फजिती : श्री गीता ते कु.एकता..
आपला जेव्हा मामा किंवा पोपट बनतो तेव्हा त्या घटनेला फजिती म्हणतात. अशा घटनेस फजिती हे नाम ज्या कुणास सुचलंअसेल तो निश्चितच शेक्सपियरपेक्षा मोठा प्रतिभावंत (किंवा प्लेटोपेक्षा मोठा भाष्यकार ) असला पाहिजे. कारण हे जे काहीफजिती प्रकरण आहे ते, दिव्यत्वाची तेथे प्रचिती आणून देणारं असच आहे.
या जगात फजिती नामक जे काही मामा/पोपट नसतं तर काय
झालं असतं याचा कधी कुणी विचार केलाय का ? कदाचित केलाही असेल. पण हा विचार अलिबाबाच्या गुहेत त्यानेकडिकुलूपात बंद करुन ठेवला असल्यानं तो आपल्यापुढे उघड झालेला नाही. त्यामुळे साप्रंतकाली हे महान कार्य आम्हीचकरायचं ठरवलं आहे. (यामुळे आमचा फजितवाडा होणार नाही, अशी बाबाजींच्या चरणी मनोभावे प्रार्थना.)
1
फजितीच्या पाऊलवाटा आम्ही जेव्हा धुंडाळू लागलो तेव्हा थेट महाभारत काळात पोहचलो. कुणाला महाभारत हा प्रेमाचाप्रवास वाटतो, तर कुणाला सुडाचा प्रवास. मात्र आमच्या तीक्ष्ण नजरेला असं लक्षात आलं की महाभारत हा फजितीचासुरम्य, सुरस आणि सुव्यवस्थित असा प्रवास ठरतो. फजितीचे फायदे आणि तोटे मनुष्यजातीपुढे ठसठशितपणे ठेवण्यासाठीव्यासमुनींनी त्याची रचना केली असावी. फजितीच जर नसती तर महाभारत घडलं नसतं. यास पुरावा काय ?असा सवालआर्यवर्तातील 90 टक्के सुज्ञांच्या मनी येऊ शकतो.
तर बघा, इंद्रप्रस्थात जेव्हा पांडवांनी ( सिनिअर आणि ज्युनिअर कौरव भ्राताश्रींनी त्यांच्यावर बालपणी आणि वयातआल्यावर केलेल्या सर्व फजितींवर मात करीत ) मयसभेची निर्मिती केली. (मयसभा नामक महाल किंवा वाडा हा फजितीचेआद्य स्मारक ठरवायला काही हरकत नाही.) जे दिसतं ते प्रत्यक्षात नसतं.असा काहीसा चमत्कार या महालाच्यावास्तुविशारदानं केला. म्हणजे फजिती करणं हा त्याचा मुख्य उद्देश होता हे सिध्द होतं.
अशी ही मयसभा बघायला कौरवांसह तेव्हाच्या सर्व ज्येष्ठ कनिष्ठ राजेमहाराजांना पांडवांनी निमंत्रण धाडलं. कौरवश्रीदुर्योधन ही मयसभा बघता बघता एके ठिकाणी पाणी समजून ओलांडून जावू लागले तर भिंतीला धडकले. सौभाग्यवतीद्रौपदीवहिनी नेमक्या त्याच क्षणी तिकडून आपलं नवनवं वैभव मिरवत लगबगिनं चालल्या होत्या. कौरवश्री दुर्योधनांची हीफजिती त्यांच्या नजरेत पडली. त्या फिस्सकन हसून गेल्या. (आमच्या मिसेसही तिथे त्याक्षणी असत्या तर त्याही फिदीफिदीहसल्या असत्या. एव्हढेच काय राणी एलिजाबेथ तिथे असत्या तर त्या कदाचित हसल्या नसत्या मात्र महाराणीला शोभेलसेस्मित मात्र त्यांनी नक्कीच केले असते. असो.) नेमका हाच तो क्षण जिथे पुढील साऱ्या महाभारतीय संघर्षाची बीजं रोवलीगेली. या फजितीने कौरवश्री दुर्योधनांच्या मनात अपमान के बदलेकी आग जी पेटली ती द्रौपदी वहिनींच्या वस्त्रहरणनामेअत्यंत अश्लाघ्य फजिती कृत्यापर्यंत पोहचती झाली. श्रीकृष्णाने नेमक्या त्याक्षणी हस्तक्षेप करित द्रौपदी वहिनींना वस्त्रांवरवस्त्रे पुरवून कौरव आणि कंपनीची फजिती करुन या काळ्याकुट्ट प्रकरणावर पांघरुन घातले. या फजितीने द्रौपदी वहिनींच्यामनातही बदले की ज्वाला प्रज्वलित झाली आणि तिचा प्रवास अर्थातच कौरवश्री दुर्योधनांच्या बदलेकी आग सोबतचसंमातररीत्या कुरुक्षेत्रापर्यंत झाला.
