंनदी आयुष्यासाठी स्वच्छतेचे सातत्य
महात्मा गांधी यांना स्वातंत्र्यप्राप्तीएवढच देशातील स्वच्छतेचं उद्दिष्ट महत्वाचं वाटायचं. स्वातंत्र्य संग्रामासाठीसातत्याने प्रेरणा देणाऱ्या विविध उपक्रमांना सुरुवात आणि गती देतानाच त्यांनी स्वच्छतेचा कार्यक्रमहीप्रभावीपणे राबवला. यंदा दोन ऑक्टोबरला पंतप्रधानांनी स्वच्छ भारताची घोषणा देऊन सर्वांना स्वच्छतेसाठीकार्यरत केलं.
स्वच्छतेतूनच समृध्दीचा मार्ग स्पष्ट दिसू लागतो. आपलं घर स्वच्छ, टापटीप,नेटकं असेल तर घरातसकारात्मक उर्जा कार्यरत राहते. ही उर्जा प्रत्येक क्षण उत्साहाने व्यतित करण्याची प्रेरणा देत राहते. घराचंआनंददायी वातावरण स्वच्छतेवर अवलंबून असतं. अशा स्वच्छ घरी लक्ष्मी नांदते असं आपण पूर्वापार ऐकतआलो आहोत. यास सुध्दा हे वस्तुनिष्ठ कारण असावं. स्वच्छ घरातील व्यक्ती प्रसन्नतेनं घरातील वा कार्यालयीनकामकाजात सहभागी होण्याची अधिक शक्यता असते. त्यातून सर्जनशील उत्पादकता उच्च श्रेणीची राहू शकते.
कागदपत्रांचा निचरा
घरात आणि कार्यालयात सुध्दा आपण अनेक कागदपत्रे सतत गोळा करत राहतो. याचा कधीतरी उपयोगहोईल असं आपणास वाटत राहतं. पण फार कमी वेळेस अशा कागदपत्रांचा उपयोग होतो. विशेषत: जेव्हा गरजभासेल तेव्हा आपणास ही कागदपत्रे एकतर मिळत नाही किंवा अशा कागदपत्रांचा शोध घेण्यात बराच वेळजातो. त्यामुळे एक वेगळाच ताण मनावर येतो. कामास विलंब होतो. त्यामुळे घरातील आणि कार्यालयीनकागदपत्रांची नियमित स्वच्छता ही एक चांगली सवय आपण लावून घ्यायला हवी. वेळेच्या व्यवस्थापनासाठी हाउत्तम घटक ठरतो. त्यातून कार्यक्षमता वाढू शकते.
घरातील स्वच्छता
घरातील स्वच्छतेची जबाबदारी केवळ महिलेचीच असल्याचा बहुतेक पुरुष मंडळीचा समज झालेला आहे. घरी आपली पत्नीच बहुदा स्वच्छतेकडे लक्ष देते. आपली वृध्द आईसुध्दा आपला सहभाग देते.घरात मुलगीअसेल तर तिच्या कडूनहीही अपेक्षा केली जाते. आपण मात्र हा आपला प्रांतच नव्हे असं वागतो.घरातीलबाथरुम वा शौचालयाची स्वच्छता किती पुरुष मंडळी करत असावीत याचे देशव्यापी सर्वेक्षण करण्याची गरजआहे. स्त्री-पुरुष समानेतचा नारा देणाऱ्या आपल्या समाजाचं पितळ लखलखितपणे उघडं पाडणारं सत्य त्यातूनसामोरे येऊ शकतं. घरातील स्वच्छतेच्या कार्यात पुरुषांचा सहभाग हा पतीपत्नीमधील उत्तम नातेबंध निर्माणकरण्यासाठी होऊ शकतो. सहकार्यातून स्नेह आणि स्नेहातून कायमस्वरुपी सौहार्द असा प्रवासही घडू शकतो.
शारीरिक स्वच्छता
शारीरिक स्वच्छतेबाबतची जागरुकता हा सुध्दा संशोधनाचा विषय ठरु शकतो. केवळ पाच मिनिटात आंघोळकरणं ही शारीरिक स्वच्छता ठरु शकत नाही. आपल्या देशात बहुतेकजण दंत आरोग्याच्या अनंत समस्यांनी ग्रस्तआहेत. सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी दात स्वच्छ करायला हवेत. पण सकाळी आपण दातस्वच्छ करण्या ऐवजी घासतो. हे घासणंही उरकण्यापुरतच असतं. रात्रीच्या भोजनानंतरच दात स्वच्छ करणं हेअनेक कुटुंबात घडत नाही. मुख आरोग्यासाठी दाताची स्वच्छता सर्वाधिक महत्वाची असूनही बहुतेकजण त्याकडेदुर्लक्ष करतात. हातापायाची नखं वेळोवेळी काढणं, त्यातील मळ स्वच्छ करणं ही बाबही आपण गांभीर्यानं घेतनाही. केसांची स्वच्छता दुर्लक्षित राहते. नियमित तेल लावणं, केस व्यवस्थित विंचरणं, हानीकारक ठरणारनाहीत अशा दर्जेदार शॅम्पू आणि कन्डिश्नरनं डोकं स्वच्छ करणं, डोक्यात काही पुरळं झाली असतील तर त्यावरतत्काळ उपाय करणं असं फार कमी वेळा घडतं.