कुरुक्षेत्रावर सूर्याला खोटं खोटं अस्तास पाठवून, कौरववीर जयद्रथ यांना श्रीकृष्णानं फजित केलं आणि त्यांचा काटाकाढला. एैरावताच्या आडून नरो वा कुंजरो वा हे प्रकरण आचार्य द्रोणाचार्य फजित व्हावे यासाठीच रचल्या गेल्याचही स्पष्टचदिसतं. पितामह भीष्मांचं सगळं वावरणं हे कौरवांच्या फजितीला फुस देणारं होतं. सारथीश्री शल्याने तर राधेय कर्णाचीनेमक्या क्षणी फजितीच घडावी याचा पण केला होता.)
2
असो.
अशा या विविधांगी फजितीतून महाभारताचा महासंग्राम घडला. मात्र या महासंग्रामाच्या प्रारंभी श्रीकृष्णांच्या प्रतिभेतूनप्रसवलेली गीता, ही अंखड मनुष्यजातीला मिळालेली अव्दितीय ,अनुमप अशी भेट होय.
असं समजा जर कौरवश्रीं दुर्योधनांची फजितीच झाली नसती तर? महाभारत युध्दाच्या रणभेरी वाजल्या नसत्या आणिगीतेच्या महानिर्मितीचा मुहूर्त टळला असता. त्यामुळे पुढे शतकानुशतके या गीतेने कित्येक विव्दान, गुरु, स्वामी, महंत, संशोधक यांना वैचारिक, बौध्दिक, तात्विक खाद्य पुरवलं, ते मिळालं नसतं.
गीतेनेच ज्ञानेश्वरांना अमृतानूभव दिला. त्यावर त्यांनी जे चिंतन-मंथन केलं ते मराठीतलं आजवरचं सर्वात वैभवशालीसाहित्य लेणं ठरलय.आणि मराठीतील तत्वचिंतकांना त्यावर भाष्य करण्याचा, त्यातील व्याक्रण ते प्रतिमा शोधांचा एकअखंड स्त्रोत मिळाला. कित्येक मराठी प्राध्यपकांच्या पीएचडी ते एमफिलचीही सुपरफ्री सोय सुध्दा झाली.
बघा बघा, एका फजितीतून महाभारत युध्द, युध्द प्रसंगी गीतेची निर्मिती, गीतेतून ज्ञानेश्वरीची प्रेरणा, टिळकांचेगीतारहस्य, विनोबांची गीताई, असं वैभव उदयास आलं. अजुनही त्यात खंड कसा पडलाच नाही. मॅक्समुल्लरनामेजर्मनपंडितला गीता समजून घेण्यासाठी संस्कृत शिकण्याची प्रेरणा आणि उर्जाही मिळाली. त्यामुळे मूळ संस्कृतातीलगीतेमध्ये असणारी विविध रहस्ये त्यास कळली असावित. (त्या रहस्याचा त्याने त्याच्या देशाच्या हितासाठी कसा फायदाहोईल याची गुप्त सुत्रेही लिहून ठेवली असावित. याचा (शक्यतेच्या पातळीवरील) पुरावा हाच की जर्मनीने चौथ्यांदाजागतिक फुटबॉल स्पर्धा जिंकली. हिंदुस्थानास आणखी 10 हजार वर्षे तरी या स्पर्धेतील सहभाग शक्य होईल असं वाटतनाही. लावा पैज! ) अशी ही फजिती. एका टोकापासून ते दुसऱ्या टकमक टोकापर्यंत कोणकोणत्या बाबींसाठी कारणीभूतठरणारी.