परिसर स्वच्छता
घराच्या स्वच्छतेसाठी आपल्यापैकी बहुतेकजण आग्रही असतात. पण तेवढेच आग्रही आपल्या परिसरस्वच्छतेसाठी असत नाहीत. हा चमत्कारिक विरोधाभास आपल्याकडे सर्वत्र दिसून येतो. इकडेतिकडे बघत हळूचखिडकीतून बाहेर कचरा फेकण्याची वा केळाची साल फेकण्याची आपली सवय अद्याप गेली नाही. घरातीलस्वच्छता जशी सकारात्मक उर्जेची प्रेरणा देते, त्याचबरोबर परिसर स्वच्छता कार्यक्षमतेस नवे पैलू देण्याससहाय्यभूत ठरु शकते.
परिसर स्वच्छता ही आपली जबाबदार मानत नसल्याने आपणास आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावं लागतं. छोट्या-मोठ्या आजारांनी बहुतेक सर्वजण त्रस्त आहोत. त्यामुळे निश्चितपणे आपली व्यक्तिगत कार्यक्षमताप्रभावित झाली आहे. आपला बहुमूल्य वेळ आणि पैसा आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी व्यतीत होत आहे. आनंदी आणि निरामय जीवनासाठी देऊ शकणारा आपला वेळ आपणास या नकारात्मक बाबींकडे द्यावा लागतआहे. ही बाब लक्षात घेऊन त्यावर गांभीर्याने विचार केला तर परिसर स्वच्छतेकडे घराच्या स्वच्छते एवढेच महत्वप्रत्येक व्यक्तिने द्यायला हवं. ही कृती करताना दुसऱ्या घरीच शिवाजी जन्माला यायला हवा ही मानसिकता आतादूर करण्याची वेळ आली आहे.
मनातील कचऱ्याचा निचरा
आपल्या मनात अनंत वाईट गोष्टी सातत्याने साचत राहतात. त्या तशाच ठेवण्याकडे बहुतेकांचा कल असतो. जुने हिशेब चुकवण्यासाठी त्यांचा उपयोग करता येईल असं आपणास वाटत राहतं. वारंवार आपण आपल्यामनास तसं बजावत असतो. वेळप्रसंगी जवळच्यांकडे बोलूनही दाखवतो. जुन्या वाईट गोष्टिंचा हा गाळ स्वच्छ नकरण्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वावर मोठा प्रभाव पडतो. नकारात्मकता वाढते. ती चेहऱ्यावर दिसतेच पण त्याचेशारीरिक विविध परिणाम होत राहतात. हळूहळू विषप्रयोगासारखे हे परिणाम असतात. त्यातून विविध शारीरिकव्याधी उत्पन्न होण्याची शक्यता असते. तणाव वाढतो. मधुमेहासारखा अजगर कधीच आपणास विळखा घालूनबसतो, हेही लक्षात येत नाही. जुन्या वाईट बाबींचा गाळ किती साचून ठेवायचा ,त्याचा उपसा किती करायचा,केव्हा करायचा, हे व्यक्तिपरत्वेच ठरत असते. कारण आपण भूतकाळातच अधिक रममाण होण्यात सुखमाणत असतो. त्यातून विशेष काही साध्य होत नाहीच उलट नात्यांमध्ये दरी पडते. कामकाजावर परिणाम होतो. आपण मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कमकुवत होतो. त्यामुळे मनातील गाळ सतत स्वच्छ करण्याचा निर्धारकरुन तो पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करायला हवा.
आधुनिक उपकरणांमधील कचरा
आपण टेन्कोसेव्ही झालो आहोत. संगणक,मोबाइल, लॅपटॉप,टॅब यांचा वापर वाढला आहे. पण यायंत्रांमध्ये सुध्दा आपण अनावश्यक बाबी कोंबून ठेवायला लागलो आहोत. वाट्टेल ते डाऊनलोड करुन ते साठवूनठेवतो. फोटोवर फोटो अपलोड करत जातो.त्याचा दबाव हार्डडिस्कवर येतो. डाऊनलोड करताना विविध प्रकारचेव्हायरस गॅजेट्समध्ये प्रवेश करु शकतात. ही बाब लक्षात घेता आपल्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्समध्ये प्रारंभापासूनचकचरा होऊ देऊ नये. असा कचरा कळत न कळत झाला असेल तर तो सतत स्वच्छ केला पाहिजे. त्यामुळेइलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचे आयुष्य आणि कार्यक्षमता वाढेल आणि आपल्यावरही ताण येणार नाही.
स्वच्छतेचं महत्व हे असं आहे. केवळ दोन ऑक्टोबरला प्रतिकात्मक स्वरुपात हाती झाडू घेऊन स्वच्छता होणारनाही. ते तात्पुरतं ठरेल. कोणतीही तात्पुरती गोष्ट काहीही साध्य करु शकत नाही. आनंददायी निरायम जीवनआणि यशस्वी आयुष्य तर नक्कीच नाही. त्यात सातत्यच हवे. मग ते व्यक्तिगत ,मानसिक स्वच्छता असो कीसार्वजनिक स्वच्छता.