3
शुर्पणखेची फजिती आणि पुढे श्री हनुमानाने केलेली लंकाधिपती यांची आणि लंकानगरीची फजिती या दोन बाबीरामायणाच्या केंद्रस्थानी नाहीत का? या फजितीच्या बेड्यांमध्ये लंकाधिपतींनी न अडकण्याचा सुज्ञपणा दाखवला असतातर संबंध आर्यावर्तातील शिवमंदिरांच्या दर्शनाचं त्यांचं स्वप्न साकार झालं असतं. त्यातून महादेवांवरची एखादी ऑल टाइमग्रेट साहित्यकृतीही साकारली असती. मात्र लंकाधिपतींची मारुतीरायांनी फजिती केल्यानं सारं काही ओम फस्स झालं.
4
ऐतिहासिक काळातही फजितीचं एक मोठं उदाहरण दिसून येतं. आपल्या शिवाजी महाराजांनी कडेकोट बंदोबस्तअसतानाही आग्य्रातून पलायन केलं आणि हिंदुस्थानचे सम्राट आलमगीर औरंगजेब यांच्या तेव्हापर्यंच्या देदिप्यमानकालखंडावर फजिताचा डाग लावला. या फजितीनं औरंगजेबांना शहाणपण यायला हवा होता. करुक्षेत्र आणि मयसभेच्यापरिघातच वास्तव्यास असूनसुध्दा कदाचित त्यांना महाभारताचे साइड इफेक्ट्स माहीत नसावेत. त्यामुळेच ते बदले की आगवगैरे ह्रदी आणि मनी चेतवून महाराष्ट्रदेशी उत्साहाने आले.आणि किरकोळ अपवाद वगळता 25 वर्षे स्वत:च्या फजितीलानिमंत्रण देत राहिले. या फजिती – फजितीत ते अल्ला-प्यारेही झाले.( खुदाच्या घरी त्यांनी मै और मेरी फजितीया हा ग्रंथरचायला काही हरकत नाही. बेस्टसेलरचा त्याला दर्जा यूँव मिळून जायचा.)
5
फजितीच्या अशा विविध शेड्स आपल्याला पौराणिक काळ ते सध्यस्थितीत दिसून येतात. फजिती हा शब्द कानावरपडल्यावर आपल्या नजरेपुढे जे काही येतं त्यामध्ये टॉमने जेरीची आणि जेरीने टॉमची केलेली फजिती. डोनाल्ड डक आणिमिकी माऊस हे ज्यांची करतात आणि त्यांची होते ती फजिती. या फजितीने गेली 75 वर्षे लहान थोरास खो खो हसवले. त्यातून वाल्ट डिस्ने यांची तिजोरी ओव्हरफ्लो झाली. लॉरेल हार्डी आणि चार्ली चॅप्लिन हेही फजिती वीरच होतेच. त्यांच्यापदोपदी होणाऱ्या फजितीवर आपण 21व्या शतकात मनमुराद हसलो,22व्या शतकातही यात फारसा फरक पडेल असंवाटत नाही.(चित्रपट रुपातले त्यांचे फजितवाडे क्लासिक बिसिक समजले जातात. आता हे आपलं सुदैव्य की दुर्देव्य ?) फजिती – प्रयोगात सोन्याची खान दडली असल्याचं या तिन्ही महामानवांना चांगलंच कळलं होतं.
सासू-सुनेचं नातं हे टॉम (मांजर) आणि जेरी (माऊस)यांच्या सारखंच असतं,हे पारंपरिक सत्य. पण या सत्याच्याआधारावर टीव्हीच्या छोट्या पडद्यावर नयनरम्य खेळ मांडण्याचा जुगार कु. एकताताई कपुरांनी इतक्या हुषारीनं खेळला कीगेली दोन दशके हिंदुस्थानाच्या समस्त भगिनीमंडळाला सासु-सुनेच्या या फजितीखेळावाचून करमेनासे झालेय. याफजितखेळाने एकताताईचं चांगभलं झालं. त्यांचं स्वत:चं मोठ्ठ साम्राज्य निर्माण झालं. शिवाय अनेक टीव्ही चॅनेल्सहीसमृध्दीच्या दही-दूध-तूप-लोण्याने न्हावू लागले.
फजितीचं महात्म्य किंवा महत्व हे असं आहे. सध्या भारतातील सर्वात शक्तीशाली व्यक्ती श्रीयूत मुकेश अंबाणी आणिजगातील सर्वात शक्तीशाली व्यक्ती श्रीयूत बराका ओबामा यांच्यासह फजित
झाला नसेल असा एकही माणूस या जगात सापडायचा नाही. कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर आपल्यापैकी प्रत्येक जणफजित झालाच्च असतो. फजिती झाली नाही असा माणूस शोधून देणाऱ्यासाठी आपण एक कोटीच काय दहा कोटीचेहीबक्षीस जाहीर करु शकतो.
फजितीची गंमत अशी असते की माणूस एकदा फजित होऊनही पुन्हा पुन्हा फजित होत राहतो. एका फजितीतून तोशहाणा व्हायला नको का ? पण तसं काही होत नाही. फजितीमध्ये अशी कोणती एनर्जी दडलीय? किंबहुना फजितीचालॉ ऑफ अट्रॅक्शन काय असावा बरं? शेन वार्नच्या प्रेमात पडल्यावर फजितीचा टिळा भाळी लागणार हे माहीत असूनहीश्रीमती लिझ हर्ली सारख्या महाबिलंदर महिलेसह एकापाठोपाठ एक कुमारिका, आणि कुणाच्या तरी भूतपूर्व सौभाग्यवतीत्याच्या प्रेमात पडतातच ना. हिंदी हॉरर चित्रपट प्रेक्षकांची पुन्हा पुन्हा फजिती करत असले तरी असे निर्बुध्द चित्रपटबघण्यासाठी पुन्हा पुन्हा थिएटरकडे जाण्याची शक्ती या प्रेक्षकांकडे कुठून येते? फजितीच्या अवतीभोवती असे कितीतरीप्रश्न फिरतात. हे सारे प्रश्न कुट झाले आहेत. सुटायचे नाव नाहीत.
माणसाने हत्तीचा आदर्श ठेवला पाहिजे याबाबत. कधीतरी म्हणे (कल्पनेतल्या) हत्तीची,मुंगीने (अर्थातच कल्पनेतल्या) फजिती केल्याचे आपल्या कानावर आलेच आहे. हत्ती तेव्हाच शहाणा झाला. याने कानाला खडा लावला आणि तो मुंगीजाणाऱ्या रस्त्याकडे फिरकलाच नाही. गाढवानं एकदाच वाघाचं कातडं पांघरल नि तो फजित झाला. पुन्हा तो त्यावाटेलागेलाच नाही. बेडकानं एकदा स्वत:ला फुगवून बैल होण्याचा प्रयत्न करुन स्वत:ची फटफजिती करुन घेतली. या फजितीने तोशहाणा झाला. तेव्हापासून त्याने एकाही बैलाकडे डोळे उंचावून बघितलं नाही. एका गाढवाला,एका बेडकाला आणि एकाहत्तीला जर हे जमू शकते तर (हत्तीवर स्वार होण्याचा पराक्रम गाजवणाऱ्या ) शहाण्यासुरत्या माणसाला कां बरे जमू नये. खरंतर माणसाच्या शहाणपणावरच शंका घेण्यासारखी ही स्थिती आहे. माणूस स्वत:ची फजिती पुन्हा पुन्हा करुन घेतो. फजितीतून एकदाच गीता प्रसवू शकते आणि एखादीच एकता (कपूरला) साम्राज्य निर्माण करु शकते, हे आपण कधी बरेलक्षात घेणार?
6
मानवाची एकदा फजिती झाली तरी त्यातून तो काही धडा शिकेलच असं ठामपणे सांगता येत नाही. त्यामुळे फजितीचंमानसशास्त्र, समाजशास्त्र किंवा अगदी अर्थशास्त्रही समजून घेण्यासाठी संशोधन होणं गरजेचं वाटतं.फजितीचं सुध्दा एकतत्वज्ञान असू शकतं. सौंदर्यशास्त्रही असू शकतं. पाश्चिमात्य देशांमध्ये अनंत बारिक बारिक विषयांवर संशोधन होत असतानाया एका विषयाकडे कुणा
प्रज्ञावंताला कां वळावं वाटलं नसेल हो.
माणूस फजित कां होतो ? खरोखरच होतो की झाल्यासारखं दाखवतो ? माणसाला दुसऱ्याची फजिती झालेली कांआवडते ? हा खेळ तो सतत कां खेळत राहतो ? फजिती उच्चश्रेणीची असते की कमी श्रेणीची असते की फजितीलाकोणतीच श्रेणी नसते. फजितीलाही मार्क्स- लेनीन- माओच्या विचारविश्वातल्या वर्गबिर्ग संघर्षाची धार लागलेली असतेका? असे कितीतरी प्रश्न निर्माण होऊ शकतात. फजिती पासून एकाही माणसाची समजा सुटकाच नसेल तर मग त्यानेफजितीचे रितसर प्रशिक्षणच कां घेऊ नये?
फजितीचे प्रशिक्षण हा (मेबी) मुर्खपणा असला तरी प्रशिक्षण घेतलेल्या माणसाची फजिती आणि अप्रशिक्षित माणसाचीफजिती यात अंतिमत: गुणात्मक फरक राहू शकेल. असं काही प्रशिक्षण असतं हे कळलं तर ज्या उच्चभ्रूंना आपली संभाव्यफजितीही स्मार्ट आणि
डिझाइन्ड अशी व्हावी ,असं वाटत असते ती मंडळी अशा प्रिमिअम फजिती ट्रेनिंगसाठी नक्कीच रांगा लावतील. जसंसौ.नितावहिनी अंबाणींच्या इंग्रजी मीडियमच्या शाळेत शाहरुख, सचीनची मुलं शिकायला जातात तसंच प्रिमिअमफजिती क्लासमध्येही जाऊ शकतात. महानगरपालिकेचीच शाळा परवडू शकणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी व त्यांच्यासाठीनिम्नश्रेणीचे किंवा परवडू शकणाऱ्या फजितीचे ट्रेनिंग कम कौन्सेलिंग क्लास सुरु करता येतील.
फजिती प्रशिक्षण अथवा शिक्षण हा अद्याप तरी व्हर्जिन म्हणजेच ज्याकडे कुणाचेही लक्ष गेलेले नाही असा मोठाआवाका, आकाश आणि व्याप्ती असलेला विषय असल्याचं सकृतदर्शनी दिसून येतं. विद्यापीठ अनुदान आयोगास किंवाएखाद्या डीम्ड युनिव्हर्सिटीला किंवा जगातील पहिल्या टॉप हंड्रेड मध्ये मिरवणाऱ्या अमेरिकेतल्या एकाही विद्यापीठाला याविषयात पदवी किंवा पदव्युत्तर पदविका किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्याचे सध्या सुचले नसेलही. पण तो क्षणकधीही येऊ शकतो. सध्या इनोव्हेटिव्ह आणि सेल्फ फायनांसिंग अभ्यासक्रम सुरु करण्याचे किंवा होण्याचे चांगले दिवसजगभरात आले आहेत. फजितीचे विविधांगी , सखोल,सुक्ष्म आणि ज्याला हवे तसे टेलरमेड अभ्यासक्रम नक्कीचगुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार फजिती होण्यासाठी किंवा करवून घेण्यासाठी उपयुक्त ठरु शकतात.
या विषयातच स्वतंत्र विद्यापीठ होण्याची क्षमता सुध्दा दडलेली आहे. ज्या ठिकाणी कदाचित जगातील पहिला अधिकृतफजितवाडा म्हणजेच मयसभेची उभारणी झाली त्या खांडववनातच हे विद्यापीठ उभारल्यास त्या पहिल्यावहिल्याफजितवाड्याचे यथोचित स्मारकही उभारल्याचे समाधान मिळू शकेल. त्याभूमितील फजितीचे गुणधर्म सिलॅबसला अधिकसमृध्द करेल. शिवाय अनुभवसिध्दता आपोआपच मिळू शकेल. एकूणच या विषयामध्ये अत्यंत गतिने,करलो दुनियामुठ्ठीभरमे म्हणणाऱ्या उद्योगापेक्षाही जग पादाक्रांत करण्याची क्षमता सुप्तावस्थेत दडलेली आहे. या अशा उद्योगाची उभारणी(उदा- या विद्यापीठाचे जगभरात उपकेंद्रे, पाठ्यपुस्तके, अपेक्षित प्रश्नात्तरे, नोट्स, गाइड्स, शिकवणी वर्ग, क्रॅशकोर्स, विषय शिकवण्यासाठी प्राध्यापक, संस्था चालवण्यासाठी इतर कामगार वर्ग, ऑडिओव्हिज्यूएल्स साधने, ऍ़प्सइत्यादी इत्यादी. ) आणि पायाभरणी शक्य असल्याचं कुणाचही लक्षात यायला काहीच हरकत नसावी.
7
अल्टिमेट सौंदर्यवती मर्लिन मन्रोच्या आकर्षंणानं जे.एफ.केनेडिंना आणि दुष्यंताला दयमंतीनं वेडं केलं होतं तसाच निष्कर्षमाणसाच्या फजिती आकर्षणाबद्दल काढता येतो. कदाचित त्यामुळेच त्याच्या सुपिक बुध्दीतून एप्रिल फूलच्या रुपानेफजिती सेलिब्रेशनचा जन्म झाला असावा. एक एप्रिलला एकमेकांची मनसोक्त फजिती करण्याची प्रेरणा मानवास मिळालीहा त्याचा पुरावा.
या दिवशी नवं आर्थिक वर्षं सुरु होतं. सर्वसामान्य माणूस कायम आर्थिकदृष्ट्या फजित होत असतात म्हणून त्या फजितीचेपुण्यस्मरण करण्यासाठीही हा दिवस साजरा करण्याचा (दुष्ट) हेतूही यापाठिमागे असू शकतो. एकदा आर्थिक फजितीझाली, आता कानाला खडा,असं बहुतेकांच्या बाबत काही घडत नाही. आर्थिकसंपन्नतेचा चमत्कार करण्याची महाशक्तीघेऊन पृथ्वीतलावर अवतरलेल्या मुंबईच्या हर्षद मेहतापासून तर नाशिकच्या मधुकर चव्हाण यांच्यासारख्या योगीपुरुषांवरविश्वास ठेवण्याची जी अव्दितीय शक्ती मानसाला प्राप्त होत आलीय, तीस पुन्हा रिचार्ज करता यावी आणि अपारउत्साहानं या योगीपुरुषांपुढे लोंटागण घालण्याची प्रेरणा एक एप्रिलला मिळत राहावी असा सुध्दा एक हेतू एप्रिल फुलसेलिब्रेट करण्यामागे असू शकतो. म्हणजेच फजितीचा प्रवास वेदनादायी न ठरता तो सुखकारकच वाटावा यासाठी मानावानेएक एप्रिलला दिलेला अर्थ आणि अन्वयार्थ त्याच्या झक्कास प्रतिभेचा आणखी एक सॉलिड पुरावाच.
8
जागतिक क्रमवारितील श्रेष्ठ टेनिसपटू कु. मारिआ शारापोव्हा यांना जेव्हा सचिन तेंडूलकर यांच्याबध्दल विचारण्यात आलंतेव्हा आपणास सचीन माहीत नाही असं त्यांनी प्रांजळपणे सांगितलं. तेव्हा आपण सोशल मीडिआवरुन वाट्टेल ते लिहूनत्यांची फजिती करण्याचा भीमपराक्रम केला.
कु.मारिआला सचिन तेंडूलकर माहीत नसेल. पण आपल्यापैकी कितीकांना रमेश तेंडूलकर माहीताय? आम्ही ठामपणेसांगू शकतो की 99 टक्के भारतीयांचे आणि 98 टक्के महाराष्ट्रीयांचे रमेश तेंडुलकर यांच्याबध्दलचे उत्तर त्यांचा मोठ्ठाचपोपट किंवा मामा करणारं ठरु शकतं. भीम मोठा की दु:शासन मोठा याचं उत्तरही आपली फजिती करणारं ठरु शकते.
त्यामुळेच फजितीचा खड्डा कसा आपला बळी घेईल याचा नेम नाही. परवा ती कु.अलिया भटनामे एका नटीलादूरचित्रवाहिनीच्या एका प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात श्री पृथ्वीराज चव्हाण हे कोण, असा प्रश्न विचारला गेला. तेव्हाकु.अलिआ यांनी ते देशाचे राष्ट्रपती आहेत असं उत्तर देऊन फजितीच्या खड्डयाला स्वत:हून निमंत्रण दिलं. तिची ही फजितीआपण मस्त एन्जॉय केली.फीफी हसलो बिसलो.
पण आपण सुध्दा कमी आहोत का तिच्यापेक्षा ? आपण तिचेच भाऊबंद. रमेश तेंडूलकर कोण हा प्रश्न स्वत:लाचविचारा ? या प्रश्नाचं उत्तर कु.अलिया आणि आपण मुंबई मेट्रोच्या एकाच डब्यात बसलो असल्याचं सिध्द करणारं ठरेलचशिवाय आपल्या
सामान्यज्ञानाच्या फजितीचे असामान्य वर्तुळही पूर्ण करेल..
सुरेश वांदिले